Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!
भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
संघटना) यातच १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले.ज्यातून भारताला पाकिस्तान मधून पूर्व पाकिस्तान काढून त्यातून बांगलादेश तयार करायचा होता.जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा पाकिस्तान ला भारतीय हवाई हद्द वापरण्यास मज्जाव केला गेला.या साठी पाकिस्तानला बांगलादेश ला जाण्यासाठी
भारताला वेढा घालून श्रीलंके वरून पूर्व पाकिस्तान ला (बांगलादेश ला) जावे लागत होते.हे अंतर खूप होते त्यामुळे लढाऊ विमानांना इंधन खूप लागत होते.याच वेळी श्रीलंकन सरकारने पाकिस्तानला मदत करायला सुरवात केली,श्रीलंकेने त्यांची हवाई हद्द आणि इंधन दोन्ही गोष्टी पाकिस्तानला वापरायला
दिल्या.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्रीलंकेला खडेबोल सुनावले कि तुम्ही भारत पाकिस्तान च्या भानगडीत पडू नका.पण श्रीलंकेने इंदिरा गांधींच्या चेतावणी ला केराची टोपली दाखवली.तेव्हा इंदिरा गांधीजींनी ठरवले कि श्रीलंकेला दणका देयाचा.त्यांनी विचार करून ठेवला होता कि आता
श्रीलंकेचे दोन तुकडे करावे लागणार नंतर भारत सरकार ने अनधिकृतपणे तामिळी अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या गटांना मदत पुरवायला सुरु केले त्यांना खाण्या पिण्याच्या आणि युद्ध सामुग्री पण पुरवल्या गेल्या.हे सगळे चालू असताना लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )ची सुरवात झाली.हे एक
राजनैतिक आणि सैनी संघटन आहे.हे संघटन श्रीलंके मध्ये स्वतंत्र तामिळ राष्ट्र असावे अशी मागणी करत होते.तामिळी जनतेचे रक्षण करण्यासाठी ज्या संघटना उभय राहिल्या त्यातील एक tamil new tigers हि पण संघटना होती.TNT मध्ये विद्यार्थी आणि तरुणाचा खूप मोठा वर्ग होता आणि याचा कर्ता धर्ता
व्ही प्रभाकरन होता.श्रीलंकेमधील अल्पसंख्येक तामिळ भीती खाली वावरत होते त्यांना वाटत होते त्यांची ओळख श्रीलंकेमधून पुसून टाकली जाईल, बहुसंख्यिक सिंहला जनता त्यांचा धर्म त्यांची भाषा हि समाप्त करायला निघाली आहे.१९५६ मध्ये श्रीलंकेने एका विवादित कायद्यावर शिक्का मोर्तब केले.
सिंहली भाषेला राष्ट्रीय भाषा जाहीर करून टाकले.तामिळी लोक स्वतःच्या भाषेविषयी खूप सवेंदनशील असतात.(या बाबतीत मराठी लोकं विरुद्ध आहेत.स्वतःच हिंदी आणि इंग्रिजीचा भढीमार चालू करतात.) तामिळी भाषेचा आग्रह त्याचा दुसरा पैलू असा पण होता कि सरकारी नोकरी मध्ये तामिळी जनतेचे महत्व कमी
होत चालेले.१९७६ येता येता LT लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )म्हणून ओळखू लागले होते.हि संघटना एवढी ताकतवान होती याचा अंदाज आपण असा लावू शकता कि लिट्टे ची स्वतःची पायदल,हवाईदल आणि नौदल होती.श्रीलंका सरकार ज्या सघंटनेला आतंकवादी संघटना म्हणत होती ती संघटना जगातील एकमेव
अशी संघटना होती ज्या संघटने कडे वायुसेना आणि नौसेना होती,हळू हळू या संघटनेने संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशत पसरवली होती कि त्यांनी तिथल्या एका राष्ट्रपतीला त्यांनी सुसाईड बॉम्बिंग करून टाकले.हळू हळू हे संघटन एवढे ताकातवर होत चालले होते कि भारत पण चिंताग्रस्त झाला होता.तत्कालीन
प्रधानमंत्री राजीव गांधी यांना एका भारत सरकारमधील अधिकाऱ्याने सांगितले होते जर लिट्टे आत्ता नाही थांबवले तर उद्या हि संघटना भारतावर भारी पडेल.तत्कालीन भारत सरकारला हि चिंता होती कि उद्या या संघटनेने श्रीलंके मध्ये स्वतंत्र प्रस्थापित केले तर भारतातील तामिळी जनतेला एकत्रित करून
तामिळ भूमी स्थापन करण्याची मागणी करू लागतील,म्हणूनच भारत सरकारने लिट्टे आणि श्रीलंका सरकार मध्ये एक शांती समझोता केला.पण हा समझोता काही कारणास्तव जास्त दिवस टिकला नाही.भारत सरकारने श्रीलंकेमध्ये आपली शांती सेना पाठवली होती.याचा च फायदा घेत भारत सरकार ने विचार केला कि लिट्टे
ला या द्वारे समाप्त करूया.पण हा डाव उलटा पडला भारत सरकार ला वाटले २-३ दिवसाचे हे misssion असेल, पण असे झाले नाही.हे युद्ध १ नाही,२ नाही तब्बल ३ वर्ष हे युद्ध चालू होते.१९८९ मध्ये राजीव गांधी निवडणूक हरले. नवीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी शांती सेनेला परत बोलावूंन
घेतले १९९० पर्यंत सगळे भारतीय सैन्य परतले.या ३ वर्षांमध्ये भारताचे १२०० जवान शाहिद झाले होते.यातच पुढच्या निवडणूक येऊ घातल्या ओपिनियन पोल मध्ये राजीव गांधींचे सरकार येणार असे चित्र झाले असताना राजीव गांधींनी निवडणुकांच्या सभेमध्ये घोषणा केल्या कि ते श्रीलंकेमध्ये तामिळी
जनतेच्या हितासाठी शांती प्रस्थपित करण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार म्हणून सांगितले. लिट्टे ला भीती होती जर राजीव गांधींचे सरकार आले तर काय करतील सांगता येत नाही. म्हणून आत्मघातकी बॉम्ब चा कट रचला गेला आणि २१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २०मिनीटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदुर
मध्ये त्यांना मारले गेले.ज्यांनी मारले ते लिट्टेचे प्रशिक्षित आतंकवादी होते.राजीव गांधींच्या हत्येची माहिती हि अगोदरच भारतीय गुप्तहेर खात्याला होती त्यांनी राजीव गांधींना अगोदरच सांगितले होते कि तुम्ही तामिळनाडू मध्ये कुठे हि कोणतेही रॅली करू नका.त्यांनी कोणाचे ऐकले नाही
आणि म्हंटले कि मी घाबरून घरात बसू शकत नाही असे होणार नाही.या नंतर २००९ मध्ये श्रीलंकन सरकार ने लिट्टे चा खात्मा करून टाकला आणि या गृहयुद्धमध्ये ७० हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले.यानंतर लिट्टेच्या काही त्या युद्धातून वाचलेल्या समर्थकांनी निर्वासित सरकारचे घटन केले.
विदेशात असलेले श्रीलंकन तामिळी शांततेच्या माध्यमातून तामिळी हिताच्या अजूनही मागणी करत असतात.(transnational government of tamil eelam)
या वेबसिरीज मध्ये नायक शेवटी जिंकलेला दाखवला आहे. reel आणि real life मध्ये हाच फरक आहे मित्रांनो !!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला.
असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत
होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही
श्रावण महिना म्हणले की सगळीकडे हिरवळ आणि सण,त्यात सणांचा उत्साह तर वेगळाच असतो.तसा हा महिना ३० दिवसांचाच असतो.पण यावेळी हा ५९ दिवसांचा असणार आहे.
हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो.त्याला आपण अधिक मास म्हणतो,वैदिक पंचांगात सूर्य आणि
चंद्राच्या आधारे गणना केली जाते.त्यानुसार दरवर्षी चंद्र महिना हा ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना हा ३६५ दिवसांचा असतो.या दोन्हीमध्ये दरवर्षी फरक हा ११ दिवसांचा असतो.जो ३ वर्षात ३३ दिवसांचा होतो.म्हणून,तो अधिकमास असतो.आता हे सर्व दिवस समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त
महिना असतो.तो मलमास असतो.त्याला पुरषोत्तम मास पण म्हंटले जाते.आता या दोन श्रावण महिन्याची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते.अधिक श्रावण महिना हा १८ जुलै पासून सुरू होत आहे आणि निज श्रावण महिना हा १७ ऑगस्ट पासून सुरू होत आहे जो १५ सप्टेंबर ला संपेल,त्यामुळे श्रावना
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.
हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-
म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो
समान नागरी कायद्याची तयारी ही विधी आयोगाकडे देण्यात आलेली होती.गेली ८ महिने हा आयोग मॅरेथॉन बैठका घेत होता.अजून १-२ बैठका झाल्या नंतर हा विधी आयोग पावसाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याचा तपशील सबंधित मंत्रालयाकडे देणार आहे.या अहवालाच्या आधारे
१/५
केंद्र सरकार समान नागरी कायदा हा आणण्याची तयारीत असणार आहे.हा कायदा कधी आणणार आहे याबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे.पण येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी हे विधेयक येणार आहे.२२व्या विधी आयोगाने यावर मिशन मोडमध्ये काम केलं असून,जवळ पास या आयोगाने २४-२८ बैठका घेतल्या आहेत
२
म्हणजेच या कायद्यात सर्व समावेशकाता आणण्यासाठी हर एक पैलूचा अगदी सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायद्याचा सर्वसमावेशक असा एक दस्तेएवज तयार केला आहे.यामध्ये देशातील सर्व जाती धर्म आणि त्यांच्या चालीरीती यांचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही.
३
देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले, जे फारस कोणाच्या लक्षात आले नाही. त्यांनी अजितदादांना आणि शरद पवारांना असा सणसणीत आणि खरमरीत टोला लगावला आहे.
ते म्हणाले,
"अजित पवारांना १८ वर्षापूर्वीच मुख्यमंत्री होता आले असते,पण त्यांना होऊ दिले नाही."
पण या विधानाने अजितदादांच्या
१/५
मनातील शल्य बाहेर पडले.आता देवेंद्र फडणवीस हे मर्म विनोदाने बोलले की यामागे काही खोल अर्थ दडला आहे का काय?हे लवकरच कळेल.
असे विधान करण्यामागे कारणही तसेच आहे.
२००४च्या विधानसभेच्या निवडणुकीत
राष्ट्रवादीला ७१ जागा आणि काँग्रेसला ६९ जागा मिळूनही पण,काकांनी मुद्दाम मुख्यमंत्रीपद
२
हे काँग्रेसला बहाल केले आणि त्या बदल्यात महत्वाची खाते स्वतःकडे जास्त ठेवली.पण अजितदादांना काय मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दिले नाही.ते त्यांना सहजच करता आले असते.शिवाय त्यांना पक्षातून पाठिंबा पण होता.पण काकांनी ते होऊ दिले नाही.
Remote Electronic Voting Machine system
२०२३ मध्ये ९ राज्यांच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक याचा विचार करता , या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये RVM प्रणाली वापरण्यात येणार आहे.
ही प्रणाली देशातील नागरिक आत कुठून ही त्याच्या मतदानाचा हक्क देशातील
१/४
कोणत्याही भागातून बजावू शकतो.यासाठी मतदाराला त्याला त्याच्या गावी जावे लागणार नाही.जिथे RVM चे बूथ असेल त्या ठिकाणावरून तो मतदान करू शकणार आहे.यासाठी एक प्रात्यक्षिक येत्या १६ जानेवारी ला आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष हजेरी लावणार आहेत.
आत्ताच सांगतो.UT शिवसेना,काँग्रेस आणि एनसीपी
या तिन्ही पक्षांना हे मान्य नसल्याचे चान्सेस जास्त असू शकतात.चांगल्या गोष्टींना विरोध करणे हे त्यांचे परम कर्त्यव्य आहे.
आणि दुसरी म्हणजे भावी नगरसेवक,आमदार खासदार यांचा याठिकाणी जास्त विचार केला गेलं असेल..
त्यांना आता जास्त मतदारांना ने आण करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार
३/४