जेम्स लेनचा नवा सल्लागार - गिरीश कुबेर

@girishkuber यांच्या "अन्यथा" या सदरचा मी अगदी सुरुवातीपासून चाहता होतो

त्याला पहिला तडा गेला त्यांच्या "बळीराजाची बोगस बोंब" या लेखानंतर आणि आता त्यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी उधळलेली मुक्ताफळे निदर्शनास आल्यावर मात्र या बुद्धिभेदास
1/n
उघडं पाडणं गरजेचंच बनतं

सर्वप्रथम त्यांनी शंभूराजे, महाराणी सोयराबाई यांच्यावर ओकलेली गरळ आणि अष्टप्रधान मंडळातील कारस्थानी मंत्र्यांची (हळुवारपणे) केलेली वकिली हे विस्तृतपणे समजून घेऊ
2/n
(माझ्या वाचनात संपूर्ण पुस्तक आलेले नाही, परंतु त्यातला जितका मजकूर वाचनात आलाय तो त्यांच्या मनातली मळमळ समजून घेण्यास पुरेसा आहे)

ते लिहितात
संभाजींनी या वारस वादाचा शेवट सोयराबाईंचा आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणाऱ्या शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील काहींचा खून करून केला
3/n
हे रक्तरंजित पर्व शिवाजींनी गुणवान लोकांचा बनविलेला अमूल्य समूह घेऊन गेले आणि याची संभाजीना खूप मोठी किंमत मोजावी लागली तसेच जरी संभाजी धाडसी असले तरी आपल्या पित्याप्रमाणे संयंमी व मुत्सद्दी नव्हते !

4/n
आता हे सगळं वाचल्यावर कोणत्याही नवख्या माणसाच्या मनात सर्वप्रथम कोणत्या भावना उमटतील?

-शिवरायांच्या मंत्र्यांपैकी काहीजण सोयराबाईंशी प्रामाणिक होते त्यांना व आपली सावत्र माता सोयराबाईंना संभाजी महाराजांनी ठार मारले
5/n
-शिवरायांनी बनविलेली "प्रतिभासंपन्न" लोकांच्या जंत्रीस स्वराज्य मुकले ज्यामुळे पर्यायाने स्वराज्याला आणि संभाजीराजांना खूप मोठी किंमत मोजावी लागली (इथं ते एकाच वाक्यात हळुवारपणे कारस्थानी मंत्र्यांना "अमूल्य" असं संबोधतात आणि नकळत क्लीन चिट देत
6/n
संभाजीराजांना मात्र बेमालूमपणे चुकीचं ठरवतात)

आता या धादांत खोटारडेपणाचा थोडक्यात समाचार घेऊ

गिरीश कुबेर ज्यांना "टॅलेंट पूल" (गुणवान लोकं) वगैरे म्हणतात त्या "प्रतिभावान" सरकारकूनांपैकी काहींनी आपली "प्रतिभा" कशी पाजळली याचा संक्षिप्त आढावा घेऊ
7/n
शिवराय साधारणपणे १२ दिवस (२० मार्च ते ३ एप्रिल) आजारी असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजांस न कळविल्याने त्यांना शिवरायांच्या आजारपणात त्यांच्या दिमतीस येता आलं नाही
8/n
शिवरायांसारख्या "प्रचंड लोकप्रिय" अशा रयतेच्या राजाच्या निधनाची बातमी लोकांपासूनच काय तर खुद्द संभाजीराजांपासून लपवून रायगडाची दारे बंद करून शिवरायांच्या चितेस अग्नीही मिळायच्या आधी संभाजीराजांविरुद्ध खलबतं करत
9/n
सोयराबाईंवर शिवरायांच्या मृत्यूसंदर्भात संशयाच्या कंड्याही पिकविल्या ज्याच्या जोरावर सोयराबाईंना भिववून व दडपण आणून त्यांचा आपल्या अभद्र योजनेसाठी पाहिजे तसा वापर करून घेतला (याचा दुसरा अर्थ असाही आहे की ही विषारी योजना महाराणी सोयराबाईंची कधीच नव्हती)
10/n
आपले वडील कसे आहेत याची विचारणा करताच शिवराय बरे असल्याची खोटी ग्वाहीही संभाजीराजांना देण्यात आली आणि जवळपास १० ते १५ दिवस शिवरायांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही (कारण त्यांना ठरवलेली योजना रायगडावर पार पडायची होती)
11/n
अनाजी दत्तोने सोयराबाईंबरोबर बाळाजी आवजी व मोरोपंतांसारख्या इतर मंत्र्यांवरही दबाव टाकून या कुटील डावात सहभागी व्हायला लावले
बरं सभासदही अगदी स्पष्टपणे लिहितो की राज्य वाटण्याची कल्पना ही कारकुनांची (सोयराबाईंची नव्हे)
12/n
संभाजीराजांविरुद्ध सैनिक जायला तयार नसल्याने या मंत्र्यांनी दुप्पट वेतन दिले होते

"अर्थतज्ञ्" गिरीश कुबेर ज्यांचा उल्लेख "गुणवान" असा करतात त्यांचा उल्लेख "इतिहासकार" वा सी बेंद्रे मात्र कुमंत्री,दुर्मंत्री, शेतकऱ्यांना अतिवाईट संकटात टाकणारे,लाचेसाठी हपापलेले असा करतात !
13/n
आणि कुबेरांच्या या सर्व "गुणवान" लोकांचा हा विषारी कारभार कधी चालला होता? - दिल्लीचे आक्रमण स्वराज्यावर घोंघावत असताना !

"मराठी साम्राज्याची छोटी बखर" मध्ये उल्लेखिल्याप्रमाणे "ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत कोणीही स्वार्थी कारकुनांच्या हवाली व्हायला तयार नव्हते" तसेच
14/n
सोयराबाईंच्या आत्महत्येचाही उल्लेख आढळतो तसेच काही स्वार्थी सरकारकूनांव्यतिरिक्त इतर कारकून, लष्कर, सुभेदार, सेनापतींना संभाजी राजा शहाणा व न्यायी वाटत होता आणि हेच पुढे सिद्धही झालं
15/n
स्वराज्याच्या आणि त्यांच्या जीवाशी खेळणारी इतकी कारस्थानं करूनही संभाजीराजांनी मंत्र्यांना शिक्षा ठोठावली नव्हती
त्यांना शिक्षा देण्यात आली ती त्यांचा शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाचा पुत्र अकबरास देण्याचा दुसरा कट उघडकीस आल्यानंतर !
16/n
इथं तत्कालीन पत्रव्यवहार व प्रवासी लेखकांनी केलेल्या नोंदीही अत्यंत महत्वपूर्ण ठरतात
राजापूरकर इंग्रज वखारवाल्यांच्या बातम्या आणि नोंदींमध्ये नमूद असल्याप्रमाणे शंभूराजांनी १८जून१६८०ला रायगडावर आल्यानंतर आपल्या धाकट्या भावास (राजाराम महाराज) अत्यंत ममतेने वागविले व वागवत आहे
17/n
इतकंच नव्हे तर शिवरायांना संभाजीवर कारभाऱ्यांकडून विषप्रयोग किंवा घातपात होण्याची शक्यता वाटत असल्यानेच दक्षिणेच्या मोहिमेवर निघताना शंभुराजांना रायगडापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ते करत होते असा संशय एक डच वखारकर व्यक्त करतो
18/n
म्हणजेच शिवरायांच्या हयातीतच या कारस्थानाचा सुगावा त्यांना लागला होता हे नक्की

ज्या शंभूराजेंना "अर्थशास्त्री" कुबेरजी अप्रत्यक्षपणे "उतावीळ व कमी मुत्सद्दी" संबोधतात त्याच संभाजीराजांचे वर्णन
19/n
तत्कालीन इंग्रज "संभाजीराजा अत्यंत धूर्त व शहाणा आहे (Report speaks him very diligent and careful) तसेच त्याचा कारभार शिवरायांपेक्षा अधिक सुसंस्कृत, दयाळू व नेमस्त असा आहे" असा करतात !
परमानंदही लिहितो की संभाजीराजांनी सोयराबाई व दुसऱ्या ३ मतांचे रायगडावर येताच सांत्वन केले
20/n
ज्या शंभुराजांना कुबेर चपलखपणे "उतावीळ व कमी मुत्सद्दी" म्हणतात त्या शिवपुत्र संभाजीची लढाई "एकाचवेळी" कोणाकोणाबरोबर होती?
👇
21/n
५ लाखांवर फौज घेऊन"खासा"दक्षिणेत उतरलेल्या सम्राट औरंगजेबाशी,गोव्यातल्या पोर्तुगीजांशी,स्वराज्याच्या-त्यांच्या जीवावर उठलेल्या स्वार्थांध कारकूनांशी तसेच पत्नी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार देऊन एकप्रकारे जातिव्यवस्थेवर प्रहार करून शाक्तधर्मप्रसाराचे महायुध्दही लढत होते !
22/n
स्वराज्य निर्माण करताना त्यागी लोक भेटतात पण ते निर्माण झाल्यावर त्याच स्वराज्याकडे मतलबाने पाहणारे लोकही निर्माण होतात, अशा मतलबी स्वकियांशी त्यांची लढाई होती !
23/n
नेमके हे सगळे संदर्भ सोडून "अर्थशास्त्री" कुबेरजींना मल्हार रामरावासारख्या समकालीन नसणाऱ्या किंवा १८ व्या शतकातील बखरकारांचे भरमसाठ दंतकथांनी भरलेले लिखाण कसे बरे सापडले?

"अर्थशास्त्री" कुबेरांचे ट्रानफॉर्मेशन "इतिहासकार" म्हणून होत असताना हा निव्वळ योगायोग कसा मानावा?

24/n
गिरीश कुबेरांना त्यांनी ओकलेली गरळ किंवा लिखाण हे धादांत खोटं आहे हे माहित नसणे ही अशक्यकोटीतली गोष्ट आहे त्यामुळे यामध्ये पुन्हा काही कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही
25/n
कुबेर बेधडकपणे संभाजीराजांबद्दल इतकी गरळ ओकत असतील तर थोरल्या शाहू महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल किंवा राजर्षी शाहूंच्या प्रचंड क्रांतिकारी आणि महान सामाजिक योगदानाबद्दल लिहितील ही मुळात अपेक्षाच करणं भाबडेपणाचं ठरेल
26/n
संभाजीराजांना बदनाम करण्याची मोहीम अनाजी दत्तोंपासून गेली सतत ३०० वर्षे अखंड कार्यरत आहे, काही दंतकथाकारांनंतर त्यात महत्वाची भूमिका बजावली ती नाटककारांनी आणि त्यात आता भर पडली "अर्थशास्त्री" कुबेरांची !
27/n
संभाजीराजांच्या बदनामीचा कट हा सांस्कृतिक कलुषित वृत्तीचा व इतिहासाच्या विकृतीकरणाच्या प्रवृत्तीचा एक भाग आहे ज्याचे गौतम बुद्ध, महात्मा फुले, संभाजी महाराज ते महात्मा गांधी हे सर्वजणही त्याच विकृतीकरणाच्या वृत्तीचे शिकार आहेत आणि कुबेरांसारखे अनेकजण त्याचे शिकारी आहेत.
28/n
आता ही शिकार करताना कुबेरांच्या "कुबेरीत" किती भर पडली याचा शोध घ्यावा लागेल !

तरीही आम्हाला हे मनापासून सांगावंसं वाटतं की "अर्थतज्ञ्" कुबेरांनी पेशवाईकालात लिहिल्या गेलेल्या बखरींवर विसंबून न राहता स्वतंत्रपणाने चिकित्सक अभ्यास करणाऱ्या वा सी बेंद्रे, डॉ जयसिंगराव पवार,
29/n
शेजवलकर, डॉ आनंद पाटील, कॉ शरद पाटील यांच्या चिकित्सक ऐतिहासिक लेखनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नक्कीच (त्यांच्या दृष्टीने) विद्वान, मुत्सद्दी, मातृवत्सल, चारित्र्यसंपन्न, महापराक्रमी शिवपुत्र संभाजीचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही !

30/n
"विद्वान, मुत्सद्दी, मातृवत्सल, चारित्र्यसंपन्न, महापराक्रमी शिवपुत्र - छत्रपती संभाजी महाराज" यांना बदनाम करणाऱ्या या कुत्सित लिखाणाबद्दल गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध.

31/n
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने या खोट्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून गिरीश कुबेर यांची चौकशी करावी ही विनंती !
@CMOMaharashtra @uddhavthackeray

प्रतीक पाटील @Liberal_India1 यांनी सडेतोडपणे हा प्रश्न लावून धरल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

32/33
संदर्भ :
१) छत्रपती संभाजी महाराज - वा सी बेंद्रे
२) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - डॉ जयसिंगराव पवार
३) मराठी रियासत खंड २ - ग गो सरदेसाई
४) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महंमदी की ब्राह्मण? - कॉ शरद पाटील

33/33
*मातांचे
(20/n)
डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ या ग्रंथातील नरहर कुरुंदकरांच्या लेखात छत्रपती संभाजी बद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत असे आहे की ज्याने लक्षावधी च्या फौजेच्या चौफेर आक्रमणाला प्रजेचे नुकसान होऊ न देता खंबीरपणे तोंड दिले व औरंगजेबाला निराश केले तो माणूस
34
लहरी उतावळा विलासी रागीट कसा असेल अशी शंका इतिहासकारांना का आली नाही हे नरहर कुरुंदकर यांचे मत कुबेरां च्या वाचनात आलेलेच नसावे असे आम्ही कसे म्हणावे?
35
उग्र प्रकृती संभाजी असे नामकरण असणार्या मराठी रियासत खंड दोन मधे गो .
स .सरदेसाई लिहितात, "राज्याच्या मुख्य घडामोडी संभाजीने आपल्या अष्टप्रधानां च्या विद्यमानच सिद्धीस नेल्या
पृ.क्र.३६

36

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kunal Anil Patil

Kunal Anil Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kunalanilpatil

21 May
राजीव गांधींनी 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला, तेव्हा मोदींची गॅंग गाईच्या शेणात पार बुडालेली होती

१९८४ मध्ये विक्रमी बहुमतासह राजीव भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. आणि, तरुणाईचा भारत घडवण्यात मग्न होते.
1/10
तो काळ म्हणजे जागतिकीकरणाची गर्भारभूमी होती. जग बदलत होते.जुने कोसळत असताना, नवे काही उभे राहात होते.राजीव यांना या बदलाचे नेमके भान होते.जिल्ह्या-जिल्ह्यात नवोदय विद्यालये उभी करणा-या राजीवना नव्या तंत्रज्ञानाची व्याप्ती समजली होती आणि त्यामागचा विज्ञाननिष्ठ आशयही समजला होता
2
नियतीशी दुसरा करार राजीव करू पाहात होते.
आज जी 'डिजिटल इंडिया''ची चर्चा सुरू आहे, त्याचे जनक राजीवच. जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी 'तरूण' मांडणी तेव्हाच ते करत होते.
3
Read 10 tweets
26 Apr
#MediaWhitewash

Have you heard or read following headlines?
-Wow,we are airlifting Oxygen plants from Germany!
-The world is helping India just due to Modi!
-Modi has made India a VishwaGuru & India is a perfect yardstick to measure the performance of any govt in the world!
1/14
-Modi is getting praised by the media all over the world?
Bla.. bla.. bla…

Let us give you some fresh and more real perspectives, as the world sees it!

-From preparedness to pandemic to Oxygen management
-From system implementation to coordination with States
2/14
-From timely decision making to transparency on Covid-19 related data
-From the plan for vaccination to migrant workers issue
-From arrogant ignorance to the caution and alarm raised by experts in response to shameless election rallies
3/14
Read 15 tweets
19 Apr
फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले...

- @DrVijayChormare

रेमडेसिवीरच्या संदर्भाने महाराष्ट्रातला राजकीय संघर्ष शनिवारी १७ एप्रिलला दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा
1/n
गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील सोळा निर्यातदारांना स्वतःकडे असलेली वीस लाख रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला केंद्राकडून परवानगी मिळत नाही. राज्यसरकारने या सोळा कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत
2/n
विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे मलिक यांनी आपल्या ट्विट मालिकेत म्हटले होते.
3/n
Read 29 tweets
18 Apr
"All types of gatherings are Completely Wrong & Condemnable!"

Did you notice Godi-Media’s deafening silence on a crowded gathering of Muslims(attending the funeral of one of their top clerics)?
The obvious question is why is the media Silent Now?Remember it is the same media
1/n
that was demanding sedition, 302, shoot-at-sight for the Nizamuddin Tableeghi Jamaat episode, last year.
Here’s the Answer:
This Irresponsible gathering took place in Ajay Bisht’s Uttar Pradesh!
If this gathering issue is highlighted,
2/n
then the obvious responsibility of UP Police is exposed!
Who gave the permission of this gathering? What was the UP State Administration, Police Machinery doing when this was happening?
Sorry, don’t expect too much,
3/n
Read 5 tweets
17 Apr
कमाल (कमल) की बात है ना?

भाजपा बनाम तब्लिघी इव्हेंट के बाद समुचे मुस्लिम समाज के खिलाफ नफरत का जहरीला अभियान चलाने वाला बेशर्म गोदी मिडिया आज देश में जब करोना की दूसरी जानलेवा लेहेर चल रही है तब 👇

●उत्तराखंड में ३० लाख लोगों से खचाखच भरे हुए कुंभ मेले पे 👉 🤐
1/n ImageImageImageImage
●आपदा के समय देश के जिस गृहमंत्री का बर्ताव सबसे ज्यादा जिम्मेदारीवाला होना चाहिए वो देश का पहला तडीपार गृहमंत्री बेशर्मों की तरह बिना मास्क के हजारों की भीड इकठ्ठा करके रोड शो और रैलियां कर रहा है उस सत्ता में बैठे जिम्मेदार इंसान के इस बेशर्म बर्ताव पे 👉 🤐
2/n Image
●भाजपा शासित मध्यप्रदेश और गुजरात जैसे राज्यों में राज्य करोना के मरीजों की संख्या और मृत्यु के बारे में छुपाई जाने वाली जानकारी पे 👉 🤐
●जब देश को वैक्सीन की जरुरत है तब उसके कम पड़ रहे स्टॉक को छोड़ झूठ मुठ का "टिका उत्सव" मानाने वाले पीएम पे 👉 🤐
3/n
Read 7 tweets
16 Apr
'सिंहस्थ': कुसुमाग्रज

व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर
संताचे पुकार | वांझ झाले ||

रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग | तुडुंबला ||

बँड वाजविती | सैंयापिया धून
गजाचे आसन | महंतासी ||

भाले खड्ग हाती | नाचती गोसावी
म्हणे वाट यांस पुसावी | अध्यात्माची ||

1/n Image
कोणी एक उभा | एका पायावरी
कोणास पथारी | कंटकांची ||

असे जपीतपी | प्रेक्षकांची आस
रूपयांची रास | पडे पुढे ||

जटा कौपिनांची | क्रीडा आहे जळ
त्यात हो तुंबळ | भाविकांची ||

क्रमांकात होता | गफलत काही ||
जुंपते लढाई | गोसाव्यांची ||

2/n
हे साधू नाहतात | साधू जेवतात
साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||

येथे येती ट्रक | तुपासाखरेचे
टँकर दुधाचे | रिक्त तेथे ||

यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची
चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||

येथे शंभराला | लाभतो प्रवेश ||
तेथे लक्षाधीश | फक्त जातो ||

3/n
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(