My Authors
Read all threads
"तुम्ही फक्त कश्मीर आणि पाकिस्तान कडे लक्ष द्या हो! (चीनचं आम्ही बघू!) आपल्यावर कोण कुठून हल्ला करणारे हे सांगण्याचं काम आर्मीच्या कमांडर इन चीफचं नाही! "

हे आहेत नेहरूंचे बोल. जनरल करिअप्पा, आपल्या कमांडर इन चीफने चीनच्या संकटावर प्लॅन सांगितल्यावर टेबलवर दाणकन हात आपटून 1/n
नेहरूंनी वरील उपदेश केला.

पुढे काय घडलं तो इतिहास आहे.

देश कठीण काळात असताना, त्याची फिकीर नसलेल्या लोकांची या नेहरूंना आज मोदींपेक्षा "भारी" दाखवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.

नेहरू दासांची कीव करावीशी वाटते.

2/n
एकीकडे मोदींचं नाव घेतलं की पोटात कळ उठते यांच्या. पण नेहरूंचे जनुकीय वारस मोदींच्या पासंगाला पुरणारे नाहीत. म्हणून मग "मोदींना उत्तर" म्हणून सवयीनुसार पूर्वजांचा आधार घेत नेहरूंचे फोटो शेअर करावे लागतात.

पण मग नेहरू चिकित्सा केली की फाऊल वाटतो यांना!

3/n
बाबांनो - "मोदींना उत्तर" म्हणून नेहरू तुम्हीच समोर आणणार असाल तर नेहरू चिकित्साच होणार ना?

मोदी लेहला गेल्यावर नेहरूंचा फोटो तुम्हीच समोर आणलात, हो की नाही?

इसरोने कर्तृत्व गाजवल्यावर नेहरूंच्या आठवणींनी डोळे तुम्हीच टिपले, येस ऑर नो?

4/n
मोदींचं अमेरिकेतलं भाषण गाजलं, त्यांना भेटण्यासाठी सदनात गोऱ्यांनी गर्दी केली - तेव्हा भारतीय पंतप्रधानांचा गौरव झाल्याने जळून खाक झालेल्या तुम्हीच नेहरूंच्या अमेरिका भेटीतील फोटो-ऑडिओ क्लिप शेअर केल्या, हां या ना?

स्वतः इतिहास उकरून काढायचा, - 5/n
मग त्यातला चिखल दाखवला की बोंब मारायची.

ऐसा कैसा चलेंगा?

बरं तुम्ही इतिहाससुद्धा सोयीचा काढता लेक हो!

आता म्हणे नेहरूंचं "Scrap The Army!" विधान उघड करणारे लॉकहार्ट "खोटारडे" होते. "भारतद्रोही" होते. (यांना आवडेल ते नं लिहिणारे, बोलणारे असेच खोटारडे असतात!

6/n
नशीब लॉकहार्ट संघी हस्तक असल्याचे आरोप अजून झाले नाहीत!)

आपल्या पुस्तकात हा प्रसंग नोंदवणारे मेजर जनरल डी के पलीत कोण होते? स्वतः आर्मी व्हेटरन तर होतेच, भारत-चीन युद्धाच्या वेळी मिलिटरी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल होते. अश्या पदावरचा माणूस काहीही लिहून ठेवेल का?

7/n
फक्त पलीतच नव्हे. 1962 : The War That Wasn’t या आपल्या पुस्तकात शिव कुणाल वर्मांनी सुद्धा नेहरूंच्या "पोलीस पुरेसे आहेत, आर्मी स्क्रॅप करा" विधानांचा उल्लेख केला आहे.

हे विधान तर सोडाच - चीनच्या संकटाच्या बाबतीत नेहरू किती भोळसट, अनभिज्ञ राहिले यावर भरभरून लिहिलं गेलं आहे.

8/n
कर्नल अनिल आठल्ये एका लेखात लिहितात :

"As the author of the official history of that war, I can vouch for one fact, that is all the faulty decisions and strategies in that ill-fated war flew from the basic premise 'China will never attack'. The origin of that premise was

9/n
in the domination of the political and military space by Jawaharlal Nehru!"

वर्मांनी तर जागोजागी नेहरू कसे कमी पडले यावर भाष्य केलं आहे.

एक गोष्ट अगदी साधी आहे. चीन आणि भारताचा काहीही संबंध नव्हता. इंग्रजांनी तो हुशारीने, जाणीवपूर्वक येऊ दिला नव्हता -

10/n
तिबेटला बफर म्हणून वापरून. तिबेटचं हे अनन्यसाधारण महत्व इंग्रजांपासून स्पष्टपणे माहिती होतं.

अश्या परिस्थिती, तिबेट स्वतंत्र, स्वायत्त रहावा - आणि भारताच्या बाजूने असावा - हा साधा सेन्स होता.

पण नेहरूंच्या सरकारमध्ये तिबेट काय चीज आहे हेच अनेकांना माहिती नव्हतं.

11/n
अश्या परिस्थितीत, चीनने आपलं सैन्य तिबेटमध्ये घुसवल्यावर भारत सरकारची स्थिती काय होती माहितीये?

"कन्फ्युजन" ची...!

वर्मा म्हणतात :

When the Tibetan government turned desperately to India for help, Nehru seemed completely at sea. Appeals for aid were turned down and

12/n
the Tibetans were advised by India to settle the matter peacefully, whatever that was supposed to mean. The fact of the matter was India had absolutely no clue as to how the situation should be handled.

तिबेटने भारताला मदत मागितली...नेहरू कन्फ्युज्ड...!

13/n
काय करावं कळेना इंटरनॅशनल स्टेट्समनना...! तिबेटच्या एकामागे एक विनंती येत राहिल्या...भारताने सांगितलं..."शांततेच्या मार्गाने सेटलमेंट होऊन जाऊ द्या!"

आपल्याकडे शेतीची भांडणं डोकी फोडून थांबतात. इथे तिबेट गिळायला चीन आसुसला असताना आमचं ग्लोबल व्हिजन असलेले

14/n
नेहरू तिबेटला म्हणतात "म्याटर पीसफूली मिटवून घ्या आपापसात!"

आपल्या सीमा कुणाला भिडल्या आहेत, या प्रकरणानंतर कुणाशी भिडणार आहेत, त्याचे परिणाम काय होणारेत याची काही कल्पना असायला हवी की नको पंतप्रधानांना?!

बरं ही कल्पना "दिली" गेली नव्हती का? तर हो! दिली गेली होती!

15/n
इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन प्रमुख, बी एन मुलीक नेहरूंसमोर जाऊन बसले होते सगळी परिस्थिती समजावून सांगायला. चीन कधीही तिबेट घशात घालू शकतो हे स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांनी नेहरूंना. इतकंच नव्हे, अमेरिका एअर सपोर्ट द्यायला तयार आहे हे ही सांगितलं होतं. त्याही पुढे -

16/n
भारताने फक्त मिलिटरी पावलं उचलली तरी चीन स्वतःच माघार घेऊन कृती टाळेल - युद्ध/हिंसेची वेळच येणार नाही - असं ही सांगितलं होतं.

नेहरूंची प्रतिक्रिया काय?

शिव कुणाल वर्मा उवाच :

17/n
"Nehru, who had embarked on a deliberate policy of bringing China onto the world stage, then let it be known that he was not willing to intervene militarily. The Indian prime minister also felt any military offensive by India would severely impact her standing -

18/n
in the eyes of the world."

नेहरूंना चीनला वर्ल्ड स्टेजवर आणायचं होतं, म्हणून मग मिलिटरी नको! शिवाय "जगात" आपली इमेज नको ना बिघडायला!

चिनी ड्रॅगनचं संकट सांगणारे एकटे मुलीक नव्हते. सरदार वल्लभभाई पटेल, शामा प्रसाद मुखर्जी आणि इतर अनेकांनी चीन-तिबेट विषयावर कठोर कृतीचा

19/n
आग्रह धरला होता.

ज्या मीटिंगमध्ये मुलीक यांनी चीन-तिबेट बद्दल आग्रही मत मांडलं, त्यात सरदार पटेल सहभागी नव्हते. नंतर त्यांनी नेहरूंना एक पत्र पाठवलं.

स्टेट्समन कसा असतो - परिस्थितीची जाण कशी असते - याचा अप्रतिम नमुना म्हणजे ते पत्र.

पत्रात सरदार म्हणतात -

20/n
"The Chinese Government has tried to delude us by professions of peaceful intention. My own feeling is that at a crucial period they manage to instil into our Ambassador a false sense of confidence in their so-called desire to settle the Tibetan problem by peaceful means.

21/n
There can be no doubt that during the period covered by this correspondence the Chinese must have been concentrating for an onslaught on Tibet. The final action of the Chinese, in my judgment, is little short of perfidy. The tragedy of it is that the Tibetans put faith in

22/n
us; they choose to be guided by us, and we have been unable to get them out of the meshes of Chinese diplomacy or Chinese malevolence."

काय ओळखलंय पहा चीनला! तिबेटने आपल्यावर विश्वास टाकलाय..आपण मात्र चीनच्या मगरमिठीतून त्यांना सोडवू शकलो नाही आहोत याची जाणीव करून देताहेत!

23/n
चीनचे लोक कशी भाषा बोलताहेत यावर देखील पटेलांनी करडी नजर फिरवली होती.

"ही आपल्या मित्राची भाषा नाही - हे जणू आपला संभाव्य शत्रू आपल्याशी बोलतोय असं वाटतंय..."

"Their last telegrame to us is an act of gross discourtesy not only in the summary way it disposes of our protest

24/n
against the entry of Chinese forces into Tibet but also in the wild insinuation that our attitude is determined by foreign influences. It looks as though it is not a friend speaking in that language but a potential enemy."

पुढे जो भाग देतोय तो कसा बावनकशी सोनं आहे पहा.

25/n
कम्युनिझम, भौगोलिक राजकारण, संरक्षण यंत्रणा...पटेलांचा वकूब कसा उठून दिसतोय पहा -

"Chinese irredentism and communist imperialism are different from the expansionism or imperialism of the western powers. The former has a cloak of ideology which makes it ten times more

26/n
dangerous. In the guise of ideological expansion lie concealed racial, national or historical claims. The danger from the north and north-east, therefore, becomes both communist and imperialist. While our western and non-western threat to security is still as prominent 27/n
as before, a new threat has developed from the north and north-east. Thus, for the first time, after centuries, India’s defence has to concentrate itself on two fronts simultaneously. Our defence measures have so far been based on the calculations of superiority over

28/n
Pakistan. In our calculations we shall now have to reckon with communist China in the north and in the north-east, a communist China which has definite ambitions and aims and which does not, in any way, seem friendly disposed towards us."

हा विचार जागतिक आऊटलूक असलेल्या

29/n
नेहरूंचा नाही. हे अॅनालिसिस भारतीय पंतप्रधानाचं नाही. हा सरदार पटेलांचा विचार आहे.

आणि - सरदार पटेल फक्त इतकाच विचार, मत व्यक्त करून थांबले नाही! त्यांनी भारताने चीन बाबतीत लॉंगटर्म काय विचार करायला हवा हे पण नोंदवून ठेवलं. एक नव्हे, दोन नव्हे, नऊ प्रॉब्लम्स आणि

30/n
अॅक्शन पॉईंट्स लिहून दिले.

त्यातले फक्त दोन सांगतो.

(d) The question of Chinese entry into UN. In view of rebuff which China has given us and the method which it has followed in dealing with Tibet, I am doubtful whether we can advocate its claims any longer.

31/n
There would probably be a threat in the UN virtually to outlaw China in view of its active participation in the Korean War. We must determine our attitude on this question also.

(g) Improvement of our communication, road, rail, air and wireless, in these areas and with the

32/n
frontier outposts.

वाचलात ना? पुन्हा वाचा.

व्हिजनरी नेहरूंनी यांवर काय केलं हा इतिहास तर सर्वज्ञात आहेच.

बाय द वे - हे पत्र कधीचं आहे माहितीये?

७ नोव्हेम्बर १९५०

ही तारीख दोन गोष्टींसाठी महत्वाची आहे.

पहिली महत्वाची गोष्ट - पटेल हे पत्र पाठवल्याच्या अवघ्या ३८ दिवसांत

33/n
निधन पावले. त्यामुळे पटेलांना या बाबतीत काही ठोस कृती करण्याची संघी मिळाली नाही.

दुसरी-भारत चीन युद्धाच्या बारा वर्ष - बा रा व र्ष - आधी पटेलांनी ब्लु प्रिंट आखून दिली होती हो! जर त्यावर काम झालं असतं तर आज दक्षिण आशियातील पावर डायनॅमिक्स वेगळंच असलं असतं. अर्थात, नेहरूंनी

34/n
कमिटी नेमली. कमिटीने रिपोर्ट सादर केला. पण काम अगदीच तोकडं झालं. "चीन हल्ला करणार नाही" या भोळसट स्वप्नाळू अंधश्रद्धेने घात केलाच.

पुढे पंचशील - जी नेहरूंची व्हिक्टरी म्हणून गाजवली गेली, त्यातून तिबेटची भारताने अधिकृतरीत्या केलेली घोर प्रतारणा, भारताने चीनवर

35/n
सीमा ठरवण्याबद्दल ठेवलेला - पुन्हा एकदा आंधळा विश्वास वगैरे वाचलं, समजून घेतलं की डोकं भणाणून जातं.

आणि हे नेहरू आज तुमच्या आमच्या समोर वर्तमान पंतप्रधानांना "प्रत्युत्तर" म्हणून समोर आणले जातात.

मग का होऊ नये चिकित्सा?

36/n
१९४७ पासून सतत - सतत भारतीय सैन्याच्या अधिकारांचं सिस्टिमॅटिक खच्चीकरण केलं गेलं. संख्या कमी करत नेली. एकेकाळी ४ लाखांचं असलेलं आपलं सैन्य दीड लाखांवर आणलं गेलं. खच्चीकरण फक्त संख्येत नव्हतं. निर्णय प्रक्रियेत देखील होतं. इतकं की सैन्याचे निर्णय चक्क दिल्लीतील ब्युरोक्रसी

37/n
घ्यायला लागली. नेहरूंचा आर्मी द्वेष कसा होता याचा अनुभव कमांडर इन चीफ जनरल करिअप्पाना देखील आला.

चीनने तिबेटवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर करिअप्पांनी नेफाच्या सेक्युरिटीचा प्लॅन नेहरूंना सांगिल्यावर नेहरू भडकले. टेबलवर दाणकन हात आपटत म्हणाले -

38/n
“It is not the business of the C-in-C to tell the Prime Minister who is going to attack us where. You mind only Kashmir and Pakistan.”

सैन्याने काश्मीर आणि पाकिस्तान बघावं.
आम्ही चीन बघू.

छान बघितलात हो. फारच छान.

बरं, काश्मीर तरी सैन्याला हॅन्डल करू दिला का यांनी?

39/n
भारतीय सैन्य पूर्ण विजयाबद्दल १००% कॉन्फिडन्ट असताना "दूरदृष्टी" असणाऱ्या नेहरूंनी सैन्याला सीजफायर करायला सांगितलं आणि काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी भारताच्या मानगुटीवर बसवला.

नेहरूंची देशाच्या संरक्षण स्ट्रॅटेजीच्या बाबतीत हीच लेगसी आहे. भारतावर "नसलेले" दोन प्रश्न लादणे!

40/n
काश्मीर आणि चीन!

हे इतकं असून आमची आर्मी नेहरूंनी "सक्षम" करून भारतावर फारफार उपकार केले असं सांगत आधुनिकीकरणाची उदाहरणं दिली जातात.

ते आधुनिकीकरण कुठे गेलं ६२च्या युद्धात? इतकी नामुष्की कशी ओढवली? आर्मी चीफ, आयबी, मंत्रिमंडळातील वरिष्ठजन कानीकपाळी ओरडून सांगत होते...

41/n
तुम्ही सैन्य टॉप क्लास अपग्रेड केलं होतं...मग का पराभव झाला?

पराभवाचं कारण हे आहे :

लेफ्टनंटजनरल व्ही के कपूर सांगतात :

"Nehru continued to appease the Chinese and the untimely death of Sardar Patel took away all opposition to Nehru’s views.

42/n
The Sino-Indian War of 1962 and the national humiliation was the result of this policy and the bias against the military."

"भारतीय सैन्याला कार्यवाही करण्याची "खुली छूट" दिली आहे" - असं छातीठोक सांगू शकणाऱ्या मोदींच्या समोर स्पर्धा करायला या नेहरूंना आणून बसवताय तुम्ही?

43/n
मोदी लेह ला गेल्यावर "त्यात काय एवढं! नेहरू पण गेले होते!" म्हणत त्यांचे फोटो शेअर करता?

तरी नेहरूंची चिकित्सा करू नका म्हणताय?

वरील सर्व गोष्टी नाकारू शकता तुम्ही.

वरील सर्व प्रसंग खोटे, सर्व दाखले फेक, सगळे लोक संघी.

वाट्टेल ते नाकारू शकता.

पण -

44/n
१९६२ च्या युद्धाचा परिणाम कसा नाकाराल?

तो इतिहास कसा बदलाल?

त्यासाठी कुणाला जबाबदार धराल?

एक गोष्ट समजून घ्या.

नेहरू फक्त तुमचेच "पहिले पंतप्रधान" नाहीत. माझेही आहेत. त्यांचं अपयश माझ्या देशाचं अपयश आहे. मोदींचं एखादं खरं-खोटं अपयश तुम्हाला असुरी आनंद देऊन जात असेल.

45/n
मला मात्र नेहरूंचं अपयश दुःखदायकच वाटतं. मला या काळ्याकुट्ट आठवणी जागवून कुठलंच समाधान लाभत नाही.

पण, माझ्यासाठी वर्तमान जास्त महत्वाचा आहे. तो तुम्ही नासवताय. माझ्या देशाच्या वर्तमान पंतप्रधानाची खिल्ली उडवायला तुम्ही सोयीस्कर इतिहास उगाळताय. मग आम्ही गप्प बसू शकत नाही.

46/n
आधीच्या लेखात ही म्हणालो होतो, आजही म्हणतोय.

तुम्हाला कुणाचं भक्त व्हायचंय, कुणाची चाकरी करायचीय हा तुमचा प्रश्न आहे. काहीच हरकत नाही.

पण आज देशासमोर कठीण परिस्थिती असताना, देशाचं सैन्य मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना आमचे पंतप्रधान आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत.

47/n
त्यात राजकारण करत, ख्याख्या करत जुना इतिहास उकरून काढू नका. उकरण्याची सुरुवात केलीत तर त्यासोबत बरंच काही बाहेर येईल.

जुने फोटो शेअर कराल तर फोटोमागच्या खऱ्या कहाण्या देखील बाहेर येतील.

48/n
आधी म्हणालो तसंच - तुम्हाला बिलकुलच परवडणारं नाहीये हे सगळं.

पुढे तुमची मर्जी.

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

facebook post link: facebook.com/OmkarDabhadkar…

@threadreaderapp please unroll.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!