थ्रेड👇
परवाच भाजपा- शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.+
खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
मात्र पुन्हा देवेंद्रजींनी या निर्णयाला समोर आणत, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मतांचा अधिकार मिळवून दिला.
जो शेतकरी काळ्या मातीत राबतो, कष्ट करतो अन उत्पादन केलेला आपला माल बाजार समितीत आणतो त्याला बाजार समितीच्या कोणत्याच प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. ना त्याला योग्य बाजारभाव मिळत+
होता, ना त्याला सोयीसुविधा मिळत होत्या.
ज्या बाजार समितीची निर्मितीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झाली आहे असं म्हणतो तिथे सत्ता कुणाची असेल हे ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नव्हता, पण न्यायाची, कल्याणाची अन समृद्धीची अपेक्षा धरणार तरी कुणाकडे, अन ती आत्मीयता तरी कुणाकडे असणार हाच+
विचार सुभाष बापू देशमुख यांच्या पणन विभागाने लक्षात घेतला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना 2017 पासून पहिल्यांदा मतांचा अधिकार मिळाला. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा पहिला संग्राम म्हणावा लागेल.
केवळ विविध विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या जोरावर बाजार+
समितीतली सत्ता ठरवायची ही पद्धत गेली वर्षानुवर्षे चालत राहिली अन आमचा शेतकरी पिचत राहिला, मुद्दाम भाव पाडला जायचा, त्याला सुविधा नाहीत, चोरीचे प्रमाण असायचे आणि या सगळ्या अडचणी असतानाही कुणालाच जाब विचारायला जाता यायचं नाही कारण बऱ्याच बाजार समित्या या आजारी होत्या. केवळ आपलं+
इप्सित साध्य करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा.
जेव्हा आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला तेव्हा आ. सुभाष बापू देशमुख म्हणाले होते, "शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे." बापूंना सुद्धा खऱ्या अर्थाने दुःख झालं होतं, कारण त्या निर्णयामागे त्यांनी शेतकऱ्यांचं खरं+
दुखणं ओळखलं होतं.
पण मुळात प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आल्यावरच मतदानाचा अधिकार का काढून घेतला? खरी भीती त्यांनाच का आहे?
तर या राज्यातल्या अनेक बाजार समित्या वर्षानुवर्षे या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच ताब्यात राहिल्या आहेत, राहिल्या नव्हे तर ठेवल्याच+
होत्या.
गेली सत्तर वर्षे गावागावातील विविध विकास सोसायट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात होत्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीपासून राज्यपातळी पर्यंत सर्व व्यवस्था ज्यांच्या हातात होती त्यांनी बळीराजाचे शोषण केलं, पंचायत समित्यात शेततळी योजना आली की ती आपल्या+
कार्यकर्त्यांना, नाहीतर मग आपल्याच घशात घालायची, नवीन बी बियाणं, युरिया आला की आपल्याच मालकीचा करायचा, गावातील विकास सोसायट्यावर सुद्धा पूर्वी काँग्रेस आणि आता अलीकडे राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवलं आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. तू कुणाचा कार्यकर्ता आहे हे+
बघून सोसायटीचे कर्ज आणि लाभ देण्याची लाजिरवाणी पद्धत आघाडीने रुजवली. समस्त कारखानदारी आणि साखरसाम्राट हाताशी धरून जागोजाग शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं. बाजार समित्या तर पैसे खाण्याचं कुरण केलं, कारण शेतकऱ्यांना अधिकार नव्हता अन काही जागृत शेतकरी आवाज उठवायचा, बोलायचा प्रयत्न करत+
होते तर त्यांना स्थानिक पातळीवर अडचणीत आणून शोषण केलं जायचं.
ज्यावेळी 2014 ला देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात भाजपा सरकार आलं आणि आ. सुभाष (बापू) देशमुख सहकार आणि पणन मंत्री झाले त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पहिला झटका बाजार समित्यात मतांचा अधिकार देऊन दिला अन दुसरा झटका+
हजारो पिशवीतल्या सोसायट्या बरखास्त करून दिला.
आता पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार आले आहे. लोककल्याणाची अन शेतकरी समृद्धीची कामं सुरू झाली आहेत. आता कुठे आपलं सरकार आल्याची जाणीव होतेय, शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या उन्नतीची+
मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.
गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"
मग+
नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं!😅
उद्धवजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि+
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.
जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
झाल्या, युतीला बहुमत आलं, तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंना उपरती झाली अन सेनेला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा कांगावा करत महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं, मुळात भाजपाने कोणता शब्द दिलाच नव्हता.
आज त्याच उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना शब्द देऊन फिरवला आणि हेच+
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.
शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
नेत्यांची वेशीवर टांगत आहेत.
जेव्हा परबांच्या दापोलीच्या रिसॉर्ट विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर कारवाईच्या अगोदरच पोलीस स्टेशनला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली, पण सोडून देतील ते सोमय्या कसले! त्यांनी रीतसर+
#महत्वाचा_थ्रेड
छत्रपती संभाजीराजे यांनी महाआघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली, काही दिवस वाटही पाहिली मात्र त्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अक्षरशः अपमान केला, जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेचा विषय आला आणि राजेंनी सांगितलं की "मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मला मदत करावी." तेव्हा+
राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
आणि शिवसेना सहाव्या जागेवर ज्यांना उमेदवारी देईल त्यांना आम्ही आमची मते देणार अशी घोषणा केली. म्हणजे संभाजीराजे यांना दिलेला शब्द 24 तासात फिरवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कमाल केली, थेट संभाजीराजे यांना अटी शर्ती आणि अल्टीमेटम देत दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर+
महत्वाचा थ्रेड👇
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा काल कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला, त्यात त्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर धक्का बसला, मला त्यांच्या मागच्या अनेक स्टेटमेंटची आठवण आली, कारण शरद पवार जे बाहेर बोलत होते ते आतमध्ये आयोगासमोर+
शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!
कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला 1 जानेवारी 2018 रोजी, आणि 2 जानेवारी 2018 ला शरद पवार मीडियासमोर आले, अजून पुरता हिंसाचार थांबला नव्हता, द्वेष आणि हिंसा मनात धगधगत होती, त्यावेळी मिडियासमोर येऊन शरद पवार म्हणाले की, "मी वढू गावातून माहिती+
घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून त्या ठिकाणी जाऊन चिथावणी देण्याची भूमिका अगोदर 3-4 दिवस केली, मी त्यांची नावे घेऊ इच्छित नाही पण ग्रामस्थ सांगतात!"
हे शरद पवार बोलेपर्यंत कोणीही हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतले नव्हते, ना कोणी संशय व्यक्त+
कोरेगाव भीमाच्या दंगलीत भिडे गुरुजींचा सहभाग नाही!
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून भिडे गुरुजींचे नाव वगळण्यात आलं. भिडे गुरुजी विरोधात कोणताही पुरावा नाही.
खरंतर पहिल्या दिवसांपासून आम्ही म्हणतोय की गुरुजी अशा कृत्यात अजिबात नसतात, देव, धर्म आणि देशासाठी अखंड हयातभर+
समर्पित भावनेने काम करणारे गुरुजी थोर आहेत!
शरद पवारांनी केवळ द्वेष करत त्याला रंग देऊन समाजात दुही माजवण्याचे काम केले, पवार ज्यांना विचारवंत समजतात ते आज अर्बन नक्षलवादी म्हणून काही तुरुंगात आहेत, काही जामिनावर बाहेर! बाहेर मिडियासमोर काहीही द्वेषपूर्ण वक्तव्ये करणारे+
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार परवा भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर यु टर्न मारून आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगून आले आहेत, आता तरी शरद पवारांनी थोतांड आणि तुष्टीकरणीय राजकारण थांबविले पाहिजे!
भिडे गुरुजींना त्या दंगलीच्या आरोपातून मुक्तता मिळाली, ही आनंदाची बातमी आहे!❤️🚩+