मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.
गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"
मग+
नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं!😅
उद्धवजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि+
राष्ट्रवादीचा त्यांना दर्प यायचा मात्र एक दिवस त्यांच्याच मांडीवर बसत सत्ता स्थापन केली, त्या मावा आघाडीच्या प्रेमात इतके वाहत गेले की आता हातात आपल्याच पक्षाच्या 55 आमदारां पैकी केवळ 4 - 5 आमदारांचे तुणतुणे राहिले आहे!
परवा रात्री वर्षावरून मुक्काम हलवत असताना "नका सोडून जाऊ+
रंगमहाल...." या पिंजरामधल्याच लावणीची मला प्रकर्षानं आठवण येत होती!😁🤣
माझ्यासाठी एकेकाळचे "आदर्शवादी मास्तर आणि आदर्शवादी उद्धवजी" दोन्ही सारखेच!😍👏👍
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.
जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
झाल्या, युतीला बहुमत आलं, तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंना उपरती झाली अन सेनेला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा कांगावा करत महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं, मुळात भाजपाने कोणता शब्द दिलाच नव्हता.
आज त्याच उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना शब्द देऊन फिरवला आणि हेच+
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.
शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
नेत्यांची वेशीवर टांगत आहेत.
जेव्हा परबांच्या दापोलीच्या रिसॉर्ट विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर कारवाईच्या अगोदरच पोलीस स्टेशनला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली, पण सोडून देतील ते सोमय्या कसले! त्यांनी रीतसर+
#महत्वाचा_थ्रेड
छत्रपती संभाजीराजे यांनी महाआघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली, काही दिवस वाटही पाहिली मात्र त्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अक्षरशः अपमान केला, जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेचा विषय आला आणि राजेंनी सांगितलं की "मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मला मदत करावी." तेव्हा+
राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
आणि शिवसेना सहाव्या जागेवर ज्यांना उमेदवारी देईल त्यांना आम्ही आमची मते देणार अशी घोषणा केली. म्हणजे संभाजीराजे यांना दिलेला शब्द 24 तासात फिरवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कमाल केली, थेट संभाजीराजे यांना अटी शर्ती आणि अल्टीमेटम देत दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर+
महत्वाचा थ्रेड👇
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा काल कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला, त्यात त्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर धक्का बसला, मला त्यांच्या मागच्या अनेक स्टेटमेंटची आठवण आली, कारण शरद पवार जे बाहेर बोलत होते ते आतमध्ये आयोगासमोर+
शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!
कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला 1 जानेवारी 2018 रोजी, आणि 2 जानेवारी 2018 ला शरद पवार मीडियासमोर आले, अजून पुरता हिंसाचार थांबला नव्हता, द्वेष आणि हिंसा मनात धगधगत होती, त्यावेळी मिडियासमोर येऊन शरद पवार म्हणाले की, "मी वढू गावातून माहिती+
घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून त्या ठिकाणी जाऊन चिथावणी देण्याची भूमिका अगोदर 3-4 दिवस केली, मी त्यांची नावे घेऊ इच्छित नाही पण ग्रामस्थ सांगतात!"
हे शरद पवार बोलेपर्यंत कोणीही हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतले नव्हते, ना कोणी संशय व्यक्त+
कोरेगाव भीमाच्या दंगलीत भिडे गुरुजींचा सहभाग नाही!
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून भिडे गुरुजींचे नाव वगळण्यात आलं. भिडे गुरुजी विरोधात कोणताही पुरावा नाही.
खरंतर पहिल्या दिवसांपासून आम्ही म्हणतोय की गुरुजी अशा कृत्यात अजिबात नसतात, देव, धर्म आणि देशासाठी अखंड हयातभर+
समर्पित भावनेने काम करणारे गुरुजी थोर आहेत!
शरद पवारांनी केवळ द्वेष करत त्याला रंग देऊन समाजात दुही माजवण्याचे काम केले, पवार ज्यांना विचारवंत समजतात ते आज अर्बन नक्षलवादी म्हणून काही तुरुंगात आहेत, काही जामिनावर बाहेर! बाहेर मिडियासमोर काहीही द्वेषपूर्ण वक्तव्ये करणारे+
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार परवा भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर यु टर्न मारून आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगून आले आहेत, आता तरी शरद पवारांनी थोतांड आणि तुष्टीकरणीय राजकारण थांबविले पाहिजे!
भिडे गुरुजींना त्या दंगलीच्या आरोपातून मुक्तता मिळाली, ही आनंदाची बातमी आहे!❤️🚩+
थ्रेड👇
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राज्याला लागलेल्या साडेसाती आणि शनीतून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही मातोश्रीवर येणार असून संकटमोचक हनुमानाची चालीसा म्हणणार असल्याचं त्यांनी+
जाहीर केलं होतं. त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर शिवसेना इकडे सतर्क होत आज पहाटेपासूनच शिवसैनिक रेल्वेस्टेशनवर जाऊन वाट बघत बसले होते आणि त्यांना तिथेच बसवत राणा दांपत्य थेट विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. ताटकळत बसलेल्या शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला. एकीकडे हे शिवसैनिक+
रेल्वेस्थानकावर तर काही शिवसैनिक आणि आमदार, खासदार थेट मातोश्रीच्या बाहेर येऊन या रखरखत्या उन्हात रस्त्यावर वाट बघत बसले आहेत. पण राणा दांपत्याने उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर येणार असल्याचं पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे.
"मातोश्री हे आमचं पवित्र ठिकाण, इथे कुणीही हनुमान+