परमसौगत Profile picture
Dec 28, 2022 18 tweets 10 min read Read on X
"श्यामची आई" आणि "बालसाहित्य" एवढीच प्रतिमा साने गुरुजींची केली जाते पण इतर अनेक ठिकाणी गुरुजींचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते (1/16)

#Thread #समाजसुधारक_साने_गुरुजी📍
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.

व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.

संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.

क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.

मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
दि.२४ डिसेंबर १८९९ रोजी दापोली शहराजवळील "पालगड" या गावी जन्मलेले साने गुरुजी म्हणजे, "फक्त श्यामची आई" आणि "बालसाहित्य" एवढीच प्रतिमा साने गुरुजींची केली जाते.

पण इतर अनेक ठिकाणी साने गुरुजींचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते अस्पृश्यता निवारण (4/16)
या क्षेत्रात साने गुरुजींनी उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे.

गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिव तर आईचे नाव यशोदाबाई असे होते.

वडील सदाशिवराव हे महसूल कलेक्टर होते. नंतरच्या काळात साने यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली व पुढे गुरुजींच्या आईचे म्हणजेच यशोदाबाईंचे (5/16)
१९१७ मध्ये निधन झाले.

साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठविण्यात आले. पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही, परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी पालगडला आले.

दापोली येथे (6/16)
असताना मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवणारे ते हुशार विद्यार्थी होते. व त्यांना कवितेतही रस होता.

१९१८ साली गुरुजींनी हायस्कूल मधून मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळवून पुढील शिक्षण सर परशुरामभाऊ कॉलेज मधून पूर्ण केले. तेथे त्यांनी बी.ए. ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी (7/16)
मराठी आणि संस्कृत साहित्यात एम.ए. ची मास्टर डिग्री पूर्ण केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजींनी अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केले, शाळेतील मुलांसाठी त्यांनी "विद्यार्थी" नावाचे एक मासिक देखील प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. (8/16)
गुरुजी हे प्रतिभाशाली वक्ता होते त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये "नैतिक मूल्य" निर्माण केली.

तसेच गुरुजींनी अध्यापनाचे कार्य ६ वर्ष केले व त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य "भारतीय स्वातंत्र्यासाठी" समर्पित केले. जेंव्हा महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली त्यावेळेस गुरुजींनी (9/16)
आपल्या शालेय नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला.

पुढे नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्याबद्दल त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्याने धुळे कारागृहात पंधरा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले.

१९३० ते १९४७ या कालावधीत साने गुरुजींनी (10/16)
अनेक आंदोलनात भाग घेतला व त्यांना तब्बल आठ वेळा अटक करण्यात आली.

व धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरुंगात सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले.

"श्यामची आई" ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. पुढे (11/16)
१९४२ च्या "भारत छोडो" आंदोलनात भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने १५ महिने तुरूंगात टाकले.

कामगार चळवळीतही साने गुरुजींचा सक्रिय सहभाग होता. वस्त्रोद्योग व खानदेशातील शेतकरी संघटित करण्यातही गुरुजींनी मुख्य भूमिका बजावली. व "राष्ट्र सेवा दलाची" स्थापना केली. (12/16)
ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. जातिभेद, दलितांना रूढी वागणूक, अस्पृश्यता या अनेक प्रकारच्या परंपरांचा साने गुरुजींनी कडाडून विरोध केला.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी गुरुजींनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला (13/16)
व या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला हे उपोषण ११ दिवस चालले आणि विठ्ठल मंदिराचे दरवाजे हे अस्पृश्यांसाठी खुले झाले.

"एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले." असे त्यावेळी म्हटले गेले.

गुरुजींनी विपुल साहित्य लेखन केले आहे. कादंबऱ्या, लेख, निबंध (14/16)
काव्य, चरित्रे, लेखन करत असताना भारतीय संस्कृती आणि माणसातील असणारे मूल्ये यांचा विचार करून त्यांनी आपली बरीच पुस्तके ही तुरुंगात पूर्ण केली आहेत.

प्रेम बंधुता यांची शिकवण देणारे थोर साहित्यिक साने गुरुजी स्वतः लिहिलेल्या "भगवान गौतम बुद्ध चरित्रामध्ये" म्हणतात, (15/16)
"भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले,

"जगाविषयी मनात सहानुभूती व करुणा बाळगून मानवांच्या हितार्थ, व कल्याणार्थ प्रयत्न करा, पावित्र्याने पुरीत अशा विशुद्ध व निर्दोष जीवनाची घोषणा करा; सुफलीत अशा कृतार्थ जीवनाची घोषणा करा." (16/16)

#थोर_साहित्यिक #समाजसुधारक #साने_गुरुजी📍

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with परमसौगत

परमसौगत Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PratikBalasah13

Apr 12
पुढे बाबासाहेब म्हणतात,

"तुमचे माझ्यावरील प्रेम पाहून मला कोणतेही कार्य करण्याची उमेद वाटते."

#Thread🧵

गोलमेज परिषदेला निघाले असता आंग्लविद्याविभूषित डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी भरलेल्या अस्पृश्य समाजाला दिलेला संदेश आजही आपल्या चळवळीला दिशा व प्रेरणा देणारा आहे,+ Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेस निघाले असता बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी मुंबईतील "कावसजी जहांगीर" सभागृहांमध्ये एक सभा भरवली गेली होती. परिषदेत जमलेल्या अस्पृश्य वर्गातील स्त्रियांपुढे बाबासाहेबांनी अत्यंत स्फूर्तिदायक भाषण त्यावेळी केले, आपल्या भाषणात बाबासाहेब+
म्हणतात,

"भावी पिढीला आजच्या गुलामगिरीचा मागमूसही दिसणार नाही अशी अलौकिक स्वार्थत्यागाची कामे अगदी निर्भयपणे करावयास तुम्ही सज्ज झालात की माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पाडण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल."

त्याच सभागृहांमध्ये थोड्यावेळाने पुरुष वर्गाचा निरोप घेते वेळी ते+
Read 6 tweets
Apr 3, 2023
( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )

गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)

#ThanksPhuleAmbedkar📍
"दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.

अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
वलंगकर, शिवराम कांबळे यांनी देखील अमानुष व्यवस्था बदलण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तसेच या चळवळीला व्यापक रूप देऊन ज्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला गतिमान केले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या गुरूंच्या सत्कार्याची माहिती, (3)
Read 12 tweets
Apr 2, 2023
(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)

वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)

#ThanksPhuleAmbedkar📍
नि:संशय मोलाची आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
घटना समितीतील अखेरचे भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

राष्ट्राच्या भवितव्यासंबंधी आपले मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात,

"भारत २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल, हा माझ्या मनात पहिला प्रश्न (3)
Read 17 tweets
Apr 1, 2023
( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )

असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)

#ThanksPhuleAmbedkar📍 Image
कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,

याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या या कृतीचा भारतीय जनमानसात सखोल असा कोणताच परिणाम झाला नाही.

कारण अस्पृश्यतेचे मूळ असणारा चातुर्वरण्यांचा सिद्धांत व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता व त्या आधारित जातीभेद नष्ट करणे, हे त्या समाजसुधारकांचे मुख्य (3/18) Image
Read 19 tweets
Jan 6, 2023
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)

#पत्रकार_दिन #Thread📍
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.

अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.

तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
Read 15 tweets
Jan 5, 2023
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)

#सावित्रीमाई_फुले #Thread📍
आतापर्यंत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इतकीच ओळख आपल्याला माहित आहे.

पण याव्यतिरिक्तही सावित्रीमाई फुले यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, अस्पृश्यांचे हाल पाहून लहानपणापासूनच (2/27)
ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले.

ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीमाईंनी केले व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या. (3/27)
Read 27 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(