My Authors
Read all threads
"राजर्षी शाहू महाराज" आणि "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या उपस्थितीत झालेली प्रसिद्ध 'अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्णाची माणगाव परिषद...' 👇
माणगावच्या बहिष्कृत मंडळांनी
अस्पृश्य समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाचा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचे ठरवले. या मंडळींचे जातीभेद मोडून काढून एकीने लढण्यासाठी परिषद घ्यायची असे ठरले. या चर्चेत खुद्द नाना मास्तर, गणू मसू सनदी, नागोजी यल्लापा कांबळे,
कृष्णा तुकाराम कांबळे, कृष्णाजी देवू, यमालिंगू, दत्तू सिंघ, कासीम मास्तर आदी कार्यकर्ते होते. मानगावच्या बहिष्कृत मंडळांनी शाहू महाराजांची भेट घेतली. महाराजांना आनंदच झाला. सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.एवढेच नव्हे तर मी स्वतःच डॉ. आंबेडकराना निमंत्रण देतो म्हणाले
स्वतः शाहू महाराजांनी मुंबईला जाऊन बाबासाहेबांना निमंत्रण दिले. तारीख ठरली, २१/२२ मार्च १९२०.
सामाजिकदृष्ट्या पुरोगामी भूमिका असणाऱ्या महाराजांवर सनातन्यांनी टीकेची झोड उठवली होती. एवढेच नव्हेतर त्यांच्यावर प्राणघातक हल्याचा कटही रचण्यात आला. कारण ते समाज परिवर्तनासाठीचे करीत असलेले कायदे व सुधारणा आपल्या विरोधी जाणार्या आहेत असे सनातन्यांना वाटत होते.
या कटाचे सूत्रधार के.डी. कुलकर्णी होते. फुलेंनाही हे सोसावे लागले तेच महाराजांच्या वाट्याला आले.पण या कुलकर्ण्यांना पकडून बिंदू चौकातील तुरुंगात डांबून ठेवले. तुरुंगातील दामू जोशी साथीदारांसह तुरुंग फोडून पळून गेला आणि त्याने महाराजांना बाँम्बने उडवण्याचे प्रतिआव्हान दिले.
राजवाड्याच्या मागच्या बाजूस लक्षतीर्थ वसाहत भागात बॉम्बस्फोट झाला. नंतर त्याचा अहवाल २८ ऑगस्ट १९१९ ला महाराजांना प्राप्त झाला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर महाराजांना त्या स्फोटाचे गांभीर्य लक्षात आले. हा बॉम्ब राजवाड्यावर पडला असता तर त्यांचे सारे कुटुंब उध्वस्त झाले असते.
गावकर्यांनी जय्यत तयारी केली. समाज मंदिरासमोरच देखणा मंडप उभारला. बँन्ड सज्ज ठेवला. गावभर नुसते आनंदाचे वारे वहात होते. सनातन्यांच्या जीव तडफडत होता.
माणगाव जि. कोल्हापूर येथे दि. २२ मार्च‚ १९२० रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्णाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेचे अध्यक्ष होते अस्पृश्यांचे तरुण नेते डॉ. आंबेडकर आणि प्रमुख पाहुणे होते राजर्षी शाहू महाराज.

तिथून शाहू महाराजांनी दिलेल्या भाषणातील काही भाग..👇🏻
मित्र हो !

आज माझे मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मिळावा म्हणून मी शिकारीतून बुद्ध्या येथे आलो आहे. मिस्टर आंबेडकर हे ‘मूकनायक’ पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात‚ याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आजच्या सभेचे अध्यक्ष मिस्टर आंबेडकर यांचे करणे मला नापसंत आहे. कारण महार‚ मांग‚ चांभार‚ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून‚ वा विशेषतः महार लोक पूर्वी महारकी‚ सूत कातून व्यापार करीत असता त्यांना अस्पृश्य कोणी ठरविले कोण जाणे ! असा वैश्याचा धंदा सोडून दस्यू म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे
अतिशूद्र आंबेडकरांनी का पत्करला आहे‚ मला कळत नाही. तथापि मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करितो की‚ आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने‚ आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी
अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात.पशू-पक्षीदेखील आपल्या जातीचा पुढारी करितात.पक्ष्यांत कधी चतुष्पादांचा पुढारी झाला नाही. चतुष्पादांत कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय‚ बैल‚ मेंढरे यांत मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते.
हिंदुस्थानशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यास जात नाही. परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र जातिभेद इतका तीव्र आहे की‚ मांजर-कुत्रे किंबहुना शेणापेक्षादेखील कमी‚ अशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवांस व भगिनींस वागवितो व अजूनही आम्ही गैरशिस्त पुढारी करितो.
म्हणून गरीब लोक अहमदाबाद‚ अमृतसरसारखे ठिकाणी व मागे मुंबईस झालेल्या दंग्यांसारख्याप्रसंगी बळी पडतात. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातिभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवितील‚ असे पुढारी पाहिजेत.
जरी मी आंबेडकरांची निंदाच करीत आलो‚ तरी त्यांच्या उदार मतांबद्दल स्तुतीही करणे जरूर आहे. आज त्यांना ‘पंडित’ ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे? विद्वानांत ते एक भूषणच आहेत. आर्य समाज‚ बुद्ध समाज व ख्रिस्ती यांनी‚ त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते;
परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत‚ याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत. मीही मानतो.

(महाराजांनी नियतकालिकासाठी २५००/-रु. मदत बाबासाहेबांना दिली. या घटनेनंतर एक महिन्याने ‘मूकनायक’ बाबासाहेबांनी सुरू केले.)

क्रमशः
संदर्भ :
१. राजर्षी शाहू छत्रपती यांची भाषणे.
२. के. जी. भालेराव यांचा The Wire साठी लिहिलेला लेख.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!