Saurabh Profile picture
Mar 15 7 tweets 2 min read
#रलीव - इस्लाम स्विकार करा
#सलीव - काश्मीर सोडून पळा
#गलीव - नाही तर जिवानिशी मरा

धर्मस्थळांमधून रलीव सलीव गलीवच्या लाउडस्पीकर वरून घोषणा देत, काश्मीर पाकिस्तान का हिस्सा बनेगा, हिंदू पुरुषांशिवाय आणि हिंदू महिलां सकट..

👇👇👇
असे नारे देऊन हिंसाचार घडतो आणि तेंव्हाचं तेथलं राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं.
चिड येते फक्त. डोक्याचा पारा चढतो.
तळपायाची आग मस्तकात जाते.

काही ठिकाणी अचानक ठरलेले शो रद्द झाले.
काही शहरात, काही राज्यात थेटर मिळत नाहीये, कुठेही न्यूज नाहीये.
👇👇
त्याच सिनेमात एक संवाद आहे, 'मीडिया टेररिझम की रखेल थी' हे आजच्या घढीला वर्तमानात लागू पडतयं का...? 😥
थेटर उपलब्ध न होणं हा अभिव्यक्ती वर घाला असून त्या विशिष्ट राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादाचा नवीन प्रकार आहे का?
👇👇
कोण तो इंतेजार हुसैन 'द काश्मीर फाईल्स' रिलिज होऊ नये म्हणून बॉंबे हायकोर्टात याचिका टाकतो कारण की अल्पसंख्याकांच्या धार्मिक संवेदना दुखावतात म्हणे, आणि Genocide (सरसकट कत्तल करून एकाच वेळी दोन तीन पिढ्या संपवणे) करताना कुठे गेल्या होत्या धार्मिक संवेदना?
👇👇
काश्मीरी पंडीतांच हत्याकांड निवडून निवडून करत असताना त्यांचे शेजारी अल्पसंख्याकांनी (चित्रपटातील अब्दुल ही व्यक्तिरेखा) बघ्याची भूमिका का घेतली? कुठे गेली होती काश्मीरियत?
कुठे गेली होती गंगा जमुनी तहजीब?

काश्मीर मधे आतंकवादीने सरेंडर केलं तर दोन लाख रू इनाम द्यायचे.
👇👇
परत तो बंदूक उचलायचा परत खाली ठेवायचा परत दोन लाख घ्यायचा हे चालायचं पण काश्मीर मधून पळवलेले हिंदू एका कँप मधे अनेक कुटुंबे कोंबून कोंबून ठेवले आणि ते त्यांच्या घर जमीनी व्यवसाय सोडून आले त्या कुटुंबाला सहाशे रु महिना मदत केली गेली.
कँप मधेच अनेक लोकं गतप्राण झाले.
👇👇
जो आपला ईतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ कधीच उज्वल असू शकत नाही. आपण आपला ईतिहास, परंपरा रुढी, सत्यता नाकारून पण एक प्रकारे आपल्याच भविष्याचा जिनोसाईड करत आहोत.

टीप : राजकीय चष्मा वापरून वाचू नका फक्त एवढीच विनंती

-- संदिप भोगे
#TheKashmirFiles

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saurabh

Saurabh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Right_vichar

Mar 17
छत्रपती राजारामराजे भोसले जयंती 🚩

राजमुद्रा :
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।🚩🙏

राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला किल्ले राजगडावर झाला. Image
राजाराम महाराज हे मुळात शांत स्वभावाचे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. व्यक्तिगतरीत्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या एका पत्रात त्यांनी दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजाराम महाराजांकडे तेव्हा पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही.
Read 4 tweets
Aug 19, 2021
अमेरिका स्वतः माघारी फिरले.. मग नागरिकांमध्ये लपून बसलेले तालिबानी बाहेर पडले आणि अफगाणिस्तान वर कब्जा केला.. जर हा तालिबानचा विजय आणि अमेरिकेचा पराभव

तर..
१७६१ साली भारतावर आक्रमण केलेल्या अब्दालीला मराठ्यांनी थेट भिडून वापस पाठवून दिले.. मग हा मराठ्यांचा पराभव कसा ??
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत निश्चितच मराठ्यांच मोठ नुकसान झालं.. खूप सैनिक गमावले.. अपेक्षित यश मिळाले नाही.. पण मराठ्यांनी देश वाचविला.. अहमदशहा अब्दाली आल्या हाती परत गेला..

@Tushar_RT5
नाही म्हणता थोडे फार मराठा सैनिक युद्धबंदी बनवून घेऊन गेला.. पण अब्दालीच्या सैन्याचे अतोनात नुकसान झाले..

आताच्या पाकिस्तान मधील काही भाग मराठ्यांनी गमवला.. पण ज्या उद्देशासाठी अब्दाली भारतात आला होता तो मुघलांना परत सत्ता मिळवून देण्याचा अब्दालीचा उद्देश साध्य झाला नाही..
Read 5 tweets
Aug 15, 2021
हिमालयं समारभ्य यावत् इंदु सरेावरम् |
तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ||

खंडित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
.
.
.
खरच.. पण आपण स्वतंत्र आहोत का?
१)ज्या भागावर आपल्या पूर्वजांनी भगवा ध्वज फडकावला तो भाग शत्रु राष्ट्राने कधीच गिळंकृत केला आहे..
२) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.

३) गिलगित बल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर हिंदुस्थानामधे जो पर्यंत समाविष्ट होत नाही, तो पर्यंत कसल आलय स्वातंत्र्य..
४) १९४७ पासून ते आतापर्यंत आपण कधी विचार केला आहे की आपल्या भारत भू च्या रक्षणासाठी, संपूर्ण काश्मीर साठी आपले किती भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत..

हे एक प्रकारचे अघोषित युद्धच चालू आहे.

जेव्हा आपण या परकीयांचा समूळ नायनाट करू ..
Read 5 tweets
Aug 6, 2021
धागा: कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर 🚩🙏

महालक्ष्मी मंदिर हे एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे जे देवी महालक्ष्मीला समर्पित आहे, भारताच्या प्राचीन कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे.. देवी पुराणानुसार हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.
शक्तीपीठ स्तोत्रम च्या शंकर संहिता नुसार १८ महाशक्तीपीठांपैकी एक.. वेंकटेश्वर कल्याणम च्या मागे असलेल्या कथेसह, महाविष्णूशी लढा दिल्यानंतर आणि खोलासुराचा वध केल्यावर महालक्ष्मी येथे राहिली असे म्हटले जाते..

हे मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार चालुक्य साम्राज्याचे आहे.
पहिल्यांदा ७ व्या शतकात बांधले गेले.
अनेक पुराणांमध्ये मंदिराचा उल्लेख आहे. शिलाहारा, देवगिरी राजवटीतील यादव यांनी या शहराला भेट दिल्याचा पुरावा आहे. आदि शंकराचार्यांनीही भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराला नियमित भेटी दिल्या आहेत 🙏
Read 7 tweets
Aug 4, 2021
सदाशिव राव भाऊ यांची आज तारखेनुसार जयंती

त्यांचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वितीय,श्री शालिवाहन शके १६५२,साधारण नाम संवत्सरी,सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला.

आज त्यांच्या जन्म दिवशी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करणे गरजेचे आहे ते म्हणजे कानपूर स्थित "भाऊपुर" शहर ImageImage
२९ डिसेंबर ला माननीय पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील "न्यू भाऊपूर-न्यू खुरजा" मालवाहतूक रेल्वे लाईनचे लोकार्पण केले. हे भाऊपूर म्हणजेच मराठा साम्राज्याचे सकलराजकार्यधुरंधर, श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ नामकरण केलेले एक महत्वाचे औद्योगिक गाव आहे🙏🚩
सदाशिवरावभाऊ सारख्या सेनानीचा पानिपतच्या लढाईत दुर्देवी अंत झाला. भाऊंनी त्यांच्या कार्य काळात कधीही मोठेपणाची हाव केली नाही पण त्याग मात्र केला. मराठा राज्याच कल्याण हे त्याचे एकमेव ध्येय होते.चोख कारभारी, दृढनिश्चयी, प्रचंड पराक्रमी सदाशिवराव भाऊसाहेबांना त्रिवार अभिवादन 🙏🚩
Read 4 tweets
Jun 23, 2021
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
हिंदू साम्राज्य दिवस🚩🚩🚩
शिवशक ३४८ प्रारंभ...

“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” अशी शपथ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरातुन सुरू झालेला प्रवास, हा “जेष्ठ शुद्ध त्रयोदशी,शके १५९६” रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला.
शिवराज्याभिषेक सोहळा हा पूर्णपणे वैदिक हिंदू पद्धतीने केला गेला, तेव्हाच आपल्याला हिंदूंचा राजा मिळाला व खऱ्या अर्थाने हिंदुसाम्राज्याची सुरुवात झाली. म्हणूनच हिंदुसाम्राज्य दिन!🚩

आजच्याच दिवशी चार पातशहिंच्या छाताडावर पाय देऊन शिवाजी राजे आखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले..🙏
समर्थ रामदास स्वामी:-🙏

" तीर्थक्षेत्रे मोडीली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव धर्म गोब्राह्मण । करवाया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित, पुराणीक । कवीश्वर, याज्ञिक, वैदीक।धुर्त, तार्कीक सभानायक । तुमचें ठायी ॥
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(