My Authors
Read all threads
टिळक / गांधी / सावरकर / आंबेडकर इत्यादी लोकोत्तर पुरूष अमुक एक विषयात, मुद्द्यावर चुकले, कमी पडले, असं आज वाटत असेल तर ते मान्य करण्यात कमीपणा नसतो. तो त्या महात्म्यांचा अपमान ही नसतो. किंवा "त्यांची चूक काढतो" म्हणजे आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त अक्कल आहे असंही नसतं. +
आपल्या कोणत्याही कृतीचा परिणाम काय होईल हे त्यापैकी कुणालाही एका मर्यादेपलीकडे माहिती असणं अशक्य असतं. त्यांना त्यावेळच्या वर्तमानाचं वा इतिहासाचं झालेलं आकलन तत्कालीन साधनांच्या आधारावर असतं. +
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला असलेलं मानवाचं सामाजिक आकलन आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीचं आकलन, ह्यातही बराच फरक असतो. साधनं वाढलेली असतात, साधक वाढलेले असतात...त्यामुळे जुने ठोकताळे गळून पडणं सहाजिक असतं. किंबहुना आवश्यकच असतं. +
न्यूटन - आइन्स्टाईम - बोहर ही सिद्धांताची उत्क्रांती फक्त विज्ञानातच नव्हे, समाजशास्त्रातही होणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. ही उत्क्रांती होत असताना "न्यूटन मूर्ख आहे का? तुम्ही फार शहाणे आहात का?" असे प्रश्न विज्ञानाने धरून ठेवले असते तर कठीण झालं असतं. +
इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या अभ्यासातही आपण असं प्रतिगामी असू नये.

सावरकर असो वा नेहरू, कोणताही ऐतिहासिक महापुरुष संपूर्ण आणि १००% आवडायला हवाच हा दुराग्रह चूक आहे, चूकच असतो.

त्याचवेळी, नावडत्यावर टीका-टिपणी करताना - +
न पटणाऱ्याच्या विचार/कार्याची चिकित्सा करताना त्याचा उपमर्द करणे हे ही चूकच.

कळण्यास फार फार सोपं आहे हे. माणूस मुळातून सज्जन असेल तर हे आचरणात आणणं सुद्धा सहज - स्वाभाविक होऊन जातं. पण दोन्ही बाजूंच्या बहुतांश लोकांना जमत नाही. +
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदार वर्तनाचं भान - दे कट बोथ वेज बॉस...!

अर्थात - "त्यांनी 'आमच्या माणसावर' घाण उडवली मग आम्ही त्यांचा माणूस पण घाण करणार" - अशी शर्यत लागली की सगळ्यांचेच हात घाण होणं नैसर्गिक आहे.

इथेच आपलं वैचारिक दारिद्र्य सुरु होतं. +
या दारिद्र्याची, एक समाजम्हणून आपण किती मोठी किंमत मोजतो पहा -

मी स्वतःला गांधीजी, टिळक, सावरकर, आंबेडकर, छत्रपती ह्या सर्वांचा शिष्य म्हणवू इच्छितो. कारण त्या त्या महामानवाच्या विचार-आचारातून "आज" कामी येईल ते ते सर्व उचलावं असं मला वाटतं.

पण - +
आजचं राजकीय आणि सामाजिक पटल इतकं गढूळ आहे की असं काही उघडउघड म्हणणं केवळ हास्यास्पद ठरेल...!

ह्या सर्व थोर विभूतींचं मूळ तत्व एकच होतं. त्या-त्या काळातील महत्वाच्या प्रश्नांवर आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांवर लक्ष केंद्रित करून तशी कृती करणे.

फरक फक्त - +
कधी प्रश्नांच्या प्राथमिकतेत तर कधी समस्या समाधानाच्या मार्गात होता. पण हा फरक होता म्हणून "मूळ माणूसच वाईट" होता असं समजून कसं चालेल? त्यातून काय साध्य होणार? +
"वर" बसलेल्यांना "खाली" असलेल्या समाजाला चार कोपऱ्यांत उभारून उभा आडवा विभागायचा आहेच. तुम्ही-आम्ही असेल विभागून घेण्यास तयार आहोत का? - हा सवाल आहे. +
इतिहासाच्या अभ्यासाचा फोकस "कोण" वरून "काय", "कसं", "का" ह्याकडे वळाला की इतिहासावरून भांडणं होणं थांबून त्यातून शिकून पुढे जाणं शक्य होईल.

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!