हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
निवडणुकांना सामोरे जाऊन, ३०३ खासदारांचे बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सरकारने संसदेत संविधानीक मार्गाने कृषी कायदे पारित केले.
(1/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
विरोधकांना या कायद्यावर चर्चा न करता गोंधळ घालून सभात्याग करणे जास्त महत्वाचे वाटले.
(2/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
देशभरात शेतकऱ्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यांनी लोकशाही मार्गाने होऊ दिले.
(3/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
लोकशाहीने दिलेला शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा अधिकार केंद्र सरकारने इंदिरा गांधींप्रमाणे पायदळी तुडवला नाही.
(4/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
चर्चेतून तोडगा निघू शकतो यावर ठाम विश्वास ठेऊन शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या ११ बैठका करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि ४ पाऊले मागे यायची तयारी दाखवली.
(5/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
आदोलकांना मिळणाऱ्या ५ स्टार ट्रिटमेंटपासून ते खलिस्तानी मागण्यांपर्यंत सगळ्या गोष्टी एक एक करून बाहेर येत असूनही ते चर्चा करण्यापासून मागे हटले नाहीत.
(6/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
२६ जानेवारीला शेतकरी शांततापूर्ण रॅली करतील यावर त्यांनी विश्वास दाखवला.
(7/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोकशाही मुल्य जपण्यासाठीचा एक चांगला प्रयत्न त्यांनी केला
(8/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
"केंद्र सरकार शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पण करू देत नाहीत" असा 'तांडव' करायची संधी त्यांनी विरोधकांना दिली नाही.
(9/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
(10/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
त्यांनी आंदोलकांवर गोळीबार करून ते आणखी चिघळू दिले नाही.
(11/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
त्यांनी पोलिसांना हटवून हिंसक आदोलकांना मोकळे रान दिले नाही.
(12/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
ते दोषींविरोधात शुट ॲट साईट वगरेचे आदेश न देता कायदेशीर मार्गाने चौकशीच्या नोटीसेस पाठवत बसले आहेत.
(13/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
पंतप्रधान मोदी, अमित शहा, अजित डोवाल आणि इतर सर्वच प्रमुख मंडळी प्रचंड संयमी आहेत आणि विरोधकांच्या कोणत्याच जाळ्यात अडकत नाहीत.
(14/15)
हिंसेला केंद्र सरकारच जबाबदार आहे कारण,
१३० कोटी लोकांचे निरनिराळे सल्ले न ऐकता ते त्यांच्या विवेकबुद्धीने निर्णय घेतात.
(15/15)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
इराण हा एक अधिकृत इस्लामिक देश आहे, जिथली ९९% पेक्षा जास्त लोकसंख्या मुसलमान आहे.
अशा इराण मधले एक जागतिक दर्जाचे दिग्दर्शक माजिद माजदी (नावात बरंच काही आहे) यांनी २०१५ साली एक चित्रपट काढतात ज्याचे नाव 'Mohammad:- The Messenger Of God'.
(1/n)
हा त्यावर्षी इराणची Academy Awards साठीची Official Entry असतो आणि त्यावर्षी इराणमधे सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा हाच चित्रपट असतो.
हा चित्रपट आता Digital Platform वर Release होत आहे आणि या चित्रपटावर भारत नावाच्या Secular देशात बंदी घालावी अशी मागणी 'रझा अकॅडमी' करते.
(2/n)
त्याची दखल थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री घेतात आणि केंद्र सरकारला पत्र लिहीतात. याआधीच रझा अकॅडमीने २०१५ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक माजदी आणि संगीत दिग्दर्शक ए.आर.रहमान यांच्या विरोधात फतवा काढायचा प्रताप करून झाला आहे.
• या कोरोना काळात एकिकडे महाराष्ट्र सरकारवर चहुबाजूने टीका होत असताना सोनू सूद करत असलेल्या कामावर मात्र कौतुकाचा वर्षाव होत आहे
(1/n)
• अशातच सोनू सूद राज्यपालांना राजभवनात जाऊन भेटतो, रोहित पवार सोनू सूदच्या घरी जाऊन त्याला भेटतात. त्याची माध्यमांत चर्चा होते. पण या सगळ्यात 'मातोश्री' कुठेच नसते.
(2/n)
• एकीकडे सोनू सूद राज्यपालांना स्वतःहून भेटतो पण मुख्यमंत्र्यांना भेटायची त्याची इच्छा होत नाही. आता ती का होत नाही हे सोनूलाच माहिती पण यातून त्यांचा EGO मात्र दुखावला जातो
(3/n)
जेव्हा संजय राऊतांमुळे बाळासाहेबांना खुलासा करावा लागतो!!!
स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे एक गाजलेले भाषण आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या चित्र-चरित्र प्रकाशानाच्यावेळी केलेले ते भाषण हा एका उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना आहे.
त्या भाषणात प्रमोदजी सांगतात की 'मला बाळासाहेब का आवडतात?'
(1/n)
याचे एक कारण म्हणजे बाळासाहेब कधीही 'हे मी बोललोच नाही' अशा पद्धतीचा घुमजाव करत नाहीत. ते बोलण्याच्या आधी किंवा नंतर नाही तर बोलतानाच विचार करत बोलतात. बाळासाहेबांची ही एक खरंच खासीयत होती.
(2/n)
पण जो माणूस बोलतानाही एवढी विचारपूर्वक बोलतो त्या माणसाला त्याच्या लिखाणावर खुलासा/स्पष्टीकरण द्यायला लागते ही गोष्ट पटणारी आहे का??
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,
छान बोलतात, शांतपणे बोलतात, संयत बोलतात, घरातला मोठा भाऊ बोलतोय असं वाटतं, वगैरे वगैरे म्हणत कौतुकाचे पूल बांधणाऱ्या (PR agency च्या प्रचाराचे बळी ठरलेल्या??) सर्वांना एक छोटीशी आठवण.....
ते मुख्यमंत्री आहेत...वक्तृत्व स्पर्धेतले स्पर्धक नाहीत!!
(1/n)
त्यांना शासन चालवायचंय...वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग नाहीत!!
त्यांना काम करायला नेमलंय...फक्त तुम्हाला धीर द्यायला नाही!!
एखाद्या डॉक्टरने पेशंटची ट्रिटमेंट केली नाही पण फक्त त्याच्या नातेवाईकांना धीर दिला तर चालेल का??
तसंच आहे हे!!!!
राज्य सरकारचे काम कोणी दाखवू शकेल का??
(2/n)
केंद्राच्या योजना पण धड राबवत नाहीयेत,
स्वतःची एखादी योजना सुरू करणे वगैरे तर खूप लांबची गोष्ट.
तेव्हा Evaluation कामाचे करा...भाषणाचे नाही!!!
(3/n)