My Authors
Read all threads
राणी रुद्रम्मादेवी काकतिय -

काकतिय घराण्याचं राज्य आंध्र आणि तेलंगणाच्या परिसरात होतं. त्याच घराण्यात जन्मली रुद्रम्मा!
इ.स. १२५० च्या दरम्यान गणपतीदेव काकतिय हे राज्य करत होते. वरंगळ ही त्यांची राजधानी. त्यांनी आंध्र किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला.
तेलुगू भाषिक जनतेला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.गणपतीदेव हे कलाप्रेमी होते. या उदारमतवादी राजाला रुद्रम्मा आणि गणपम्बा अशा दोन मुली होत्या.रुद्रम्माअतिशय शूर,धाडसीआणि युद्धकलेत निपुण होती.तिचे नेतृत्व गुण बघून गणपतीदेव यांनी रुद्रम्माला आपली उत्तराधिकारी घोषित केले.
दरबारातील मान्यवर, मंत्री, सामंत, यांना हा निर्णय रुचला नाही. दोन वर्षे रुद्रम्माने वडिलांच्या हाताखाली काम केले. प्रशासनातील बारकावे समजून घेतले. इ.स. १२६२ मधे रुद्रम्माचा राज्याभिषेक झाला.
तिचे गुण सगळ्यांना मान्य असले तरीही सर्वोच्च पदावर एका स्त्रीने बसणे अनेकांना सहन होत नव्हते. अशा लोकांच्या आग्रहाखातर राज्याभिषेकाच्या वेळी तिचे नाव बदलून ' महाराज रुद्रदेव ' असे ठेवले. त्यामुळे काही अभिलेखांमधे तिचे नाव कोरतांना रुद्रम्मा महाराज रुद्रदेव असे दिले आहे.
याच पुरुषवर्चस्व वृत्तीने शेजारच्या राज्यातील शासकांनी हल्ले सुरू केले. कलिंगाच्या राजाला तिने परतवून लावले तर लगेच तमिळनाडूच्या पांड्य राजाने हल्ला केला. त्याला व्यवस्थित हरवले तर देवगिरीच्या यादव राजाचे आक्रमण! अत्यंत कणखर नेतृत्वाची झलक दाखवत तिने सर्वांना धूळ चारली.
यादव राजाला तर तिने सोन्याचांदीची मजबूत खंडणी वसूल करूनच सोडले.
रुद्रम्मा अतिशय कुशल योद्धा आणि तलवारबाजीमधे निपुण होती. हत्ती आणि घोडेस्वारीत तरबेज होती. तिच्या सैन्यात अडीच हजार गजदळ होतं. या युद्धाच्या काळात तिने प्रशासनात अनेक बदल केले. मंत्रीमंडळात अनेक पदे वंशपरंपरागत होती
त्यामुळे खरे गुणवंत उमेदवार मागे पडत असत. आपल्या पदाला काही धोका नाही या समजूतीमुळे मंत्री, त्यांची मुले चढेल वृत्तीने वागत असत. ही प्रथा रुद्रम्माने बंद केली. काही जुने सदस्य त्यामुळे नाराज झाले पण राज्याची प्रगती होऊ लागली.
आपण चांगले काम केले नाही तर आपले पद जाईल या भीतीने प्रशासनातील अधिकारी प्रामाणिकपणे, मान मोडून काम करु लागले.
वरंगळ या राजधानीप्रमाणेच सगळ्या राज्याच्या सुरक्षेसाठी आणि पाण्याच्या सोयीसाठी तिने भरपूर प्रयत्न केले.
वडिलांनी जिंकलेल्या किनारपट्टीवर बंदरांची आणि कोठारांची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना दिली. तांदूळ, मसाले आणि इतर अन्नधान्याची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
युरोप आणि आखाती देशांमधे तिच्या राज्यातून सोने, मौल्यवान रत्ने, मोती, मसाले, तांदूळ, रेशमी कापड अशा वस्तूंचा व्यापार होत असे. काकतिय राज्यात हिऱ्यांच्या खाणी होत्या. हिऱ्यांना पैलू पाडणे, त्यांचे दागिने घडवणे हा मोठा उद्योग होता.
त्या कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था रुद्रम्माने केली होती.
इटलीचा व्यापारी मार्कोपोलो तिच्या राज्यात आला होता. सर्वत्र फिरताना त्याने जे काही बघितले ते लिहून ठेवले आहे.
रुद्रम्मा राणीचे आणि तिच्या दरबाराचे वर्णन मार्कोपोलोने केले आहे. " रुद्रम्मादेवी अतिशय रूबाबदार आणि तडफदार आहे. प्रजा आणि दरबारातील लोकांवरही तिची जरब आहे. सगळीकडे बारीक लक्ष ठेवणारी राणी नेहमी योद्धयाचा वेश करते.
प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची राणी नेहमी घोड्यावरुन फिरते.ती तलवार,भाला आणि बाण चालवण्यात तरबेज आहे.असे वर्णन मार्कोपोलोने केले आहे.रुद्रम्माचा विवाह राजकुमार वीरभद्रदेव चालुक्य याच्याशी झाला होता.मात्र विशेष म्हणजे दोघांनीही आपले राजकीय जीवन आणि कौटुंबिक संबंध यात गल्लत केली नाही.
वीरभद्रदेव चुलत घराण्यातला राजकुमार असल्याने स्वतः राजा होणे शक्य नव्हते. रुद्रम्माला दोन मुली झाल्या. तिने २५ वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले. मुलींमधे आवश्यक गुण नसल्याने नातू प्रतापदेव याला तिने आपला उत्तराधिकारी नेमले.
नलगोंडा जिल्ह्यातील चंदुपालता गावात एक शिलालेख सापडला आहे. त्यात रुद्रम्मादेवीच्या अखेरच्या क्षणांबद्दल नोंद केली आहे. शिलालेखानुसार २७ नोव्हेंबर १२८९ रोजी राणी रुद्रम्मादेवीचा मृत्यू झाला. सेनापती मल्लिकार्जुन नायक याच्या सोबत ती घोड्यावरून राज्यात पाहणी करण्यासाठी फिरत होती.
त्यावेळी तिच्याच राज्यातील जुन्या, असंतुष्ट विरोधक मंत्र्याने तिच्यावर हल्ला केला. रुद्रम्माजवळ सैन्य नव्हते. ती सहजच फेरफटका मारायला निघाली होती. पण विरोधक मात्र पूर्ण तयारीनिशी आले होते. सेनापती मल्लिकार्जुन नायकने पराक्रम गाजवला.दोघांनी कडवा प्रतिकार केला पण दोघांचा अंत झाला.
सिद्दीपेट जिल्ह्यात बेक्कलू गावात त्रिकूट मंदिर आहे. त्या मंदिरात राणी रुद्रम्मा देवीच्या अखेरच्या लढाईचा प्रसंग दाखवणारे शिल्प आहे.
पित्याच्या आज्ञेनुसार, चोख राज्य करणाऱ्या रुद्रम्माचा कपटाने अंत झाला.
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा रुद्रम्मादेवीच्या खाणीत मिळाला होता. सुरुवातीला ३८७ कॅरेटचा हा हिरा रुद्रम्माच्या देवघरातील भैरवीदेवीच्या आभूषणात होता. चौदाव्या शतकात दिल्लीच्या सुलतानाने केलेल्या लुटालूटीत कोहिनूर दिल्लीला गेला.
कोहिनूर कपटाने भारताबाहेर गेला आणि रुद्रम्मासारख्या मौल्यवान व्यक्तिमत्त्वांना आपण विसरून गेलो!🙏🏻🙏🏻🙏🏻
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with priyaa pradip zore

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!