आपण काय वाचतो? कसं वाचतो? हे महत्त्वाचं आहेच.पण त्याहून महत्वाचं आहे वाचलेलं किती आत्मसात करतो. बरोबर ना?
या सगळ्यांपेक्षा मला वाटतं महत्वाचं आहे आपलं वैचारिक अधिष्ठान निर्माण होण्यात आपण वाचलेला ऐवज किती उपयोगी पडतो ते.
सध्या वाचकांची कमी नाहीय.कमी आहे ती वेगळीच. ती काय? #म 1/n
आपल्या समाजास एकांगी विचार करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला.ती सवय आपल्याला लागलीय हे ही आपल्या लक्षात न येणे ही आपली दुखरी नस.वेगवेगळ्या सामाजिक समस्येसाठी उपाय शोधत असताना या दुखऱ्या नसेवर दाब पडतो ही वस्तुस्थिती आहे..मग कळ लागलेला समाज मूळ समस्येशी फारकत घेतो. 2/n
ही एकांगी विचार करण्याची अंगभूत सवय आता सवय न राहता तीच जगणं झालीय.हे निरीक्षण आहे..मग वाचनाने आपणास फक्त एका प्रचलित विचारांची क्षमता दिलीय का? आपण स्वतःची विचार क्षमता विकसित करण्यात कुठं कमी पडलो? त्यासाठी एखादा ऐवज वाचत असताना मी काय इंटेशन ठेऊन वाचतोय? हे महत्त्वाचं आहे.3/n
ससा आणि कासव या गोष्टीत कासव जिंकलं हे समाजाने लक्षात ठेवलं पण सशाची झोपही पूर्ण झाली याकडे कानाडोळा केला. आता कासव थकलेलं आहे ससा फ्रेश आहे. हे ही लक्षात घ्यायला हवं ना? कारण,आयुष्यात एकच शर्यत असत नाही.शर्यतींची मालिका असते.हा विचार आपण बाजूला ठेवला.अस प्रत्येक बाबतीत घडलं.4/n
आज समाज एका स्थित्यांतरातून जात असताना वाचन मस्ट आहे..पण त्या वाचनाचे योग्य ते परिणाम लवकरात लवकर दिसायला हवेत..त्यासाठी आपलं वाचन आणि विचार योग्य दिशेस असायला हवेत. खोट्या लेखणीमधून खोटा इतिहास किंवा अनिष्ठ परंपरेस बळ देणारं साहित्य अवतीभवती असताना तर ते अतीव गरजेचं आहे.5/n
आज शालेय पाठ्यपुस्तकात अक्षम्य छेडखानी होत असताना एक समाज म्हणून आपण भविष्यातील परिस्थिती आतापासून गंभीरतेने घ्यायला हवी..'बघू होईल तेंव्हा' हा उपाय इथं लागू पडणार नाही कारण ते शिकून मोठी झालेली लेकरं एका ठराविक पठडीतील विचार करणारी असतील..त्यांना मग त्यावेळी कसं समजवायचं? 6/n
आज आत्ताही एखादा विरोधी विचार आपल्याला झेपत नाही.असं का होत असेल? त्यावर उपाय वाचनात आहे का? हे ही तपासायला हवे. खरंतर वाचून विचार करणे हा मानवी गुणधर्म..पण तो गुणधर्म लोप होत आहे.समाजमाध्यमातून तयार असणारं लिखाण आपण वाचत बसतो त्यामुळेही यास हातभार लागला आहे.अर्थात काही अपवाद.7/n
आज जी सामाजिक परिस्थिती आहे त्यावर उपाय म्हणून समाजाची विविधांगी विचारसरणी शाबूत असणं गरजेची गोष्ट आहे.ती विचारसरणी विविधांगी वाचनाने येऊ शकते. फक्त त्यासाठी पूर्वअट म्हणून वाचनातून स्वतःची विचारशक्ती प्रफुल्लित करण्याची क्षमता आपण विकसित करायला हवी. तरच वाचनाने फायदा होईल.8/n
हिटलरने ज्यूंची हत्या केली हा शिकण्याचा विषय नाही तर ज्यूंची हत्या आपल्यासाठी कशी फायद्याची आहे हे त्याने जर्मनांवर कस बिंबवलं हे शिकण्याचं मटेरिअल आहे.उद्या आपल्याकडे असाच कोणी हिटलर निपजला तर त्यास कसं तोंड द्यावे.हे यातूनच आपल्याला कळलं असतं.वरून त्यास निपजूचं दिला नसता.9/n
वाचन संस्कृती सामाजिक जडणघडणीत तेंव्हाच हातभार लावते. जेंव्हा वाचक हे स्वतंत्र आणि तर्कशुद्ध विचार करणारे बनतात. अन्यथा नुसती पारायण होऊन जातात. एखादं पुस्तक फिनिश केल्यानंतर त्यातून मला काय भेटलं..हा यक्षप्रश्न स्वतःला उत्तर मिळेपर्यंत विचारायला हवा..तरच वास्तवात बदल घडेल.10/n
लोकशाही मूल्य म्हणून विरोधी विचाराचा योग्य मानसन्मान व्हायला हवा..त्यासाठी विचाराचा विरोध विचाराने करण्याची ताकद हवी..ती ताकद सदृढ वाचनाने येईल. हे एवढं महत्व वाचनाचे असताना आपण नेमकं वाचन वचन सोडून बाकी उपाय करण्यात गुंग झालो. समाजास आतातरी हे उमजायला हवं. n/n

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

3 Oct
परवा गिरीश कुबेर म्हणले तसं.. या देशात अत्याचारांची दखल घेण्यासाठी काही अटींची पूर्तता व्हावी लागते. त्या अटी पूर्ण केल्यासच सदर घटनेची दखल घेऊन व्यवस्था सामाजिक आणि व्यवस्थात्मक दोन्ही आघाड्यावर तुमच्यावर परत अत्याचार करण्यास तयार होते. हे कटू असलं तरी सत्य आहे. #म 1/n
अत्याचारीत व्यक्ती स्त्री की पुरुष,लैंगिक आणि स्त्री अत्याचार असल्यास किती जण,वय,जात ,तीव्रता हे सगळं सनसनाटी निर्माण करण्याइतपत भयाण हवं. महत्वाचे म्हणजे गुन्ह्याचे स्थळ शहरी/ग्रामीण यावरून आपण ठरवतो की गुन्ह्याची दखल (न्याय न्हवे) घ्यायची की नाही ते.युगानुयुगे हेच सुरुय.2/n
निर्भया आणि हाथरस या दोन्हीत समान धागे आहेत.दोन्ही ठिकाणी पीडित मेल्यानंतर समाज जागा झाला.तावातावाने दंगा करू लागला. निर्भयातून आपला समाज काहीच शिकला नाही..हे हाथरस ने सिद्ध केलं असं म्हणण्यास वाव आहे. कारण,मूळ विषय बाजूला पडून आता आपण राजकीय चर्चा आणि हेवेदावे यात रंगलोय.3/n
Read 9 tweets
3 Oct
"फाशी सारख्या उपायांनी बलात्कार थांबणार नाहीत.उलट गुन्हेगारांचा पीडितेला संपवण्याकडे कल राहील." आठवतं का काही? निर्भया केस वर नेहमीप्रमाणे आपण एक समिती नेमली होती.त्या न्या.J.S.वर्मा समितीचे हे बोल आहेत.निर्भया वेळीही आपला संताप अस्मान फाडत होता.आज हाथरसवेळी तर विचारूच नका.#म 1/n
अधिक कठोर आणि जास्त मुदतीच्या शिक्षेची तरतूद हवी अस वर्मा यांचं मत.पण त्याविषयी सुद्धा ते साशंक होते.कारण,इतिहासात त्याने फार काही फरक पडलेला दिसला नाही. दिल्ली घटनेनंतर जनक्षोभ इतका तीव्र होता की लोकांनी आठेक हजार सूचनावजा उपाय सुचवले होते..पण त्यातही आत्ता सारख तर्क आणि 2/n
वस्तुनिष्ठ विचार न्हवता. सध्या असणारे कायदे हे सर्वोत्तम आहेत.पण त्याची अंमलबजावणी विश्वासार्ह आणि कार्यक्षम यंत्रणेकडून व्हायला हवी. हे एक मत वर्मा यांनी मांडले.ते किती योग्य मत होतं ते सध्या पोलीस,न्याय, कायदे यंत्रणा याद्वारे जो खेळ हाथरसमध्ये सुरुय त्यातून कळेल. 3/n
Read 10 tweets
1 Oct
'काँग्रेसला 60 वर्षे दिलीत,मला 60 महिने द्या.' मनमोहन सिंग सरकारचे धोरण 'मर जवान मर किसान आहे' मला सत्ता द्या 'जय जवान,जय किसान' करतो मी.नरेंद्र मोदी नामक व्यक्ती 2014 च्या अगोदर बोलत होते. आज 72 महिने झाले या मोदी नामक सरकारला. परिस्थिती काय आहे पाहतोय आपण. #म 1/n
गुजरात मॉडेल चा डंका बडवला गेला.शेतकऱ्यांना 24 तास वीज आहे तिथं असा.वस्तुतः 8 तास ही वीज तिथं मिळत न्हवती. या असल्या खोट्या हॅमरिंगमध्ये तर्क विसरतो माणूस. जनतेचे तेच झाले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका दर देतो म्हणाले होते ही लोकं.खरतर 2014-15 च्या हमीभावात 2/n
कुठेही ही बाब दिसली नाही.वरून न्यायालयात असं काही करता येत नाही याचं शपथपत्र दिलं. काही राज्ये या कमी हमीभावावर बोनस देऊन शेतमाल खरेदी करत होती.त्यातून शेतकऱ्यांना चार पै मिळत होते.तर मोदींनी ही बोनस सिस्टीम बंद करा असे पत्र लिहले.भाजपशासित राज्यांनी ते पत्र आमलात ही आणले. 3/n
Read 11 tweets
30 Sep
"आरोपींना अटक केलेली आहे.त्यांना तुरुंगात पाठवण्यात येणार असून,योगी हे UP चे मुख्यमंत्री आहेत आणि तिथे कधीही गाडी पलटू शकते. -इति भाजपचे महासचिव"
विकास दुबे ची गाडी पलटी केली होती.

माझा प्रश्न आहे लोकशाहीप्रेमी जनतेस...लोकशाहीची रीत आणि आपलं वागणं बरं आहे का? #म 👇
घटना चीड आणणारी आहे हे मान्य.. पण ढासळलेल्या व्यवस्थेला.. व्यवस्थात्मक दंडेलशाही हे उत्तर आहे का? लोकशाही मूल्ये अशीच जर पायदळी तुडवून इन्स्टंट न्याय(?) होणार असेल तर आपण चुकीच्या मार्गाने जातोय लोकहो.
म्हातारी मेली याचं दुःख नाही..पण काळ सोकावतोय! कळतंय का मी काय म्हणतोय? 👇
पॅरोडी असली तरी लोकशाही हवी कारण तिचं रूपांतर आपण हिमतीने ओरिजनल लोकशाहीत करू.
पण लोकशाहीच नसेल तर काय करायचं? हल्ली परवलीचा झालेला प्रभू राम ही आपल्याला वाचवू शकणार नाही. काळजी घ्या.🙏
Read 4 tweets
29 Sep
भारतीय संसदीय लोकशाहीत विरोधकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच भान विरोधकांना आहे का? यंदाच्या कोविड काळात जे अधिवेशन झालं त्यात विरोधकांनी काय साध्य केलं? उलट सरकारने त्यांना हवे तसे फासे टाकून परिस्थिती त्यांना हवीतशी बनवली हे लोकशाही समाज म्हणून आपल्या लक्षात आलं का? #म 1/n
परवा राज्यसभेत जो गोंधळ झाला त्याची जबाबदारी सरकारची असली तरी विरोधकांनी योग्य डावपेच आखून संसदीय आयुधांचा वापर कुशलतेने करणे गरजेचे होते..संख्याबळ कमी असल्याने तर ती महत्वाची अटच होती. ज्या फार्म बिल्स वरून संसदेत गदारोळ झाला..त्यासाठी आता रस्त्यावर उतरून काय फरक पडेल? 2/n
आता सरकार आणि त्याचे पाठीराखे 'बघा विरोधकांना संसदेत चर्चा नको आणि रस्त्यावर दंगा हवाय.' असा प्रचार करताना दिसत आहेत. त्यातील सत्यता विरोधकांनी कितीही ओरडून सांगितली तरी काही फरक पडेल असे वाटत नाही..कारण फार्म बिल्स कशी शेतकरी फायद्याची आहेत याचे संदेश बातम्या आणि चर्चा यातून3/n
Read 9 tweets
28 Sep
या सरकारला लोकशाही टिकवायची आहे की ती ही विकायची आहे?

सांप्रतकाळी हा प्रश्न अध्यादेश विषयी या सरकारचे असणारे ममत्व पाहून पडतो आहे. खरंतर अध्यादेश हा प्रकार जगात संसदीय लोकशाहीत तीनच देश वापरतात..आपण, पाकिस्तान आणि बांगलादेश.बाकी लोकशाही देशांत संसदेद्वारेच जावे लागते. #म 1/n
संसदेचे अधिवेशन सुरू नसताना काही तातडीचा कायदा/नियम बदल करावयाचे असल्यास..सोय म्हणून ही अध्यादेश पद्धत आहे. इतर लोकशाही मूल्यांची विल्हेवाट जशी आपण लावली तशीच ती या पद्धतीची ही लावली. त्यास पक्ष किंवा सरकार असा भेदभाव झाला नाही..तरी जनतेस त्याचे कधी सुतक लागले असे झाले नाही. 2/n
1952-2014 काळात एकूण 637 अध्यादेश निघाले होते. त्यात इंदिरा कालखंडात 157 तर मनमोहन सिंग यांनी 61 अध्यादेश बजावले होते..आत्ताच्या सरकारचा वकुब पाहता ते या दोघांना सहज मात देतील ही रास्त शंका आहे. या सरकारची 'तातडीची वेळ' ही व्याख्या नेमकी काय हे कळायला मार्ग नाही. 3/n
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!