थॅंक्यू मिस्टर शिंदे...

अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.
अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.
पण काय आहे मिस्टर शिंदे,
तुमच्या सारखे लोक जेव्हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर व बाळासाहेबांच्या आशिर्वादाने निवडून आले ना, सगळ्या बाजूंनी सगळं मिळाल्यानंतर चटक लागली. मग कसंही,कुठूनही निवडून येणं. हेच महत्वाचं वाटायला लागलं तुमच्या सारख्यांना. पण शिवसैनिक तसाच आहे... फाटकाच!
आता तुम्ही जे काही केलंय ती गद्दारीच. तुम्ही पहिले नाही आणि शेवटचे ही नसणार.
पण तुम्ही जे केलंय ते आजपर्यंत कुणी नाही केलं. तुम्ही आमच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलाय. आमची शिवसेना दिल्ली च्या ठगांच्या मदतीने चक्क चोरलीत.
एक लक्षात ठेवा मिस्टर शिंदे...
ज्यांना शिवसेना, ठाकरे, मातोश्री चा अडथळा वाटतो, १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन होताना मुंबई हातची गेली असा ज्यांचा समज आहे, त्यांची सोबत घेऊन शिवसेनेवर ताबा मिळवताय. नांव मिळालंय, चिन्ह ही मिळालंय.
मिळाली नाही आणि मिळणार ही नाही, ती आमची निष्ठा आणि मातोश्री वर असलेली श्रध्दा. कारण प्रत्येक सच्चा शिवसैनिक मानतो की, आजही आमचं दैवत त्या वास्तूत वावरतंय.

थॅंक्यू यासाठी म्हटलं मिस्टर शिंदे, की स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर प्रश्न पडला होता काय करायचं?
तो प्रश्न सोडवलात तुम्ही. चक्क आयुष्य वाढवलंत माझं. किमान पंधरा वर्षांनी. आता लवकर मरायचं नाहीय आणि मरणारही नाही.
गद्दारांना गाडल्या शिवाय वर गेलो तर बाळासाहेब लाथ मारून खाली हाकलतील.
ऊध्दवला,आदित्य ला सांभाळा सांगितलं होतं. तू असाच वर आलास. माफ नाही करणार ना बाळासाहेब...
सगळं परवडेल, पण मोठ्या साहेबांची नाराजी कशी परवडेल?

तेव्हा.....
आता फीट रहायचं आणि तुमच्यासह सा-या गद्दारांना राजकीय पटलावरून दूर करीपर्यंत उसंत नाही घ्यायची.

थॅंक्यू वन्स अगेन मिस्टर शिंदे...
भेटूच निवडणूकीच्या आखाड्यात...

आमच्याशी एकट्याने लढायची हिंमत नाहीय तुमची. दिल्ली वरून फौजा बोलवा. तीच तुमची खरी ताकद.

थॅंक्यू...
तुम्हाला जय महाराष्ट्र नाही म्हणणार. तो मान गमावलाय तुम्ही.

🚩🚩🚩

#cp #waf

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajan Shridhar Mhapsekar

Rajan Shridhar Mhapsekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MhapsekarRajan

Feb 21
उद्धवसाहेब फक्त इतकंच करा...
अ‍ॅड. विश्वास कश्यप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपवलं... पक्ष गेला चिन्ह गेलं... आता उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं सांगणारं अ‍ॅड. विश्वास कश्यप यांचं उद्धव ठाकरेंसाठी कळकळीने लिहिलेलं पत्र...
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय, प्रथमतः आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!
आपण सध्या प्रचंड वाईट मानसिक अवस्थेतून जात आहात याची आम्हाला कल्पना आहे. आपली प्रकृती सुद्धा ठीक नाही.
"मोघलांच्या नादी लागलेले..."

दिल्लीतील मोघलांच्या नादी लागून आपल्यातल्या काही लोकांनी आपल्याला दगा दिला हे सर्वश्रुत आहे. घाबरू नका साहेब यातला एकही पुढच्या निवडणुकीत निवडून येणार नाही ही खात्रीच नव्हे तर विश्वास आहे आम्हाला.
Read 25 tweets
Feb 4
"पनामा पेपर" आठवतो का?
तोच तो, ज्यात आपला पद्मश्री+पद्मभूषण+पद्मविभूषण असलेला "सदी का महानायक", त्याची सूनबाई, विजय मल्ल्या, हरिष साळवे अशा लोकांची नावं आली होती?

जगभरातल्या टॅक्सचोर गुंतवणूकदारांचा भांडाफोड करणारं हे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?
डाफ्ने करुआना गॅलिझिआ नावाच्या ह्या स्त्री पत्रकाराला तिच्या परिवारासह बॉम्बने उडवण्यात आलं होतं; चिथड्या-चिथड्या झाल्या होत्या तिच्या!

"हे" हिडेनबर्गच्या नॅथन अँडरसनला माहिती नसेल?
मग त्या अँडरसनला हे सुद्धा माहिती असेलच की अदानी किती मोठा "भस्मासूर" आहे आणि त्याच्या हातातलं बाहुलं असणार इथलं सरकार विरोधकांचा कसा "लोया" करतं?

हे सगळं माहिती असतानाही त्याने अदानीची चड्डी उतरवण्याचं धाडस केलं, यासाठी त्या पठ्ठ्याचं विशेष कौतुक करायला(च) पाहिजे...
Read 4 tweets
Nov 28, 2022
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या, अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा, काही लोकांना प्रचंड गर्व असतो.

म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला...
नाती

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण...
ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...
भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही
जन्म - मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक
आपल्या अहंकाराची बळी कधी झाली
हे कळलंच नाही.
Read 10 tweets
Nov 18, 2022
सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं??
कॉंग्रेसने की भाजपने??
- डॉ. सुनील देशमुख.

७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉंग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही. उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सरकारे होती "पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते."
या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही कॉंग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो!!
Read 10 tweets
Oct 22, 2022
अ‍ॅड. सतीश उके कुठायत?

आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
वापर केला आणि जे आडवे येतील त्यांना ठरवून वाटेला लावलं. हे करण्याच्या मागे महाराष्ट्रातले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळेच विरोधक घेत आहेत. आता तर सामान्य माणूसही फडणवीसांच्या चेहर्‍याखालची मानसिकता ओळखू लागला आहे. आव कितीही प्रामाणिक असला तरी आता या....
प्रामाणिकपणावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. माजी गृहमंत्री अनील देशमुख असोत वा नवाब मलिक किंवा संजय राऊत. भाजपची अडचण दूर करण्यासाठी या नेत्यांविरोधी कारवाई झाल्याची उघड चर्चा होते आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्या नेत्यांच्या धर्मपत्नी, त्यांची मुलं आणि नातलगही आता...
Read 26 tweets
Aug 1, 2022
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...?

तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले...

हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला.

हा अहवाल गुजरात सरकारकडून चक्क हरवला गेला...
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(