#Thread - "स्वराज्यस्वामींनी"

#राजमाता म्हटलं की ज्यांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यासमोर येते त्या म्हणजे- जिजाऊ माँसाहेब.

जिजाऊंची जडणघडण ही एका घरंदाज कुळात झाली, पुढे त्याच तोलामोलाच्या घराण्यात त्यांचा विवाह झाला. धैर्य -शौर्याचा, साहसाचा वारसा त्यांच्या माहेराकडून मिळाला. Image
जाधव घराणे हे त्यावेळी राजे किताबाने गौरवलेलं सन्मानप्राप्त घराणं होत. पुढे राजे किताब असलेल्या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या. व इथून खरी त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची, ओळख सगळ्या जगाला होते.! इथूनच मध्ययुगीन भारतातील सुवर्णकाळाचा अध्याय सुरू झाला अस म्हणण्यास हरकत नाही. Image
जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह झाल्यावर, समकालीन कवी - परमानंद यांनी आपल्या शिवभारत ग्रंथात जिजाऊ बद्दल जे लिहल आहे ते नक्की बघण्याजोगत आहे.!

परमानंद म्हणतो - "जेव्हा 'विनयशील' जिजाऊ, भोसले घरात येतात तेव्हा, शहाजीराजे व जिजाऊ या जोडीला जणू लक्ष्मीनारायणाची शोभा येतेय."
पुढे परमानंद म्हणतो - जिजाऊंच्या येण्याने, त्यांच्या तेजाने, शहाजीराजेंचा पराक्रम व कीर्ति प्रखरपणे दिसु लागली.!
माता पार्वती जशी श्री शंकराची सेवा करते तशी ती पती शहाजीराजेंची सेवा करतेय.!

परमानंद इथे, जिजाऊ विषयी विनयशील, गुणवान, प्रेमळ या अर्थाचे आशयाचे शब्द वापरतो.!
आपल्या मातेसमान असलेल्या सासूची सेवा, पतींशी आदरयुक्त प्रेमळ वार्तालाप व सेवा करणे, त्याना धीर देणे. एवढंच नव्हे तर इतर पतिव्रता स्रियांना त्या मार्गदर्शन करायच्या.! माहेर आणि सासर, अशा दोन्हीकडील थोर वडीलधाऱ्याना प्रियजनांना आपल्या सुस्वभावाने त्या आनंदित करायच्या.
जिजाऊ बद्दल विनय, विनयशीलता हा शब्द परमानंदाने दोनतीन वेळ वापरला आहे.!
व त्यासोबतच "विनयाची प्रतिमूर्ती" हा शब्द वापरून त्याने जिजाउंच चरीत्रचं स्पष्ट केल आहे.!
समकालीन व शहाजीराजेंच्या पदरी असलेल्या कवी जयराम पिंडयेनी आपल्या 'राधामाधवविलासचंपु' या ग्रंथात जिजाऊ बद्दल लिहल Image
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली ज्यास शोभली जाया जिजाई ! जिचे की कीर्तीचा चंबूजंबुद्वीपाला ! करी साउली माऊलीसी मुलाला !

याचा अर्थ- जिजाऊ ह्या पराक्रमी धीर, उदार, वीर शाहजीराजेने शोभणार्या पत्नी आहे. पतीची कीर्ती महान असली तरी, त्यांची कीर्ती व प्रसिद्धी वेगळी- स्वतंत्र आहे !
जिजाऊंची उदार व गंभीर कर्तव्यदक्ष वृत्ती पूर्ण जम्बुद्वीपात पसरली आहे की, गरीब, पीडित सज्जन, सभ्य असे लोक परकीय लोकांच्या त्रासाला- अन्यायाला कंटाळून थेट जिजाऊंच्या आश्रयाला- साउलीला येतात.! ही त्यांची कीर्ती आहे.! रयेतला त्यांचा मोठा आधार होता हे इथं स्पष्ट होतं.! Image
जिजाउंच विवाहानंतर सुरवातीच्या काळातील जीवन हे अतिशय धामधुमीच धावपळीच व त्रासदायक गेलं. पती शहाजीराजे यांचा पराक्रम असला तरी, त्यांना म्हणावा तेवढा सन्मान मिळत नव्हता. त्यांचे सासरे व मेहुण्याची हत्या निजामशाहने केली, यानंतर शाहजीराजे आदिलशाहीत गेले तिथेही तीच तऱ्हां झाली. Image
या सर्व घटनाचां परिणाम जिजाऊवर जाणवू लागला. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देत शहाजीराजे आपल्या पत्नी व मुलांची व्यवस्था नीट करत. शिवजन्मानंतर जिजाऊ व बाळशिवाजीराजेंचा निवास शिवनेरी, अहमदनगर, पेमगिरी, दौलताबाद, माहुली आदी ठिकाणी झाला.! पण या सर्व परिस्थितीला जिजाऊ धैर्याने समोर गेल्या. Image
शहाजीराजे मुलूखगिरी वर असताना, शिवबांचा जन्म झाला. यात जे बाळाचे सर्व परंपरागत विधी असतात ते सर्व जिजाऊनी शिवनेरीवर व्यवस्थित पार पाडले. 1630 ते 1630 पर्यत शिवाजीराजेंची काळजी-संगोपन-शिक्षण जिजाऊंनी उत्तम केलं. या सर्व धामधुमीत जिजाऊना या गडावरून त्या गडावर जावे लागत Image
कारण त्यावेळी मोघल आणि शहाजीराजेंचा संघर्ष तीव्र स्वरूपाचा होता. पुढे जिजाऊंना नाशिकला, बाळशिवबा समेत कैदही झाली. नंतर त्यांचे चुलते जगदेवराय जाधव यांच्या विनंतीवरून त्यांची सुटका झाली.!

हे सर्व सांगायच कारण की माँसाहेब जिजाऊनी किती अवघड-कठीण परिस्थितीला तोंड दिलं होतं.!
शाहजीराजेंचे कारभारी दादोजी कोंडदेव यांनी, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढे परकिय आक्रमणामुळे भकास झालेलं असलेली पुणे जाहगिरीची घडी पुन्हा ठीक बसवली.!

आपल्या आईच धैर्य, व्यवस्थापन, समयसुचकता, निर्णयक्षमता, प्रजावत्सल कारभार या सर्व गोष्टी बाळशिवाजीराजे पाहत मोठे झाले.! Image
पुढे स्वराज्याचं दिव्यकार्य सुरू झाल्यावर जिजाऊंनी शिवाजीराजेंना एक मार्गदर्शक म्हणून जी साथ दिली, बर वाईट जाणून घेण्याची उदारवृत्ती प्रदान केली.! रयेतेबद्दल असलेली कणव राजेंच्या मनी असेल तर त्याच मुळ, जिजाउंच्या उदार अंतःकरणात सापडत. जे मी वर जयराम पिंड्येच्या काव्यात सांगितलय. Image
राजेंनी ज्या काही मोहिमा काढल्या, त्यात अफजलखान, शाहिस्तेखान, सुरतेची लूट, आग्रावरून सुटका, या मोहीम हिंदुस्थानाच्या इतिहासात अजरामर आहेत. या सर्व मोहिमां फत्ते करण्यासाठी राजे जेव्हा बाहेर पडायचे, तेव्हा गडावरून स्वराज्याचा राजकारभार स्वतः जिजाऊंच्या देखरेखीखाली असायचा.! Image
अफजलखाचे पारिपत्य करताना, लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला करताना, सुरतेची लूट करताना, या सर्व मोहिमाआधी जिजाऊबरोबर राजेंची चर्चा झाली असणार, त्याना एक मार्गदर्शक व आई म्हणून जे बळ व आशीर्वाद दिला असणार हे त्या मोहीमेच्या यशात दिसून येत. यावेळी राज्याची काळजी जिजाऊंनी नीट घेतली
आग्ऱ्याला निघाल्यापासून ते सुटेकपर्यत 6 ते 7 महिन्याचा काळ होता. या काळात स्वराज्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आधी जसा, तसाच कारभार जिजाऊंनी सांभाळला.
स्वराज्याची पहिली आरमार मोहीम' बसरूर मोहिमेला जात असताना राजेंनी जिजाऊंची सूर्यग्रहणाच्या पर्वणीला सुवर्णतुला केली Image
( महाबळेश्वरला 1665 मध्ये ही सुवर्णतुला केली आहे. )

म्हणजे यात कळून येईल की, राजेनां लढाया मोहिमां वेळी आईकडून उपयुक्त सल्ले, धीर, मार्गदर्शन, आशीर्वाद, आदी मिळायचे. आणि हेच त्यांच्या यशाचे फल आहे. शिवरायांच्या चरित्राविषयी वाचताना आपल्याला महाराजांना जो महान गुण दिसतो Image
तो म्हणजे परस्त्रीचा अतोनात आदर, तिला मातेइतकीच समजणे.! सोबतच स्वराज्यात स्रियाच्या विक्रीला अटकाव. शत्रूच्या गोटातील स्रियांना आदराने त्यांच्या घरी पोहोच करणे. शत्रूच्या स्रियांना बंदी करण्याचे हिणकस प्रकार शिवरायांनी कधीच केले नाही.! हे सर्व संस्कार माँसाहेब जिजाऊंचेच Image
पुढे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झाल्यानंतर. नातु शभुराजेंना आई इतकीच माया देऊन वाढवले, त्यानाही थोरल्या महाराजासारखे संस्कार दिले.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही राजे इतिहासात महान राजा म्हणून अमर आहेत. यामागे केवळ जिजाऊचं.! Image
जिजाऊ ह्या शिवाजी महाराज व शभुराजें या बापलेका मधील एक संवादाचा दुवा होत्या. तसेच राजेंच्या धर्मपत्नी व राजे यांच्यामध्ये जो मायेचा पदर होता तो जिजाऊं होत्या. राजे आणि राण्यांमधील दुवा जिजाऊच होत्या. एक मातृसमान सासू म्हणून त्या रायगडचे कौटुंबिक वातावरण, नीट व आलबेल ठेवायच्या. Image
मला वाटत की एक माता केव्हा धन्य होते ? जेव्हा तिच्या लेकास या धर्तीवर अलौकिक कीर्ती व सन्मान प्राप्त होतो.! म्हणून शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा या जगात सर्वात जास्त आनंद हा जिजाऊनाच झाला.! पाच पातशाहच्या समोर आपल्या मुलाने एक सार्वभौम राज्य निर्माण केले हा एक आनंदच. Image
राजे छत्रपती म्हणून सिंहासनी बसल्याच्या 12 दिवसांनीच जिजाऊ स्वर्गावासी झाल्या.!

इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवात जिजाउबद्दल लिहतात- "एक वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, म्हणून जिजाऊसारखे भाग्य कुणाला लाभले नाही"

[ यासोबत मला जिजाऊ एक (शभुराजें) वीराच्या आज्जी सुद्धा होत्या. ]
मध्ययुगीन भारतासह या जगात सर्वात आधी स्वातंत्र्य न्याय समता या मानवी मूल्यांच अधिष्ठान कोणी बसवले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असे थोर मानवतावादी राजे जगाला देणाऱ्या माता म्हणजेच राजमाता जिजाऊ.!

माझ्या मते माँसाहेब जिजाऊ म्हणजे एक हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यमाताच होय. Image
1630 ते 1636 असे वाचावे ..👍

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vijay Gite- Patil

Vijay Gite- Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kingsmanT11

Jan 14
पानिपत युद्धात पराभव का झाला ?

14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला.अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे. Image
महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन
वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो. पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समूहवाचक आहे.)
Read 29 tweets
Dec 22, 2022
#Thread 📍
महाराष्ट्राच्या राजकरणाची पातळी घसरली आहे

जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून आपण पाहिलं तर लक्षात येईल की -महाराष्ट्राने एकही दिवस सुखाचा आणि शांततेचा स्थैर्याचा पाहिला नाही. रोज नवीन वाद महाराष्ट्राच्या माथी मारला जातोय, रोज नवीन गाढव गोंधळ
घातला जातोय.
सध्याचे नागपूर नगरीत चालत असलेलं हिवाळी अधिवेशन तुफानी आणि वादळी ठरत आहे. विरोधात असलेले MVA पक्षाचा आवाज दाबला जातोय, सदनात बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या - जनहितार्थ मुद्द्यावर चर्चा करायला अथवा, काही विशेष काम करायला शिंदे फडणवीस सरकार असमर्थ असल्याचं दिसुन येतंय.
महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनात, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे भूखंडाचा श्रीखंड. नेमकं काय आहे हा मुद्दा ―

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना, नागपूर सुधार प्रन्यास चा सुमारे 83 कोटींचा भूखंड, डेव्हलपर ला 2 कोटीला भाड्याने दिले आहे,
Read 18 tweets
Dec 6, 2022
#Thread
महापरिनिर्वाण दिना निमित्त-

बौध्द धर्माच्या पतनानंतर भारत सामाजिक, शारीरिक, बौद्धिक गुलामगिरीच्या गर्तेत ढकलला गेला. तो दोन हजार वर्षाचा काळ अमानुष होता. त्या गुलामगिरी विरोधात थेट विसाव्या शतकात आपल्या ज्ञानतेजाने, मानवतावादाचे अधिष्ठान घालणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय समाज गुलामगिरीत एवढा गुंग झाला होता की. त्याला त्याचे शोषण करणारे पुज्य- आदरणीय वाटत. तुमची गुलामगिरी तुमचा अभिशाप आहे. ती तुमच्या मागील जन्मातील पातकांची वसुली आहे. तुमची गुलामगिरी दुर्दैवी असली तरी दैवी आहे, असा ग्रह त्यांच्यात पेरण्यात ब्राह्मणवादी विचारधारा यशस्वी झाली
या गुलामगिरी विरोधात कार्य करण्याचे प्रयत्न म्हणावे तितके झाले नाही, जे झाले त्यांची व्याप्ती ही फार क्षुल्लक होती. तुमच्यावर लादलेली गुलामगिरी ही गतजन्मानचे पातक नसून ही एका विशिष्ट वर्गाच आत्मवर्चस्व अबाधित ठेवण्याकरीता केलेली हुकूमशाही व अमानवीय खटपट होय.
Read 20 tweets
Dec 4, 2022
शिवप्रेमींनो हे वाचा. 👇

माँसाहेब बघताय का ?
तुमच्या प्रिय शिवबाचा घोर अपमान.

तुमच्या सदकृपेने,महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान दिला, वर्षानुवर्षे गुलामीत खितपत पडलेल्या रयेतला, भूमीपुत्राला शक्ती दिली, स्वातंत्र्यप्रेरणा दिली. आज तोच महाराष्ट्र तुमच्या शिवबाचा अपमान सहन करतोय.
आबासाहेब शहाजीराजे- बघताय का तुमच्या पराक्रमी वीर पुत्राचा अपमान.!

महाराष्ट्रातील 12 कोटी मराठ्यांनो याचसाठी, शहाजीराजेनी स्वराज्यसंकल्प केला होता का ?
राजांना स्वराज्याच तोरण बांधण्यास उत्कृष्ट शिक्षण संस्कार दिले, पुण्यास येताना विद्वान शिक्षक दिले, हुशार कारभारी दिले.
आबासाहेब तुम्ही मोघलांना रक्ताच पाणी करून तीन वर्षे लढला, विजापूरी आपल्याला कैदही झाली, आपले बहुत हाल केले, तरीही आपण आपला स्वराज्य संकल्प सोडला नाही.
आणि आजचा मराठा, आपल्या छत्रपती पुत्राचा अपमान बघुन थंड पडलाय. हे तुम्हाला बघवत नसेल याची मला कल्पना आहे.
Read 17 tweets
Dec 3, 2022
शिवसेनेत आलं की माणसाच सोनं होत.

सुषमाताई अंधारे त्यापैकी एक. यापूर्वी त्या दलित चळवळीच्या नेत्या, आंबेडकरी चळवळीच्या नेत्या म्हणून महाराष्ट्राला परिचित होत्या. आज शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या विद्वत्त विचाराला व आक्रमक वक्तृत्वाला एक नवं व्यासपीठ मिळालय.!
@andharesushama Image
सुषमाताईंचा शिवसेनेत येण्यापूर्वी व नवीन प्रवेश झाल्यावर, महाराष्ट्रात अनेकांना मोठं नवल वाटू लागलं, कालपर्यंत शिवसेनेवर टीका करणाऱ्या सुषमाताई अंधारे, आज शिवसेनेत खुशीने येत आहेत. त्यावर त्यांची जी रोखठोक प्रतिक्रिया होती त्याने सर्वांचीच थोबाड बंद केली.
यावर त्यांचं म्हणण- भाजपने देशात हिंदुत्वाच्या नावाखाली जो शेणसडा केलाय, जातीय धार्मिक तंटे माजवुन राष्ट्रीय ऐक्याला जे तडा द्यायचं काम केलंय ते बघता, उद्धवजी ठाकरे हे कैक पटीने बरे आहेत, त्यांचं सर्वसमावेशक हिंदुत्व, संयमी सुसंस्कृत सुजाण नेतृत्वाने, मला शिवसेना पक्ष भावला.
Read 9 tweets
Nov 29, 2022
#सावरकर

१) गेल्या 8 ते 10 वर्षात भाजपकडून, नेहरू गांधी यांच्या बद्दल खोटा प्रचार करून सतत अभद्र बदनामी केली.
कुठंतरी काँग्रेसला हे सर्व असह्य झाल्याने, त्यानी भाजप ज्यांना आदर्श मानते त्यांची पोलखोल करायला सुरुवात केली, तर भाजप गोटात प्रचंड अस्वस्थता, तणाव दिसू लागला आहे. 👇
२) त्यावर सारवा-सारव म्हणून, भाजपच्या पोपटाना पाचारण करण्यात आलं. आणि त्यानी हळुच टूम काढत, सावरकराची बदनामी करू नका अस कळवळ्याचा नाटकी आव आणत सांगितलं. त्यांची अटकल बऱ्याच लोकांच्या लक्षात आली का याची कल्पना नाही. मात्र त्यानी, गांधी नेहरू टिळक सावरकर महान होते ;👇
३) त्यांची बदनामी करू नका, म्हणून गांधी नेहरू टिळक या महान काँग्रेसी ओळीत मोठ्या धुर्तपणे हिंदू महासभेच्या सावरकराना, सामील केलं. हा कावा भारतीय समाजातील बुद्धिजीवी लोकांच्या नजरेतून सुटण्यासारखा नाही.
सावरकर आणि काँग्रेसच्या नेत्यांची विचार व कार्यप्रणाली वेगळी आहे. 👇
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(