उत्तर प्रदेश मध्ये, ज्या नराधमांनी पाशवी बलात्कार करून, पीडित तरुणीला जीवे मारण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला एकट्यालाच नाही सर्वांनाच दुःख आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण, तुम्ही फिल्म सिटी न बनवता माता बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अश्या उपाय योजना करा, असा उपदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहत.
साहेब दुःख व्यक्त राजकारण न करता देखील आपल्याला व्यक्त होता आलं असतं, पण नाही, आपणाला राजकीय टिपण्णी महत्वाची वाटली +
आणि तुम्ही ती केली.
असो, सर आपल्याला माहिती असेल, नसेल याबद्दल मला माहिती नाही. पण, मागील ६-७ महिन्यात आपल्या राज्यात घडलेल्या घटना तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत, +
ज्यांमुळे राज्यात महिलांवर वाढलेले अत्याचार ही बघायला मिळालेत.
१. १७ जुलै २०२०, पनवेल येथे क्वारंनटाईन सेंटर मध्ये ४० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. हा
२. मीरा भाईनंदर येथे गोल्डन नेस्ट कोविड सेन्टर येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर तिथल्या सुरक्षा रक्षकाकडून बलात्कार+
झाला आहे. देशमुख साहेब, घटना आहे जून मधील, पण घडकीस आली सप्टेंबरमध्ये. म्हणजे किती सुरक्षित आहेत महिला बघा.
३. देशमूख साहेब, कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. २८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. +
४. देशमुख साहेब, राज्यात अश्या घटना घडल्या आहेत, त्यात दलित महिलांवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या आहेत. डोंगरगाव येथील घटना बघा, मुली सकट, महिलेचे मृत शरीर विहिरीत सापडलं. ही घटना वेळ निघून गेला, पण तपास काही झालं नाही. शिर्डीत एका दलित मुलीने आत्महत्या केली, +
रोड रोमियोच्या जाचाला कंटाळून.
५. साहेब आता हे सोडून द्या, इतर घटनां आपल्या निदर्शनास आणून देतो. अपल्याच नागपूर जिल्ह्यात नागपूरच्या नारखेड तालुक्यातील अरविंद बनसोड नावाचा दलित युवकला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आरोपी कोण आहे ? हे आपल्याला देखील माहिती आहे. +
६. नुकतंच तीन -चार दिवसांपूर्वी आपल्या नागपूर शहरात कुऱ्हाडीने व्यक्तीला भर दिवसा, रस्त्यावर कापण्यात आलं. त्यावेळीही चक्कार शद्ब नाही निघाला आपल्या तोंडून.
मला सांगा साहेब, ही दिवसा कुऱ्हाडीने ठार मारून जीव घेणाऱ्या लोकांची गाडी पटली होऊ शकते का आपल्या राज्यात.? +
कस आहे साहेब मानवी वृत्तीच अशी आहे. आपला दोष नाही. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ आपणाला दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातीक कुसळ आपण शोधण्यात वेळ घालवतो.
साहेब, ज्यांच्या हातात राज्याचे पोलीस खाते आहे, त्या व्यक्तीच्या शेतात चोर चोरी करून पळून जातात.
विचार करा गुन्हे करणारे किती घाबरतात तुम्हाला.?
प्रकाश गाडे ह्यांची फेसबुक पोस्ट..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)
अश्यात राजकारणावर काही व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. अश्यात बातम्यासुद्धा बघत नाहीये. बघायच्या म्हटलं तरी ते प्रकरण बघवत नाहीये. पण आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. (१/१०)
जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे लाड फडणवीसांनी चालवले आहेत कि काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. मी भाजपसमर्थक आहे पण गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून (२/१०)
लिहितोय. ते भयंकर अस्वस्थ आहेत.
पुण्यासाठी ११०० कोटी मंजूर झालेले अजित पवारांनी थांबवलेत. अजित पवारांना पुणं - पिंपरी चिंचवड किती आवडतं हे जगजाहीर आहे. जेंव्हा ते सत्तेत आले तेंव्हाच चर्चा सुरु झाली होती कि पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार म्हणून. आतलं मन (३/१०)
सुरुवातीलाच सांगतोय, लेख खूप मोठाय.. वेळ घेऊन वाचा..
१ डिसेंबर २०१९ रोजी एक लेख लिहिला होता. (लेखाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये). देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दगाबाजीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून जे भाषण केले होते त्यातले काही मुद्दे इथं परत मांडतोय.. (1/20)
१. विरोधी पक्ष वार करत असतात. जवळचा मित्र वार करतो तेंव्हा झालेली जखम तेवढ्या उघडपणे जगाला दाखवता येत नाही.. १०५ जागा येऊनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. कारण कोणी बाहेरचं नव्हतं तर घरातलंच होतं, तेही प्रचंड अव्यवहार्य.. ही भावना जेंव्हा जेंव्हा ते 'हरकत नाही' (2/20)
म्हणायचे तेंव्हा जाणवायचीच..
२. "मी परत येईन", ह्या त्यांच्या विधानावर अजून ठाम रहात येत्या काळातल्या सर्व शक्यतांसाठीची दारे खुली असल्याची ग्वाहीच दिली..
३. देवेंद्रजींचे भाषण सुरु असताना, छगनराव "मी पुन्हा येईन" तेवढं फक्त म्हणू नका जेंव्हा म्हणाले तेंव्हा, (3/20)
दादा भाजपात येणार... आता फक्त मुहूर्ताची वाट पाहणे शिल्लक..
दादा राष्ट्रवादीची संस्कृती धोक्यात आणत आहेत. दादा भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत.. साधारणपणे भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं तर भाजपवाले शांत बसून ऐकून (१/६)
घेतात नाहीतर दुर्लक्ष करण्याचा मास्टरस्ट्रोक मारतात. पण अजितदादांनीसुद्धा तेच करावं?
काल श्रीकांत शिंदेंवर प्रश्न विचारताच पत्रकाराच्या कॅमेरावर संजय राऊत थुंकले..
ह्यावर अजितदादा म्हणाले, "आपली काही संस्कृती आहे, परंपरा आहे, हैचं भान सर्वांनी ठेवावं.."
ह्यावर (२/६)
संजय राऊत भडकले आणि "धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं" म्हणत दादांच्या तोंडावर शब्दशः थुंकले..
ह्यावर दादा म्हणतात, "ते काही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो.."
अजितदादा जर भाजपचे असते तर आश्चर्य वाटलं नसतं कारण (३/६)
उद्धवसेनेला?
- ताटकळत ठेवलं गेलं. आमदार खासदार गेले. पक्षाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार. राहिलेले अजून जातील. थोडक्यात सेनेला मजबूत लागलेले तबेले पवार आणि पटोले मस्तपैकी मजा घेत बघत बसले आहेत. (२/४)
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आंबे खाऊन कोया मातोश्रीच्या अंगणात टाकत होते आणि संजय राऊत जिभल्या चाटत होते. असं करत करत मातोश्रीच्या आमराईत निवडुंग उगवलेत जे उद्धव ठाकरेंना भयंकर मऊ लागत आहेत..
आता पुढं काय करायचं हे पुन्हा सिब्बल ठरवणार म्हणजे (३/४)