#Thread - "स्वराज्यस्वामींनी"

#राजमाता म्हटलं की ज्यांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यासमोर येते त्या म्हणजे- जिजाऊ माँसाहेब.

जिजाऊंची जडणघडण ही एका घरंदाज कुळात झाली, पुढे त्याच तोलामोलाच्या घराण्यात त्यांचा विवाह झाला. धैर्य -शौर्याचा, साहसाचा वारसा त्यांच्या माहेराकडून मिळाला. Image
जाधव घराणे हे त्यावेळी राजे किताबाने गौरवलेलं सन्मानप्राप्त घराणं होत. पुढे राजे किताब असलेल्या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या. व इथून खरी त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची, ओळख सगळ्या जगाला होते.! इथूनच मध्ययुगीन भारतातील सुवर्णकाळाचा अध्याय सुरू झाला अस म्हणण्यास हरकत नाही. Image
जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह झाल्यावर, समकालीन कवी - परमानंद यांनी आपल्या शिवभारत ग्रंथात जिजाऊ बद्दल जे लिहल आहे ते नक्की बघण्याजोगत आहे.!

परमानंद म्हणतो - "जेव्हा 'विनयशील' जिजाऊ, भोसले घरात येतात तेव्हा, शहाजीराजे व जिजाऊ या जोडीला जणू लक्ष्मीनारायणाची शोभा येतेय."
पुढे परमानंद म्हणतो - जिजाऊंच्या येण्याने, त्यांच्या तेजाने, शहाजीराजेंचा पराक्रम व कीर्ति प्रखरपणे दिसु लागली.!
माता पार्वती जशी श्री शंकराची सेवा करते तशी ती पती शहाजीराजेंची सेवा करतेय.!

परमानंद इथे, जिजाऊ विषयी विनयशील, गुणवान, प्रेमळ या अर्थाचे आशयाचे शब्द वापरतो.!
आपल्या मातेसमान असलेल्या सासूची सेवा, पतींशी आदरयुक्त प्रेमळ वार्तालाप व सेवा करणे, त्याना धीर देणे. एवढंच नव्हे तर इतर पतिव्रता स्रियांना त्या मार्गदर्शन करायच्या.! माहेर आणि सासर, अशा दोन्हीकडील थोर वडीलधाऱ्याना प्रियजनांना आपल्या सुस्वभावाने त्या आनंदित करायच्या.
जिजाऊ बद्दल विनय, विनयशीलता हा शब्द परमानंदाने दोनतीन वेळ वापरला आहे.!
व त्यासोबतच "विनयाची प्रतिमूर्ती" हा शब्द वापरून त्याने जिजाउंच चरीत्रचं स्पष्ट केल आहे.!
समकालीन व शहाजीराजेंच्या पदरी असलेल्या कवी जयराम पिंडयेनी आपल्या 'राधामाधवविलासचंपु' या ग्रंथात जिजाऊ बद्दल लिहल Image
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली ज्यास शोभली जाया जिजाई ! जिचे की कीर्तीचा चंबूजंबुद्वीपाला ! करी साउली माऊलीसी मुलाला !

याचा अर्थ- जिजाऊ ह्या पराक्रमी धीर, उदार, वीर शाहजीराजेने शोभणार्या पत्नी आहे. पतीची कीर्ती महान असली तरी, त्यांची कीर्ती व प्रसिद्धी वेगळी- स्वतंत्र आहे !
जिजाऊंची उदार व गंभीर कर्तव्यदक्ष वृत्ती पूर्ण जम्बुद्वीपात पसरली आहे की, गरीब, पीडित सज्जन, सभ्य असे लोक परकीय लोकांच्या त्रासाला- अन्यायाला कंटाळून थेट जिजाऊंच्या आश्रयाला- साउलीला येतात.! ही त्यांची कीर्ती आहे.! रयेतला त्यांचा मोठा आधार होता हे इथं स्पष्ट होतं.! Image
जिजाउंच विवाहानंतर सुरवातीच्या काळातील जीवन हे अतिशय धामधुमीच धावपळीच व त्रासदायक गेलं. पती शहाजीराजे यांचा पराक्रम असला तरी, त्यांना म्हणावा तेवढा सन्मान मिळत नव्हता. त्यांचे सासरे व मेहुण्याची हत्या निजामशाहने केली, यानंतर शाहजीराजे आदिलशाहीत गेले तिथेही तीच तऱ्हां झाली. Image
या सर्व घटनाचां परिणाम जिजाऊवर जाणवू लागला. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देत शहाजीराजे आपल्या पत्नी व मुलांची व्यवस्था नीट करत. शिवजन्मानंतर जिजाऊ व बाळशिवाजीराजेंचा निवास शिवनेरी, अहमदनगर, पेमगिरी, दौलताबाद, माहुली आदी ठिकाणी झाला.! पण या सर्व परिस्थितीला जिजाऊ धैर्याने समोर गेल्या. Image
शहाजीराजे मुलूखगिरी वर असताना, शिवबांचा जन्म झाला. यात जे बाळाचे सर्व परंपरागत विधी असतात ते सर्व जिजाऊनी शिवनेरीवर व्यवस्थित पार पाडले. 1630 ते 1630 पर्यत शिवाजीराजेंची काळजी-संगोपन-शिक्षण जिजाऊंनी उत्तम केलं. या सर्व धामधुमीत जिजाऊना या गडावरून त्या गडावर जावे लागत Image
कारण त्यावेळी मोघल आणि शहाजीराजेंचा संघर्ष तीव्र स्वरूपाचा होता. पुढे जिजाऊंना नाशिकला, बाळशिवबा समेत कैदही झाली. नंतर त्यांचे चुलते जगदेवराय जाधव यांच्या विनंतीवरून त्यांची सुटका झाली.!

हे सर्व सांगायच कारण की माँसाहेब जिजाऊनी किती अवघड-कठीण परिस्थितीला तोंड दिलं होतं.!
शाहजीराजेंचे कारभारी दादोजी कोंडदेव यांनी, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढे परकिय आक्रमणामुळे भकास झालेलं असलेली पुणे जाहगिरीची घडी पुन्हा ठीक बसवली.!

आपल्या आईच धैर्य, व्यवस्थापन, समयसुचकता, निर्णयक्षमता, प्रजावत्सल कारभार या सर्व गोष्टी बाळशिवाजीराजे पाहत मोठे झाले.! Image
पुढे स्वराज्याचं दिव्यकार्य सुरू झाल्यावर जिजाऊंनी शिवाजीराजेंना एक मार्गदर्शक म्हणून जी साथ दिली, बर वाईट जाणून घेण्याची उदारवृत्ती प्रदान केली.! रयेतेबद्दल असलेली कणव राजेंच्या मनी असेल तर त्याच मुळ, जिजाउंच्या उदार अंतःकरणात सापडत. जे मी वर जयराम पिंड्येच्या काव्यात सांगितलय. Image
राजेंनी ज्या काही मोहिमा काढल्या, त्यात अफजलखान, शाहिस्तेखान, सुरतेची लूट, आग्रावरून सुटका, या मोहीम हिंदुस्थानाच्या इतिहासात अजरामर आहेत. या सर्व मोहिमां फत्ते करण्यासाठी राजे जेव्हा बाहेर पडायचे, तेव्हा गडावरून स्वराज्याचा राजकारभार स्वतः जिजाऊंच्या देखरेखीखाली असायचा.! Image
अफजलखाचे पारिपत्य करताना, लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करताना, सुरतेची लूट करताना, या सर्व मोहिमाआधी जिजाऊबरोबर राजेंची चर्चा झाली असणार, त्याना एक मार्गदर्शक व आई म्हणून जे बळ व आशीर्वाद दिला असणार हे त्या मोहीमेच्या यशात दिसून येत. यावेळी राज्याची काळजी जिजाऊंनी नीट घेतली
आग्ऱ्याला निघाल्यापासून ते सुटेकपर्यत 6 ते 7 महिन्याचा काळ होता. या काळात स्वराज्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आधी जसा, तसाच कारभार जिजाऊंनी सांभाळला.
स्वराज्याची पहिली आरमार मोहीम' बसरूर मोहिमेला जात असताना राजेंनी जिजाऊंची सूर्यग्रहणाच्या पर्वणीला सुवर्णतुला केली Image
( महाबळेश्वरला 1665 मध्ये ही सुवर्णतुला केली आहे. )

म्हणजे यात कळून येईल की, राजेनां लढाया मोहिमां वेळी आईकडून उपयुक्त सल्ले, धीर, मार्गदर्शन, आशीर्वाद, आदी मिळायचे. आणि हेच त्यांच्या यशाचे फल आहे. शिवरायांच्या चरित्राविषयी वाचताना आपल्याला महाराजांना जो महान गुण दिसतो Image
तो म्हणजे परस्त्रीचा अतोनात आदर, तिला मातेइतकीच समजणे.! सोबतच स्वराज्यात स्रियाच्या विक्रीला अटकाव. शत्रूच्या गोटातील स्रियांना आदराने त्यांच्या घरी पोहोच करणे. शत्रूच्या स्रियांना बंदी करण्याचे हिणकस प्रकार शिवरायांनी कधीच केले नाही.! हे सर्व संस्कार माँसाहेब जिजाऊंचेच Image
पुढे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झाल्यानंतर. नातु शभुराजेंना आई इतकीच माया देऊन वाढवले, त्यानाही थोरल्या महाराजासारखे संस्कार दिले.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही राजे इतिहासात महान राजा म्हणून अमर आहेत. यामागे केवळ जिजाऊचं.! Image
जिजाऊ ह्या शिवाजी महाराज व शभुराजें या बापलेका मधील एक संवादाचा दुवा होत्या. तसेच राजेंच्या धर्मपत्नी व राजे यांच्यामध्ये जो मायेचा पदर होता तो जिजाऊं होत्या. राजे आणि राण्यांमधील दुवा जिजाऊच होत्या. एक मातृसमान सासू म्हणून त्या रायगडचे कौटुंबिक वातावरण, नीट व आलबेल ठेवायच्या. Image
मला वाटत की एक माता केव्हा धन्य होते ? जेव्हा तिच्या लेकास या धर्तीवर अलौकिक कीर्ती व सन्मान प्राप्त होतो.! म्हणून शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा या जगात सर्वात जास्त आनंद हा जिजाऊनाच झाला.! पाच पातशाहच्या समोर आपल्या मुलाने एक सार्वभौम राज्य निर्माण केले हा एक आनंदच. Image
राजे छत्रपती म्हणून सिंहासनी बसल्याच्या 12 दिवसांनीच जिजाऊ स्वर्गावासी झाल्या.!

इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवात जिजाउबद्दल लिहतात- "एक वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, म्हणून जिजाऊसारखे भाग्य कुणाला लाभले नाही"

[ यासोबत मला जिजाऊ एक (शभुराजें) वीराच्या आज्जी सुद्धा होत्या. ]
मध्ययुगीन भारतासह या जगात सर्वात आधी स्वातंत्र्य न्याय समता या मानवी मूल्यांच अधिष्ठान कोणी बसवले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असे थोर मानवतावादी राजे जगाला देणाऱ्या माता म्हणजेच राजमाता जिजाऊ.!

माझ्या मते माँसाहेब जिजाऊ म्हणजे एक हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यमाताच होय. Image
1630 ते 1636 असे वाचावे ..👍

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विजय गिते―पाटील

विजय गिते―पाटील Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kingsmanT11

Sep 2, 2023
#वाचा
एकीकडे स्वतःला क्षत्रियकुलांवंस- कुलीन मराठा समजणाऱ्या गरीब मराठा समाजाचे अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीचे सत्य द्वंद्व

१) घरी 1 ते 10 एकर शेती
२) घर बांधायला कर्ज, पाहुण्यकडून उधार पैसे
३) डिप्लोमा, इंजिनिअरिंग, नर्सिंग ITI पर्यत शैक्षणिक उड्या
५) अजूनही हुंडा देणे -घेणे
👇
६) मुलीच्या व मुलाच्या लग्नात, उच्चभ्रूपणाचा तोरा मिरवायला वारेमाप पैशांची उधळपट्टी.

७) कसतरी कर्ज काढून घर बांधणे, घराला बाहेरून गिलावा,रंगरंगोटी न करता वास्तुशांती, जागरण गोंधळ सारखे कार्यक्रमात पैसे उधळणे

७)दारू, पान मसाला, सिगारेट, तंबाखु घेऊन पैसे आणि शरीर बरबाद करणे
👇
८) उच्चभ्रू हॅप्पी बड्डेचे थोतांड साधेपणाने न साजरे करता, ऐपत नसतानाही, मित्रांना खुश करण्यासाठी 5 - 10 हजार रुपये खर्च करून, त्याना पार्टी देणे. व आपल्या नसलेल्या तथाकथित दिलदारकीचा रुबाब झोडणे.

९) दारू पत्ते,रमी सर्कल, व मटक्यात पैसे उधळणे.

१०) एकमेकाचे पैसे बुडवणे.
👇
Read 12 tweets
Aug 28, 2023
#Thread
महापुरुषांच्या मर्यादा - शरद पाटील - बुद्ध

इंडोलोजिस्ट शरद पाटील यांचे साथी व जेष्ठ अनुयायी युवराज बाबा यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते मला म्हणाले की विजू, शरद पाटील मला नेहमी म्हणायचे

"मी कुठल्याही तत्वज्ञानाचं बिनशर्त समर्थन करणार नाही किंवा समर्थक होणार नाही"
👇
शरद पाटील यांच हे वाक्य खूप काही सांगून जात, तुम्ही कोणत्याही विचारधारेला बिनशर्त मानू नका, प्रत्येक विचारधारेला आणि तत्वज्ञानाला मर्यादा असतात. त्या मर्यादा आपण ओळखल्या पाहिजे. बुद्ध, मार्क्स, छत्रपती शिवाजी - संभाजी महाराज, फुले आंबेडकर ही माणसं होती, त्यानाही मर्यादा होत्या.👇
शरद पाटील यांच्याकडे एक संगीतकार आले होते, आणि बोलले की शपा आम्हाला, महापुरुषावर गाणे बनवायचं आहे काहीतरी सांगा. त्यावेळी ते बोलले गाणं बनवा पण नुसती स्तुती नको; तर त्या महापुरुषांच्या मर्यादा पण मांडा.

मर्यादा मांडल्याने आपण व्यक्तिपूजेच्या रोमँटिक आदर्शवादाला बळी पडत नाही.👇
Read 9 tweets
Aug 12, 2023
#Thread - वाचा
"मराठ्यांच्या संबंधाने चार उद्गार" - या थोर ग्रंथात इतिहास संशोधक धर्मचिकित्सक राजाराम शास्त्री भागवत पेशव्यांच्या स्वामीद्रोहा बद्दल लिहतात.

- पेशवाईच्या बाहेरून विस्तीर्ण दिसणाऱ्या वृक्षाची स्थिती आंतून भोंवर लागलेल्या माडाप्रमाणे झाली होती.

वाचा खाली..👇
हें माधवराव पेशव्यांच्या देखील लक्षांत येऊन चुकलें होतें “अंतकाळाच्या समयीं पश्चाताप होऊन त्यांनी विद्वान शास्री व पंडित यांस विचारिलें की पेशव्यांचे राज्यात धमोंत्कर्ष होत आहे; दौलतींतील सर्वं लोक सुखी आहेत, प्रजापालन चांगले होत आहे,
असें असतां पेशव्याचें वंशास क्षय लागला व पानपतीं फौज गार होऊन दौलत बुडाली याचें कारण काय? तेव्हां काशीकर शास्री यांनीं उत्तर केलें कीं, स्वामीद्रोहापेक्षां थोर पातक नाहीं. धन्यास् प्राधान्य प्रतिबंधांत ठेवून राज्याच्या उपभोग करूं इच्छितात याच कारणानें वंशक्षय व अपकीर्ति होत चालली
Read 10 tweets
Aug 11, 2023
#Thread
नेहरु - संघ भाजपला एवढे का खुपतात.?

याचे कारण - देशाच्या जनतेनं नेहरूंना १९५२ च्या निवडणूकी पासून १९६२ पर्यत शक्तीशाली बहुमताने पंतप्रधान बनवलं होत. !नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत काँग्रेसचा विचाराचा उत्कर्ष केला अन महात्मा गांधीचा धर्मनिरपेक्ष विचार मोठा केला होता.
👇
नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९५२ पासून ३ लोकसभा निवडणूका लढवल्या. तिन्ही निवडणुकीत भारतीय जनतेन त्याना भरभरून मतदान केलं.

काँग्रेस | जनसंघ
१९५२ - ३६४ सीट्स | - ३ सीट्स
१९५७ -३७१ सीट्स | - ४ सीट्स
१९६२ - ३६१ सीट्स | - १४ सीट्स
👇
पंडित जवाहरलाल नेहरु असेपर्यत जनसंघ एकदम अडगळीतला पक्ष म्हणून राहिला.! नेहरू गेल्यानंतर, जनसंघाला मोठी तरतरी आली. १९६७ च्या निवडणूकित त्यानी थेट ३५ जागा मिळवल्या.! जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व MP बिहार व UP या राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. 👇
Read 18 tweets
Jul 16, 2023
#Thread
महाभारतातील प्रधान संघर्ष - भाग १

कौरवांच आणि पांडवांची वाटणी होण्याआधी ते एक कुलातील भांडण होतं. कुरुराज्याची वाटणी म्हणजे― खांडववनाची हस्तिनापुराची वाटणी झाल्यावर ते आता दोन विभक्त कुलांचे आणि नंतर कुरुक्षेत्रावर दोन गणातील भांडण बनले. त्यांची वाटणी का झाली हे बघा.
👇
राजर्षीशासित दासप्रथाक राजक गणराज्याच्या समयानुसार 7 पिढ्यानंतर कुल विभक्त होणे हा तत्कालीन पारंपरिक समय होता. ( समय म्हणजे कायदा ) पांडव सुद्धा
कौरव होते. कारण ते कुरुचे वंशज होते. वडिलांच्या नावामुळे ते पांडव , तसे ते ब्रह्मवादिनी कुंतीचे पुत्र म्हणून कौंतेय सुध्दा.
अर्जुन जेव्हा द्वंद्वयुध्दात चित्रसेन गंधर्वाचा पराभव करतो तेव्हा तो शंकेच निरसन करताना पांडवांना - अर्जुनाला 'तापत्य' म्हणतो , तापत्य म्हणजे तपतीचे वंशज. तपती पूर्वीच्या कुरुराज्याची राजा, गणराष्ट्री होय. तपती ही भूमाता होती. तसेच पांडवांची आई कुंती ही मूळच्या मातृवंशक राज्याची.
Read 25 tweets
Jun 19, 2023
Happy birthday Rahul gandhi..🎂

१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा.!
― आपल्या विचारावर, तत्वावर,  निर्णयांवर ठाम राहणारा माणूस.  कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली. 
( पुढे वाचा. )👇 Image
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं  चित्र तयार केलं.

ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप,  चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇 Image
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.

ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(