The Lone Wolf Profile picture
Apr 30 27 tweets 11 min read
गुमनामी बाबा : ३
#नेताजी
#gumnamibaba

हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात.
1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता )
2. रशियामधील मृत्यू
3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.

ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.

अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
शरणागतीचे विचार चालू होते. त्या काळात नेताजींच्या सरकारचे त्यातपुरते हेडक्वार्टर सिंगापूर येथे होते.

नेताजींनी टोकियोला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन ते जपानी सरकार बरोबर बोलणे करणार होते. सरेंडर करायचे आहे ते जपान बरोबर की वेगळे याबाबत चर्चा होणार होती.
जरी आझाद हिंद सेना जपानी सरकारच्या मदतीने युद्ध करीत होते तरीदेखील त्यांनी स्वतःचे स्वतंत्र भारतीय सरकार आपण केलेले होते त्याचे स्वतःचे चलन होते, स्वतःचा ध्वज होता. त्यामुळे नेताजींच्या मनात जपानने त्यांची शरणागती वेगळी घ्यावी व आम्ही आमची
शरणागती वेगळी घेऊ असा विचार होता. त्याबद्दलची बोलणी करण्यासाठी 16 ऑगस्ट 1945 ला नेताजींनी जपानला जाण्याचा निर्णय घेतला.

परंतु निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री नेताजींच्या अगदी जवळच्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची
भावना दिसून आली. त्या रात्री बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांना प्रचंड दुःख वाटत होते व त्यांचे वागणे जणू असे काही होते की नेताजी यापुढे परत कधी दिसणारच नाही. नेताजींनी देखील आझाद हिंद सेनेचा जो खजिना होता तो तातडीने आपल्या जवळ मागवून घेतला. त्यामुळे बाकी आजाद हिंद
मधील लोकांच्या मध्ये नेताजी जपानला जाणार व नंतर कधीतरी शरणागती पत्करणार अशी भावना होती तर त्यांच्या निकटवर्तीयांनी मध्ये मात्र अत्यंत वेगळी व दुःखाची भावना जास्त होती. या गोष्टीचे नवल वाटते की काही निकटचे सहकारी अक्षरशहा नेताजी जणूकाहीमृत्युमुखी पडणार आहे अशा पद्धतीने दुःखी होते.
नेताजींनी आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना स्वतः बरोबर घेतले. त्याचबरोबर जपानी अधिकारीदेखील त्यांच्याबरोबर जपानला जाणार होते. एकाच विमानांमधून हे सर्वजण जपान ला जाण्यास निघाले. त्याकाळात विमानांचा वेग जास्त नव्हता. 17 तारखेला सायगोन येथे नेताजी यांचा एक फोटो आहे. तो त्यांचा
शेवटचा फोटो मानला जातो.
त्या रात्री बऱ्याच गोष्टी बदलल्या गेल्या. नेताजींचे खासम खास लोक त्यांच्याबरोबर होते जसे की प्रितमसिंग, गुलजारा सिंह, हबीब उल रहेमान, आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च अधिकारी पद असलेले जनरल जे के भोसले. सोळा तारखेपर्यंत भोसले हे नेताजी यांच्या बरोबर होते.
परंतु १७ तारखेला बरेच प्लान बदलल्यामुळे नंतर जनरल भोसले नेताजी बरोबर नव्हते. त्यांना विमान बदलावे लागणार होते जे लहान असल्याने सगळ्यांना घेऊन जाणे शक्य नाही असे ठरवले गेले. हबीब उल् रेहमान हे नेताजी यांच्या बरोबर होते.
जपान जाणारा हवाई रस्ता तैवान वरून जाणारा होता त्या काळात. 18 ऑगस्ट ल वाटेत तलहोकु या विमानतळावर विमान थांबले.

तेथून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात विमानाचा हवेत भरारी घेताना स्फोट झाला. त्यामध्ये थर्ड डिग्री भाजले गेल्यामुळे नेताजींचा त्याच दिवशी म्हणजे 18 तारखेला मृत्यू झाला.
आता ही झाली सरकारने मान्यता दिलेली कहाणी किंवा थियरी. आता या घटनेनंतर काय काय घडले ते आपण बघू.

मुळात नेताजींचा मृत्यू 18 तारखेला झाला व त्याबद्दलची बातमी व त्यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम जपानने तेवीस तारखेला जाहीर केले. 23 ऑगस्ट 1945
ते बातमीदेखील छापण्यात करता आझाद हिंद सेनेतील एस.ए.अय्यर नावाचे अधिकारी होते त्यांनी ही बातमी लिहून दिली होती. ज्यामध्ये नेताजी जपानी सरकार सोबत समर्पणाच्या गोष्टीबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते असे आहे. ही बातमी खाली दोन फोटो मध्ये दाखवत आहे.
आता प्रश्न असा येतो की मुळांमध्ये जपाने 15 ऑगस्ट रोजी शरणागती पत्करली होती. दुसऱ्या महायुद्धा मधील त्यांचे सरकार बरखास्त झाले होते व नवीन सरकार स्थापन झाले होते त्याला फक्त दोन दिवस झाले होते. सुभाष चंद्र बोस यांचा करार जापनीज जुन्या सरकार बरोबर झालेला होता..
म्हणजेच नवीन सरकार हे अमेरिकेला शरणागती झाल्यानंतर त्यांच्या संमतीने तयार झालेले सरकार होते त्यांना भेटून सुभाषचंद्रबोस नक्की काय चर्चा करणार होते किंवा त्याला किती अर्थ होता? त्यामुळे जपानला जाण्याचा निर्णय हा प्रचंड रिस्क असलेला होता. कदाचित जपानला गेल्याबरोबर
नवीन जपानी सरकारनेच त्यांना अटक करण्याचे चान्स जास्त होते. केवळ एक दिवस पूर्ण झालेल्या जपानी सरकार बरोबर ते काय चर्चा करणार होते?

अर्थात हे माझे म्हणणे नाही. तर त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्मेंट ने नेताजींची मृत्युची बातमी आल्यानंतर लगेच सत्य शोधून काढण्यासाठी जी कमिटी बनवली
त्यांचे हे मत होते व त्याच प्रमाणे अनेक भारतीय देखील हा विचार बोलून दाखवत होते.

मुळामध्ये मृत्यू 18 तारखेला झाल्यानंतर 23 तारखेपर्यंत ही बातमी बाहेर का आले नाही हा सर्वात विवादात्मक मुद्दा होता. जपानच्या सरकारने इतका वेळ का घेतला
याबाबत अमेरिका व इंग्लंड दोन्ही ही साशंक होते. ब्रिटिश अधिकाऱ्याने तर आपल्या डायरीमध्ये लिहिलेले आहे की पकडण्याच्या आधी सात-आठ दिवस स्वतःच्या मृत्यूची बातमी देणे हे सुभाष बोस नक्की करू शकतात. म्हणजेच कोणाचाही या बातमीवर अजिबात विश्वास नव्हता. परंतु तत्कालीन भारतीय सरकारने या
बातमीचा स्वीकार केला व त्या काळातील भोळ्या जनतेने स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारमधील महान नेत्यांचे म्हणणे कोणत्याही शंका किंवा अविश्वासा शिवाय ऐकले त्यामुळे सर्व भारतात शोककळा पसरली.

आत्ताचे अमेरिकेमधील पेंटागॉन येत्या काळात वॉर डिपार्टमेंट म्हणून ओळखले जायचे. त्यांनी जाहीर
केलेल्या अहवालामध्ये हे स्पष्ट लिहिलेले आहे ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत कोणताही डायरेक्ट पुरावा उपलब्ध नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी केवळ लोकांच्या बोलण्यात व ऐकण्यामध्ये आहे त्यापलीकडे कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही.
ना कोणताही पोस्टमार्टम, ना कोणताही मृतदेहाचा फोटो काहीच नाही. सगळे काही हवेत. फक्त चर्चा आणि शाब्दिक गोष्टी.

आज आपण एकंदरीत सरकारी मान्यता असलेल्या थियरी बद्दल चर्चा केली व त्यातील फक्त एखाद-दुसरा पॉईंट वादग्रस्त वाटला तो येथे शेवटी मांडला परंतु त्याच्या पुढच्या भागात मात्र
ही थेरी किती बिनबुडाची आहे याबाबत सविस्तर चर्चा करेन. ज्या जपानी डॉक्टरांनी नेताजी म्हणून घोषित केले व त्याचे सर्टिफिकेट दिले त्यांची स्वतःची स्टेटमेंट पुर्णपणे विरुद्ध कशी होती व कोणत्या काळात त्यांची स्टेटमेंट कशी बदलली गेली त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी म्हणणाऱ्या
लोकांच्या बोलण्यामध्ये किती तफावत होती या सर्व गोष्टी आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

माझ्या लेखामध्ये काही ही चुकले असेल किंवा त्रुटी राहिली असेल असेल तर कृपया सांगावे त्याबद्दल मोठ्या मनाने माफ देखील करावे ही विनंती.
#mayurthelonewolf
#thelonewolfotos

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with The Lone Wolf

The Lone Wolf Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mayurjoshi999

May 1
दोन दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यामध्ये स्त्रीचे आईमध्ये रूपांतर कसे होते किंवा स्त्रीला त्यातून कशा पद्धतीने जावे लागते याबद्दल. त्यामध्ये किती ती कष्ट व वेदना असतात व त्याच प्रमाणे त्यात वात्सल्य व प्रेम या गोष्टी कश्या असतात वगैरे वगैरे. पुरुषांसाठी मात्र या गोष्टी पूर्ण
वेगळ्या असतात..बाजू छान मांडली होती.

पण माझा मुद्दाच वेगळा आहे यावर.....अर्थात माझा विषय मूळ विषयाला सोडून काहीतरी भलताच असतो यात वाद नाही. सवय आहे ती कशी जाणार...
परंतु हे सगळे वाचताना माझ्या मनात हा प्रश्न आला की मुलांना जन्म देण्याचे धाडस कुठून येते लोकांकडे? अर्थात हे मी थट्टेने किंवा टीका करण्यासाठी बोलत नाहीये तर मला खरोखर त्याचे नवलही वाटते आणि जिज्ञासा देखील.
Read 23 tweets
May 1
गुमनामी बाबा - 4
#नेताजी #gumanami #subhash_bose

नेताजी यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी देशांमध्ये पोहोचली होती. सर्व देशावर दुःखाची छाया पसरली होती. काही लोकांमध्ये शंका-कुशंका नेताजींचा मृत्यू या बाबत उलट सुलट चर्चा चालू होत्या.
परंतु त्यावर कोणताही राजकीय विचार किंवा ॲक्शन अशी गोष्ट नव्हती कारण नेताजींचा मृत्यू झालेला आहे हे मान्य करण्यात आले होते.

सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवर काम करण्यास अमेरिकेने चालू केले. कारण नेताजींच्या मृत्युचा एकही स्पष्ट पुरावा कोणा समोरच नव्हता
त्यांचे मृत शरीर कोणाच्याही हाती लागले नाही किंवा त्यांच्या मृत शरीराचा फोटो कुठेही नव्हता किंवा त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कोठेही नव्हता. अशाप्रकारे डायरेक्ट लिंक असलेला कोणताच पुरावा त्याबाबत उपलब्ध झाला नाही त्यामुळे अमेरिका व इंग्लंड या बाबत साशंक होती. नेताजींचा मृत्यू
Read 40 tweets
Apr 29
सत्य भयकथा:अमावस्येच्या मुहूर्तावर❤️

कोलवा बीच, ते हॉटेल आणि ती खोली.......

मी:

माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.

आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.

गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
Read 55 tweets
Apr 29
लग्नाची उत्पत्ती.

बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.

उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत
Read 36 tweets
Apr 28
ध्यान

गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.

असो तर,

आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
Read 38 tweets
Apr 28
गुमनामी बाबा-२
#netaji
#नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.

तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.

सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
Read 31 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(