अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक लागलीय, भाजपने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत, मात्र देवेंद्रजी म्हणाले आहेत आम्ही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून युतीमध्ये ही जागा लढवणार आहोत. मात्र ती जागा दोघांपैकी कुणाच्या वाट्याला सोडायची हे आम्ही अजून बैठक घेऊन ठरवू!
इकडे मात्र उद्धव+
ठाकरेंनी त्या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. ऋतुजा लटके या स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांचा राजीनामा मंजूर न होता तांत्रिक गोष्टीत+
अडकला आहे, राजीनामा तीन महिने अगोदर द्यावा लागत असल्याचे कारण समोर येत असून जर राजीनामा मंजूर नाही झाला तर ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवता येणार नाही.
इकडे उद्धव ठाकरे तर पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहेत आणि तिकडे अंधेरीच्या उमेदवारीचा प्रश्न अजून सुटला +
नाही.🤣
या राजीनामा प्रकरणात नेमकं कोण विघ्न आणतंय हे उद्धव ठाकरेंना कळत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आपल्या कामात मश्गुल आहेत.
पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंची अख्खी सेना फुटली आहे, नाव गेले, चिन्ह गेले आणि आता अंधेरीची जागा गेली की सगळा खेळ संपल्यात जमा. लवकरच+
मुंबई महानगरपालिका निवडणूकाही होत आहेत, तिथेही गाशा गुंडाळावा लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही!🤣💯🔥
या सगळ्या प्रकरणात देवेंद्रजी फडणवीस तेवढे पिक्चरमध्ये नाहीत हेच बरं आहे!😷
थ्रेड👇
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामण यांच्या बारामती लोकसभेचा प्रवास दौरा जाहीर झाला. येत्या 16, 17 व 18 ऑगस्ट या तीन दिवशी निर्मलाजी स्वतः बारामती लोकसभेत तळ ठोकून असणार आहेत. याचाच अर्थ आता भाजपाने मिशन बारामती लोकसभा हातात घेतले आहे. लोकसभा निवडणुकांना अजून दोन+
वर्षे बाकी आहेत मात्र बारामतीच्या बुरुजांना हादरे बसायला सुरुवात झालीय.
सध्या केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री असलेल्या स्मृतीजी इराणी यांनीही 2014 च्या अगोदर अमेठीमध्ये काँग्रेसी गांधींच्या अस्ताची सुरुवात अशीच केली होती, 2014 ला स्मृतीजींना थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र+
तरीही कामात सातत्य ठेवत त्यांनी 2019 ला थेट काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या राहुल गांधींना अस्मान दाखवत तब्बल 55 हजार मतांनी पराभवाची धूळ चारली आणि देशात कितीही मोठ्या घराणेशाहीचा पराभव करू शकतो हे स्पष्ट संदेश देत इतिहास निर्माण केला. भाजपासाठी 2019 ला अमेठी झाली, आता 2024 ला+
गेले दोन - तीन दिवस झाले उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे टिझर येताहेत, ते पाहत असताना कमालीची कीव येते, इतक्या टुकार गप्पा आणि टोमणे केवळ तेच मारू शकतात. मुलाखत पाहणं सोडा, टिझरही पाहणं जीवावर येतंय. मात्र त्या टिझरमध्ये सर्वात जास्त भांडवल काय असेल तर ते त्यांच्या आजारपणाचं आहे.+
केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
मला हे ऐकत असताना भाजपाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता. एका दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत,+
आपल्यामुळे राज्याचे नुकसान होऊ नये हे लक्षात ठेवणारा आणि कर्तव्याशी इमान ठेऊन अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत जीव ओतून काम करणारा दुसरा कोणताच नेता देशाने अनुभवला नाही. ना कधी त्यांनी त्या आजाराचं भांडवल केलं, ना त्यावर कधी चकार शब्द!
नाकाला नळी लावलेली असताना सभागृहात आलेला हा+
थ्रेड👇
परवाच भाजपा- शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.+
खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
मात्र पुन्हा देवेंद्रजींनी या निर्णयाला समोर आणत, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मतांचा अधिकार मिळवून दिला.
जो शेतकरी काळ्या मातीत राबतो, कष्ट करतो अन उत्पादन केलेला आपला माल बाजार समितीत आणतो त्याला बाजार समितीच्या कोणत्याच प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. ना त्याला योग्य बाजारभाव मिळत+
मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.
गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"
मग+
नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं!😅
उद्धवजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि+
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.
जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
झाल्या, युतीला बहुमत आलं, तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंना उपरती झाली अन सेनेला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा कांगावा करत महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं, मुळात भाजपाने कोणता शब्द दिलाच नव्हता.
आज त्याच उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना शब्द देऊन फिरवला आणि हेच+
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.
शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
नेत्यांची वेशीवर टांगत आहेत.
जेव्हा परबांच्या दापोलीच्या रिसॉर्ट विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर कारवाईच्या अगोदरच पोलीस स्टेशनला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली, पण सोडून देतील ते सोमय्या कसले! त्यांनी रीतसर+