औरंगाबाद येथील मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांच्या निधनाची वार्ता माझ्यासाठी अतिशय दुःखद आहे.
त्यांच्याशी माझे वैयक्तिक,कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहेच याशिवाय मराठवाडा व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले.
रफिक झकेरिया यांच्यानंतर फातिमा मॅडम यांनी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या कार्याचा भार अतिशय समर्थपणे पेलला.
समाजातील वंचित, शोषितांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अल्पसंख्याक मुला-मुलींना दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपुर्ण उपक्रम राबविले.
त्यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात अनेक दर्जेदार अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रासह त्यांनी पत्रकारितेत देखील आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. टाइम्स ऑफ इंडियाच्या 'संडे एडिटर' म्हणून त्यांनी अतिशय उत्तमोत्तम विषय हाताळले.
त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना सरोजिनी नायडू एकात्मता पुरस्कार १९८३ साली प्रदान करण्यात आला होता.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या समाजविश्वात सातत्याने कार्यरत असणारे एक कल्पक व अभ्यास व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना अर्शद आणि फरिद झकेरिया यांच्यासोबत आहेत.फातिमा झकेरिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Supriya Sule

Supriya Sule Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @supriya_sule

6 Apr
#COVIDー19 ची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी @NCPspeaks चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कठीण काळात कशा पद्धतीने कार्यरत रहावे याबाबत पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी आपणा सर्वांना प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.याशिवाय मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम आपण सर्वांनीच कसोशीने टाळणे आवश्यक आहे. राज्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अविश्रांत मेहनत करीत आहे.
Read 5 tweets
11 Jan
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत बैठक झाली.यावेळी प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी ही प्रवाशांच्या मागणी रेल्वे खात्याकडे मांडली. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल.याशिवाय प्रदूषणही कमी करता येऊ शकेल.
पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे.याशिवाय या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'मेमू' लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी रेल्वेकडे केली.
Read 13 tweets
11 Jan
रविवार, दि.१७ जानेवारी २०२१ पासून महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने माझ्या फेसबुक पेजवर पाहणार आहोत.
महात्मा फुले यांची वैचारीक जडण-घडण, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, स्त्रीशिक्षण व इतर शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सत्यशोधक समाज, यासोबत त्यांचे साहित्यिक कार्य यांसारख्या विविध पैलूंचा सर्वांगिण आढावा घेणारी नामवंत लेखक, साहित्यिक व अभ्यासकांची व्याख्याने (cntd)
याअंतर्गत आपल्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक चळवळीचे शिलेदार डॉ बाबा आढाव यांच्यासह प्रख्यात लेखक व संशोधक प्रा. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस, प्राध्यापक डॉ जास्वंदी वांबूरकर यांचा समावेश आहे.
Read 4 tweets
9 Jan
अहमदनगर शहराची खास ओळख असणारी व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हिआरडीए) ही संस्था चेन्नई येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याचे वृत्त वाचण्यात आले.ही संस्थेचा अहमदनगर शहराच्या विकासात अतिशय मोलाचा वाटा असून १९४७ पासून ही संस्था येथे अतिशय उत्तम रीतीने काम करीत आहे.
येथील व्हिआरडीएच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली आहेत.देशाच्या संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि इतर आवश्यक सामुग्री येथे विकसित झाली आहे.याशिवाय वाहनांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे.
मा. @rajnathsingh जी, ही संस्था चेन्नईला गेल्यास सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची विनाकारण फरफट होणार आहे.याशिवाय शहराच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था बाहेर जाणार आहे.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!