मित्रानो शनिवार रविवार आले कि सर्व जण आपल्या परीने २ निवांत दिवस कसे मजेत घालायचे याचे प्लॅनिंग करतात.
पण दुर्गप्रेमी आज कुठल्या किल्लयाचा ट्रेक करायचा हे खूप आधीच ठरवून
शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवार सकाळीच
आपल्या मोहिमेला सुरवात करतात @Amruta39117837
चला आज आपण हि ट्रेक करून फिरून येऊया
अशा एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याशी
माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणी निगडित आहेत
किल्ला म्हंटले कि त्याला भूगोल आणि इतिहास हा हवाच
नाही तर तो किल्ला कसला @RajeGhatge_M
महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्लयांना
मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत,
पण आपण आज चाललो आहोत त्या किल्ल्याला काही हजारो वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.
या किल्ल्याचा संदर्भ श्री रामाचा पूर्वज असलेल्या
राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे
तुमच्या लक्षात आलंच असेल आपण हरिश्चंद्रगडचा ट्रेक करत आहोत
हरिश्चंद्रगड..!
उत्तुंग कडे, भीषण दऱ्यांनी वेढलेला परिसर.. नव्हे नव्हे
तर निसर्गाला पडलेलं एक रांगडं स्वप्नच…
पण हजारो रानवेड्यांना खुणावत राहणारा
हा अजस्त्र डोंगर म्हणजे एक स्वप्ननगरीच आहे @Vishakh50862352
तुम्हाला काहीतरी उत्तुंग करायची इच्छा आहे,
तुमच्यातली सगळी रग जिरवायची आहे.
तुम्हला कुठल्यातरी बलदंड प्रतिस्पर्ध्याशी दोनहात करायचं आहे. किंवा तुमच्या मनात पराभूत भावना आहे.
आणि तुम्हाला कुठेतरी जिंकून दाखवायचं आहे.
तर मग तुम्ही या हरिश्चंद्रगडावर गेलंच पाहिजे
पण तुम्ही म्हणाल कुठेअयोध्येचा राजा हरिश्चंद्र
आणि कुठे हा महाराष्ट्रातला किल्ला
आपण पाहू या हि कथा
राजा हरिश्चंद्र हा अयोध्येचा राजा,ऋषी विश्वामित्राला स्वप्नात त्यानं आपलं सगळं राज्य दान देऊन टाकलं
सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने सगळं राज्य दान करून
मुलगा आणि बायकोला घेऊन वनवासात जाणं पसंत केलं
वनवासात असताना हरिश्चंद्र,आपली राणी तारामती आणि मुलगा रोहिदास याना घेऊन या गडाच्या परिसरात आला
या गडावर डोंबारी राजा राज्य करत होता
या राजाच्या दरबारी राजा हरिश्चंद्र पाणी भरण्याचं काम करी,
पण हा डोंबारी राजा मोठा जुलमी
त्यानं रांजनाला खालून भोक पाडलं आणि सांगितलं की
हा रांजण जर तू भरलास तर मी तुला माझं राज्य देईन
हरिश्चंद्र रोज दमून भागून रांजण भरीत राही
पण एक कावड टाकली आणि दुसरी भरायला गेला
की रांजण रिकामा होई अशीच कैक वर्षे लोटली
आणि एक दिवस एक बेडकुली त्या रांजनाच्या छिद्रावर बसली
आणि कमाल काय त्या दिवशी रांजण भरून उलथू लागला
त्या दिवशी त्या डोंबारी राजाने आपलं राज्य राजा हरिश्चंद्राला दान केलं आणि निघून गेला तिथून पुढे राजा हरिश्चंद्राने या भागात किती दिवस राज्य केले माहीत नाही
मात्र इथे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि तारामती शिखर
आजही त्याची साक्ष देत उभे आहेत.
आणि या भागात आपली कौलारु घरे उभारून हजारो वर्षांपासून कातळ कड्याच्या साक्षीने आयुष्य जगणारा
महादेव कोळी हा आदिवासी समाज
राजा हरिश्चंद्राची कहाणी सांगत असतो
असो दंतकथेची ही वाट सोडून आपण आपल्या ट्रेक वर परत येऊ हरिश्चंद्रगडाचे भौगोलिक स्थान सांगायचे तर ठाणे,पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४मीटर उंच आहे
गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.
त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.
मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.
कल्याण-अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो
या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे.
या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते.
तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो.
त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय
ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय.
ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.
पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो.
वाटेत कोठेही पाणी नाही.
त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात.
हा सर्व परिसर जंगलाचा आहे
या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे
पुढे आणखी थोडं अंतर चालून गेलं की हरिश्चंद्रेश्वर मंदिर लागत, कातीव दगडात बांधलेलं हे मंदिर
म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे
हे मंदिर किमान दहाव्या शतकातलं असावं
असं त्याच्या रचनेवरून जाणवतं,
बाजूने भक्कम दगडाची तटबंदी आत जायला एकाच बाजूनव दरवाजा,
तोही पूर्ण दगडात उभारलेला,
मुख्य मंदिर हे जमिनीपासून पुरुषभर खोलीवर आहे.
मंदिराच्या बुडापासून शिखरापर्यंत सगळी दगडं
दगडाच्या खांबावर अत्यंत माजबुतीचे जोड देत मंदिर उभारत नेलं आहे.
मंदिराची उंची साधारण साठ फूट असावी,
मंदिरावर सगळीकडे नक्षीकाम करण्यात आलं आहे,मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे
मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे.
या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे.
यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे.
यातही महादेवाची पिंड आहे.
या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत.
त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर
डाव्या हातास एक गुहा लागते.
याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात
या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे.ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
चला आता जाऊ या तारामतीच्या शिखराकडे
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट
शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमुर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते.
आता आपण अशा ठिकाणी जाऊ या ज्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे
ते ठिकाण आहे कोकण कडा
हे सर्व दुर्ग प्रेमी आणि गिर्यारोहकांचे आकर्षणाचे स्थान हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेली थोडी चढण चढून तीव्र उतरला लागतो, थोड्याशा झाडीतून जाणार धीरगंभीर रस्ता
आपल्याला थेट कोकणकड्यावर घेऊन जातो सह्याद्रीत असंख्य कोकणाकडे आहेत, पण हरिसचंद्रगडावर असलेल्या कोकणकड्याची सर कुठल्याच कड्याला येणार नाही असाच आहे तो. आपण जवळ जाईपर्यंत इथे कडा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही,पुढे अचानक डोंगर कडे दिसणं बंद होत आणि अचानक हवा जोराने वाहू लागते
बस समजून जायचं कोकण कडा आला, पावसाळ्यात तर इथे भरपूर धुकं असतं त्यामुळे हा कडा नक्की कुठे आहे हेच लक्षात येत नाही
ऑक्टोबरात कडा खूप चांगला दिसतो, साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा चंद्रकोर रचनेचा हा कडा अगदी तीक्ष्ण आणि भीषण उताराने जमिनीत घुसला आहे. तो तेवढाच आतल्या बाजूलाही खचला
असल्यामुळे त्याची भीषणता आणखीनच वाढली आहे.तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे
कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते.
येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
इथे इंद्रवज्र नावाचा निसर्गाचाचमत्कार जर आपले नशीब जोरावर असेल तर पहायला मिळतो
इंद्रवज्र म्हणजे आकाशात सूर्य असताना दरीत जमा झालेल्या ढगांवर सूर्याचेकिरण पडल्यामुळे व वातावरणातील पाण्याच्या तुषारांमुळे ढंगांवर उमटणाऱ्या सप्तरंगी छटा
मित्रानो आजवर केला नसेल तर२दिवसात पूर्ण होऊशकेल
असा हा हरिश्चंद्रगड चा ट्रेक जरूर करा एकदा जाऊन आलात कि ह्या गडाच्या आठवणी आपल्या मनात कायमच्या कोरल्या जातील ह्या पोस्ट च्या निमित्तानी माझ्या ही कॉलेज जीवनाच्या ट्रेकिंग च्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या हा मला मिळालेला बोनस च आहे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर @kul_anagha
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल @Vishakh50862352
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की" @RajeGhatge_M@TheDarkLorrd
शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले
मित्रानो आज आठवड्याचा पहिला दिवस,
या आठवड्याचा शनिवार शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
आजपासून विजयादशमी पर्यंत शक्य तो थ्रेड देवी भवानीच्या संदर्भात पोस्ट करायचा मानस आहे
त्या निमित्ये देवी सेवा आणि देवीचे नाम घेणे होईल @RajeGhatge_M@Vishakh50862352
२ दिवसांपूर्वी मी तुळजाभवानी मातेच्या घोर निद्रेच्या संदर्भात एक विडिओ पोस्ट केला होता
पण माता तुळजाभवानी ची हि एवढीच निद्रा नसते
आजचा धागा त्या महामायेच्या निद्रे विषयी आहे
चला पाहू या हा
"मंचक निद्रा" धागा
श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते
या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे.
१) चांदीचा मंचक
२) लाकडी मंचक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.
उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते @shivajirao29
"राहुल तेवतीया आणि २०२०"
दोन दिवसापूर्वी एक भन्नाट समीकरण वाचनात आले
ते आपल्यापुढे ठेवत आहे २७ सप्टेंबरला शारजा येथे झालेल्या IPL २०-२० खेळात रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत राहुल तेवतीया हा खेळाडू साऱ्या क्रिकेट रसिकांच्या चेष्टेचा आणि रंगाचा धनी बनला होता @gajanan137
मला हि आठवतंय कि डॉ आनंद रंगनाथन या नामवंत सन्मान्य व्यक्तीला हि ह्या राहुल बद्दल ट्विट करावंसं वाटलं होत कि हा नक्की करतोय काय १७ वि ओव्हर संपली २० बॉल खेळून सुद्धा त्याला एक हि चौकार व षटकार मारता आला नव्हता समालोचक म्हणत होते हा रिटायर्ड आऊट का होत नाही @Amruta39117837
१७व्या ओव्हर नंतर त्याच्या टीम ची जिंकण्याची शक्यता होती
२% फक्त
अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर त्याच्याकडून शून्य आशा आणि मित्रानो चमत्कार घडला
डोंबिवलीतील विलास सुतावणे यांची "विविसू डेहरा" ही संस्था गेली अनेक वर्षे पर्यटकांना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या गाठी भेटी घडवून आणते. याबरोबरच सैनिकांच्या शौर्यावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित करणे,
दिवाळीमध्ये देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांना फराळ, सदिच्छा भेट म्हणून पोहोचवणे हे उपक्रम सातत्याने राबवत आहे.या वर्षी पण दिवाळी फराळ पोहोचता करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.यासाठी देशप्रेमी नागरिकांकडून सहभाग अपेक्षित आहे. कमीत कमी रक्कम रुपये पाचशे अपेक्षित आहे. @smitprabhu
आपणास विनंती आहे की आपण या उपक्रमास हातभार लावावा.
Following are the bank details for transferring the donation for दीवाळी फराळ - सैनिकांसाठी.
ICICI Bank
Branch - Dombivli East
Name - VIVISU DEHRA
A/c no. - 095005500038
Current Account
IFSC code - ICIC0000950
माणसं मनातली.....
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....
काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....
शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....
शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....