#पुस्तकआणिबरचकही
शंकर भाऊ साठे : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) 👇
हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६),  लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी 👇
कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही. शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा  या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती.👇
अन्यायाची चीड, शोषितांच्या विषयी हृदयात आपुलकी, वास्तव कथानक, प्रभावी घटना-प्रसंग, विचारप्रवण संवाद, विषम समाजव्यवस्थेवर घणाघाती प्रहार, हे त्यांच्या कादंबरी लेखनाचे विशेष नोंदवता येतील. त्यांनी रेखाटलेल्या नायक-नायिका ह्या बंडखोर, कष्टाळू, धाडसी, करारी बाण्याच्या, आपल्या 👇
भावनांना प्रगट करणाऱ्या तसेच मानवी जीवनमूल्ये जोपासणाऱ्या आहेत. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
@Marathi_Mee @ShubhangiUmaria @threadreaderapp unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रविण कलंत्री

प्रविण कलंत्री Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KalantriPravin

Mar 13
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇 Image
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇 Image
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇 Image
Read 7 tweets
Mar 13
#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ )   १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇 Image
चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇 Image
‘अत्तर आणि गुलाबपाणी’  हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’ ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’व ‘सुखाचं फूल’ 👇 Image
Read 6 tweets
Mar 12
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇 ImageImage
आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
या मराठा कालखंडाचा उदयास्त या दोन भागातील पुस्तकात अगदी सुलभतेने बारीकसारीक तपशिलांसह मांडला आहे.
पहिल्या भागात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड असुन दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू राजांची मोगलांच्या कैदेतून सुटकेपासुन 👇
Read 6 tweets
Mar 12
#पुस्तकआणिबरचकाही
कविता विश्वनाथ नरवणे ( १२ मार्च १९३३ - २८ ऑगस्ट २०२० ) प्राध्यापिका म्हणून काम करीत असतांना लेखनाची सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकात काय प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. 👇 Image
कथासंग्रह, कादंबरी, नाटके अशी त्यांची पस्तीसहुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ओघवती भाषा व नेमके विश्लेषण ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या एका कथासंग्रहाचे जाने अन्जाने या नावाने हिंदीत भाषांतर झाले. सोळा भाषांतील म्हणी व वाक्प्रचार या 👇 Image
संबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्वपूर्ण आहे. या कोशाचे प्रकाशन  तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते झाले होते. नेपोलियन या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
Read 4 tweets
Mar 10
#पुस्तकआणिबरचकही
सावित्रीबाई फुले ( ३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७ ) बालवयातच ज्योतिबांशी विवाह झाल्यावर पतीकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्यातच सहभाग घेतला नाही तर अनेक वेळा मार्गदर्शन केले. अवहेलना व प्रतिकुल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन👇 Image
समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला मुक्ति चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या, ज्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने देशातील महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या दलित कुटुंबात जन्मल्या👇 Image
होत्या, परंतु एकोणिसाव्या शतकातील स्त्री शिक्षणाची सुरुवात म्हणून त्यांनी थेट ब्राम्हणवादाच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते.त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलित यांच्या हक्कांच्या संघर्षात व्यतीत झाले. त्या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. 👇
Read 7 tweets
Mar 10
#पुस्तकआणिबरचकही
वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९)मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व👇
ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे 👇
बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली 👇
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(