My Authors
Read all threads
हिंदू मुस्लिम 'वैमनस्य' आणि लोकमान्य टिळक
...

एखादा माणूस "महापुरुष" असतो म्हणजे नेमकं काय? वेगवेगळ्या कसोट्या लावता येतील. पण समाजापुढे घालून दिलेले आदर्श, तत्कालीन सामाजिक/राजकीय प्रश्नांवर केलेलं कार्य आणि - दूरगामी परिणाम करतील अश्याप्रकारे केलेली वैचारिक तात्विक मांडणी

१+
या तीन कसोट्या प्रामुख्याने लावल्या जायलाच हव्यात.

लोकमान्य टिळकांनी केलेलं वैचारिक कार्य, एकहाती गाजवलेलं कर्तृत्व, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा घातलेला पाया आणि त्या जोडीने "स्वातंत्र्य मिळवून पुढे काय?" या प्रश्नाचं शोधलेलं उत्तर...अश्या अनेक फ्रंटवर टिळक एखाद्या कसलेल्या

२+
खेळाडूसारखं झळाळत रहाणार आहे.

या सर्वांत विविध राजकीय प्रश्नांची मांडणी करत असताना टिळकांनी केलेलं लेखन आजही दिशादर्शक ठरतं.

फक्त वानगी दाखल, टिळकांनी हिंदू - मुस्लिम प्रश्नावर मांडलेले विचार पुढे देतोय.

=========

३+
"मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणांस भिते व यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यावयाचे नाही, हि समजूत खरी असो वा खोटी असो त्याचा येथे विचार कर्तव्य नाही. मुसलमान लोकांची अशी समजूत आहे ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे व (... अनेक)

४+
उदाहरणावरून थोडीबहुत तरी ती दृढ होत जाते. सरकार अशा रीतीने एका धर्माच्या लोकांस वचकते अगर त्यांचा फाजील सन्मान ठेवते अशी कोणतीही समजूत होणे प्रजेच्या स्वास्थ्यास अपायकारक आहे."

---

"हिंदूलोक मसलमानांइतके जात्याच दंडेल नाहीत हे सरकारने व सरकारी कामदारांनी नेहमी लक्षांत

५+
ठेवावयास पाहिजे. गोरक्षणाकरिता जर हिंदू लोक दंगा करतात असें मानले तर मग युरोपियन अगर ख्रिश्चन लोकांविरुद्ध ते का दंगा करीत नाहीत? ख्रिश्चन लोक गोमांस खातात ही गोष्ट हिंदुलोकांस माहीत नाही असे नाही, परंतु हिंदू लोकांनी ख्रिश्चन लोकांस मार दिल्याचे कोठे उदाहरण अद्याप घडून

६+
आले नाही, यावरून असे उघड होते कि हिंदुमुसलमानांतील वैमनस्य इतर काही कारणामुळे हल्ली जास्त वाढले असून कधी कधी यांच्या मनाने पेट घेण्यास गोरक्षणादिकांची सबब पुरी होते. वास्तविक गोरक्षण हे त्याचे कारण नव्हे. हिंदू-मुसलमानांमध्ये जो काही स्वभावतःच द्वैतभाव आहे तो शिक्षणाचा अधिक

७+
प्रसार झाल्याखेरीज व मुसलमानी धर्ममतांत आमच्या वेदांताची सरमिसळ झाल्याखेरीज कधीही पूर्णपणे नाहीसा व्हावयाचा नाही. यापैकी शिक्षण प्रसाराचे काम सरकारनेच अंगावर घेतले पाहिजे. दुसरे काम मौलवींच्या हातून होईल. परंतु ह्या दोन्ही गोष्टी घडून येण्यास दिनावधी लागेल. तो पर्यंत गोवध,

८+
ताबूद वगैरे बाबतीत कोणाचे कसकसे हक्क आहेत हे नीट मनात आणून त्या बाबतीत सरकारने केलेले नियम कोणाची भीड मुर्वत न धरता पाळावे असा बंदोबस्त झाला पाहिजे. दोघांसही सारख्या सवलती ठेवणे व शांततेचा पहिल्याने जो भंग करील त्यास योग्य शासन करणे हे हल्लीच्या स्थितीत सलोखा ठेवण्याचे दोन

९+
उत्तम उपाय आहेत. ज्ञानाचा जास्त जास्त प्रसार होऊन लोकस्थिती ज्या मानाने सुधारेल त्या मानाने या उपायांची कमी कमी आवश्यकता होत जाईल हे उघड आहे. परंतु ती स्थिती येईपर्यंत वर लिहिलेल्या उपायांचीच योजना केली पाहिजे."

---

"हिंदू लोक मुसलमानांप्रमाणे हिरवट व रानटी नसल्यामुळें आपण

१०+
होऊन दुसऱ्याच्या अंगावर चालून जाण्याचे साहस त्यांच्या हातून बहुदा होत नाही हे खरे आहे; पण हिंदू लोकांत, निदान मराठे लोकांत तरी "दिधले दुःख पारणे उसने फेडू नयेच सोसावे" अशा तर्हेचा नामर्दपणा अद्याप उत्पन्न झाला नाही, हि मोठ्या सुदैवाची गोष्ट आहे. मुंबईच्या दंग्यापासून सरकारने

११+
जर काही बोध घ्यावयाचा असला तर तो हाच होय, व हि स्थिती लक्षांत आणून पुढील बंदोबस्त सरकारने केला तरच हिंदू मुसलमानांतील दंग्याचे खरे बीज नाहीसे होऊन राष्ट्रात शांतता राहण्याचा संभव आहे. हल्ली मुसलमानांबद्दल सरकारी अंमलदार जो पक्षपात दाखवतात तो अन्याय्य आहे."

---

१२+
"हिंदू लोकांस ज्या प्रमाणे आपले सणवार करण्याचा हक्क आहे त्याचप्रमाणे मुसलमान लोकांसहि आहे, व जाणूनबुजून जोपर्यंत यांपैकी एकजण दुसऱ्याच्या वाटेस जात नाही अगर त्यांचे मन दुखविण्याचा प्रयत्न करीत नाही तो पर्यंत सरकारने निःपक्षपाताने दोघांचेही सारखेच संरक्षण केले पाहिजे.

१३+
इंग्रज लोकांनी हिंदू लोकांसाठी गायी न मारण्याची सनद मुसलमान लोकांपासून घ्यावी असे आम्ही म्हणत नाही व म्हटले असता इंग्रज सरकार ऐकवायचेही नाही; परंतु ज्या ठिकाणी गायी मारण्याची दुकाने नव्हती त्या ठिकाणी भर हिंदूंच्या वस्तीत मुसलमानांस सदर दुकाने घालण्याची परवानगी देणे म्हणजे

१४+
हिंदू लोकांस विनाकारण चिथविण्यासारखे आहे व केव्हाना केव्हा तरी त्याचा प्रतिकार करण्याचे हिंदू लोकांच्या मनात राहील हे सरकारने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे."

---

हे आहेत टिळकांचे शब्द!

स्वातंत्र्यपूर्व काळातील विवेचन आहे हे! खरं वाटेल का?!

मुस्लिमांच्या वर्तनाची जाणीव आहेच

१५+
परंतु सगळा दोष मुस्लिम समुदायावर झटकून मोकळे होत नाहीयेत. सरकारकडून, यंत्रणांकडून रुथलेस सेक्युलर वर्तनाची अपेक्षा आहे टिळकांची! त्याचवेळी, मुस्लिमांमध्ये इथल्या संस्कृतीची बीजं अधिकाधिक रुजणं हेच मूळ सोल्युशन आहे हे ही मांडलंय टिळकांनी!

१६+
हे वाचून - एकीकडे टिळकांचं त्या काळात स्पष्ट होणारं द्रष्टेपण, दुसरीकडे ही वस्तुस्थिती आजही फारशी बदलेली नाही हे भयावह वास्तव, तिसरीकडे टिळकांच्या काळापासून आजपर्यंत या प्रश्नावर ठोस उपाय अमलात नं आल्याची बोच...हे सगळं एकदम समोर उभं रहातं.

१७+
फक्त हिंदू-मुस्लिम विषयच नव्हे, लोकमान्य टिळकांचे अग्रलेख वाचले की त्यांचं द्रष्टेपण, भविष्याची त्यांच्या मनातील आखणी आपल्याला अक्षरशः अवाक करून सोडले.

१८+
म्हणूनच लोकमान्य टिळक एक महापुरुष म्हणून अधिकच झळाळून निघतात.

लोकमान्य टिळकांना मनःपूर्वक वंदन!

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!