समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇

esakal.com/satara/satara-…
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा
पवार साहेबांचा वरदहस्त असलेल्या सकाळ ह्या वृत्त समूहाने छापून आणले आहे. ☺️

ह्या योगायोगाचा तर्क आपण नको लावायला. ज्यांना लावायचा ते लावतीलच.

पण , छत्रपतींची आणि रामदास स्वामींची भेट झाली ह्याचे पुरावे नाहीत असे सांगून हे शिल्प काढून टाकण्याची मागणी कोकाटे ह्यांनी केली आहे. +
आणि त्यात भाजपा राजकारण करत आहे असेही सांगितले आहे.

ह्यात भाजपा ने त्यांना काय स्पष्टीकरण द्यायचे ते द्यावे.
आता , ह्या दोन महापुरुषांची भेट किंवा बोलणे ह्याबद्दल बोलायचे तर , श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री सद्गुरू रामदास स्वामी ह्यांचे एकमेकांशी पत्रलेखन झाले आहे, +
असे काही पुरावे सापडले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी , रामदास स्वामींना सनद सुध्धा दिली होती , ह्याचे पुरावे पण सापडले आहेत. आता महाराज कोणालाही न भेटता , न पाहता सनद देतील का ? ह्याचा विचार सर्वसामान्य जनतेने करावा.

ह्या संदर्भातील एक लिंक 👇



+
" श्री शिव-समर्थ भेट " नावाचे पुस्तक वसंतराव वैद्य यांनी लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, 'शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली. +
त्याजागी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले' त्या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे.
+
हे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हा तोच दिवस आहे , ज्या दिवशी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ( शरद पवार साहेब ) ह्या शिल्पाचे अनावरण केले.

+
या पुस्तकात शिवाजी महाराजांनी समर्थांच्या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला 11 बिघे जमीन दिल्याचे वैद्य यांनी लिहिले (पान क्र-10) आहे. इ. स. 1678 साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचंही ते लिहितात. पुस्तकाच्या शेवटी
+
त्यांनी ही सनदही पूर्ण दिली आहे. त्यात "छ. शिवाजी महाराज यांनी श्रीसद्गुरुवर्य श्रीसकल तीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्री महाराज श्रीस्वामी- स्वामींचे सेवेसी" असा मायना लिहिला आहे.

या सनदेत शिवाजी महाराज म्हणतात, "चरणरज शिवाजीराजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा

+
करुन सनाथ केले आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्य साधना करुन धर्मस्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा."

या सनदेत शिवाजी महाराज पुढे लिहितात, "याउपरी राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा घडावी. +
असा विचार मनी आणिला तेव्हा आज्ञा जाहली की तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय." म्हणजे महाराजांनी आपले राज्य समर्थांना अर्पण केल्याचा उल्लेख केल्याचे वैद्य यांनी लिहिले आहे.

या पुस्तकाच्या पान क्रमांक 11 वरती सनदेचा सर्व अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे.

+
चाफळच्या सनदेचा उल्लेख द. वि. आपटे आणि रा. वि ओतुरकर यांनी महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास या पुस्तकातही केला आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मात्र चाफळच्या या सनदेवर शंका उपस्थित केल्या आहेत. ते म्हणाले, वैराग्य आलेल्य़ा, सणसमारंभात भाग न घेणाऱ्या आपले बंधू व्यंकोजीराजे +
यांना शिवाजी महाराज यांनी याच काळात पत्र लिहिलं होतं. वैराग्य वगैरे उतारवयातल्या गोष्टी आहेत, आता पराक्रमाचे तमासे दाखवा असे त्यांनी या पत्रात लिहिले होते.
ह्याबद्दल त्यांचा तर्क असा आहे की -
जर शिवाजी महाराज आपल्या भावाला वैराग्यापासून परावृत्त करत असतील तर

+
तर ते स्वतः अशा गोष्टी करतील असे वाटत नाही. त्य़ामुळे या सनदेच्या सत्यतेबद्दल शंका येते."

माझा तर्क थोडा वेगळा आहे. मी काही गजाभाऊ मेहंदळे , पांडुरंग जी बलकवडे , बाबासाहेब पुरंदरे
इंद्रजित सावंत ह्यांच्या सारखा इतिहासकार नाही. मी महाराजांवर श्रध्दा असलेला एक मराठी माणूस आहे. +
मला जेव्हढे समजते तेवढेच मी बोलतो, त्यामुळे, माझा तर्क देऊन ह्या सर्व इतिहासकार मंडळींचा अपमान वगैरे करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही , तशी माझी लायकी सुध्धा नाही.

मी महाराजांनी सनदे मध्ये वापरलेल्या शब्दाकडे जातो आणि त्या शब्दांचा/ वाक्यांचा मला जो अर्थ समजतो तो मांडतो. +
जेव्हा महाराज म्हणतात की , " राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा घडावी असा विचार मनी आणिला " ह्याचा अगदी सरळ सरळ शब्दात अर्थ घेतला तर , जसे शिवाजी महाराज वैराग्य स्वीकारणार होते असा होतो..
पण , माझा तर्क हा आहे की , महाराजांनी असे म्हणन्या मागे

+
त्यांचा सगळ्या गोष्टी चाचपडून घेण्या मागचा उद्देश सुध्धा जाणवतो.
छत्रपती शिवाजी महाराज हे खूप धोरणी होते.
त्यांनी स्वराज्यासाठी साठी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती , ती काही कोणाला राज्य अर्पण करण्यासाठी नव्हती , हे तर सर्वांना मान्य असेल पाहिजे. मग +
मग ते इतक्या सहजपणे कोणा साधुसंताला, बैराग्याला राज्य का म्हणून अर्पण करतील ? तर, मला असे वाटते की समर्थांना सनद दिल्यानंतर , त्यांना अजून काही आवश्यकता आहे की नाही ...किंवा त्यांच्या मनात अजून दुसरे तर काही नाही ना , हे चाचपडून घेण्यासाठी सुध्धा असू शकते , हा विचार का नाही +
केला जात ? सनदे वर शंका घेण्यापेक्षा , छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुप्त गुण सुध्धा अभ्यासू जाऊ शकतो का, ह्या कडे का कोणी लक्ष देत नाही ?

त्याही पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचे आहे ते समर्थांनी त्यांना दिलेले उत्तर " तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय." म्हणजे +
म्हणजे समर्थांनी त्यांना फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन करणे आणि तोच तुमचा धर्म आहे हे सांगून त्यांचा हेतू हा राज्य नावावर करून घेणे वगैरे नसून छत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे पालक व्हा हेच आहे. मग समर्थांचा हा विचार उदात्त नाही का ? ह्यावर कोणी विचार करेल का ?
समर्थांच्या ह्या कृतीला मार्गदर्शन म्हणू शकतो का?
स्वार्थ न पाहता ,स्वराज्यासाठी ,देशासाठी नक्की काय बरोबर आहे हे सांगणे म्हणजे मार्गदर्शन आहे, आणि असं मार्गदर्शन करणारी कोणीही व्यक्ती ही गुरुस्थानी असते. त्या संदर्भाने ते छत्रपतींचे गुरू ठरू शकतात.
इतिहासअभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्यामते..रामदास स्वामींबद्दल शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आदरभाव होता आणि रामदासांच्या मनातही शिवाजी महाराजांप्रती आदरभाव होता. त्यांनी महिपतगड आणि सज्जनगडावर (तेव्हाचे नाव परळी) समर्थ रामदासांना राहाण्याची परवानगी , शिधा उपलब्ध करण्याचे आदेश +
किल्लेदारांना दिले व तशी पत्रंही पाठवली होती.
शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट 1649 साली झाल्याचं काही बखरींमध्ये उल्लेख झाला असला तरी त्याला आधार नाही, असं मत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे व्यक्त करतात.

google.com/amp/s/www.bbc.…

+
जर , बखर काय म्हणते हे आपण इतिहासाचा पुरावा मानतो तर मग , त्याच बखरिंचा आधार घेऊन , आपण त्यांची भेट झाले होती हे खरे का नाही मानू शकत ?

ते म्हणतात, "शिव-समर्थ भेटीला स्वराज्यस्थापनेशी नेऊन जोडणं अर्थहीन आहे. परंतु शिवाजी महाराजांची समर्थ संप्रदायाची 1658 मध्ये +
पहिल्यांदा ओळख झाल्याचं दिसतं. भाटेकृत सज्जनगड व समर्थ रामदास पुस्तकात भास्कर गोसाव्यांनी दिवाकर गोव्यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांकडे भिक्षेस गेलो असता त्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्याचे सांगितले.

त्यात त्यांनी शिवाजी महाराजांकडे +
भिक्षेस गेलो असता त्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्याचे सांगितले. त्यावर महाराजांनी कोण समर्थ, समर्थांचे मूळ गाव व इतर चौकशी केल्याचे विचारल्याचे भास्कर गोसावी म्हणतात. भाटे यांनीही समर्थ- शिवाजी महाराज भेटीची तारिख 1672 ची दिली आहे. 1672 नंतर या दोघांचे संबंध आत्यंतिक

+
आत्यंतिक जिव्हाळ्याचे झाले.".

ह्याचाच अर्थ, छत्रपती शिवाजी महाराज असे इतक्या सहज सहजी कोणावरही विश्वास ठेवत नसत , कारण भिक्षा मागणारा याचक कोणीही असू शकतो..संपूर्ण शहानिशा झाल्यावरच याचकाला छत्रपतींनी मदत केली असावी..हा सुध्धा तर्क मांडता येऊ शकतो. +
चाफळच्या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थांचा उल्लेख श्री सद्गुरुवर्य असा केल्याबद्दल ते म्हणतात, "चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा मायना असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने नसून आध्यात्मिक गुरुस्थानी असलेली व्यक्ती अशा दृष्टीने आहे.

+
मग ह्याच तर्काने , माझे म्हणणे आहे की समर्थ हे शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक का होईनात पण, " गुरू" ठरतात ना ?

त्यांचे म्हणणे आहे की ,शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी समर्थ रामदासस्वामींचा संबंध जोडण्यासाठी कसलाही ठोस पुरावा नसून जे पुरावे आहेत ते

+
उत्तरकालीन बखरींचे आहेत."

पण, त्याही पेक्षा मुख्य म्हणजे खुद्द ताराराणी साहेब ह्यांनी छत्रपती शाहू महाराज (तिसरे) ह्यांच्या लग्न पत्रिकेत " श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न " असे छापून आणले होते. ते का छापले असावे ? ह्याचा सुध्धा इतिहासकारांनी आणि सर्वसामान्यांनी विचार करावा ?
माझे एकच म्हणणे आहे की , ह्या सर्व प्रकारामुळे छतेपतींनी स्थापन केलेल्या ह्या महाराष्ट्राचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान होतो...
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले राजकारण बंद व्हावे आणि सर्व इतिहासकारांनी

+
ह्या विषयावर पुन्हा नव्याने अभ्यास करून हा विषय मार्गी लावावा , हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#जय_शिवराय

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with समीर कुलकर्णी

समीर कुलकर्णी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!