#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇
उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇
जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇
वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची 👇
भरेल. सावरकरांची कविता ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड) आणि शत्रूच्या शिबिरात हे त्यांचे 👇
अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी 👇
एक. 'मला काय त्याचे अथवा मोपल्यांचे बंड' आणि 'काळे पाणी' या त्यांच्या दोन कादंबऱ्या. 'उ:शाप', 'संन्यस्त खडग' आणि उत्तरक्रिया ही त्यांनी लिहिलेली नाटके. त्यांच्या इंग्रजी ग्रंथात 'वाॅर ऑफ इंडियन इडिंपेडंन्स १८५७', 'हिंदूपदपादशाही', ' हिंदूराष्ट्रदर्शन', 'हिस्टाॅरिक स्टेटमेंट', 👇
आणि 'लेटर्स फ्रॉम अंदमान' यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाड्मय खंड १ ते ८ ह्यात समाविष्ट आहे. मुंबईमध्ये १९३८ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच १९४३ साली सांगली येथील नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
कुसुम अभ्यंकर ( २८ फेब्रुवारी १९३६ - ५ एप्रिल १९८४ ) आपल्या लालित्यपूर्ण, प्रवाही शब्दकळेने आणि लेखनातल्या सखोल जीवनदर्शनाने थोड्या अवधीत लोकप्रिय झाल्या. त्यांची तेहेतीस पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतील बहुतांश कादंबर्या नायिकाप्रधान आहेत. पुरुषप्रधान 👇
कुटुंबव्यवस्था, पारंपरिक नीतिमूल्यांची चौकट, बाईपणामुळे येणार्या मर्यादा यांमध्ये दडपून गेलेल्या स्त्रियांचे चित्रण त्यातून आहे. या नायिका तडफदार आहेत. स्वाभिमानी, करारी, समजूतदार, सेवाभावी आहेत. तशाच स्वप्नाळूही आहेत. स्त्रीची ही विविध रूपे कुसुम अभ्यंकरांनी उठावदारपणे सादर 👇
केली आहेत. रंजनप्रधान कथांच्या साच्यात बसणार्या या कादंबर्यांपेक्षा वेगळ्या धाटणीचे कादंबरीलेखनही त्यांनी केले. ओघवती भाषा आणि कादंबरीच्या तंत्राची उत्तम समज यांमुळे त्यांच्या कादंबर्या लोकप्रिय झाल्या आहेत. ‘विघ्नहर्ता’, ‘झुरते मी अंतरी’ (१९७५), ‘अश्विनी’, ‘स्पर्श’ (१९७५),👇
#पुस्तकआणिबरचकाही
कृष्ण गंगाधर दीक्षित ( १४ एप्रिल १९१४ - २८ फेब्रुवारी १९९५ ) कवी संजीव या नावाने ओळखले जातात. १९३५-१९८८ या काळात संजीव यांचे बारा कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘सुख आले माझ्या दारी’, ‘मराठा तितुका मेळवावा,’ ‘रंगपंचमी,’ ‘सुधारलेल्या बायका,’ ‘वाट चुकलेले नवरे,’ 👇
‘जन्मठेप,’ ‘हात लावीन तिथे सोने,’ ‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘जखमी वाघीण’, ‘ठकास महाठक’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘ग्यानबाची मेख’ या चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले. याखेरीज अनेक गैरफिल्मी गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या नावावर सापडतात. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील 👇
‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत कवी संजीव यांनीच लिहिले होते. केवळ चित्रपटगीतेच नव्हे, तर ‘सासर-माहेर,’ ‘भाऊबीज, ‘चाळ माझ्या पायात’, ‘पाटलाची सून’ अशा निवडक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. त्यापैकी ‘पाटलाची सून’ (१९६७) या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेचा 👇
#पुस्तकआणिबरचकाही
शंकर दामोदर पेंडसे : (२८ फेब्रुवारी १८९७ - २३ ऑगस्ट १९७४) ग्रंथकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक. संस्कृत व मराठी साहित्य संत साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा असल्याने त्यांचे बहुतेक लेखन याच विषयाशी संबंधित आहे. त्यांनी लिहिलेल्या संतवाङ्मय विवेचक ग्रंथांतूनही 👇
त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग आणि त्यांची रसिकता ह्यांचे दर्शन घडते. विशेषत: महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या पाच संतकवींच्या कार्याचे आपल्या विद्वात्तापूर्ण ग्रंथांमधून त्यांनी केलेले विवेचन आणि मूल्यमापन अतिशय मूलगामी झालेले आहे. वैदिक 👇
वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास (१९६५) या ग्रंथात त्यांनी भागवत धर्म हे मूळच्या सूर्योपासनेचे विकसित रूप होय, हे साधार प्रस्थापित केले आहे. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेले पौराणिक भागवत धर्म (१९६७) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. ह्याशिवाय त्यांचे स्फुट लेखनही बरेच आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे : (२७ फेब्रुवारी १९१६– ८ ऑगस्ट १९९८) मराठी कथालेखिका, कादंबरीकर्त्री व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका . वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री 👇
मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. सुमतीबाईंनी विपुल लेखन केले. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबऱ्या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. 👇
वि. स. खांडेकर यांच्या सूचनेवरून अमरावतीच्या (विदर्भ) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन संस्थेत काहीदिवस वास्तव्य केले. तेथील कुष्ठरोग्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्याव त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या अनुभूतीतून तेथील वास्तवावर बेतलेली 👇
#पुस्तकआणिबरचकाही
ज्योत्स्ना देवधर ( २७ फेब्रुवारी १९२६ - १७ जानेवारी २०१३ ) विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्राबाहेर झाल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून कथा-लेखन केले. १९६० ते १९७० या दशकाच्या उत्तरार्धात मराठीत ज्या स्त्री लेखिका पुढे आल्या त्यांमध्ये त्यांचे हे नाव महत्त्वाचे आहे. 👇
‘तरुण भारत’ (पुणे) या दिवाळी अंकात ज्योत्स्नाबाईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली. पुढे लगेचच (१९६७) ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली. पुढच्याच वर्षी १९६८मध्ये त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात👇
आली. त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच या दोन्ही कादंबर्यांचे विषय कौटुंबिक विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील स्त्री हेच होते. या कुटुंब पद्धतीचे गुण-दोष आणि मर्यादाही त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. अनेक कादंबर्यांबरोबर वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यात 👇
#पुस्तकआणिबरचकाही
श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१ ) . मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करू लागले. ‘काँपिटिशन’ ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. 'आणि बाकीचे सगळे' 👇
व 'बिनमौजेच्या गोष्टी' हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., ‘वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस’, ‘गुरूत्वापसरणाचे प्रदेश’ इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरूषोत्तमराव, शीतयुद्ध सदानंद, कळ, खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो 👇
या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रूढ आकृतिबंध आढळणार नाहीत तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. 👇