#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्‍या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं.
त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच
अर्बन धर्मवाद हा पण तितकाच मोठा धोका आहे.जेव्हा चकचकीत घरांमधे आँफिसेसमधे बसणारे,उच्चशिक्षित लोक यामधे गुंतलेले असतात तेंव्हा याचा धोका कित्येकपटीने वाढलेला असतो.समाजात,आपापल्या जातीच्या गटांमधे ह्या माणसांच्या विद्वत्तेला,समृद्धीला एक वलय असतं आणि या वलयाचा फायदा उठवून ही माणसं
आपापले विचार समाजात पसरवत असतात.ही माणसं सुशिक्षित व विचार करणारी तो विचार चांगल्या पद्धतीने शब्दांमधे मांडू शकतात.यामुळे सोशल मीडियावर ही माणसं खूप पाँप्युलर असतात.या सगळ्यामधे एक पॅटर्न असतो ते म्हणजे सोशलमिडिया ग्रुप्स तयार होवून त्यामागून पद्धतशीर ब्रेनवाँशिंग केलं जातं
कधी कळत आणि नकळत.खऱ्या खोट्या बातम्या,तद्दन खोटी किंवा एकतर्फी माहीती पसरवून ये केलं जात असतं.मग एक आँनलाईन समर्थकांचं सैन्य तयार आपल्या विरोधकांवर शाब्दिक हल्ले करून त्यांना नामोहरम केलं जातं ज्याला आपण ट्रोल्स म्हणतो.ट्रोलिंग करणार्‍या लोकांचं वय हे १५ ते ३५ आहे हिच चिंतेची बाब
आहे.आपल्या पुढच्या पिढीला आपण नासवून टाकलेलं आहे हे कटू सत्य आपल्यासमोर लवकरच एक मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर येणार आहे. एकदा माणसाला इतक्या भडक पद्धतीने रिअँक्ट होण्याची,एकतर्फी विचार करण्याची,एकदा कळपाची बांधिलकी पत्करली की मग कुठलाही विचार न करता त्याच्या सगळ्या गोष्टींना
समर्थन करणे.याची सवय झाली की ही सवय तेवढ्यापुरती रहाणार नाही.ही सगळी माणसं आहेत यांच्यामागे एक विचार करणारी संघटित लाँबी आहे त्यामुळे त्यांना कुत्र्यांसारखं ठार मारता येत नाही मग ही माणसं समाजात जातात तेंव्हा काय होईल याची कल्पना करवत नाही.यापुढे जर सोशल व डोमेस्टिक व्हाँयलन्स
घटना वाढतील अशी मला भिती वाटते.यापलिकडे एक असाही समाज आहे जो टिव्हीवर,सोशल मीडियावर,पेपरमधे शेअर झालेल्या गोष्टींना प्रामाणिकपणे सत्य मानत असतो,त्याच्यावर या असल्या गोष्टींचा कसा परिणाम होत असेल ही पण चिंतेची बाब आहे.यामधे सगळ्यात जास्त गोची झाल्ये ती विवेकी विचारांची.
कारण त्यांना दोन्ही गट आपले शत्रू मानतात.खरंतर वैचारिक क्रांती आणि एका मर्यादीत चौकटीत धर्म या अन्न वस्त्र निवारा इतक्या गरजेच्या गोष्टी आहेत.पण एका गटाला ते धर्मवादी वाटतात आणि दुसऱ्या गटाला धर्मविरोधी.पुरोगामी विवेकी विचार ही एक शिवी बनवून वापरात आहे हल्ली.फूरोगामी,पुरोगांडु
वगैरे शब्द सर्रासपणे वापरणाऱ्या माणसांना पुरोगामी विचार या शब्दाच्या अवकाशाचा अंदाज तरी आहे का असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रेम जिव्हाळा आत्मियता वगैरे गोष्टीच्या कल्पना संदर्भ झपाट्याने बदलत आहेत व याचा संबंध स्वार्थ,हितसंबंध जपणे,व्यावहारिक आर्थिक फायदा याकडे झुकाव होत आहेत.
मनाच्या प्रेमाची वाटचाल हळूहळू शारिरिक वासनेचं रूप घ्यायला लागली आहे आणि याला प्रॅक्टिकल थिंकिंग असं गोंडस नाव देऊन त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपल्याला करमणूक म्हणून जे आँफर केलं जातंय त्यांच बदललेलं स्वरूप हा फार मोठा अभ्यासाचा विषय असणार आहे यापुढे
मानसशास्त्रासाठी बिभत्स आणि सेन्सेशनल थ्रिल्ससाठी आपली भूक वाढते आहे का?
आपलं उत्तर प्रामाणिक असलं तर आपण ठरवू शकू.
आपण एका सामाजिक ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत.
आणि या आगीत आपली मुलं जळून जाणार आहेत.
सावध व्हायला हवं.

जय महाराष्ट्र 🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎

aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Chav0_

Nov 18, 2021
#मेटाव्हर्स #Metaverse
‘मेटाव्हर्स’म्हणजे नेमकं काय?
पारंपारिक वैयक्तिक संगणनाद्वारे,तसेच आभासी व संवर्धित वास्तविकता हेडसेटद्वारे सतत ऑनलाइन ३डी व्हर्च्युअल वातावरणास समर्थन देणारे,इंटरनेटचे १ गृहितक पुनरावृत्ती आहे.मेटाव्हर्स,काही मर्यादित स्वरूपात,सारख्या प्लॅटफॉर्मवर
किंवा सेकंड लाइफ सारख्या व्हिडिओ गेमवर आधीपासूनच उपस्थित आहेत.‘मेटाव्हर्स’बद्दल प्रत्येकजण चुकीचा आहे,हा माझा ३ भाग सिद्धांत आहे.
भाग १ :
प्रत्येकजण मेटाव्हर्स चुकीचा समजत आहे.
बर्‍याच लोकांना वाटते की "मेटाव्हर्स" हे एक आभासी ठिकाण आहे,रेडी प्लेयर वन या चित्रपटातल्याप्रमाणे.माईनक्राफ्ट,रोब्लॉक्स किंवा झुक्याने (Mark Zuckerberg) आभासी जग फेसबुक डेमोमध्ये दाखवले.
पण ती जागा नसेल तर?
Read 12 tweets
Jul 12, 2021
#BJPExposedAgain
मालवीय याचा दावा असत्य आहे कारण सरकारने मार्च २०१५ पासून कोणतेही थकित तेल बाँड भरले नाहीत.यूपीए सरकारने २००५ ते २०१० दरम्यान जारी केलेल्या १.४४ लाख कोटी रुपयांच्या बाँड पैकी २०१५ मध्ये एनडीएच्या राजवटीत एकूण ३,५०० कोटी रुपयांपर्यंतचे केवळ २ बाँड परिपक्व झाले. Image
सरकारच्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार,अनुलग्नक ६ए ते ६एच अंतर्गत,पुढील बाँड ऑक्टोबर २०२१ मध्ये परिपक्व होणार आहे.२००२ मध्ये भाजप सरकारच्या राजवटीत तेल बाँडचा १ला संच जारी करण्यात आला होता.३० मार्च २००२ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील
finmin.nic.in/sites/default/…
तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक म्हणाले की, तेल पूलातील ८०% तूट संपुष्टात आणण्यासाठी आरबीआय ९००० कोटी रुपयांचे बाँड जारी केले होते.एनडीए सरकारला हे कर्ज वारसा हक्काने मिळाले हे जरी खरे असले,तरी २००२ पासून हे घडत आहे हेही खरे आहे.
economictimes.indiatimes.com/govt-issues-rs…
Read 13 tweets
May 20, 2021
बऱ्याच जणांनी मला विचारलं की भौ ते केयर्न एनर्जी चा विषय काय आहे..त्या सगळ्यांसाठी मी जितकं जमेल तितकं सोप्या पद्धतीने मी प्रयत्न केला आहे:
भारताची गेल्या १०० वर्षात इतकी वाईट अवस्था झाली नव्हती!
#मोदीने_देश_विकला
#ModiFailsToPay
#मोदी_इस्तीफा_दो
#ModiMustResign
#CairnEnergy
@CairnEnergy या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची केलेली नाचक्की किती मेनस्ट्रिम मीडिया आणि मराठी मीडिया ने दाखवली.जगात ५ क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या कंपनीने जागतिक स्तरावर अपमानित करत भारताच्या विरोधात एक मोठा लढा आंतरराष्ट्रीय कंपनीत जिंकला आहे,
#ModiFailed
या बद्दल भारतीय जनतेला का अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे?काय प्रकरण आहे नेमक?केयर्न एनर्जी ही एक ब्रिटिश ऑईल कंपनी आहे.जिने भारतात आपला बिझनेस,केयर्न इंडिया या उपकंपणीच्या नावाने २००७ साली सुरू केला होता.
#CairnScrewsModi
moneycontrol.com/news/business/…
Read 17 tweets
Apr 14, 2021
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप
Read 13 tweets
Apr 11, 2021
#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते Image
सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान Image
बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.
Read 10 tweets
Apr 8, 2021
#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी #जळगावभ्रष्टाचार #JalgaonScam
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी @AnilDeshmukhNCP यांनी महिना १०० कोटी वसूली करायला सांगितल्याचा नुकताच एक आरोप केला होता.
त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
विरोधकांच्या लफड्यांच्या बाबतीत कार्यतत्पर असणाऱ्या केंद्र सरकारचे अनुकरण करत आपल्या राज्य सरकारनेही तातडीने याबाबतीत चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश काढून २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
#जळगावभ्रष्टाचार #२००कोटीदेवेंद्रच्यापोटी
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(