Dr. Sanjay Rakibe Profile picture
May 27 14 tweets 4 min read Twitter logo Read on Twitter
स्वतंत्र भारताचे वास्तव...
पण हे थांबायला हवे.

अमेरिकेत देव नाही, मठ नाही,
पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे. गेल्या २०० वर्षात दुष्काळ नाही.
कुठले होम हवन नाही,
कसली वारी नाही,
कसले अभिषेक नाही,
अनुष्ठानं नाही,
हरिनाम सप्ताह नाही,
पारायणे नाहीत.
१/१४
अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.
अन्नधान्य विपूल आहे.
सुखसोयी भरपूर आहेत. कशाचीच कमतरता नाही.
माणशी २८७६ वृक्ष आहेत.
भारतात फक्त माणशी २८ झाडे आहे.
आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो.
पण एकही भारतीय झाड लावत नाही, जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही...
२/१४
भारतात दारात झाड नाही,
तर हिरवळ कुठली.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारतापेक्षा तिप्पट आहे.
अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी, तर भारताची आहे १३५ कोटी.
३५ कोटीची १३५ कोटी झाली,फक्त ७५ वर्षात.
एवढीच जबरदस्त प्रगती आहे.
३/१४
इथे हजारो जाती,
सतराशे साठ धर्म,
कुणाचाच मेळ नाही.
प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा,
आमचाच धर्म मोठा,
नाही लेकरांना तोटा..
एक मुलगा सांभाळने कठीण झाले, तरी एकएकाला अनेक लेकरं ते ही बेरोजगारीने भटकत आहेत,
ना शिक्षण, ना संस्कार, ना आचार, ना विचार..
सगळं बिनधास्त, आणी मस्त.
४/१४
आताच पिण्यास पाणी नाही, तर पुढे काय?
कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही, निसर्गाची चाड नाही. नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत.
प्रार्थना केल्या जात आहे, नुसतेच माजलेत धर्माचे स्तोम...
एकाही धर्माच्या देवात पाऊस संतुलित करण्याची ताकद नाही.
५/१४
जनता दिशाहीन होऊन त्यांची स्वप्न राखेत मिसळली आहे. संविधान नावाला उरले आहे.
चौकशी शिवाय अटकेचा न्याय झाला आहे.
महागाईने जनता त्रस्त झाली, तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवत आहे.
दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे, जनतेला लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.
६/१४
चिंता व ताणतणावाने अर्धा भारत मधुमेह ग्रस्त झाला आहे. ३० % लोकांना रक्तदाब आहे.
शेतात काम करायला मजूर नाही, अंगमेहनतीला माणुस नाही.
सगळे बिनकामाची माणसं आहे.
नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत.
स्वयंपाकाला बाई, भांडी व धुण्याला बाई तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.
७/१४
आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.
कुंभ मेळ्यात लाखो सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली, आणि आता रस्त्यावर भटकत आहेत.
विरक्त झाले आहेत.
लग्नाचे वय टळून गेले आहे. बायको मिळत नाही. गावागावांत किमान चाळीस पन्नास पोरं बिनलग्नाची आहेत.
८/१४
भयंकर विदारक परिस्थिती आहे. बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत.
मराठी शाळा बंद पडल्या आहे. मुलांना धड इंग्रजी व धड मराठी पण येत नाही आहे.
मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहे. टिव्ही वरच्या मालिका नग्न झाल्या आहेत.
गुन्हेगारी जास्त दाखवत आहे. मुलं लहानपणापासूनच हिसंक होत आहेत.
९/१४
१३ व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहे.
दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.
प्रार्थना स्थळे लुटीची ठिकाणं झाली आहेत.
वृद्धाश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत, तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.
आईला बाळासाठी वेळ नाही, पाळणाघरे वाढत आहेत.
अनाथालय वाढत आहे.
१०/१४
लेका-सुनांना सासु सासरे नकोत.
भारतिय संस्कृती चा पार बट्याबोळ करणे चालू आहे.
माणसं पदोपदी खोटं बोलत/वागत आहेत.
खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.
चोरांना/लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे.
सज्जनांना वेड्यात काढले जात आहेत.
११/१४
लोकशाही, समता, बंधुता, स्वातंत्र्य हे फक्त व्हॉटस् ॲप संदेशा पुरतीच मर्यादित झाले आहे.
चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत.
प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.
पण आज ही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.
साहित्यीक मारले जात आहेत.
१२/१४
छ. शिवरायांनी ३५० वर्षापुर्वी साहित्यकांना उत्तम लिखाणासाठी कोटी रूपये मानधन दिले होते. आज साहित्यीक भीक मागत आहेत.
एकंदरीत भारत विस्फोटाचा व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे. भारत मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालला आहे.
१३/१४
वेळीच सावरलो नाही तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडणार आहे हे नक्की.
अजून वेळ गेलेली नाही,
जात, धर्म, राजकारण ह्यापेक्षा माणूस, माणुसकी आणि प्रेम जपायला पाहिजे.

समता, बंधुभाव, एकोपा, आपुलकी वाढली पाहिजे.
विचार करा...
१४/१४
#भारताची_दशा
#मराठी #नाशिक #रिम #म

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr. Sanjay Rakibe

Dr. Sanjay Rakibe Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrSanjayRakibe

Apr 17
#उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान जास्त वेळ १००-१०१ फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ९७.५ ते ९८ फॅ. असते. #उष्माघातामध्ये हे तापमान १०१ फॅ. पेक्षा जास्त होणे व हे जीवघेणे ठरते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.

१/६
#उष्माघाताची लक्षणे खालील प्रमाणे
*हृदयाची धडधड वाढणे
*दिर्घ श्वास घ्यावा लागणे, व श्वासाची गती वाढणे
*रक्तदाब (Blood pressure) वाढणे किंवा कमी होणे
*घाम येणे थांबणे
*चिडचिड होणे, बेशुद्धी (ग्लानी) किंवा भ्रम वाढणे
*चंचलता येणे किंवा कमी होणे
*डोकेदुखी
*मळमळ (ऊलट्या)
२/६
*शरीरात ताठरता येणे
*खूप तहान लागणे
*हात आणि पायात आकड (Cramps)
*आक्रमकता/चिडचिड वाढणे...
*खोल बेशुद्धी

प्रथमोपचार...
व्यक्तिला उन्हापासून दुर थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
व्यक्तिला खाली झोपवून त्याचे हातपाय सरळ करावे.
कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.

३/६
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(