मित्रांनो, हा लेख म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा आणलेला ऊत नाही तर एका निर्णयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित करणारी घटना घडलीये, त्या अनुषंगाने जुन्या एका निर्णयाचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करत आहे.. +
काही महत्वाची माहिती चीनला पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्याखाली राजीव शर्मा नावाच्या पत्रकाराला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट च्या अंतर्गत अटक करण्यात आलीये. ह्या पत्रकाराने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्स, चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या अश्या पोर्टलसाठी काम केलंय. +
ह्या माणसाकडे काही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्वाची अशी कागदपत्रे मिळाली आहेत. मुळात ह्या व्यक्तीचा लिखाणाचा कलसुद्धा साधारण अश्याच बाबीमध्ये होता.
तर...
२०१६ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेकडून ह्या राजीवशी संपर्क साधण्यात आला. +
तो सतत त्यांच्या संपर्कात असल्याचेसुद्धा सांगतात. दीडवर्षात ह्या मुक्तपत्रकाराला तब्बल ४० लाख मिळाले. त्याचसोबत प्रत्येक माहितीसाठी त्याला १०००$ मिळत म्हणजे काही महत्वाची माहिती दिली कि साधारण ६० ते ७० हजार रुपये मिळत असत.. काय कमावलं असेल विचार करा. +
अर्थात ह्याला एवढी महत्वाची माहिती कशी मिळत असेल? त्याचे नेमके कोणते डीप असेट्स संरक्षण क्षेत्रात पेरले गेले होते? त्याने आत्तापर्यंत कोणती माहिती चीनला पुरवली? हे काळाच्या ओघात कळेलच..
पण मला इथे वेगळा मुद्दा मांडायचाय ज्यावरून बऱ्याच विचारवंत लिब्राडूंची नेहमीच जळत असते.. +
ह्या राजीवला एवढे पैसे कसे मिळत असत? तर एक चिनी महिला आणि तिचा एक नेपाळी सहकारी ह्यांनासुद्धा ह्यासंदर्भात अटक झालीये कारण एका शेल कंपनीमार्फत हे सगळे पैसे ह्या राजीवला मिळायचे..
शेल कंपनी? काही आठवतंय? नोटबंदीमुळे झालेल्या असंख्य फायद्यांपैकी एक +
अतिमहत्त्वाचा फायदा म्हणजे शेल एक लाखाहून अधिक शेल कंपन्यांचा बाजार उद्धवस्त करण्यात आला. शेल कंपनी म्हणजे केवळ कागदावरची कंपनी जिला काहीच अस्तित्व नसतं जिचा उपयोग बऱ्याचदा काळ्याचं पांढरं करायला होतो. अश्या लाखाहून अधिक कंपन्या हटवल्या गेल्या म्हणजे ज्यांचे स्टेक, हितसंबंध +
ह्या अश्या कंपन्यांमार्फत जुळले गेले होते त्यांची जळणारच कि ओ. सगळ्याच शेल कंपन्या बाहेर आल्या असे माझे म्हणणे नाही पण मजबूत बांबू नक्कीच लागलेत. ह्यात शंका नाहीच. केवळ एका छोट्या फ्लॅट मध्ये शेकडो अश्या कंपन्या सुखाने नांदत होत्या. त्या जाळल्या ह्या नोटबंदीने.. +
आज एक राजीव शर्मा बाहेर आलाय.. असे अजूनही कित्येक राजीव शर्मा असतीलच कि? अश्या कित्येक राजीव शर्मांचा बाजार ह्या नोटाबंदीने उदास केला असेल? उगाच ठरावीक लोकं काही काळानं जाहीररीत्या नोटबंदीच्या नावानं उगाच बोटं मोडत नाहीत.. आणि हे सर्व तथाकथित विचारवंत
एकाच विचारसरणीचे.. हाही केवळ योगायोगच कि?
नोटबंदीने सर्वसामान्यांना त्रास झाला हे मी नाकारत नाहीच. पण त्याचे दूरगामी चांगले परिणाम आहेतच, ज्याचा विचार आधी कधीही झाला नव्हता.
कितने राजीव छुपाओगे.. सारे राजीव निकालेंगे..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)
अश्यात राजकारणावर काही व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. अश्यात बातम्यासुद्धा बघत नाहीये. बघायच्या म्हटलं तरी ते प्रकरण बघवत नाहीये. पण आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. (१/१०)
जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे लाड फडणवीसांनी चालवले आहेत कि काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. मी भाजपसमर्थक आहे पण गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून (२/१०)
लिहितोय. ते भयंकर अस्वस्थ आहेत.
पुण्यासाठी ११०० कोटी मंजूर झालेले अजित पवारांनी थांबवलेत. अजित पवारांना पुणं - पिंपरी चिंचवड किती आवडतं हे जगजाहीर आहे. जेंव्हा ते सत्तेत आले तेंव्हाच चर्चा सुरु झाली होती कि पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार म्हणून. आतलं मन (३/१०)
सुरुवातीलाच सांगतोय, लेख खूप मोठाय.. वेळ घेऊन वाचा..
१ डिसेंबर २०१९ रोजी एक लेख लिहिला होता. (लेखाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये). देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दगाबाजीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून जे भाषण केले होते त्यातले काही मुद्दे इथं परत मांडतोय.. (1/20)
१. विरोधी पक्ष वार करत असतात. जवळचा मित्र वार करतो तेंव्हा झालेली जखम तेवढ्या उघडपणे जगाला दाखवता येत नाही.. १०५ जागा येऊनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. कारण कोणी बाहेरचं नव्हतं तर घरातलंच होतं, तेही प्रचंड अव्यवहार्य.. ही भावना जेंव्हा जेंव्हा ते 'हरकत नाही' (2/20)
म्हणायचे तेंव्हा जाणवायचीच..
२. "मी परत येईन", ह्या त्यांच्या विधानावर अजून ठाम रहात येत्या काळातल्या सर्व शक्यतांसाठीची दारे खुली असल्याची ग्वाहीच दिली..
३. देवेंद्रजींचे भाषण सुरु असताना, छगनराव "मी पुन्हा येईन" तेवढं फक्त म्हणू नका जेंव्हा म्हणाले तेंव्हा, (3/20)
दादा भाजपात येणार... आता फक्त मुहूर्ताची वाट पाहणे शिल्लक..
दादा राष्ट्रवादीची संस्कृती धोक्यात आणत आहेत. दादा भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत.. साधारणपणे भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं तर भाजपवाले शांत बसून ऐकून (१/६)
घेतात नाहीतर दुर्लक्ष करण्याचा मास्टरस्ट्रोक मारतात. पण अजितदादांनीसुद्धा तेच करावं?
काल श्रीकांत शिंदेंवर प्रश्न विचारताच पत्रकाराच्या कॅमेरावर संजय राऊत थुंकले..
ह्यावर अजितदादा म्हणाले, "आपली काही संस्कृती आहे, परंपरा आहे, हैचं भान सर्वांनी ठेवावं.."
ह्यावर (२/६)
संजय राऊत भडकले आणि "धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं" म्हणत दादांच्या तोंडावर शब्दशः थुंकले..
ह्यावर दादा म्हणतात, "ते काही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो.."
अजितदादा जर भाजपचे असते तर आश्चर्य वाटलं नसतं कारण (३/६)
उद्धवसेनेला?
- ताटकळत ठेवलं गेलं. आमदार खासदार गेले. पक्षाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार. राहिलेले अजून जातील. थोडक्यात सेनेला मजबूत लागलेले तबेले पवार आणि पटोले मस्तपैकी मजा घेत बघत बसले आहेत. (२/४)
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आंबे खाऊन कोया मातोश्रीच्या अंगणात टाकत होते आणि संजय राऊत जिभल्या चाटत होते. असं करत करत मातोश्रीच्या आमराईत निवडुंग उगवलेत जे उद्धव ठाकरेंना भयंकर मऊ लागत आहेत..
आता पुढं काय करायचं हे पुन्हा सिब्बल ठरवणार म्हणजे (३/४)