आज मला भाजपा ला समर्थन केल्याची मनापासून लाज वाटते ह्यांच्या नालायक लोकांनी आख्या NDA च अस्तित्व संपऊन टाखले ज्यांनी ज्यांनी ह्यांना साथ दिली सोबत घेतले त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणले भाजपा ने
उदाहरण द्याचेच झाले तर प्रामुख्याने
शिवसेना
शिरोमणी अकाली दल
JDU
जयललिता ची AIADMK
जेंव्हा NDA स्थापित केली गेली तेंव्हा पासून ज्यांनी ज्यांनी BJP ला मदत केली त्यांचे अतोनात नुकसान केले BJP ने
सगळ्यात आधी शिकार झाले ते जॉर्ज आणि शरद यादव तेंव्हा bjp ने नितीश ला समर्थन दिले आणि दोघांना संपवले आज नितीश ला संपवत आहेत
अकाली दल ला सुद्धा अशीच वागणूक दिली ते पण गेले
सुरवातीची bjp ही अटल अडवाणी ह्यांची होती त्यांची नियत चांगली होती आजची bjp ही मोदी शहा ह्यांच्या सारख्या टोळ बहीऱ्यांची आहे ज्यांना प्रचंड माज आहे ते सर्वसमावेशक नाहीत त्यांना फक्त हुजरे आणि चाटेच पाहिजे
त्यांनी मम आत्मन म्हणायचे आणि बाकीच्यांनी स्वाहा म्हणायचे एवढेच सूरु आहे
निवडून आलेले सरकार पाडण्यात हे माहीर आहेत म्हणजे ह्यांना लोकांनी दिलेल्या मताचे काहीच देणे घेणे नाही
मध्यप्रदेश मध्ये नाकारले गेले होते पण प्रचंड डावपेच आणि केंद्राची आसुरी शक्ती लावली कामाला आणि आले सत्तेत सोबत केंद्रीय संस्था आहेतच
ED
CBI
NIA
IT
निवडणूक आयोग
अजूनही खूप काही
आता महाराष्ट्र पुरतेच बोलायचे झाले तर 2014 लकसभे पर्यंत ह्यांना स्वबळाची खाज न्हवती पण मोदी लाट आली आणि ह्यांच्या खाजेचा नायटा झाला प्रचंड पैसा आणि केंद्राच्या एकहाती सत्तेने त्यांचा अहंकार एवढा उतू आला की युती तोडली मग स्वबळावर आले त्या वेळी ncp ने बिनाशर्त पाठिंबा दिल्याने
शिवसेनेची बाजू कमकुवत झाली 2014 ते 2019 पर्यंत bjp ने साम दाम दंड भेद करून काँग्रेस ncp चे आमदार खासदार नेते फोडायला एकसारखी सुरवात केली 2014 मध्ये ज्या लहान पक्षांना सोबत घेतले होते त्यांना 2019 ला पायाखाली घेतले त्यात रासप चे दोन उमेदवारच bjp ने फॉर्म भरायच्या वेळेस पळवले
शिवसेनेचे नुकसान केले त्याचा bjp ने गैरफायदा घेत शिवसेनेला संकटात टाखले त्यात बाळासाहेब गेले होते ह्यांनी संधी साधायची ती साधून घेतली 2014 मध्ये ज्या लहान पक्षांना डोक्यावर घेतले होते त्यांना 2019 मध्ये पायाखाली घेतले
रासपा चे दोन उमेदवार तर फॉर्म भरण्याच्या दिवशी पळवले
आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला स्वतः च्या पार्टी चा AB फॉर्म देऊन गाफील ठेवणे आणि वेळेला आसमान दाखवण्याचा घाट जाणकारांच्या सोबत घातला त्यांना 2014 ते 2019 मंत्रिपद द्यावे लागले होते म्हणून 2019 ला त्यांचा असा काटा काढला त्यात त्यांचे समर्थन करणाऱ्या पंकजाताईनां पाडून भर घातली
जानकरांचा काटा काढला गेला होता आता राजू शेट्टी ची तर आधीच सोय लावली होती दोन सख्या भावासारखे खोत आणि शेट्टी ह्यांना दूर केले कमकुवत केले म्हणजेच शेट्टी संपवले
मेटेनां महाराजांच्या पुतळ्याचे अध्यक्ष केले आणि काम बंद फक्त भूमिपूजन पुढे काय आता आरक्षणा पुरता वापर होतोय
जाणकारांच्या ऐवजी आता खुळखुळा गोपीचंद घेतला आहे जानकर हे त्यांना आवरन्याच्या पलीकडे असल्यामुळे पडळकरांना विधानपरिषदेत घेतले मुंडे समर्थक निपटले गेले आता राहिले आठवले त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन एक दलीत चेहरा पाहिजे म्हणून ठेवला आहे तसेही दलित नेते bjp सोबत नाहीत एकाने काय फरक
पडतोय म्हणून आठवले आहेत ते 2024 पर्यंत राहतील असे आज तरी वाटतंय पुढचे पुढे बघू
2019 लोकसभेच्या आधी bjp च्या विरोधात वातावरण असल्याने परत युती करायला शहा मातोश्रीवर आले आणि युती केली पण ह्या दरम्यान बालकोट झाले आणि bjp 303 वर गेली विधानसभेत परत नायटा आला जागा कमी दिल्या
पण ह्या वेळी शिवसेना सावध होती त्यांनी bjp ला अद्दल शिकवायची हेच ठरवले होते त्यांनी दिल्या जागा घेतल्या आणि निवडणुकीला समोर गेले अपेक्षेप्रमाणे निर्णय आले आणि bjp चे पोपट बोलायला लागले अडीच अडीच वर्षे शब्द दिलाच न्हवता सरड्या प्रमाणे रंग बदलला
परत शिवसेनेला खिंडीत गाठले
पण ह्या वेळेस त्याना धोबीपछाड मिळणारच होता फडवणीस शहा आणि मोदीं नी पुन्हा ncp च्या अजित पवारां सोबत सरकार स्थापन केले त्यात शरद पवार ह्यांनी तर तोंडावरच आपटवले आता bjp विरोधात का हे कळले असेल मित्रांसोबत गद्दारी करून बोकांडी बसण्याची नियत ह्या वाटेवरच्या ओंडक्याची
महाराष्ट्रात जेवढे नुकसान मित्रांचे केले केंद्रात तेच केले आज पुंडेचरी चे काँग्रेस सरकार पाडले
राजस्थान मध्ये खेळी बसली नाही
गोवा तेच केलं अटलजींनी एक मतासाठी पंतप्रधान पद त्यागले आणि फोडाफोडी करून सत्ता भेटत असेल तर तिला चिमट्याने सुद्धा पकडणार नाही असे मत असणाऱ्या bjp ची आज ही
दुरवस्था बघवीजत नाही सत्तेचा भसम्या झालेल्या रंगा बिल्ला ला येथिल छूटभैये नेते खतपाणी घालत आहेत
मोदी नी गुजरात मध्ये सुरवातीला प्रवीण तोगडियांची खूप मदत घेतली आख्या गुजरात मध्ये bjp चे वातावरण तोगडियांजीं नी बनवले त्यांचा सुद्धा मोदीं नि काटा काढला
आज VHP पेक्षा
राष्ट्रीय मुस्लिम मंच जास्त सक्रिय आहे VHP ने BJP ला वाढवले आणि BJP ने VHP संपवली आता BJP ही पूर्ण दोघांच्या हातात आहे पुढचा नंबर RSS चा लागू शकतो आज म्हणावे तसे सरसंघचालक प्रभावी वाटत नाही जोडी डोईजड झालीच आहे ज्यांना सत्तेची प्रचंड हवस आहे असे हे दिल्लीतील बोके ह्यांचा निषेध
ज्या ठाकरेंनी मी असा कधी बोललोच नाही किंवा मला असे म्हणायचे च न्हवते अशी वाक्य उभ्या आयुष्यात बोलले नाही ते खोट बोलतील ह्याच्यावर कोण विश्वास ठेवेल ज्यांनी मित्रपकक्षाचे उमेदवार पळवले त्यांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल ह्या bjp च्या भस्मासुरचा नाश करावाच लागेल आणि तो होईलच
बरच काही सांगितले गेले बरेच काही राहून गेले राहिलेले उद्या
आज प्रथमच bjp च खरं रूप लिहिण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आवडले तर ठीक नाही आवडले तर भक्त झोडपणारच आहेत पण त्यांना उत्तर सुद्धा मिळेल
जय हिंद जय महाराष्ट्र
साथ द्या bjp चा नाश करा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या राजकीय खेळया आणि त्यांचे परिणाम
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ह्यांचा उदय झाला तो स्व श्री गोपीनाथ मुंडे ह्यांच्या मुळेच
मुंडे गडकरी वादाचा फायदा झाला फडवणीसांना 2014 मध्ये मुंडे गडकरी दिल्लीत स्थिर होत असल्याने मुंडे नी गडकरींना शह देण्यासाठी
देवेंद्रजीं ना भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष केले गेले त्याचा देवेंद्रजीं नी योग्य वापर केला संधी च सोन केले पण नशीब जोरावर होतं आणि महाराष्ट्राचे 2014 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकणारे गोपीनाथ मुंडे ह्यांचे दुर्देवी दुःखद निधन झाले देवेंद्रजीं ना आणणारे मुंडे हयात न्हवते दिल्लीत मोदी शहां
दोघे स्थिरावले होते देवेंद्रजीं नी दोघांच्या अपेक्षेप्रमाणे मेहनत केली आणि यशस्वी
झाले नागपूर संघाचे आशीर्वाद मिळाले आणि झाले मुख्यमंत्री पण वरिष्ठ दुखावले गेले ते प्रामुख्याने एकनाथ खडसे
मनीष भंगाळे ह्याच्या आरोपाने खडसेंचा काटा काढला गेला एक वरिष्ठ धक्याला लावले गेले होते