🌳वटसावित्री🌳
आज वटपौर्णिमा, काल पासूनच समाजमध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सवित्रिपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही....१/n
पण कुणा एकाची स्तुती करताना किंवा महत्त्व सांगताना दुसऱ्यावर टीका केलीच पाहिजे का? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्त्व वाढते का?
काय जाणून घेतलं आपण सत्यवनाच्या सावित्री बद्दल? केवळ व्रत वैकल्य, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा, फेऱ्या घाला इतकाच?....२/n
सत्यवान सावित्रीचे आख्यान महाभारताच्या वनपर्वात येते. मद्र देशाचा राजा अश्वपतीची रूपवान, गुणवान, बुद्धिमान अशी ही कन्या सावित्री. तर्कशुद्ध विचार मांडणारी, वादविवादात प्रवीण,स्वतंत्र विचाराची. ती उपवर झाली तेंव्हा आश्र्वपतीने तिला आपला वर निवडण्याची मुभा दिली....३/n
मी तर कुठे ऐकलं की तिच्या विद्वतेमुळे तिच्याशी विवाह करायला कोणी धजावेना. आपल्यापेक्षा बुद्धिमान बायको कोणालाच नको असते. आजही इतके पुढारलो म्हणताना हा विचार करतातच की नाही? " जास्त शिकलेली, जास्त पॅकेज असलेली मैत्रीण म्हणून चालते पण सहचारिणी म्हणून नाही" अर्थात अपवादही असतातच.४/n
तर सावित्रीला सत्यवान हा पती म्हणून पसंत पडला. द्युमत्सेन राजाच्या अंधत्वामुळे शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले. त्यामुळे राजला रानोमाळ भटकावे लागले. त्याचा पुत्र सत्यवान अतिशय रूपवान त्याच बरोबर उदार, दानशूर, शूरवीर, मृदुभाषी होता. असा तो निष्कांचान असून,....५/n
त्याचा एका वर्षात मृत्यू होणार हे माहीत होऊनही सावित्रीने त्याला पती म्हणून वरले. आपल्या निर्णयावर ती ठाम होती. नंतर जे जीवन वाट्याला आले ते आनंदाने स्वीकारले.
श्रेयस आणि प्रेयस यातून प्रेयसाच्या क्षणिक सुखा ऐवजी श्रेयसाच्या अंतिम शाश्वत सुखाचा पर्याय तिने निवडला....६/n
सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमालाही आपल्या तर्कशुद्ध वाकचातुर्याने विचार करायला लावला. यमाशी झालेल्या संवादातून तिची बुधीमत्ताच प्रगट होत नाही का? सत्यवनावरील उत्कट प्रेमामुळे, तिने स्वतः त्याला निवडलेले असल्याने त्याला वाचवायचा आटोकाट प्रयत्न तिने केला....६/n
अश्या सवित्रीचा खरं तर स्त्रियांना अभिमानच वाटायला हवा.
सावित्रीला औषधशास्त्राचेही पुरेपूर द्यान असावे. म्हणूनच तर सत्यवनाला विषारी वायू शोषून घेणाऱ्या आणि भरपूर प्राणवायू देणाऱ्या वटवृक्षाखाली आणले. आजच्या कारोना काळात प्राणवायूचे महत्त्व सगळ्यांनाच पटले आहे....७/n
तेंव्हा ह्यावर शंका कुशंका घेणे योग्यच नाही, Oxygen concentrator च म्हणा हवं तर त्याला.
सावित्रीबाई फुलेंना अनुसरून शिक्षणाची कास धरणे हे तर बरोबरच आहे. ते करायलाच हवे. पण शिक्षणाचा प्रसार हा काही आजच, आधुनिक काळात झाला असे नाही....८/n
आपल्या सनातन संस्कृतीत स्त्री शिक्षणाला महत्व होते हे कसे विसरता? अनेक विदुषींची उदाहरणे निरनिराळ्या आख्यानात येतात.
मध्यंतरी सुलतानी अक्रमणांमुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बंधनं घालावी लागली असतील आणि पुरुषप्रधन संस्कृतीमुळे ती कायम राहिली, जाचक झाली....९/n
पण आपली संस्कृती अनिष्ट रूढी, परंपरांचा त्याग करून निरंतर नवे विचार, बदल स्वीकारणारी आहे. जेंव्हा एखादे चांगले कथन धार्मिक कर्मकांडाशी जोडले जाते तेंव्हा त्यातला चांगला विचार, कथेचे सार हा विचारवंतांचा प्रांत असल्याने तो बाजूला राहून बाकीच्या सोयीस्कर बाबींवरच भर दिला जातो..१०/n
आपली संस्कृती मुळातच निसर्गपुजक. सगळ्या वनस्पतीचे संरक्षण, संवर्धन होईल या कडे लक्ष पुरवणारी. आपण त्याचा मुळ आत्माच हरवून बसलो आहोत. सगळ्या व्रतांचे सार जाणून त्याप्रमाणे वागलो असतो तर पर्यावरणाच्या नावाने गळे काढायची वेळ आली नसती...११/n
आजच्या आधुनिक युगात तर वटपौर्णिमेच्या व्रताची यथेच्छ खिल्ली उडवण्या पलीकडे काही होत नाही. नका करू व्रत, वैकल्ये, नका मारू फेऱ्या पण त्याचे औषधी गुणधर्म तर जाणून घ्या. वटवृक्ष अक्षय असतो, असे वृक्ष पर्यावरणाचा समतोल साधणारे असतात हा विचार का नाही रुजवत?..१२/n
शिक्षणाची वाट धरणाऱ्या कितीजणांचे आपल्या शैक्षणिक विषयांवर प्रभुत्व असते? मला सर्वसामन्यांबद्दल म्हणायचे आहे, विचारवंत, पंडीतांबद्दल नाही. सर्वसामान्यांना सर्वदूर शिक्षण उपलब्ध होतय. डिग्री, डिप्लोमा आहे पण द्यानाच काय?....१३/n
आपल्या रूढी, परंपरांमधे विज्ञान दडलेले आहे.तेंव्हा प्रत्येक कथे मागचा विचार काय याचा शोध घ्या. आपल्या संस्कृतीची खिल्ली उडवणारे मेसेजेस विचार न करता forward करणे योग्य नव्हे. आधुनिकता आणि समाजातील सो कॉल्ड प्रतिष्ठीतांच्या प्रभावाखाली येऊन सनातन संस्कृतीला...१४/n
कालबाह्य, बुरसटलेली ठरवल्यामुळे आज समाज विस्कळीत झाला आहे हे लक्षात घ्या.
सावित्री सारखे संस्कारी, बुद्धिमान व्हा. तिच्यासारखे सखोल ज्ञान मिळवून, अर्गुमेंटल होऊन समोरच्याला निरुत्तर करा. स्वतः पती निवडताना सारासार विचार करा. निवडलेल्या पती बरोबर संसार निभाव....१५/n
पटल तर ठीक नाही तर व्हा वेगळे असा विचार काय कामाचा? आयुष्यात जोडीदाराचे फार महत्त्व आहे तेंव्हा आपल्याला त्याचा सहवास निरंतर लाभो अशी कामना करणे कसे चुकीचे असेल? अर्थात त्याला जोडीदारही तसाच हवा. गुणवान सत्यवनासारखा आदर्श!....१६/n
असा पुरुष प्रत्येकीच्या जीवनात येणे कठीणच. तेंव्हा स्त्रियांनी खऱ्या अर्थाने सावित्री व्हावे आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करावी असे वाटत असेल तर प्रत्येक पुरुषाने पत्नीचा आदर करणाऱ्या मृदुभाषी, गुणवान सत्यवाना सारखे होण्याचा प्रयत्न करावा.....१७/n
तरच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचे चीज होईल.
🙏🙏🙏🙏🙏
सौ. अमृता खोलकुटे.©

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Miss.Praphul Kholkute Phanje🇮🇳

Miss.Praphul Kholkute Phanje🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(