आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत बैठक झाली.यावेळी प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी ही प्रवाशांच्या मागणी रेल्वे खात्याकडे मांडली. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल.याशिवाय प्रदूषणही कमी करता येऊ शकेल.
पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे.याशिवाय या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'मेमू' लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी रेल्वेकडे केली.
कोरोनामुळे दौंड-पुणे शटल सध्या बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांची अडचण झाली आहे.त्यामुळे ही सेवा तातडीने सुरु करावी अशी मागणी या बैठकीत केली.
याशिवाय दौंड-पुणे या मार्गावर अत्यावश्यक सेवा अंतर्गत येणाऱ्या सरकारी व निमसरकारी कर्मचारी,बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ब्लड बँक कर्मचारी, शहरी पोलीस आदींना प्रवासाची मुभा देण्यात यावी हा मुद्दा यावेळी मांडला.
बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना दौंड स्थानकावरुन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या सोईसाठी
पुणे-मुंबई प्रगती (१२१२६ / १२१२५) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या बैठकीत केली.
पुणे - सिकंदराबाद, चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर , संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा अशीही मागणी यावेळी केली.
नीरा,पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी लवकरच रेल्वेरुळाचे काम होणार असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी अंडरपासचेही काम करावे अशी सुचना केली.
नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.
जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती.ही शाळा व अंगवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी मांडली.
जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक २५ येथे अंडरपास बांधावा ही मागणीही यावेळी केली. याशिवाय सुकलवाडी येथीलच रेल्वे पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सुचनाही केली.
जेजुरी स्थानकावरील फुटओव्हर ब्रीजचे विस्तारीकरण, ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी स्थानक दरम्यान सर्व्हिस रोड बांधावा, कोळविहिरे येथे ओव्हरब्रीज बांधावा या मागण्या आवर्जून मांडल्या.
चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये,भिगवण परिसरातील नागरीकांना हे स्टेशन अतिशय सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात यावा, (cntd,)
याशिवाय जेजुरी रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरु करावी तसेच येथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करण्यात यावेत अशीही मागणी यावेळी केली.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
रविवार, दि.१७ जानेवारी २०२१ पासून महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने माझ्या फेसबुक पेजवर पाहणार आहोत.
महात्मा फुले यांची वैचारीक जडण-घडण, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, स्त्रीशिक्षण व इतर शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सत्यशोधक समाज, यासोबत त्यांचे साहित्यिक कार्य यांसारख्या विविध पैलूंचा सर्वांगिण आढावा घेणारी नामवंत लेखक, साहित्यिक व अभ्यासकांची व्याख्याने (cntd)
याअंतर्गत आपल्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक चळवळीचे शिलेदार डॉ बाबा आढाव यांच्यासह प्रख्यात लेखक व संशोधक प्रा. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस, प्राध्यापक डॉ जास्वंदी वांबूरकर यांचा समावेश आहे.
अहमदनगर शहराची खास ओळख असणारी व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हिआरडीए) ही संस्था चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे वृत्त वाचण्यात आले.ही संस्थेचा अहमदनगर शहराच्या विकासात अतिशय मोलाचा वाटा असून १९४७ पासून ही संस्था येथे अतिशय उत्तम रीतीने काम करीत आहे.
येथील व्हिआरडीएच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली आहेत.देशाच्या संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि इतर आवश्यक सामुग्री येथे विकसित झाली आहे.याशिवाय वाहनांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे.
मा. @rajnathsingh जी, ही संस्था चेन्नईला गेल्यास सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची विनाकारण फरफट होणार आहे.याशिवाय शहराच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था बाहेर जाणार आहे.