क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..!
आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू
Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य)
पुरवल्यानंतर आपल्याकडे उरतात.
जिथे गरीब माणसाची सर्व कमाई ही मूलभूत गरजा पुरवण्यात जाते तिथे श्रीमंत/मध्यम त्याच्या कमाईचा छोटा हिस्सा अशा मूलभूत गोष्टींवर खर्च करतो.
म्हणून पेट्रोलच्या किमती पर्यायाने महागाई वाढल्याने जेव्हा मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाच्या राहणीमानात फारसा
येत नाही तेव्हा भारतातील संख्येने फार मोठा कष्टकरी वर्ग जो दारिद्र्य रेषेच्या जवळपास आहे तो कर्ज बाजारीपणाकडे व आत्यंतिक गरिबीकडे झुकतो. खरे सांगायचे तर..भारतातील ~ ९५% लोक हे LIG म्हणजे Low Income Group किंवा त्याहून कमी उत्पन्न असणारे आहेत..म्हणजेच भारतातील ९५% लोकांना
ह्या ना त्या मार्गाने वाढलेल्या पेट्रोलच्या किंमती गरिबीकडे ढकलत आहेत..! अशा परिस्थितीत ९५% जनता जर गरिबीत लोटली जात असेल तर अशा
' देशनिर्माणा 'साठीच्या जास्तीच्या करांचा आणि वाढलेल्या महागाईचा उपयोग तो काय ? ? ?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🔴 ऑपरेशन पोलो - गोष्ट मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शेवटच्या ४ दिवसांची !!
स्वातंत्र्यानंतर हैदराबाद आणि एकदोन संस्थाने सोडली तर इतर संस्थाने भारतात विलीनीकरणाच्या करारानुसार सहभागी झाली होती.
हैदराबाद मात्र समजुतीने भारतात सामील होणे तर दूरच..उलट त्याच्या हालचाली वेगळा देश कसा निर्माण होईल त्यानं दिशेने होत होत्या.
भारताला स्वातंत्र्या मिळण्याआधीच निजामाने दोन फर्माने काढून १५ ऑगस्ट १९४७ पासून हैदराबाद हा स्वतंत्र देश असेल हे जाहीर केले होते.
पण निजामाला भारतापासून धोका वाटतं होता. आणि म्हणूनच निजामाला आपले लष्करी बळ वाढवणे गरजेचे वाटू लागले.
१/n + 👇
#म #Live_Thread
आता हे लक्षात घ्या की हैद्राबाद संस्थान हे तेव्हा देशातील सर्वात मोठे संस्थान होते. ज्या ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते त्यांच्या ग्रेट ब्रिटनपेक्षा जास्त क्षेत्रफळ (~२ लाख चौ किमी) आणि जवळपास तेवढीच लोकसंख्या (~ २ कोटी) असणारे विशाल संस्थान होते.
आणि निजाम त्याकाळी भारतातच नाही तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.पण इतका श्रीमंत असूनही तो तितकाच कंजुषही होता असे म्हणतात.जगातील सर्वात मोठा हिरा ' जेकब ' तो पेपरवेट सारखा वापरणारा माणूस महालात मात्र जुना पायजमा आणि अंगरखा वापरत असे..😬(१९३७ ' टाईम ' मासिकानुसार )
असो..!
२/n+
थोडक्यात काय तर, त्याच्याकडे शस्त्र खरेदी आणि लष्कर इ साठी निजामाकडे अमाप पैसा होता.
पण.पण.पण..
भारताचा ब्रिटिशांसोबत जो
' As it is ' / ' जसा आहे तसा ' भारत सोडून जायच्या कराराप्रमाणे सर्व संस्थानांना भारत सरकारमार्फतच शस्त्र खरेदी करणे बंधनकारक होते.
आणि याच कराराचा भंग करण्यासोबत ३ मुख्य चुका दीड शहाण्या निजामाने केल्या.
१) निजामाने झेकोस्लोव्हाकिया, पोर्तुगीज सरकारकडून शस्त्र खरेदी केली ती केली आणि चोरट्या मार्गाने ही शस्त्रे करार तोडून संस्थानातही आणली.त्यात ब्रिटिशांनी आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने संस्थानांनी किती सैन्य ठेवावे याबद्दल काही निर्बंध घातले होते. त्याचाही भंग करून निजामाने सैन्याच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली.
२) 'इत्तेहादुल मुसलमीन' या रझाकारांच्या संघटनेचा प्रमुख कासिम रझवी 👇 याने रझाकारांची संख्या (शेवटीशेवटी ~ २० हजार ) व बळ वाढवून गावोगावी अत्याचार करण्यास सुरुवात केली. राजकीय विरोधकांबरोबरच गोरगरिबांच्या हत्या होऊ लागल्या.संस्थानातील गैरमुस्लिम जनतेत दहशत निर्माण केली जाऊ लागली. रस्त्यारस्त्यात हत्या,स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले.घरे लुटली जाऊ लागली.ह्याचा सगळ्यात मोठा फटका अंबाजोगाई आणि आसपासच्या भागाला बसला.
जन्मभर सरकारी नोकरीत काम कसेही करू दे..पण..रिटायर झालो की निश्चित पेन्शन मिळणार..ही होती २००४ ला NPS लागू व्हायच्या आधीची पद्धत..!
पण..२००४ साली..भारत सरकारने ही निश्चित पेन्शन पद्धत बंद केली आणि -
#StockMarketअभ्यास #म
१/n
देशाची ज्या प्रमाणात प्रगती होईल..त्याच प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल अशी सोय केली..!
ह्याने २ फायदे झाले
- सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
- ही प्रणाली २००९ ला सर्व भारतीयांना खुली केल्यानंतर फक्त नोकरदारच नाही तर सर्वांना पेन्शन मिळेल ह्याची सोय झाली.
२/n
थोडक्यात काय तर..काही कोटी नागरिकांकडून गोळा केला जाणाऱ्या कराचा मोठा भाग फक्त काही लाख सरकारी कर्मचारी..तेही निवृत्त..यांवर खर्च होऊ नये म्हणून NPS ला चालू केले गेले.
ह्या NPSच्या खात्याचे २ प्रकार आहेत
Tier १ - सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते त्या पेन्शनच्या सोयीसारखा
जगाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस , विश्वगुरू भारत , डॉलरचा देश अमेरिका आणि मी ; एक सामान्य नागरिक !
#StockMarketअभ्यास #मराठीच #म
आज जगात सर्वात जास्त गरिबी असलेल्या आफ्रिका खंडात आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस होऊन जावा ह्यासारखा विरोधाभास दुसरा नसावा..!
आणि ह्या विरोधाभासाचे नाव होते - मानसा मुसा !
जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी
'fortune' हे नियतकालिक दरवर्षी प्रसिद्ध करीत असते..अश्या ह्या नियतकालिकाने ह्या चौदाव्या शतकात होऊन गेलेला पश्चिम आफ्रिकेतील ' माली ' ह्या देशाचा राजा आजच्या पैशांत किती श्रीमंत होता ह्याचे वर्णन ' Unquantifiable ' म्हणजेच संपत्ती मोजताच येणार नाही इतका तो श्रीमंत होता असे वर्णन केले होते..😜🤯🤑 असो..
आजचा हा थ्रेड म्हणजे त्याच मुसाच्या एका गोष्टीवर..👇
१/n
हा मुसा ' माली ' साम्राज्याचा राजा होता. हे साम्राज्य सोन्याच्या खाणी, गुलाम आणि हस्तिदंत इ चा व्यापाराने भरपूर श्रीमंत झालं होतं. चौदाव्या शतकात म्हणजे जेव्हा भारतात सोन्याचा धूर निघत होता तेव्हा जगातील ~ अर्धे सोन्याचे उत्पादन हे माली साम्राज्य करत होतं..!
पण ह्या साम्राज्याची..त्यांच्या ह्या अपार श्रीमंत राजाची..फार कोणाला माहिती नव्हती आणि ह्याचीच मुसाला खंत होती.म्हणून आपले नाव जगभर व्हावे म्हणून त्याने ' हज ' यात्रा करत करत विपुल प्रमाणात दानधर्म (सोन्याच्या रूपात ) करायचे ठरवले.
आणि त्याने केलेही तसेच..६० हजार गुलाम.. तेवढेच उंट ( हे फक्त सोने वहायला ) ,१२ हजार सैन्य आणि बाकी दरबारी इतका मोठा लवाजमा घेऊन तो प्रवासाला निघाला..वाटेत त्याने अनेक ठिकाणी गोर गरीबांना सोने फुकट वाटले.त्याने त्याची किर्ती वाढली.पण ही प्रसिध्दी तो जेव्हा इजिप्तला पोचला त्यामानाने काहीच नव्हती..👇
२/n
त्याकाळी इजिप्त हे मोठे व्यापाराचे, दळणवळणाचे केंद्र होते..पूर्वेकडून आशिया खंडातून येणारे व्यापारी , उत्तरेच्या युरोप खंडातून येणारे व्यापारी आणि सबंध आफ्रिका खंडातून हज ला जाणारे यात्रेकरू या सर्वांनी इजिप्त त्यातही राजधानी कैरो नेहमी गजबजलेला असायचे.
आणि अशा ह्या १३२४च्या कैरोमध्ये मुसा ने चांगला महिनाभर मुक्काम केला..आणि ह्या मुक्कामात त्याने इतके सोने वाटले इतके सोने वाटले/खर्च केले की..; मुसा.. माली साम्राज्य , त्या साम्राज्याची राजधानी- सोन्याची नगरी ' टिंबक्टू ' ह्यांची किर्ती जगभर पसरली..!
हे इतके सोने इजिप्तमध्ये आल्याने तिथले सर्वच लोक श्रीमंत झाले..सगळीकडे आनंदीआनंद झाला..पण तो आनंद फार काळ टिकला नाही..मुसा पुढील वर्षी हज वरून परत जात होता तेव्हा त्याला तिथली व्यवस्था कोलमडलेली दिसली..व्यापार बंद होताना दिसले. त्याचे कारण तेव्हा त्याला कळले का नाही माहीत नाही पण त्याचे कारण मुसा ने वाटलेले सोने..त्यामुळे अचानक आलेली श्रीमंती होती हे आज कळून चुकले आहे.
ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅
म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇
आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -
>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात
ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.
म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.
म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.
थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜
आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!
म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.
फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!
आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇
१/n
>>> आता जे लोक Intraday किंवा F&O करत नाहीत
त्यांच्या शेअर मार्केटमधील शेअर
(सोबतच म्युचुअल फंड,बाँड, ETF etc etc सर्व गोष्टी पण)
विकून येणाऱ्या कमाईला सरकार २ प्रकारे बघते -
१) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षाच्या आत विकतात -
त्यांना १५% ने कर लागतो. ह्याला सरकार म्हणते STCG अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच कमाई..हा बिझिनेस नाही..!
म्हणजे १ लाख असे जर कमावले असतील तर त्यातले १५% म्हणजे १५ हजार सरकारला जातील बाकी ८५ हजार तुमचे..!
मग टॅक्स स्लॅब कितीही असू द्या..!🤩
२/n
२) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षानंतर विकतात -
त्यांना १०% ने कर लागतो. आणि ह्याला सरकार म्हणते - LTCG अर्थात लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच कमाई..हाही बिझीनेस नाही..!
इथे फक्त फरक इतकाच आहे की इथे आपले दयावान सरकार १ लाखापर्यंत कमाई असेल तर त्यावर कोणताही कर लावत नाही व त्यावरील सर्व कमाईला १०% कर लागतो.
म्हणजे १ लाख कमाई असेल तर शून्य कर !
२ लाख असेल तर पहिल्या एक लाखावर शून्य कर आणि त्यावरील १ लाखावर १०% म्हणजे १० हजार..! असंच पुढच्या सर्व कमाईवर !
आता..इथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की भले मी करोडपती आहे आणि मी तसा ~ ३०-४०% टॅक्स स्लॅब मध्ये येतो पण जर माझा इन्कम शेअर मार्केट मधून १०० कोटी जरी असेल तरी मला १०% नेच टॅक्स लागेल..🤯
सांगायचं हेच की , २०-३०% स्लॅब मधल्या नोकरी करण्याऱ्या कामगार लोकांनी आपली कष्टाची कमाई इथे लावावी..F&O करून सरकार, ब्रोकर , advisor, शेअर मार्केट गुरू बिरू इ सर्व गरीबांना पोसायची जबाबदारी स्विकारू नये..!😏😜😂
पण..
इतक्या वेळा सांगूनही काही अतिहुशार लोक असे असतीलच जे अजूनही F&O आणि Intraday च्याच मागे पळातील..आणि असे होऊ नये म्हणून..
मायबाप सरकारने वरील कॅपिटल Gains कमाई ही बिझीनेस इन्कम नसूनही ह्यात झालेला लॉस पुढच्या ७ वर्षांत Intraday न् FnO सारखाच नफ्यातून वजा करता येईल अशी सूट दिली आहे..🥳🤯🥳