थ्रेड👇
परवा ओरिसात रेल्वे दुर्घटना घडली अन शरद पवार सवयीप्रमाणे राजकारण करायला पुढं आले, बोलता बोलता त्यांना स्व. लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण आली, एकदा दुर्घटना घडली होती आणि शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, आता याही दुर्घटनेनंतर+
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.
वयाने आणि राजकारणात जेष्ठ असलेले शरद पवार आज नैतिकतेचे धडे देत आहेत, मात्र त्यांच्या इतिहास काळात थोडं जायला हवं असं सतत+
वाटत होतं. 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला, हे बॉम्बस्फोट तब्बल 12 ठिकाणी झाले मात्र धडधडीत खोटं बोलत शरद पवारांनी 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं, त्या स्फोटात तब्बल 257 जणांचा बळी गेला होता, तर शेकडो लोकं जखमी झाले होते, तेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते+
मात्र त्यांनी ना नैतिकता दाखवली ना राजीनामा दिला.
दुसरी घटना म्हणजे गोवारी समाज विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होता, तेव्हाही शरद पवार मुख्यमंत्री होते ते आंदोलल चिरडले गेले अन त्यामध्ये तब्बल 114 जणांचा बळी गेला, ते गोवारी हत्याकांड होते.
शरद पवारांची कारकीर्द जेवढी मोठी आहे,+
तेवढीच अशा विविध घटनांनी, दुर्घटनांनी भरलेली सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही. आज रेल्वे दुर्घटना झाली तर लगेच पवार राजकारणासाठी पुढे सरसावले मात्र मदतीसाठी कुणीही गेले नाहीत. एकीकडे इतक्या कठीण काळात धीर देणं, त्यातून मार्ग काढणं हे सुरू असताना पवार साहेब सल्ले द्यायला, टीका+
करायला, नैतिकता शिकवायला येतात. पण आपल्या कारकिर्दीत तीच नैतिकता आपण बासनात गुंडाळून ठेवली होती हे सोयीस्कर विसरतात हा त्यांचा विसरभोळेपणा आहे. असो.
त्यांचा आणि नैतिकतेचा संबंध जोडायचा म्हणल्यावर, त्यावर राजीनामा द्यायचा म्हणल्यावर त्यांची बहुतांश कारकीर्द राजीनामा देण्यातच गेली+
असती एवढे प्रताप नावावर आहेत. नैतिकतेकर शरद पवार यांनी बोलणं हे शोभत नाही !
महत्वाचा थ्रेड👇
बारामतीच्या पवारांना बामणाचं पोरगं आणि तेही आपल्यापेक्षा कमी वयाचं, आपल्या डोळ्यादेखत राजकारणात आलेलं पोरगं मुख्यमंत्री झालं हेच खटकायला लागलं होतं अन त्या तरुण मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भोवती आंदोलन, संप आणि मोर्चाचे फास आवळायला लागले. रोज नवी+
आव्हानं आणि रोज नवी संकटं उभी केली जात होती आणि प्रत्येक आव्हानाला पेलत, सामोरे जात हा फडणवीस नावाचा बहाद्दर काटेरी खुर्ची सांभाळत होता, एकीकडं तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा गद्दार पक्ष सोबतीला होता, रोज पाठिंबा काढण्याच्या धमक्या सुरू होत्या, एकीकडं रोज विरोधकांच्या+
काव्यांची परीक्षा द्यायला लागायची अन हे सगळं सुरू असताना महाराष्ट्राच्या समृद्धीचा रोडमॅप सुरू होता, प्रचंड वेगाने महाराष्ट्र पुढे न्यायचा हा ध्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होता. कितीही संकटं वाट्याला आली तरी न थकणारा, न थबकणारा आणि जराही डळमळीत न होणारा हा माणूस पवारांच्या+
महत्वाचा थ्रेड👇
कालचा दिवस आमदार रामभाऊ सातपुते यांनी गाजवला, अख्ख्या सभागृहाला हालवून सोडत राष्ट्रवादीला कामाला लावलं, जितेंद्र आव्हाड हे कुत्सितपणे नेहमी जातीयवादी आणि हिंदूद्वेष्टी टीकाटिप्पणी करत असतात, ती राष्ट्रवादीची संस्कृतीच आहे, काल ते नेहमीप्रमाणे आमदार रामभाऊ+
सातपुते यांना हीनवत दलित समाजातून आले आहेत, राखीव मतदारसंघातून आले आहेत याची मुद्दाम जाणीव करून देत जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, सभागृहात जितेंद्र आव्हाड रामभाऊंना म्हणाले, "तुम्ही ज्या माळशिरस मतदारसंघातून येता तो राखीव आहे, आणि तो राखीव कुणामुळे आहे माहितेय? डॉ. बाबासाहेब+
आंबेडकर यांच्या संविधानामुळे! तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता? तो धर्म असता तर आज तुम्ही चाकरी करत सापडले असते तिथे, तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते !"
मुळात रामभाऊ हे कट्टर धर्माभिमानी तर आहेतच पण सोबत दलित म्हणून अंत्योदय घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले युवा नेते+
थ्रेड👇
ज्या पवारांनी पूर्ण आयुष्यभर दगाबाजीचे राजकारण केले त्यांच्याच मांडीवर बसण्याच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनीसुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत दगाबाजीचे राजकारण केले. पण फडणवीस हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत,तुमचा एक तर माझे एकास लाख म्हणत योग्य वेळ येऊ दिली आणि उद्धव ठाकरेंना+
आयुष्यभर पुरेल आणि सल राहील अशी अद्दल घडवली. आजचा निवडणूक आयोगाचा निकाल हा जेवढा सच्चा शिवसैनिकांना आनंद देणारा आहे, त्याहीपेक्षा जास्त भाजपा भक्तांना आनंद देणारा आहे, कारण सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसलेल्या उद्धव ठाकरेंची उतरती कळा याची देही याची डोळा पाहायला मिळाली. आजची त्यांची+
पत्रकार परिषद पाहिली तर फक्त ढसाढसा रडायचे बाकी राहिलेले उद्धवजी पाहून एका निर्णयाचा परिणाम काय असतो याची प्रचिती आली. आणि त्यांची थोडी किवही वाटली.
ज्या दिवशी 2019 ला निकाल लागला तेव्हापासून संजय राऊतांच्या तोंडातून आमच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो हे+
अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक लागलीय, भाजपने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत, मात्र देवेंद्रजी म्हणाले आहेत आम्ही भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मिळून युतीमध्ये ही जागा लढवणार आहोत. मात्र ती जागा दोघांपैकी कुणाच्या वाट्याला सोडायची हे आम्ही अजून बैठक घेऊन ठरवू!
इकडे मात्र उद्धव+
ठाकरेंनी त्या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. ऋतुजा लटके या स्व. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांची निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांचा राजीनामा मंजूर न होता तांत्रिक गोष्टीत+
अडकला आहे, राजीनामा तीन महिने अगोदर द्यावा लागत असल्याचे कारण समोर येत असून जर राजीनामा मंजूर नाही झाला तर ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवता येणार नाही.
इकडे उद्धव ठाकरे तर पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहेत आणि तिकडे अंधेरीच्या उमेदवारीचा प्रश्न अजून सुटला +
थ्रेड👇
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामण यांच्या बारामती लोकसभेचा प्रवास दौरा जाहीर झाला. येत्या 16, 17 व 18 ऑगस्ट या तीन दिवशी निर्मलाजी स्वतः बारामती लोकसभेत तळ ठोकून असणार आहेत. याचाच अर्थ आता भाजपाने मिशन बारामती लोकसभा हातात घेतले आहे. लोकसभा निवडणुकांना अजून दोन+
वर्षे बाकी आहेत मात्र बारामतीच्या बुरुजांना हादरे बसायला सुरुवात झालीय.
सध्या केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री असलेल्या स्मृतीजी इराणी यांनीही 2014 च्या अगोदर अमेठीमध्ये काँग्रेसी गांधींच्या अस्ताची सुरुवात अशीच केली होती, 2014 ला स्मृतीजींना थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र+
तरीही कामात सातत्य ठेवत त्यांनी 2019 ला थेट काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या राहुल गांधींना अस्मान दाखवत तब्बल 55 हजार मतांनी पराभवाची धूळ चारली आणि देशात कितीही मोठ्या घराणेशाहीचा पराभव करू शकतो हे स्पष्ट संदेश देत इतिहास निर्माण केला. भाजपासाठी 2019 ला अमेठी झाली, आता 2024 ला+
गेले दोन - तीन दिवस झाले उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे टिझर येताहेत, ते पाहत असताना कमालीची कीव येते, इतक्या टुकार गप्पा आणि टोमणे केवळ तेच मारू शकतात. मुलाखत पाहणं सोडा, टिझरही पाहणं जीवावर येतंय. मात्र त्या टिझरमध्ये सर्वात जास्त भांडवल काय असेल तर ते त्यांच्या आजारपणाचं आहे.+
केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
मला हे ऐकत असताना भाजपाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता. एका दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत,+
आपल्यामुळे राज्याचे नुकसान होऊ नये हे लक्षात ठेवणारा आणि कर्तव्याशी इमान ठेऊन अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत जीव ओतून काम करणारा दुसरा कोणताच नेता देशाने अनुभवला नाही. ना कधी त्यांनी त्या आजाराचं भांडवल केलं, ना त्यावर कधी चकार शब्द!
नाकाला नळी लावलेली असताना सभागृहात आलेला हा+