My Authors
Read all threads
THREAD
विषय: शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक व त्याची आवश्यकता.

शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकामागे त्यांच्या काही वयक्तिक हेतू व महत्वकांक्षा होती याची शक्यता असण्याचे काही कारणच नाही. महाराजांचे आपण जर चरित्र पाहिले तर हि गोष्ट सहज लक्षात येईल. १

#श्रीशिवराजाभिषेक२०२०
हिंदुच्या स्वतंत्र धर्मराज्याचे जे ध्येय शिवाजी महाराज आज पर्यंत साकारत आलेले होते त्यास कुठे तरी घटनात्मक व प्रतिष्ठापद लाभणे हे राज्याभिषेका शिवाय तत्कालीन परिस्थितीत शक्य नव्हते. २
इ.स १६७४ पर्यंत महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जवळपास पूर्ण झालेले होते. त्यांच्या पराक्रमाच्या वार्ता व यवनी सैन्यात त्यांचा धाक वाढतच चालला होता. ३
आता महाराज अगणित संपत्ती, उत्तम सेना, उत्कृष्ट दुर्ग आणि जलदुर्ग यांचे स्वामी झालेले होते. लाखो जीवन व कल्याण हे त्याच्या अधीन होते.लाखो लोकांचे ते श्रद्धास्थान व भारत भरतील अनेक लोकांचे ते आशास्थान बनलेले असले तरी. ४
शास्त्र शुद्धपणे तसेच विधीवत त्यांना आजून 'राजा' हि पदवी प्राप्त झालेली नव्हती यामुळे राजकीय संबंधात इतर सत्ता व बादशहा यांच्याशी वागताना त्यांना प्रत्यक्षपणे अनेक अडचणी येत होत्या. ५
त्यात औरंगजेब त्यांना एक लहान प्रदेशाच्या भुस्वामीच समजत. विजापूरचा आदिलशहा त्यांना आपल्या सैन्यातील एका सरदाराचा बंडखोर मुलं समजत असे. यासर्व कारणांमुळे इंग्रज, डच, पोर्तुगीज, हे परकीय सुद्धा उघडपणे महाराजांना लुटारू, बंडखोर म्हणत असत. ६
आता यवनी सैन्याची व परकीय लोकांची दृष्टी बदलण्यासाठी स्वतःला संस्कारपूर्वक विधीवत व शास्त्रशुद्धपणे राज्याभिषेक करवून घेणे हा एकच मार्ग होता. ७
तसेच प्रजेला देण्यात येणाऱ्या देणग्या, सरदारांना देण्यात येणारी वतने, सनदा, संधिपत्रे याला राजपत्रकाचा मान नसल्यामुळे त्यांना ते हस्तांतरित करता येत नव्हते. ८
महाराजांच्या कार्याचा गवगवा पाहता इतर मराठे जसे शिर्के, मोहिते, जाधव, निंबाळकर याचा महारांजांविषयी मत्सर वाढतच जात होता, त्यामुळे ते आपला मोठेपणा मिरावण्यासाठी मोठ्या अहंकाराने स्वतःला मोगल व आदिलशाही सिंहासनाचे राजनिष्ठ म्हणवून घेऊ लागले. ९
अशा सर्वांची तोंडे विधीवत 'राज्याभिषेक' करून घेण्याने आपोआप बंद होणार होती, तसेच इतर यवनी सत्तेने फेकलेल्या हडकांवर जगणारे लोक पण अभिषेकाने प्राप्त होणारे राजे पण व इतरांनी दिलेले पद यातील फरक जाणत होते. १०
त्यातच महाराजांचे व्याही, जवाई हे सुध्हा स्वतःला राजे म्हणवून घेत असत. हि परिस्थिति राज्यासाठी अत्यंत घातक होती, यामुळे राज्याभिषेकाने महाराजांना आपोआपच श्रेष्ठ स्थान प्राप्त होणार होते. ११
यातच धार्मिक कारण पाहायला गेले तर विधीवत राजा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त न झाल्याने महाराजांना बह्मणांच्या धार्मिक व सामाजिक बाबतीत सत्ता नव्हती तसेच ब्रह्मवृंदाला शिक्षा करण्याचा अधिकार हि नव्हता. (कवीन्द्र श्लोक) १२
नवीन हिंदूराज्य हे मुसलमानांच्या अत्याचारापासून हिंदू व आर्य संस्कृतीचे प्रतीक बनणार होते, महाराजांच्या राज्याभिषेकाने हिंदू धर्म व संस्कृती ही पुनः श्रेष्ठपदी जाणार होती. १३
आता अनेक स्वयं घोषित इतिहास संशोधक असे म्हणतात की महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला का तर ते शुद्र होते म्हणून काशीच्या गागाभट्टाना बोलावून तो करण्यात आला. १४
महाराज्यांच्या राज्याभिषेकासाठी काशीहुन वेदमूर्ती पंडित गागाभट्ट यांची भेट घेऊन सम्मान पूर्वक आणण्यात आले होते गागाभट्ट हे चार वेद, सहा शास्त्रे, योगाभ्यास, जोतिष्य, मांत्रिक सर्व विद्येने निपुण होते, १५
गागाभट्ट त्यांच्या मते मुसलमान जसे तख्तावर बसून राज्य करतात त्याचप्रमाणे राज्यांनी आपले राज्य स्थापन करावे असे त्यांचे मत होते, (यावरही बरेच मतान्तर आहे) यावेळी राजाच्या वंशावळीचा शोध घेतला असता राजे शिसोदे (क्षत्रिय) जे उत्तरेकडून दक्षिणेकडे आलेले एक घराणे हे समोर आले. १६
उत्तरेस जसे क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे राजांनीहि तो करावा असा गागाभट्टाचा विचार होता त्याप्रमाणे राज्याच्या व्रतबंध करण्यात आला. ( सभासदी बखर पान ६८) १७
सभासदी बखर ही सर्वात प्राचीन बखर असून यातील हा उल्लेख आहे. याच काय कोणत्याच बखरीमध्ये महाराज हे शुद्र असल्याचा व ब्राम्हणांनी त्यांना विरोध केल्याचा उल्लेख नाही. उलट देशी व परदेशातील ब्राम्हण, तपोनिधी, संन्यासी, जटाधारी, योगी, जंगम त्यावेळी उपस्थित असल्याचे वर्णन आहे. १८
तात्पर्य: महाराजांच्या राज्याभिषेकाची कल्पना स्वतः गागाभट्ट यांची असून त्यांनी ती महाराजांना पटवली यावरून ब्राम्हण हे राज्याभिषेकाच्या विरोधात नसून महाराज विधिपूर्वक सिंहासनाधिश्वर हो हीच त्यांची खरी तळमळ होती. १९
राज्याभिषेकासाठी १३ शके १५९६, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर,म्हणजेच इ.स. ६ जून १६७४ नक्की झाली. या विधीच्या प्राथमिक संस्कारास २१ जून १६७४ रोजी महाराजांनी आपल्या इष्ट देवतांच्या पूजेने केली. २०
त्यानंतर महाराजांचे यथाविधी उपनयन करून, होमहवनास सुरुवात करण्यात आली. हे सर्व विधी ५ जून रोजी समाप्त होऊन महाराजांनी आपल्या कुलस्वामिनीचे प्रतापगडावर जाऊन दर्शन घेतले. २१
आता पूर्वी निश्चित केल्या प्रमाणे जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेकाचा दिवस उजाडला, ठरलेल्या मुहूर्तावर महाराजांचा अभिषेक करून त्याची हत्तीवरून सर्व सैन्य लवाजम्यासह स्वारी निघून हिंदवी स्वराज्याचा अत्यंत मंगल व स्मरणीय विधी समाप्त झाला. २२

छत्रपती शिवाजी महाराज की जय...
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with SHASHANK MAHAJAN

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!