My Authors
Read all threads
उत्तर प्रदेशात जाणाऱ्या लाखो मजुरांचा प्रश्न बिकट बनला / विना तपासणी घेण्यास नकार..!
@kkatul / लोकमत #Thread #मराठीभैय्ये
मुंबई : एकट्या उत्तर प्रदेशातील किमान २५ लाख मजूर महाराष्ट्रात आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जायचे आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकार एवढ्या लोकांना बिना तपासणीचे घेण्यास तयार नाही, आणि एवढ्या लोकांची तपासणी कमीत कमी वेळात करणे महाराष्ट्राला शक्य नाही,
यामुळे उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न बिकट बनला आहे.

मजुरांना आणि वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी केंद्र सरकारने एक पद्धती तयार करून दिली आहे. त्यानुसार जाणाऱ्या लोकांची यादी तयार केली जाईल,
एका ट्रेनमध्ये बाराशे लोक बसू शकतील. तेवढ्याची यादी तयार करून ती संबंधित राज्याला पाठवायची. त्या राज्याने ती यादी मान्य केल्यानंतर त्या लोकांना पाठवण्याची व्यवस्था करायची. या पद्धतीनुसार सध्या काही गाड्या महाराष्ट्राबाहेर पाठवण्यात आल्या.
सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या लोकांना घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र देशभरातून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांची संख्या किमान एक कोटीच्या घरात आहे.
एवढ्या लोकांना उत्तर प्रदेशात आणल्यानंतर त्यांना क्वारंटाईन आणि आयसोलेशन करावे लागले तर तेवढी यंत्रणा उत्तर प्रदेश सरकारकडे आज उपलब्ध नाही. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने या लोकांना आपल्या राज्यात घेण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करणे सुरू केले आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर एक मिटिंग झाली. त्यात आमच्याकडे पाठवणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करा, त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच त्यांना आमच्याकडे पाठवा.
त्यांच्या यादी सोबत त्यांचे रिपोर्टही जोडा, अशा अटी उत्तर प्रदेश सरकारने घातल्या. गेले चाळीस दिवस हे मजूर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारने तयार केलेल्या निवास व्यवस्थित आहेत.
त्यांना जर कोरोनाची लागण झाली असती तर त्या वेळीच ते लक्षात आले असते. चाळीस दिवसानंतरही त्यांच्यात अशी कोणतीही लक्षणे नाहीत, त्यामुळे त्यांची तपासणी करून त्यांना पाठवणे अशक्य आहे, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
राज्यात किमान पंचवीस लाख लोक आहेत. एवढ्या लोकांची कोरोना तपासणी करणे अशक्य गोष्ट आहे असे मत मंत्री नवाब मलिक यांनी लोकमतला सांगितले. एकट्या मुंबई ४० दिवसात ७० ते ८० हजार तपासण्या होऊ शकल्या. पंचवीस लाख लोकांच्या तपासण्या महाराष्ट्रात करायचे झाले तर त्यासाठी जो वेळ लागेल,
तेवढा वेळ थांबण्यासाठी हे लोक तयार नाहीत. त्यामुळे ते लोक मिळेल त्या वाहनाने किंवा पायी देखील महाराष्ट्राबाहेर जाण्यास तयार झाले आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
मुंबईत १५ ते २० हजार टॅक्सीचालक आहेत जे स्वतःची टॅक्सी घेऊन उत्तरप्रदेशला जाण्यासाठी तयार आहेत. त्यांना महाराष्ट्राची फक्त परवानगी हवी आहे, अशा लोकांना घेण्यासही उत्तर प्रदेश सरकारने तूर्त सहमती दर्शवली नाही असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशात सोबत कर्नाटक सरकारने देखील हीच भूमिका घेतली आहे. कर्नाटकमधील काही लोक महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांची देखील तपासणी केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे त्यांनी सांगितले आहे.
परिणामी या दोन्ही राज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. महाराष्ट्राने तयार केलेली यादी उत्तर प्रदेश सरकारकडे गेल्यानंतर ते जोपर्यंत या यादीला मान्यता देत नाहीत, तोपर्यंत ह्या लोकांना पाठवता येत नाही.
या सगळ्या कालावधीसाठी किमान दोन ते अडीच दिवस लागतात. यादी त्यांच्याकडुन मंजूर होऊन आल्यानंतर त्या लोकांची तिकीट काढणे, त्यांना जिल्हानिहाय डब्यांमध्ये बसवणे आणि मग त्या ट्रेन रवाना करणे असे मोठे काम सध्या प्रशासनापुढे आहे.
उत्तर प्रदेश सरकारने तीन मे रोजी एक पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवले. त्यात त्यांनी या लोकांना आत्ताच पाठवू नका, अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. त्यामुळे उत्तरप्रदेश मधील महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना पुढे पाठवण्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह म्हणाले 14 ते 15 लाख लोक महाराष्ट्रात अडकलेले आहेत. ज्यांना उत्तर प्रदेश मध्ये जायचे आहे. मी सतत उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे,
मात्र त्यांच्या सरकारने पाठवलेल्या एका पत्रामुळे या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. हा प्रकार आपण योगी आदित्यनाथ यांच्या लक्षात आणून दिला आहे. ते आता दुसरे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवत आहेत असेही कृपाशंकर म्हणाले.
आंध्रप्रदेश मधून एक ट्रेन उत्तर प्रदेश मध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी ज्या ठिकाणी नेण्यात आले तेथे मोठा गोंधळ उडाला.
परिणामी तिथली सगळी व्यवस्था कोलमडून गेली. म्हणून महाराष्ट्रातून आत्ताच लोकांना पाठवू नका असे पत्र उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्राला पाठवले. त्यामुळे महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वेवर आता मोठे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with faijal khan

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!