थ्रेड 👇
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात प्रयाग चिखलीपासून ते नृसिंहवाडीपर्यंत पायी साधारण 97 किलोमीटरची पदयात्रा काढली, पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ती स्थगित केली हा विषय निराळा...+
खरंतर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे, ते योगदान कोणी नाकारणार नाही, पण काही राजकीय गणितं बिघडली, विशेषत्वाने बारामतीशी जवळीक अंगलट आली हे खरंय. आणि त्यांच्या वाट्याला राजकीय पराभव आला. कदाचित ते पुन्हा योग्य मार्गावर येत आहेत.
पण+
त्यांनी मागच्या 5 दिवसात जी यात्रा काढली त्यात एक आग्रही मागणी होती की, "2019 च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत द्या."
मी अनेकदा 2019 च्या पूरग्रस्त मदतीसंदर्भात देवेंद्रजींवर टीका झालेली ऐकली, मात्र आज खुद्द राजू शेट्टींसारखा जाणता शेतकरी नेता देवेंद्रजींच्या GR चा+
दाखला देत त्याप्रमाणे मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे सरकारला करत असेल, तर देवेंद्र फडणवीस यांचं काम आजही ठळक आणि स्पष्ट आहे.
2019 साली देवेंद्रजी फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पीक कर्ज माफी केली होती, सोबतच हेक्टरी 95 हजार रुपये म्हणजेच गुंठ्याला 950 रुपये भरपाई दिली+
होती, या सरकारने केवळ मदतीची घोषणा करण्यापेक्षा 2019 च्या GR नुसार मदत करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. मागील सरकारने केंद्राच्या तिप्पट मदत पूरग्रस्तांना दिली होती, मात्र दीड वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची केवळ घोषणा केली आणि पैसे नसल्याचे कारण देत+
अजूनही एक रुपया मदत दिली नाही, मात्र एकीकडे सरकार थकीत कर्जपोटी 3000 कोटी रुपये कारखानदारांचे भरतेय, मात्र शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसे नसल्याचे सांगत आहे. शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरू आहे.
जेव्हा 2019 ला पूर आला तेव्हा भाजपा सरकारने ग्राउंडला उतरून मदत केली होती, अनेक मंत्री आणि+
नेते स्वतः पाण्यात आणि चिखलात उतरून मदत करत होते ते महाराष्ट्राने पाहिले आहेत. अनेक GR बदलले, नवीन काढले आणि तातडीने मदत पोहचण्यासाठी प्रभावी काम केले होते. मात्र या ठाकरे सरकारने अजूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना काहीच दिलं नाही, आता मराठवाड्यासह राज्यात प्रचंड पाऊस+
झाला आहे. त्यानेही नुकसान झाले आहे, त्यांनाही आधार देणे गरजेचे आहे.
Devendra Fadnavis यांनी पूरग्रस्तांसाठी काय केलं हे आता उशिरा का होईना Raju Shetti यांच्या धान्यात आलं हेही नसे थोडके. असो!+
थ्रेड
विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळ्या सुरू झाल्या की राष्ट्रवादी नेटाने महिला धोरणांवर बोलायला उभी राहते, "साहेबांचे महिला धोरण" या टॅगखाली मोठीमोठी भाषणं होतात. मात्र एकीकडे काही घटना अशा पुढं आल्या की नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्यांना साहेबांचं महिला धोरण समजलं का? की+
साहेबांचं महिला धोरण त्यांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी सोयीस्कर आहे हे कळायलाच मार्ग नाही. सर्रास बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना रोज घडताहेत त्यावर मात्र साहेबांचे धोरण सांगणाऱ्या रुपालीताई चाकणकर शांत असतात.
राज्यात ठाकरे सरकार हे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आणि+
पवार साहेबांच्या आशीर्वादानेच आहे, या सरकारने अत्याचाराच्या घटना रोखल्या पाहिजेत, मात्र अशा घटना घडवण्यात खुद्द राष्ट्रवादीच काही मागे नाही. पुण्याच्या कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली. एका महिला सरपंचावर हात उगारने, थेट+
महत्वाचा थ्रेड👇
हा एक असा चेहरा आहे की यांनीच अख्ख्या मावा आघाडीच्या भ्रष्टाचारी नेत्यांची झोप उडवली आहे. काल वाशीम दौऱ्यावर असताना शेणक्यांनी भाजपा नेते किरीटजी सोमय्या यांच्यावर शाईफेक आणि दगडफेक केली. मुळात लोकशाहीच्या गोष्टी करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ले करणं हे+
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत बसते का हेच पहावं लागेल. केकजिवी गुलामांनी केलेला पडळकरांच्या गाडीवरचा हल्ला आणि वडापावजिवी शेणक्यांनी केलेला सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला या मागची भीती स्पष्ट आहे. सोमय्यांनी चूक काय केली? यांचे खंडणीखोर बेधडक उघडे पाडले, चौकशा लावल्या, काहींना+
सत्तेतून पायउतार व्हावं लागलं अन त्याचा राग आता सोमय्यांवर हल्ला करून व्यक्त करत असतील तर सोमय्या योग्य मार्गावर आहेत.
सोमय्या सभागृहात नको हा शिवसेनेचा पहिला मुद्दा जर युतीसाठी असेल तर ती चूक होती, झाली. पण सोमय्या सभागृहात असते तर कदाचित दैनंदिन कामकाजात व्यस्त राहिले असते,+
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या केबिनमध्ये कधी कामानिमित्त गेलात तर विजयराज (दादा) डोंगरे यांच्या कामाची स्टाईल कळते, धडाकेबाज नेतृत्व आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर जिल्ह्यातली तरुण पोरं ज्यांच्याकडं आशेनं पाहताहेत ते विजयराज दादा एक वेगळं रसायन आहेत.+
मोहोळ तालुक्यातल्या कोणत्याही गावात गेलं की दादांचा हितचिंतक मिळणारच, इतकं काम या माणसानं उभं केलं, आष्टी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाण्याची योजना मार्गी लावण्यात दादांचा मोठा वाटा आहे. मनामनात घर निर्माण करणारा हा झुंजार नेता.
राजकीय क्षेत्रात एकेकाळी यशाच्या शिखरावर असताना+
हितशत्रूंमुळे खरंतर अत्यंत वाईट काळही विजयराज दादांनी पाहिला, त्यातून तावून सुलाखून आणि नव्या उमेदीनं पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली अन थेट जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती पदावर विराजमान झाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात 5 वर्षे पूर्ण सभापतीपद सांभाळणारा एकमेव+
"नाही जर बैलगाडा शर्यत सुरू केली तर नावाचा अजित पवार नाय, अख्ख्या महाराष्ट्राला माहितेय, ती सुरू करता येते, तामिळनाडू राज्याने ती सुरू केलीय" हे बोलणारे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार!
दादा, भाषणातच गोड गोड बोलतात, बेधडक आणि देधडक बोलतात हे फक्त भाषणातच. निर्णय घ्यायची वेळ+
येते तेव्हा दादा नाराज असतात. (नॉट रीचेबल😝)
शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी झऱ्यात 20 ऑगस्टला छकडा गाडी शर्यत भरवली आहे, मात्र अख्खं पोलीस प्रशासन आणि सरकार हादरलं आहे, गेल्या पाच - सहा दिवसांपासून पोलिसांचे जथ्थेच्या जथ्थे झऱ्याच्या पंचक्रोशीत ठाण मांडून+
आहेत, आता तर परिसरातील 9 गावात संचारबंदी लावलीय, गोपीशेठना अटक करण्याची तयारी या सरकारची चाललीय, अजित दादा या गोपीचंद पडळकरांची एवढी भीती सरकारला का वाटतेय?
लाखों लोकं त्या झऱ्याच्या मैदानाची वाट पाहताहेत, हजारोंच्या संख्येने शेतकरी आपला बैलगाडा घेऊन निघाले आहेत, पण सरकार घाबरलं+
थ्रेड👇
राज्यसभा खासदार शरद पवारांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे सभागृहात ऑन रेकॉर्ड सांगतात की, 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व जागा भरणार. पण वस्तुस्थिती पाहिली तर 31 जुलैपर्यंत यांनी काहीच निर्णय घेतला नाही. ना जागा भरल्या... ना प्रोसेस केली!
मग अजित दादांच्या+
या खोटारडेपणावर टीका व्हायला लागल्यावर, जाब विचारायला लागल्यावर त्यांचा बोलघेवडा पुतण्या आ. रोहित पवार दादांच्या मदतीला धावून आले. पण शेवटी तेही पवारच! त्यांनीही कशाचीही पर्वा न करता दिले खोटारडे ट्विट ठोकून..."त्यात लिहिलं की अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत वगैरे, त्यांनी+
एमपीएससीच्या जागा भरण्यासाठी राज्यपालांकडे 31 जुलै पूर्वीच यादी पाठवली आहे. वगैरे वगैरे...असं एक थोतांड ट्विट केलं. ( कदाचित अजित दादा शब्द पाळणारे वगैरे हे लिहीत असताना, सरकार आल्यावर 3 महिन्याच्या आत बारा कोरा करतो, नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, हे भाषण आ. रोहित+
महत्वाचा थ्रेड👇
28 व्या वर्षी अजून नीटसं मिसरूटही न फुटलेली यांची पोरं थेट कॅबिनेट मंत्री करायला येतात, ज्याला नीट चार शब्द बोलता येत नाही त्याला खासदारकीची स्वप्नं पडायला लागतात, आमदार होतात, ज्याचा बाप कित्येक वर्षे आमदार, मंत्री होता त्यांची मुलगी राज्यमंत्री करायला वेळ आहे+
मात्र बाप शेतात राबत असताना शेतकऱ्यांचा पोरगा अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतोय त्याला हे सरकार अधिकारी होण्यासाठी नीट व्यवस्था निर्माण करू शकत नाही, याची लाज स्वतः उद्धव ठाकरे आणि या सरकारच्या कर्त्याधर्त्या सर्वांनीच बाळगली पाहिजे. एका अधिकारी झालेला पण या ठाकरे+
सरकारच्या गलथानपणामुळे MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झालेल्या तरुण स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केल्याचं कळलं आणि खूप वाईट वाटलं. आतून अस्वस्थ आहे. खरंतर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, या राज्यात गेल्या दोन वर्षांपासून जे काही अंधाधुंद चाललंय त्याचा हा परिणाम आहे,+