"बाजार समिती नियमन मुक्ती विधेयक"
1960-70 च्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी एपीएमसी मार्केट तयार करण्यात आली. या नवीन विधेयकाने शेतकऱ्याला कृषिमाल विक्री एपीएमसी मध्ये करण्याची बंधन राहणार नाही. याने त्याच्या पुढील नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
तो एपीएमसी मार्केटमध्ये ही विकू शकतो किंवा त्याला वाटत असेल तर तो मार्केटच्या बाहेरही विकू शकतो म्हणजे या कायद्याने एपीएमसी मार्केट संपवले नाहीत तर शेतकऱ्यांपुढे एक नवा पर्याय खुला केला आहे. याने शेतकऱ्याचा काय फायदा होईल तर शेतमाल विकत घेण्यामध्ये जी एक मक्तेदारी निर्माण झालेली
आहे त्याला आळा बसेल. कोणतीही पॅन कार्ड धारक व्यक्ती किंवा संस्था शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊ शकते म्हणजे यामध्ये असणारे अडते मध्यस्थ यांना बाजूला सारून पारदर्शकपणे शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करण्याचे स्वातंत्र्य हे विधेयक देते. यावर आक्षेप असे आहेत की हे एपीएमसी मार्केट कमिटी
संपवण्याचे षड्यंत्र आहे पण ते खरं वाटत नाही. दुसऱ म्हणतात की बाजार शुल्क न मिळाल्यामुळे राज्याला तोटा होईल , आता राज्याला तोटा होईल म्हणून शेतकऱ्याला स्वातंत्र्य देऊ नये काय? म्हणून हाही मुद्दा गैरलागू आहे. अडते मध्यस्थ यांचे काय होणार असे प्रश्न उभे राहतात तर अडते मध्यस्थ यांना
शेतकऱ्यांनीच पोसावे काय? एका अंदाजानुसार पंजाब आणि हरियाना मध्ये दलालीपोटी दलालांना 654 कोटी एका वर्षात मिळाले आहे यातून त्यांचा विरोध तर नाही ना हेही तपासले पाहिजे. काही लोकांना असे वाटते बाहेर शेतकऱ्याची फसवणूक होईल? तर मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्याची अजिबात फसवणूक होत नाही काय.
ज्यांना हे स्वातंत्र्य नको आहे त्यांच्यासाठी एपीएमसीचा पर्याय खुला आहेच ना म्हणून या कायद्याने एपीएमसी संपवण्याचा घाट घातला आहे हा आक्षेप सध्यातरी खरा वाटत नाही.
फक्त मार्केट कमिटी असून चालत नाही फक्त हमीभाव देऊन चालत नाही तर त्या हमीभावाने शेतमाल विकत सुद्धा घ्यावा लागतो.
आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल हमीभावाने सरसकट विकत घेतला नाही हे आपल्या देशात नाही तर जगातल्या कोणत्याही देशांमध्ये अशी व्यवस्था नाही. बिहार सारख्या राज्यामध्ये 2007 पासून मार्केट कमिटी नाही. 1960 पूर्वी शेतमाल हा बाजार कमिटीच्या बाहेरच विकल्या जात होता
म्हणून1960 च्या आधीचा शेतकरी तुलनेने अधिक समाधानी होता याचा विचार तरी निदान आपण करायला पाहिजे.
दुसरे विधेयक हे कंत्राटी शेतीबद्दल आहे एक या विधेयकानुसार आता शेती करार पद्धतीने करता येणार आहे दुसरं त्यातून निघाणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेतमाल विकण्याचा करार
एखाद्या संस्थेसोबत किंवा भांडवलदार सोबत किंवा एखाद्या कारखान्या सोबत करता येणार आहे यामध्ये ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा प्रकार आधीही थोड्याफार प्रमाणात होत होता परंतु आता त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आहे यातून पुन्हा काय होईल तर शेतकऱ्याला आपला शेतमाल
डायरेक्ट कोणत्याही कारखान्याला विकता येणार आहे. करार पद्धतीने शेती करणे काही वावगे नाही उलट यामुळे ज्याला शेती करायची आहे तो शेती करू शकेल आणि एकंदरीतच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे एक चांगले पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही.आमच्या भागांमध्ये संत्रा आहे आणि जी संत्रा ज्यूस फॅक्टरी
होणार आहे त्यांना सीडलेस संत्रा पाहिजे परंतु आता जे संत्रा उत्पादन करतोय त्यामध्ये सीड आहे म्हणून त्या कंपनीने या भागातील शेतकऱ्यांना सीडलेस संत्र लावण्यासाठी कलमा दिल्या आणि त्यासोबत ते करार करू इच्छितात की पाच वर्षानंतर येणाऱ्या संत्रा ला आम्ही कमीत कमी या भावांमध्ये विकत घेऊ
आणि त्यापेक्षा जर जास्त भाव तुम्हाला दुसरीकडे मिळत असेल तर ते विकण्याचा पर्याय तुमच्यापुढे खुला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर करार होत असतील तर ते शेतकऱ्याच्या फायद्याचेच आहे असं म्हणायला हरकत नाही . काही लोकांना असं वाटतं की हे मोठे उद्योगपती नंतर ते करार पाळणार नाहीत
,असं होऊ शकतं शेतमालाच्या सौदेबाजी मध्ये असं अनेकदा होतं की घेतलेल्या सौद्या नंतर काही काळाने व्यापारी सौदा टाकून देतात परंतु तो सौदा होत असताना दिलेली अग्रीम रक्कम पण शेतकऱ्याला नंतर परत करावी लागत नाही ही तेवढेच खरे आहे की नाही? यामध्ये काही लोक अडचणी असे दाखवतात की तो शेतकरी
वाटाघाटी करण्यास सक्षम आहे का ? तर याचे उत्तर असे आहे की येणारी परिस्थिती, नवीन आव्हान माणसाला सक्षम बनवते .हा पर्याय त्याच्याकडे नव्हता त्यामुळे तो ते करण्यास सक्षम आहे किंवा नाही हे तो येणारा काळच ठरवेल. दुसरा प्रश्न असा विचारतात की हे व्यवसायिक छोट्या-छोट्या शेतकऱ्यांशी करार
करणार काय? तर याचे उत्तर असे आहे की आता त्याच्याकडे करार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तो करार करायचा किंवा नाही करायचा हे तो शेतकरी ठरवेल ना आणि त्यामुळे त्याला हा पर्यायच देऊ नका हे त्याचे उत्तर असू शकत नाही.
तिसरे अत्यंत महत्त्वाच बिल आहे ते म्हणजे आवश्यक वस्तुच्या कायद्यामध्ये बदल करणारे 'आवश्यक वस्तू कायदा सुधारणा बिल' खरंतर हा पूर्ण कायदाच शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे आणि म्हणून हा संपूर्ण कायदाच रद्द करायला पाहिजे होता कारण या कायद्याने शेतमालाच्या भावांमध्ये हस्तक्षेप करण्याचा
सरकारला अधिकार मिळतो आणि कोणताही सरकार वेळोवेळी शेतमालाचे भाव वाढल्यावर हस्तक्षेप करतो आणि त्याच्या किमती पडतात आणि म्हणून शेतकर्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही पण तरीही या सुधारणा विधेयकाने काही शेतमाल हा या कायद्याच्या बाहेर काढला आहे . निर्मला सीतारामन यांनी
अशी घोषणा केली होती की शेतकऱ्याला भाव न मिळण्या मागे हा कायदा जबाबदार आहे. या कायद्याने भाव मिळत नाही म्हणून हा आम्ही कायदा रद्द करत आहोत. मा. पंतप्रधानांनी सुद्धा हा कायदा शेतकर्याला पारतंत्र्यात ढकलणारा आहे आणि म्हणून आम्ही शेतमाल कायद्याच्या बाहेर काढणार आहोत अशी घोषणा केली
या सुधारणा विधेयकावर शंका घेत असं म्हणतात की, मोठ्या कंपन्या आता शेतमालाचा साठा करतील आणि मग ते चढ्या भावाने विकतील. अशाप्रकारचा साठा केल्यावर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने कारवाई करू नये असे शेतकऱ्यांचे अजिबात मत नाही. या कंपन्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकार सक्षम आहे.
त्यांनी ती करावी अश्या मताचे आम्ही आहोत. पण सरकारच्या काही घोषणा हवेतच विरतात सरकार स्वतः सुधारणेचा आव आणतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून म्हणतात परंतु कृती नेमकी उलटी करतात. या विधेयकानुसार दिलेले स्वातंत्र्य" विदेश व्यापार कायद्यांनी" हिरावून घेतलेलं आपण नुकताच पाहिलं.
आवश्यक वस्तू कायदा मधून कांदा काढला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील अशी आशा वाटत असतानाच विदेशी व्यापार कायद्याचा उपयोग करून कांदा निर्यातबंदी केली आणि कांद्याचे भाव पाडले हे आपण सर्वांनी बघितलं आणि म्हणून या सर्व
कायद्याचा उपयोग निदान सद्सद्विवेक बुद्धीने करणे हे कोणत्याही राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. चुकीचा विचार चुकीची कृती याचा विरोध आपण समजू शकतो परंतु विरोधक म्हणजे कायम विरोधच केला पाहिजे असे नव्हे. हे तीनही विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे
, स्वातंत्र्याकडे एक पाऊल पुढे टाकणारे आहे. याचे काय परिणाम होतात हा येणारा काळ ठरवेल परंतु सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती पाहता आहे त्या परिस्थिती पेक्षा हे सुधारणा विधेयक त्याचं आणखी वाटोळं करणार नाही हे मात्र नक्की.
-Dr. Ashish Lohe @threadreaderapp unroll
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
किसानपुत्र आंदोलनाचे वेगळेपन
💡साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येच्या दिवशी 19 मार्च रोजी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' करण्याची सुरुवात किसानपुत्र आंदोलनाने केली.
💡18 जून ला किसानपुत्र आंदोलनाने 'शेतकरी पारतंत्र्य दिवस' म्हटले. #19मार्च#SahebraoKarpe#18June
💡शेतकऱयांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे, ही बाब किसानपुत्र आंदोलनाने ठामपणे सांगितली.
💡शेतकरी या शब्दाची नेमकी व्याख्या करून शेतकऱयांच्या नावाखाली बिगर शेतकऱयांच्या 'कर्ज बेबाकी'चा विरोध केला. #freedom#Farmer#poverty
💡अनुदान आणि कर्ज माफी न मागता शेतकऱ्यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करणे हाच किसानपुत्र आंदोलनाचा एकमेव कार्यक्रम आहे.
💡शेतकऱ्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे हे देशविरोधी कायदे आहेत, हे किसानपुत्र आंदोलनाने ओळखले #Law
सरकारनेच जमीन अधिग्रहण कायदा राबवून, शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन तिही अत्यंत कमी दराने संपादित केली आणि भांडवलदारांच्या घशात घातली.तालुका स्तरापासून राजधानीच्या शहरापर्यंत औद्योगिक क्षेत्रासाठी जमीनी संपादित करण्यात आल्या. त्या हडपलेल्या जमिनिचे भाव आता गगनाला #antifarmerlaws#land
भिडले आहेत, हजारो हजार रुपये एका एका चौरस फूटाच्या किमतीचे झाले आहेत. एका एका उद्योगपतीकडे अशी हजारो एकर जमीन पडून आहे. अशा या सुलतानी कायद्याबद्दल मुग गिळून गप्प बसणारे लोक, आता अदानी अंबानी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावतील असा कांगावा करत आहेत. हे लोक एक लक्षात घेत नाहीत की #Ambani
ज्या दिवशी औद्योगिक घराण्यांना शेती करावी वाटेल त्या दिवशी जमीन धारणा कायदा संपलेला असेल. आवश्यक वस्तू कायदा संपलेला असेल. त्या परिस्थितीत शेतकरीही आपल्या मनाप्रमाणे किंमती घेऊन भांडवलदारांना जमीनी विकतील.
आडचण हीच आहे की, चार महिने अथवा वर्षांतून एकदा उत्पादन देणारा #FarmerBill
અમે અમારા પુસ્તકની નવી નકલને ગુજરાતી ભાષામાં રજૂ કરવા બદલ આનંદ અનુભવીએ છીએ. ગુજરાતના ખેડુતોએ આ પુસ્તક વાંચવું જોઈએ અને ખેડૂત વિરોધી કાયદાઓ વિશે જાણકારી મેળવવી જોઈએ. #Gujrati#BookLaunch#antifarmerlaws#KisanputraAndolan
📍तीन कृषी कानुनो का स्वागत लेकीन... #आवश्यक_वस्तू_कानून से कुछ कृषी उपज को निकाल देना, मार्केट कमिटी के बहर भी कृषी उपज की खरीद और बिक्री की छूट देना, या कंपनियो को किसानो से करार (#कॉन्ट्रॅक्ट) करने की पाबंदी हटाना, इन तिनो कानुनो मे आपत्तीजनक क्या है? मुझे आपत्ती नजर नही आती।
हां, कुछ कमजोरीया जरूर हैं। जैसे आवश्यक वस्तू कानून से मात्र खेतीमाल हटाना काफी नही है। यह कानून जड से उखाड फेंकना चाहीये। बाजार खुला करने की बात दुरुस्त है। करार करणे की कानून में प्रशासकीय न्याय व्यवस्था के साथ किसान ट्रिब्युनल की बात जोडी जा सकती है।
अर्थात निर्धारित दिनो मे फैसला सुनाने के निर्बंध के साथ इस ट्रिब्युनल को काम करना होगा।
जो हुवा उसे विरोध करने की जरुरत नही है। इन कानुनो से जो माहोल बनेगा उसका इस्तेमाल कर के #सिलिंग, #आवश्यक_वस्तू तथा #जमीन_अधिग्रहण जैसे #किसान_विरोधी_कानून रद्द कराने की मोहीम
हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठीमागे, असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे. शेतीविषयी मंजूर केलेल्या कायद्या नंतर उद्भवलेली परीस्थिती आणि उडवला जाणारा कोलाहल पहाता हा वक्प्रचार आठवल्या शिवाय रहात नाही.
सत्ताधारी पक्ष भाजपा, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि त्यांनी पोसलेली पिलावळ, आणि
बनावट शेतकरी संघटनांच्या नावाने काही अनभ्यस्त शेतकरी नेते मंडळी यांची अवस्था त्या हुरळलेल्या मेंढीसारखी झाली आहे.
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाने सरकारने जी बिले मंजूर केली आहेत ती खरेच सत्ताधारी म्हणतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र्य देणारी आहेत का ?
की विरोधी पक्ष म्हणतो त्याप्रमाणे शेतकरी आणि त्यांच्या जमीनी भांडवलदाराच्या घशात घालण्याचा हा डाव आहे ?
बनावट शेतकरी संघटनांच्या नावाखाली काही नेते मंडळी ज्याकडे इशारा करतात त्या हमीभावाचा मंजूर झालेल्या बिलाशी काही संबंध आहे का ?
१. नए अध्यादेश में एमएसपी का कहीं जिक्र नहीं है.
यह प्रश्न उठाने वाले यह शंका जाहिर कर रहे हैं कि व्यापारी किसानों से मनमाने कीमत पर उनके घर जाकर उनका माल खरीद लेंगे. ऐसा कहते हुए वे मानो यह आभास दे रहे हैं कि कृषि उत्पन्न बाजार समिति में होने वाले सौदों में पहले #Farmersbill2020
एमएसपी की कोई गारंटी हुआ करती थी. सच्चाई यह है के देश के किसी भी राज्य का कोई भी कृषि उत्पन्न बाजार समिति कानून किसी व्यापारी को एमएसपी से नीचे माल खरीदने के आरोप में कोई सजा नहीं देता है और ना ही किसानों को ऐसी कोई गारंटी पहले उपलब्ध थी. #APMCAct
केंद्र की सरकार एमएसपी पर अपनी एजेंसी के मार्फत कृषि उपज की खरीदी करती रही है. केन्द्र सरकार पहले ही जाहिर कर चुकी है कि उसकी खरीदी पहले की ही तरह शुरू रहनेवाली है.