नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्यानं तरुण बेरोजगार आहे, महागाईनं सामान्य जनता त्रस्त आहे. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
राज्यातल्या महिला,मुली सुरक्षित नाही,दिवसाढवळ्या तलवारी,कोयते नाचवले जात आहेत,गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसं मारली जात आहेत,राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे,ही राज्याची स्थिती आहे.सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जाताहेत.
राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं,विकासाचा वेग डबल होईल,म्हणून सांगितलं गेलं.मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे.राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत. सरकारकडून कणखर भूमिका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
गुंड तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरुन दहशत निर्माण करत आहेत. खून, दरोडे, अपहरण, हत्या, घरफोड्यांनी राज्यातले नागरिक हवालदिल झाले आहेत. जुगार, मटका, गुटखा, डान्स बार हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत.
राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर, महिला आमदारांवर हल्ले सुरु आहेत. धार्मिक वाद निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात पुन्हा गँगस्टरनी डोकं वर काढलं आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत.
पुण्यात कोयता गँगचा अजूनही पुरता बंदोबस्त झालेला नाही.आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुध्दा कोयता गँगनं हातपाय पसरले आहेत. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड हल्ले करतात. विशेष पोलीस आयुक्तांचं नवीन पद मिळाल्यानं मुंबईतली गुंडगिरी कमी होईल, असं वाटलं होतं.
सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यवसायिक आपले व्यवसाय करु शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का? काही गुंडांना नुसती अटक करुन उपयोग नाही. याची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. सरकारनं कोणालाही पाठीशी घालू नये.
उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये खुलेआम हप्तेखोरी सुरु आहे. मोक्का दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यानं दीड पेटीची (दीड लाख) मागणी केली.
पोलीस कर्मचारी व गुन्हेगाराच्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या हप्ता खोरीला आळा घालण्याऐवजी पोलीस आयुक्तांनी विशेष पथक बरखास्त करुन टाकलं आहे. राज्यात खुलेआम हप्ताबाजी सुरु झाली आहे.
एका बाजूला तपास यंत्रणांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचाच फायदा गुन्हेगारही घेत आहेत. आता तोतया केंद्रीय अधिकारी बनून गुन्हेगार, व्यापाऱ्यांना लुटत आहेत. कुठे आहे तुमची कायदा आणि सुव्यवस्था? कोण सुरक्षित आहेत?
मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कडेची दुकानं पहाटे चार वाजता जेसीबीच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात आली.यात भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा भाऊ सहभागी होता.छोट्या व्यावसायिकांची १ कोटी १३ लाख रुपयांची हानी झाली.पोलिसांच्या समक्ष हे पाडकाम झालं.
परंतु पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात, लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई यासारखी घातक हत्यारं घेऊन लोक येतात. गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत कोणालाही या प्रकरणी अटक करण्यात आली नाही. सरकारच या मंडळींना पाठीशी घालत आहे.
राज्यात मटका, जुगार, गुटखा, डान्स बार यांना बंदी असताना हे सर्व धंदे राजरोसपणे सुरु आहेत.तरुण पिढी ऑनलाईन रमीकडे वळत आहे. या ऑनलाईन रमीची जाहिरात काही अभिनेते, अभिनेत्र्या करत आहेत. यावर तातडीनं कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याच धर्तीवर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे.
उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्यं काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेश पसरला जाणार नाही, राज्यातला जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारनं घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेचे मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
सत्तारुढ पक्षाच्या दादरमधील आमदाराने गोळीबार केल्याचं प्रकरण राज्यात गाजलं.बॅलेस्टीक रिपोर्ट आला,ती गोळी आमदाराच्या बंदुकीतूनच सुटल्याचं स्पष्ट झालं.आता नवीनच माहिती पुढे आली की, अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केला.तो कोण होता? पोलिसांनी त्याचा तपास केला का? #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
सरळ सरळ आपल्या आमदारांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सरकार मनमानीपणे पोलीस दलाचा वापर करुन घेत आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधीच गोळीबार करतात म्हटल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं धाडस वाढत आहे, गोळीबाराच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत.
राज्यात आता गँगस्टरनं पुन्हा डोकं वर काढल्यानं बांधकाम व्यावसायिकांत भीतीचं वातावरण आहे.कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे.क्षुल्लक कारणावरुन ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम यानं सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता.पाटण) येथे गोळीबार केला.दोन स्थानिकांचा मृत्यू झाला,एकजण अत्यवस्थ आहे.
इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणाचा मुद्दा मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. आदिवासी मुलींची वेठबिगारीसाठी विक्री होते, त्यांचं शोषण केलं जातं. मी अशीही मागणी केली होती की, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावं.
एवढा गंभीर गुन्हा असताना शासकीय यंत्रणा मात्र गंभीर नाहीत. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगापुढे अधिकारी हजरच झाले नाहीत. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला हे शोभणारं नाही.
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यात सरकारला यश आलं नाही. दहावीचा गणिताचा पेपर फुटला,विज्ञान तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला.कॉपी पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली.कॉपीमुक्त महाराष्ट्राची केवळ घोषणा करुन उपयोग नाही. अंमलबजावणीकडेही सरकारनं लक्ष दिलं पाहिजे.
महिला अत्याचाराचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो. पण अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट त्यात वाढ होत आहे. एकट्या मुंबईत महिला अत्याचाराच्या वर्षभरात ६ हजार १३३ गुन्हे नोंद झाले. ६१४ अल्पवयीन मुली आणि ९८४ महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या.
१ हजार ५९८ पैकी ९१२ गुन्हे उघडकीस आले. ६८६ प्रकरणात तर आरोपीही सापडले नाहीत. १ हजार १६४ मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी १ हजार ४७ मुली सापडल्या. ११७ मुली अजून पोलिसांना सापडलेल्या नाहीत. ही मुंबईची स्थिती आहे. शाळेतल्या मुलींवर अत्याचार होत आहेत.
महिलांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचार घटनांतील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टासमोर हजर करुन त्यांना फाशीची शिक्षा द्या. "शक्ती कायद्या"ला अजून केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही. ती मंजुरी लवकरात लवकर मिळवा.तसंच महाराष्ट्रातून रोज ३८ महिला-मुली बेपत्ता होत आहेत,ही गंभीर बाब आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या. अंबानी हॉस्पिटलला धमकी आली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्यांना जरब बसेल, अशी कारवाई सरकारकडून झाली पाहिजे आणि हे सत्र थांबलं पाहिजे.
कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ हल्लेखोर आंबेरकर नाही तर त्याच्या पाठीमागचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे. कठोर शिक्षा झाली पाहिजे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न शिंदे गटानं केले.त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याची शिक्षा संजय कदमांना काय दिली? लगेच ‘ए.सी.बी.’ची नोटीस दिली. ‘फोडा नाही तर झोडा’ ही सत्ताधाऱ्यांची निती जास्त काळ टिकणार नाही.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे.गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामं रखडली आहेत.
पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नाही. पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असून पुणे मेट्रोसह रिंग रोडच्या कामाला गती द्यावी.
राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई व इतर शहरांसोबत पुण्याच्या विकासावर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं.
राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीनं प्रश्न राखून ठेवण्याचं समर्थन करता येणार नाही. विधिमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचं यापूर्वी एकही उदाहरण नाही.
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली आज, मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि संस्थेला तातडीनं ८ कोटींचा निधी दिला जाईल, असं जाहीर केलं.
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल.
‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असं आवाहन केलं.‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक,प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील.सारथीच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी सरकारची आहे.
In order to strengthen law & order in the State & ease workload of the police force, decision to recruit 10,000 youths in the police shipai category has been taken today at Mantralaya. This will benefit the urban & rural youth, giving them a chance to serve in the police force.
ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल,याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीनं मांडण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल.
यासोबतच नागपूरच्या काटोलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बटालियनसाठी १३८४ पदं निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदं भरण्यात येतील. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार आहे.
विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.
कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचं सर्व्हेक्षण,शोध,माग काढणं,प्रतिबंधात्मक उपाययोजना,चाचणी,उपचार,मदतकार्य अशा अनेक जबाबदाऱ्या जोखीम पत्करून कर्मचारी आपलं कर्तव्यं बजावतायेत.या कर्मचाऱ्यांची सुरक्षा,त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय.
शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी अशा सर्वांना विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे.