My Authors
Read all threads
छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांची शेवटची भेट...

"दीनदुबळ्यांच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझला..."
शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला दिलेला आश्रय‚ त्यांच्या जलशांना दिलेले उत्तेजन‚ ब्राह्मणेतर पक्षाची केलेली स्थापना आणि त्या माध्यमातून घेतलेला कायदे मंडळीच्या निवडणुकीतील सहभाग‚ अस्पृश्यता निवारणाचे कायदे‚ कुलकर्णी वतन बरखास्ती अशा एक ना दोन उपक्रमांमुळे
महाराज बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत बनले होते‚ तर ब्रह्मवर्गाचे नंबर एक शत्रू झाले होते. ब्रिटिश सरकारकडे त्यांच्याविषयी खोट्यानाट्या तक्रारी करण्यापासून ते त्यांच्या चारित्र्यहननाच्या कंड्या पिकविण्यापर्यंत सर्व शस्त्रास्त्रांचा वापर हा ब्रह्मवर्ग करत होता.
ब्रह्मवर्गाचे नेते केसरीकार न. चिं. केळकर यांनी महाराजांना ‘स्वराज्यद्रोही छत्रपती’ असे जाहीररीत्या संबोधून आगीत तेल ओतले.
या पार्श्वभूमीवर झालेल्या एका भेटीत महाराज प्रबोधनकारांना म्हणाले, "ब्राम्हण हात धुऊन पाठीशी लागलेला मला वाटतं, मी एकटाच छत्रपती असेन काय हो?? तेव्हा प्रबोधनकार उद्गारले, "आपल्यापेक्षाही भयंकर छळाला सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तोंड दिलेले होते..."
आणि मग दोन तास प्रतापसिंह महाराज ब्राम्हणी कटकारस्थानांना कसे बळी पडले, याची कथा प्रबोधनकारांनी सांगितली.ती ऐकून महाराज भारावून गेले आणि उद्गारले, "काय भयंकर इतिहास आहे हा म्हणायचा.
अजुनपर्यंत आम्ही आपलं समजत होतो, की बुवासाहेब (प्रतापसिंह) महाराजांनी खरोखरीच इंग्रजांविरुद्ध काही कट केला होता. म्हणून त्यांना पदच्युत नि हद्दपार करण्यात आले. हा इतिहास लिहून छापून बाहेर पडलाच पाहिजे"
आणि मग जेव्हा दोंघाच्या भेटी होत, तेव्हा प्रबोधनकारांना पहिला प्रश्न महाराज विचारत, "सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास कधी लिहितोस?"
महाराज बडोद्यास महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीच्या लग्नास निघाले होते आणि प्रबोधनकार साताऱ्यास भाऊराव पाटलांच्या निमंत्रणावरून शिवजयंतीच्या भाषणास निघाले होते. प्रबोधनकारांचे सातारला जाण्याचे प्रयोजन जाणून घेतल्यावर महाराज त्यांना म्हणाले‚
‘‘अरे‚ आता कितीदा तुम्ही ‘सोळाशे सत्ताविसाव्या साली शिवाजी जन्मला’ हे पालुपद गात बसणार? माझी आज्ञा आहे तुला‚ तेथे तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास इत्थंभूत सांगून‚ दे त्या सातारच्या मावळ्यांना भडकावून...
हे बघ‚ मी चाललोय बडोद्याला. पाच-सहा दिवसांनी मुंबईला परत येईन. तिथं येऊन मला भेट.’’
महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रबोधनकारांनी साताऱ्याच्या राजवाड्याच्या पायरीवर सलग तीन दिवस तीन भाषणे प्रतापसिंहांच्या पदच्युतीवर व तत्कालीन ब्राह्मणांच्या कुटिल नीतीवर दिली. त्या वेळी आजच्यासारखा लाऊडस्पीकर नव्हता.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर टेबलावर उभे राहून प्रबोधनकारांनी खणखणीत आवाजात‚ ‘सातारच्या राज्यक्रांतीच्या इतिहासाच्या कहाणीने साऱ्या बामणेतरांना चवताळून’ सोडले!’’
ही तीन भाषणे साताऱ्यातच नव्हे‚ तर सर्व महाराष्ट्रात गाजली. अखिल ब्रह्मवर्गात त्यामुळे खळबळ माजून गेली. प्रबोधनकारांनी शाहू महाराजांची आज्ञा तंतोतंत पाळली.
बडोद्याहून महाराज आले‚ ते गंभीर आजारी पडूनच. प्रबोधनकार त्यांना भेटावयास गेले; पण ते अत्यवस्थ असल्याने जवळच्या माणसांनी त्यांना भेटू दिले नाही;पण रात्री महाराजांनी प्रबोधनकारांची आठवण काढली आणि खास नोकर व गाडी पाठवून त्यांना आणण्याची आज्ञा केली. प्रबोधनकार आपल्या आठवणीत लिहितात‚
‘‘ते लोक आले नि म्हणाले‚ ‘छत्रपती महाराजांनी तुम्हाला लगोलग बोलावले आहे.’ त्यांच्या गाडीत बसून मी गेलो. लगेच मला वरच्या मजल्यावर नेण्यात आले. पाहतो तो सगळ्या हॉलमध्ये निळा मंद प्रकाश. पलंगाभोवती दोन-तीन डॉक्टर बसलेले. महाराजांचा प्रचंड देह पलंगावर पडलेला नि
एक हुजऱ्या छातीवर काहीतरी धरून शेकीत होता. मी पलंगावर गेलो नि नमस्कार केला. ‘काय काय केलंस साताऱ्याला‚’ इतके महाराज म्हणताच डॉक्टर उठले नि म्हणाले‚ ‘छे! छे! महाराज‚ बोलायचं नाही.’ महाराज‚ ‘मी बोललो. आता हाच फक्त बोलणार आहे.’ मी दहा मिनिटांत सातारच्या कार्यक्रमाची हकिकत सांगितली.
महाराजांना आनंद झाला. महाराज‚ ‘बरं‚ आता तू इतिहास केव्हा लिहिणार? उद्या मी कोल्हापूरला जातोय‚ तू चल माझ्याबरोबर आणि तिथं बसून लिहिणे कर.’
मी - ‘उद्या नाही; पण लवकरच रजा काढून येतो.’
महाराज‚ ‘तू वांड आहेस. छत्रपतीच्या हातावर हात मारून घे पाहू शपथ.’ महाराजांनी हात माझ्यापुढे केला आणि मी मोठ्याने शपथ घेतली. लगेच मी निघालो. बडोदेकरांनी मला त्यांच्या गाडीतून दादरला आणून पोहोचविले.
रात्री अकराचा सुमार असेल. जेवलो नि झोपी गेलो.

सकाळी सहा वाजता सौ.ने मला हलवून जागे केले. ‘अहो उठा. लोक बाहेर काय बोलताहेत ते पाहा. शाहू महाराज गेले!’
बाहेर येऊन चौकशी केली तो बातमी खरीच! तोंडातून एकच उद्गगार निघाला‚ ‘अरेरे‚ दीनदुबळ्यांच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझला’’
महाराजांच्या अंतिम इच्छेची पूर्तता प्रबोधनकारांना लगेच करता आली नाही;पण पुढे आपल्या अनंत व्यापातून सवड काढून त्यांनी सातारचा राज्यक्रांतीवरचा ग्रंथ सव्वीस वर्षांनी १९४८साली प्रकाशित केला.

समाप्त..

(संभाषणाचा प्रसंग असल्यामुळे प्रबोधन हेतूने कॉपी पेस्ट केला आहे, क्षमा असावी.🙏)
संदर्भ :-
१. राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!