समीर कुलकर्णी Profile picture
परम वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ! सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
Apr 12, 2022 7 tweets 2 min read
#Thread

सुजात मित्रा ,
तुला खरं सांगू का ? ब्राह्मण समाजाला जगातील काहीही काम नसले तरीही ते असले काही करणार नाहीत.
अरे, त्यांनी ठरवलय की अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचे. नोकरी धंदा करायचा , बाहेरच्या देशात जायचे , लग्न करून बायको व मुला बाळांसोबत सुखी राहायचे आहे.
तुला माहितीये + खूप ब्राह्मण मुलांचे आयुष्य ते स्वतः राजकारणात नसल्यामुळे सुखी आहे. त्यांना कशाचीच घेणे देणे नाही. शिक्षण ईमानदारीत घेऊन आणि संपवून लगेच पोटा पाण्याचे बघतात. देशात असतील काय नसतील काय, कमावलेल्या पैशाचा tax ते न चुकता भरतात. घर घेतात म्हणून home loan फेडतात. सुखाने फिरायचे +
Apr 11, 2022 5 tweets 2 min read
#गांधीविचार ह्या विषयावर व्याख्यान असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून @DrAbhayBang साहेब तुम्ही काय मिळवले कोणास ठाऊक ?
संघाने कधीही गांधींना कमी लेखलं नाही, मग हे #विषयांतर कशाला ?

@RSSorg @DrAbhayBang साहेब, तुम्हाला जर असे वाटत असेल की संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजवण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी , तर आज तुम्ही संघाच्या प्रगती कडे बघा. गेले ९७ वर्षांपासून संघावर दोनदा बंदी आणून सुध्दा संघ वाढतच जात आहे..तो वाढतच जाईल. कारण , संघाची प्रार्थमिकाता +
May 24, 2021 11 tweets 2 min read
सुप्रभात

#Thread

इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.

१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म

१ विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर

May 24, 2021 7 tweets 2 min read
🌿🌹🌿 || श्रीराम समर्थ || 🌿🌹🌿

हाचि सुबोध गुरूंचा

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

+ आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

+
May 23, 2021 8 tweets 4 min read
१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.

आज पर्यंत उत्तर आलेले नाही...🙏

+ माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब 🙏
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks

विषय - एक दिवसाआड इतर सगळी दुकाने चालू करणे बाबत.

माननीय महोदय ,

आज आपल्या देशावर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे खूप मोठे संकट आले आहे. ह्या महामारितून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वच जण
May 22, 2021 9 tweets 3 min read
प्रति,
शिक्षण मंत्री
महाराष्ट्र राज्य

विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.

माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.

+ Image पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.

तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
May 4, 2021 6 tweets 11 min read
@VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar प्रत्येक मनुष्य (इथे हिंदू) हा स्वतः एक भगवान रुपी अंश आहे. पण , त्याला त्याची जाणीव नसते. कोणी तरी सूक्ष्म रूपाने किंवा विराट रूपाने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षवृत्तीने त्याची त्याला जाणीव करून देत असतो.
आपल्या स्वतःला , स्वतः मधील "मी" आणि "तो" (भगवंत) हे जेव्हा लक्षात
+ @VishwambharMule @MatruBhakt @HearMeRoar21 @malhar_pandey @patilji_speaks @Shona__RS @AkshatLahane @Nik_Pandharikar येते , तेव्हा स्वतःतील विराट शक्तीची त्या व्यक्तीला अनुभूती येते.

आपली एकता म्हणशील तर ती हवीच. कायम हवी.

मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.

+
May 3, 2021 10 tweets 3 min read
#Thread

एक काल्पनिक पण मजेदार गोष्ट.

बंगाल आणि इतर राज्यातील निकाल...

बंगाल आणि इतर राज्यातील निकाल लागल्यानंतर त्या त्या पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी करायचे ठरवतात.

सगळ्यांना जवळ पडेल म्हणून मध्य प्रदेशात एकत्र यायचे ठरवतात. तसे,

+ तामिळनाडू, केरळ , पुद्दूचेरी आसाम आणि बंगाल मधून कार्यकर्ते येतात.

तामिळनाडूतील जिंकलेल्या दृमुकचा कार्यकर्ता येतो , केरळ मधील डाव्या पार्टीचा , पूद्दुचेरी , आसाम आणि बंगाल मधून भाजपचे कार्यकर्ते येतात. तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो की बंगाल चा कार्यकर्ता कसा काय आला ,

+
Dec 17, 2020 34 tweets 7 min read
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+ सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇

esakal.com/satara/satara-…