महत्वाचा थ्रेड👇
शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद असल्याचं आज राज्यसभा खासदार @PawarSpeaks यांनी बोलताना सांगितले.
आता त्याच राष्ट्रवादीच्या शरद पवारांना शेतकऱ्यांची हत्या आणि त्यांची कारकीर्द याचीही आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे.

पवार साहेब,+
तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना 23 नोव्हेंबर 1994 या दिवशी आदिवासी गोवारी हत्याकांड घडले होते. गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपुरात आला होता. त्या दिवशी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्या मोर्च्यावर सरकारने लाठीमार केला अन त्यात एकूण 114 गोवारी बांधव मृत्यूमुखी पडले. हजारो+
जखमी झाले. ते तुम्ही सत्तेत असताना सरकार पुरस्कृत झालेले सर्वात मोठे हत्याकांड होते. तेव्हा महाराष्ट्र बंद केला होता का! त्या रक्तरंजित आरोळ्या अन जखमा महाराष्ट्र अजून विसरला नाही.

पवार साहेब, 9 ऑगस्ट 2011 ला पवनेच्या पाण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मावळमध्ये मोर्चा काढला होता.+
त्यावेळी राज्यात तुमचे आघाडी सरकार सत्तेत होते, पुतण्या अजित पवार उपमुख्यमंत्री होता. अन तुम्ही स्वतः केंद्रात मंत्री होतात. पण शेतकऱ्यांना भेटून न्याय देण्याऐवजी निष्ठुरपणे गोळीबाराचे आदेश दिले अन शेतकऱ्यांवर बेछूट गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामध्ये 3 शेतकऱ्यांची हत्या झाली तर+
शेकडो जखमी झाले. आघाडी सरकार पुरस्कृत अन तुम्ही सत्तेत असताना झालेली शेतकऱ्यांची ही दुसरी मोठी हत्या. हे सुद्धा महाराष्ट्र अजून विसरला नाही, पवनेचं पेटलेलं पाणी अन रक्तरंजित कहाणी...

पवार साहेब, आपण स्वतः केंद्रीय कृषिमंत्री असताना देशात तर आत्महत्या झाल्याच पण या राज्यातही+
लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या. त्या शेतकरी आत्महत्येचा आकडा आत्तापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. त्या आत्महत्या म्हणजे तुमच्या सरकारी धोरणाने केलेल्या हत्याच आहेत. त्याच प्रायश्चित्त कोण घेणार! हेसुद्धा महाराष्ट्र विसरला नाही. लाखो संसार उघड्यावर आहेत...

या घटना तर थोड्या जुन्या+
झाल्या. पण आज राज्यात महापुराने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतातलं पोटच्या पोराप्रमाणं जपलेलं पीक तर गेलंच पण मातीसुद्धा वाहून गेली, जनावरं गेली, काही शेतकऱ्यांचे निधन झाले, आपणकिती शेतकऱ्यांच्या बांधावर गेलाय? तेही जाऊद्या! आपण बसवलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून अजून बाहेर+
पडले नाहीत, ना आपला पुतण्या अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करायला गेलेत?

उलट राज्याचे मुख्यमंत्री ऑनलाइन पीकपाहणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताहेत. रेड कार्पेट टाकून पुराची पाहणी करणारे निर्लज्ज सरकार आहे हे. आता लहान पोरं सुद्धा आता शाळेत जायला लागली+
पण आपले मुख्यमंत्री मात्र घरातून अजून बाहेर पडत नाहीत, पवार साहेब.

भाजपावर शेतकरी हत्येचा आरोप लावताना आपण दहावेळा विचार करायला हवा. जे मोदी सरकार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 6 हजार रुपये रक्कम देते, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून+
देते, कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतीला आधार आणि नव्या तंत्रण्याची जोड देण्यासाठी ठोस पाऊल उचलते, नवीन कृषी कायदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देते त्या सरकारवर आरोप करताना आपण आपल्या काळात लावलेले दिव्यांचे काळे डाग गदडपणे या राज्यातल्या शेतकऱ्यांना+
अजून दिसतात.
या राष्ट्रवादीने वर्षानूवर्षे नागवलेले शेतकरी आज मोकळा श्वास घेताहेत, बाजार समितीत कुचंबणा होती, लूट होती, विविध विकास सोसायटीत अडवणूक होती, जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडवणूक होती, सत्ताधारी धनदांडग्यांना कोट्यवधींची कर्ज द्यायची अन सामान्य शेतकऱ्यांना तुमच्या बँका केवळ+
येरझारे घालायला लावायच्या, त्यात कित्येक शेतकरी खंगुन देवाघरी गेले असतील.
शेतकऱ्यांनी हाडाची काडं करून जपलेला, वाढवलेला ऊस राजकीय द्वेषापायी तुमच्या साखर सम्राटांनी फडातच वाळवला, जाळला! याचा महाराष्ट्र साक्षी आहे. हा जळजळीत वास्तव असलेला इतिहास आहे राष्ट्रवादीचा, महाराष्ट्र कधीच+
विसरला नाही. विसरू शकत नाही. स्थानिक स्वराज संस्था ताब्यात असताना सामान्य माणसाला ज्या यातना दिल्या त्याचे ओरखडे जिवंत आहेत कित्येकांच्या मनात...

भाजपाला शेतकरी हत्येचा आरोप लावताना अन जनरल डायरची आठवण काढून त्याच्याशी तुलना करताना राष्ट्रवादीच्या अन तुमच्या या कर्तृत्वाचा+
विसर पडू शकत नाही. तुमच्या या कर्तव्याची तुलना नेमकी कोणत्या घटनेशी करायची? विचारतोय महाराष्ट्र...!!!

- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ, सोलापूर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

6 Oct
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, पालघर, वाशीम व नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी मुसंडी मारत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. प्रामुख्याने तीन पक्षांशी लढत असून आणि ते तिन्ही पक्ष सत्तेत असूनही भाजपा+
जिल्हा परिषदेत पुढेच आहे. मात्र भाजपाला राज्यात धोका देऊन सत्तेत असणारी शिवसेना मात्र या निकालात थेट तिसऱ्या/चौथ्या क्रमांकाचा फेकली गेलीय.यात पालघरला सेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव करत जागा भाजपाने जिंकली आहे.ज्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांचे पतन होणे हे
+
त्यांच्या अपयशी कर्तृत्वाचे यशच म्हणावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला पाठीमागे टाकण्यात यश मिळवलं आहे.
नागपूरच्या बाबतीत भाजपाने राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात 2 जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत, नागपुरात पंचायत समितीच्या जागाही भाजपाच्या वाढल्या+
Read 5 tweets
7 Sep
थ्रेड 👇
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात प्रयाग चिखलीपासून ते नृसिंहवाडीपर्यंत पायी साधारण 97 किलोमीटरची पदयात्रा काढली, पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ती स्थगित केली हा विषय निराळा...+
खरंतर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे, ते योगदान कोणी नाकारणार नाही, पण काही राजकीय गणितं बिघडली, विशेषत्वाने बारामतीशी जवळीक अंगलट आली हे खरंय. आणि त्यांच्या वाट्याला राजकीय पराभव आला. कदाचित ते पुन्हा योग्य मार्गावर येत आहेत.

पण+
त्यांनी मागच्या 5 दिवसात जी यात्रा काढली त्यात एक आग्रही मागणी होती की, "2019 च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत द्या."
मी अनेकदा 2019 च्या पूरग्रस्त मदतीसंदर्भात देवेंद्रजींवर टीका झालेली ऐकली, मात्र आज खुद्द राजू शेट्टींसारखा जाणता शेतकरी नेता देवेंद्रजींच्या GR चा+
Read 9 tweets
6 Sep
थ्रेड
विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळ्या सुरू झाल्या की राष्ट्रवादी नेटाने महिला धोरणांवर बोलायला उभी राहते, "साहेबांचे महिला धोरण" या टॅगखाली मोठीमोठी भाषणं होतात. मात्र एकीकडे काही घटना अशा पुढं आल्या की नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्यांना साहेबांचं महिला धोरण समजलं का? की+ Image
साहेबांचं महिला धोरण त्यांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी सोयीस्कर आहे हे कळायलाच मार्ग नाही. सर्रास बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना रोज घडताहेत त्यावर मात्र साहेबांचे धोरण सांगणाऱ्या रुपालीताई चाकणकर शांत असतात.

राज्यात ठाकरे सरकार हे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आणि+
पवार साहेबांच्या आशीर्वादानेच आहे, या सरकारने अत्याचाराच्या घटना रोखल्या पाहिजेत, मात्र अशा घटना घडवण्यात खुद्द राष्ट्रवादीच काही मागे नाही. पुण्याच्या कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली. एका महिला सरपंचावर हात उगारने, थेट+
Read 7 tweets
21 Aug
महत्वाचा थ्रेड👇
हा एक असा चेहरा आहे की यांनीच अख्ख्या मावा आघाडीच्या भ्रष्टाचारी नेत्यांची झोप उडवली आहे. काल वाशीम दौऱ्यावर असताना शेणक्यांनी भाजपा नेते किरीटजी सोमय्या यांच्यावर शाईफेक आणि दगडफेक केली. मुळात लोकशाहीच्या गोष्टी करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ले करणं हे+
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत बसते का हेच पहावं लागेल. केकजिवी गुलामांनी केलेला पडळकरांच्या गाडीवरचा हल्ला आणि वडापावजिवी शेणक्यांनी केलेला सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला या मागची भीती स्पष्ट आहे. सोमय्यांनी चूक काय केली? यांचे खंडणीखोर बेधडक उघडे पाडले, चौकशा लावल्या, काहींना+
सत्तेतून पायउतार व्हावं लागलं अन त्याचा राग आता सोमय्यांवर हल्ला करून व्यक्त करत असतील तर सोमय्या योग्य मार्गावर आहेत.

सोमय्या सभागृहात नको हा शिवसेनेचा पहिला मुद्दा जर युतीसाठी असेल तर ती चूक होती, झाली. पण सोमय्या सभागृहात असते तर कदाचित दैनंदिन कामकाजात व्यस्त राहिले असते,+
Read 11 tweets
20 Aug
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या केबिनमध्ये कधी कामानिमित्त गेलात तर विजयराज (दादा) डोंगरे यांच्या कामाची स्टाईल कळते, धडाकेबाज नेतृत्व आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर जिल्ह्यातली तरुण पोरं ज्यांच्याकडं आशेनं पाहताहेत ते विजयराज दादा एक वेगळं रसायन आहेत.+
मोहोळ तालुक्यातल्या कोणत्याही गावात गेलं की दादांचा हितचिंतक मिळणारच, इतकं काम या माणसानं उभं केलं, आष्टी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाण्याची योजना मार्गी लावण्यात दादांचा मोठा वाटा आहे. मनामनात घर निर्माण करणारा हा झुंजार नेता.
राजकीय क्षेत्रात एकेकाळी यशाच्या शिखरावर असताना+
हितशत्रूंमुळे खरंतर अत्यंत वाईट काळही विजयराज दादांनी पाहिला, त्यातून तावून सुलाखून आणि नव्या उमेदीनं पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली अन थेट जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती पदावर विराजमान झाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात 5 वर्षे पूर्ण सभापतीपद सांभाळणारा एकमेव+
Read 6 tweets
19 Aug
"नाही जर बैलगाडा शर्यत सुरू केली तर नावाचा अजित पवार नाय, अख्ख्या महाराष्ट्राला माहितेय, ती सुरू करता येते, तामिळनाडू राज्याने ती सुरू केलीय" हे बोलणारे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार!
दादा, भाषणातच गोड गोड बोलतात, बेधडक आणि देधडक बोलतात हे फक्त भाषणातच. निर्णय घ्यायची वेळ+ Image
येते तेव्हा दादा नाराज असतात. (नॉट रीचेबल😝)

शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी झऱ्यात 20 ऑगस्टला छकडा गाडी शर्यत भरवली आहे, मात्र अख्खं पोलीस प्रशासन आणि सरकार हादरलं आहे, गेल्या पाच - सहा दिवसांपासून पोलिसांचे जथ्थेच्या जथ्थे झऱ्याच्या पंचक्रोशीत ठाण मांडून+
आहेत, आता तर परिसरातील 9 गावात संचारबंदी लावलीय, गोपीशेठना अटक करण्याची तयारी या सरकारची चाललीय, अजित दादा या गोपीचंद पडळकरांची एवढी भीती सरकारला का वाटतेय?
लाखों लोकं त्या झऱ्याच्या मैदानाची वाट पाहताहेत, हजारोंच्या संख्येने शेतकरी आपला बैलगाडा घेऊन निघाले आहेत, पण सरकार घाबरलं+
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(