Manas Shukla Profile picture
Aug 10, 2020 13 tweets 5 min read Read on X
#Tweet4Bharat

विषय- राष्ट्रीय एकात्मता

राम मंदिरावर सुरू असलेला विश्लेषणाचा आखाडा चांगलाच गाजला. वर्षानुवर्षे रखडलेला विषय आज पूर्णत्वास जातोय हे पाहून जनमानसात आनंदी आणि विशेषतः भावनिक लाट उसळी मारतेय. या निमित्ताने भारतातील एकात्मतेचा एक आलेख वर्धिष्णू होताना आपण बघत आहोत. Image
न्यायालयीन लढाईत बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार हे भूमीपूजनास निमंत्रित होते. राम मंदिर एका धर्माचा विषय नसून तो आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे याचे उदाहरण धर्मनिरपेक्ष भारताच्या वहीत लिहिले गेले. हिंदू,मुस्लिम,शीख,जैन,बौद्ध अशा विविध धर्मियांनी भूमिपूजनास साश्रुनयनांनी दाद दिली. Image
धार्मिक एकात्मता हाच एक मुद्दा नसून आज भारत प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय एकात्मतेच्या नेतृत्वाचा महामेरू होतोय. कोरोना महामारीच्या संकटात सर्व भारतीय एक होऊन प्राण पणास लावून या संकटाचा सामना करताय आणि झुंज देताय, हेच याचे उत्तम उदाहरण आणि भारत यशस्वी होण्याचे कारण आहे. Image
१९६५च्या इंडो-पाकिस्तानी युद्धात भारताची आर्थिक स्थिती ढासळली होती आणि तेव्हाचे पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीयांना उपवास करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून धान्याचा पुरेसा साठा भारताकडे उपब्ध असेल, या भावनिक आवाहनाला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. Image
लाल बहादूर शास्त्रींचा तो वसा आज नरेंद्र मोदी सुद्धा व्यवस्थित रित्या हाताळताय. सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्माण कार्या विषयी मोदींनी केलेले आवाहन आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद आज सुद्धा पुतळ्याच्या भव्यते सारखा आसमंतात घुमतोय. Image
भारत-चीन सीमावादा प्रसंगी भारत आणि भारतीय जनता ही खंबीरपणे पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहून सैनिकांचे मनोबल वाढवत होती. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या "आत्मनिर्भर भारत" या अभियानात भारतीय एकजूट होऊन भारतातील वस्तू आणि बाजारपेठ यांची उपलब्धता भव्य अशी करू पाहत आहेत. Image
अर्थशास्त्राची एकात्मता ही १जुलै २०१७ रोजी जेव्हा वस्तू व सेवा कराच्या रुपात उपलब्ध झाली तेव्हा अर्थशास्त्र आणि महसुलाचा पाया अधिकच भक्कम होण्यास मदत झाली. भारताने अर्थक्रांती करत जगाला दिलेला हा "GST"चा संदेश बोधात्मक अशा पद्धतीचा होता. Image
भारताची यशस्वी वाटचाल ही एकात्मता हा उद्देश घेऊनच झाली आहे, होत आहे आणि होत राहील यात शंका नाही. सैनिकांसाठी "वन रँक, वन पेन्शन" ही योजना अंमलात आणल्याने सैनिकांना सुद्धा याचा लाभ घेत आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य अगदी सुखात व समाधानात जगता येणार आहे. Image
अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत भारत नेहमीच आपल्या गरीब व मोलमजुरी करणाऱ्या बांधवांचा काळजीवाहू पालक म्हणून भूमिका घेतो, आणि ते देशाचं कर्तव्य आहे. या बाबत एकात्मतेचा संदेश देणारे अभियान म्हणजे "One Nation One RationCard". भारताच्या कुठल्याही भागात रेशनकार्ड द्वारे पुरवठा शक्य झाला. Image
आरोग्य क्षेत्राला "डिजिटल" एकात्मता प्रदान करण्याकडे भारताचा कल दिसून येतो. या अनुषंगाने "One Nation One HealthCard" योजनेची घोषणा सुद्धा लवकरच होण्याचे संकेत दिसत आहेत. नागरिकांचे आरोग्य सरकारच्या प्राथमिक कर्तव्या इतकेच महत्त्वाचे असल्याने यामुळेसोयी सुविधा सुलभ उपलब्ध होतील. Image
आज राष्ट्रीय एकात्मता या विषयावर लिहण्याचा उद्देश एवढा की ही फक्त संज्ञा नाही, फक्त विषय नाही तर भारताने यशस्वीरीत्या सांभाळलेले शिवधनुष्य आहे. भारतात १६५२ पेक्षा जास्त प्रादेशिक भाषा व बोलीभाषा आहेत. वेगवेगळे धर्म त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी संस्कृती आणि हे असून पण
+
आज सुद्धा "वसुधैव कुटुंबकम" या एका वाक्याखाली संपूर्ण भारत जोडला जातो हेच मोठे वैशिष्ट्य आतापर्यंत भारताने टिकवून ठेवले आहे. या वेळेस धर्म,जात,पंथ बाजूला ठेवून "भारतीय नागरिक" म्हणून इथले सर्व लोक एकत्र येतात आणि अभूतपूर्व शक्तीचा संगम दर्शवितात. Image
राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य अंगिकारून केलेली वाटचाल ही नेहमीच यशस्वी असते याचं एक ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा भारत देश.

@iidlpgp

#Tweet4Bharat

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Manas Shukla

Manas Shukla Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @manasshukla_

May 27, 2021
#Thread नेहरू आणि इंडियन आर्मी !!

"जेव्हा नरेंद्र मोदींना पायजमा (पॅन्ट) घालता येत नव्हता तेव्हा इंदिरा गांधी आणि नेहरूंनी इंडियन आर्मीची भक्कम बांधणी केली."
- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते कमलनाथ
(दि.१४ एप्रिल २०१९)

(१)
आपण हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक पंतप्रधान त्याच्या किंवा तिच्या कार्यकाळात देशासाठी व देशवासीयांच्या सुरक्षेसाठी आर्मी भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देत असतो. पंतप्रधान असताना काही विषयात नेहरु हे मात्र अपवाद ठरतात. ते कशाप्रकारे हे बघूया.

(२)
प्रसंग १ ला -

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे व इंडियन आर्मीचे असलेले संबंध हे उल्लेखनीय असं काही लिहावं असे नव्हते. यातलेच काही किस्से निवृत्त अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रसंगी ऐकायला मिळतात.

(३)
Read 16 tweets
May 19, 2021
#Thread अरविंद केजरीवाल, ट्विट आणि कॉन्स्पिरसी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दि. १८ मे २०२१ रोजी एक ट्विट केलं. काय ते आपण बघूया.

(१/२२)
"सिंगापूर मध्ये आलेल्या कोरोनाचा नवा "स्ट्रेन" हा लहान मुलांसाठी खुप घातक आहे आणि भारतात तो तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात येण्याची शक्यता आहे.

(२/२२)
केंद्र सरकारला माझी विनंती आहे की,

१) सिंगापूरला जाणाऱ्या व सिंगापूरहुन येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात यावी.

२) लहान मुलांसाठी सुद्धा लसीच्या निर्मिती साठी लवकरात लवकर कार्य सुरू व्हावे.

(३/२२)
Read 23 tweets
Oct 2, 2020
कसले गांधी ?
दि. ०२/१०/२०२० (शास्त्री जयंती)

अहिंसात्मक उपदेशाचा डोस पाजणारे गांधी, असतील तेव्हाच्या लोकांचे "बापू". समोरच्याने एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याची बापूंची प्रथा गेली हो. आता दुसरा गाल सुद्धा पुढे केला तर लोकं बत्तीशी काढून हातात द्यायला सुद्धा मागे पुढे
बघणार नाहीत. अशा या परिस्थितीत गांधी उपदेश पाळणं म्हणजे स्वतःच्या हाडांचा सांगडाच करून घेणं योग्य ठरेल.

१९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला असून सुद्धा त्या नंतर पाकिस्तानला भारताने ५५कोटी रुपये द्यावेत असा आग्रह धरत "या महात्म्यांनी" चक्क आमरण उपोषण केलं होतं. पाकिस्तान
बद्दल त्यांना प्रेम म्हणून आमचा विरोध नाही, त्या देशाने आपल्या देशावर हल्ला केलेला असून सुद्धा आपण त्याचे चोचले पुरवायचे म्हणजे याला आजच्या युगात हट्टी पोराला स्वतः बापाने माजवायचे असा होतो.
पाकिस्तान मधल्या नरसंहारा मधून वाचून जे "हिंदू" तिकडून भारतात आले, तेव्हा अक्षरशः गटारीवर
Read 8 tweets
Aug 30, 2020
#Thread अटल बोगदा / रोहतांग बोगदा

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी भारतीय नागरिकांना एक सुखद बातमी देणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मोदीजी "अटल बोगदा" या महत्वकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन करतील. नक्की काय आहे अटल बोगदा ? जाणून घेऊया.
(१/१९)
लेह-मनाली महामार्गावरील हिमालयाच्या पूर्व पीर पंजाल या पर्वतरांगेत रोहतांग नावाच्या खिंडीत हा महामार्ग स्वरूप बोगदा बांधला जातोय. ९.२ किलोमीटर लांबीचा हा बोगदा भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असणार आहे. मनाली आणि लेह मधील ४६ किमी अंतर या बोगद्यामुळे कमी होणार आहे.
(२/१९)
समुद्रसपाटी पासून ३१०० मीटर (१०,१७१फुट) उंचीवर हा बोगदा बांधला गेला आहे. रोहतांग पास हा समुद्रसपाटी पासून ३९७८ मीटर (१३,०५१ फुट) उंचीवर वसलेला महामार्ग आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने हा बोगदा ओळखला जाईल.
(३/१९)
Read 20 tweets
Aug 8, 2020
कोझिकोड विमान दुर्घटना

कोविड-१९ या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधानांनी भारतात लॉकडाऊन जाहीर केला. कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता इतर देशातील भारतीय नागरिकांना सुखरूप घरी आणण्यासाठी "वंदे भारत मिशन" ही योजना आखली गेली. ImageImageImage
या मिशनमध्ये दुबई, फिलिपिन्स, अमेरिका, मलेशिया, बांग्लादेश, कुवैत, सौदी अरेबिया, सिंगापूर इत्यादी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आणण्याची जबाबदारी Air India Limited या भारत सरकारच्या कंपनीकडे दिली गेली. या मिशन अंतर्गत आता पर्यंत ६लाख ८७हजार लोकं सुखरूप घरी परतले. Image
मिशन अंतर्गत ५व्या टप्प्यात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून Air India Ltd चे AXB1344, बोइंग 737 विमानाने १९० लोकांना घेऊन उड्डाण केले.विमानात १८४ प्रवासी होते ज्यात १०लहान मुले,६ टीम मेंबर ज्यात २ पायलट यांचा समावेश होता विमानास कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लँड करायचे होते.
Read 14 tweets
Aug 5, 2020
आज एक पोस्ट Viral झालेली वाचली. त्यात लिहिलं होतं की, आजच्या या भूमीपूजनाच्या प्रसंगी "बाळ" नावाच्या "बाप" माणसाचं नाव सुद्धा लक्षात असू द्या. जेव्हा बाबरी मशीद पाडल्यानंतर गुन्हे नोंदवत होते तेव्हा हेच "बाळासाहेब" स्वतः पुढे आले होते आणि तुमचे नेते मात्र तेव्हा "चहा विकत" होते.
मला मेसेज मध्ये कोणत्याच नावाची अडचण अशी वाटली नाही किंवा चुकीचं काही वाटलं नाही. जेवढं योगदान "बाळासाहेबांचं" होतं तेवढंच योगदान आमच्या "चहा विकणाऱ्या" नेत्याचं होतं, त्यात काही मतभेद नाही. पण राम मंदिरात कोणाचं किती योगदान आहे ? या विषयावर चर्चा होऊच शकत नाही. ज्या लोकांना शक्य
होतं त्या लोकांनी १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन कारसेवा केलीच, आणि ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी घर बसल्या आपल्या रामाला लवकरात लवकर घर मिळावं आणि आपल्या घरातला "कर्ता-धरता राम" सुखरूप घरी परतावा म्हणून करोडो लोकांनी प्रार्थना केली. या उदाहरणात दोघे समूहाचा उद्देश एकच, राम मंदिर.
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(