हे बुध काटेवडीचे सदगृहस्थ आहेत मा. श्री. जीवन इंगळे. गेली 13 वर्षे हे स्वतः स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून फिरते वाचनालय चालवत आहेत. सायकलवरून काटेवडी भागातील सर्वसाधारण 15 गावात यांचं काम चालत.. वाचनाची आवड असणारी कोणीही व्यक्ती फक्त नाममात्र 1 रुपया
देऊन याचा आजीवन सभासद होऊ शकतो आणि अगदी आयुष्यभर पुस्तकं वाचू शकतो. स्पर्धा परीक्षापासून ते अध्यात्मिक पर्यंत आणि गर्भसंस्कारापासून बालसंस्कारापर्यंत, व्यसनमुक्ती अशी सर्व पुस्तकं यांच्या फिरत्या वाचनालयात उपलब्ध आहेत. वडील स्वातंत्र्य सैनिक असताना गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या
विचारांनी प्रेरित होऊन सुरु केलेल्या सामाजिक उपक्रम आजअखेर पर्यंत अविरतपणे सुरु आहे. आज त्यांच्या वाचनालयात 1600 पुस्तकं आहेत. आणि ते ही कोणतीही शासकीय मदत, अनुदान नसताना..
सलाम आपल्या कार्याला..🙏🏻🙏🏻 @LetsReadIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
क्रिप्टोकरन्सीला आभासी चलन किंवा डिजिटल चलन देखील म्हटले जाते. कारण ही क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजेच या क्रिप्टोकरन्सीचा आपण दुसऱ्या चालना प्रमाणे म्हणजेच भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे तसेच युरोपच्या युरो सारखे
व्यवहारासाठी शारीरिकदृष्ट्या वापर नाही करू शकत.
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे.
ज्याच्यावर सेंट्रल बँक किंवा कोणत्याही इतर आर्थिक संस्थांचे कोणतेच नियंत्रण नसते.
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आपण याचा वापर कोणत्या देशात करत आहोत त्यावर अवलंबून असते. म्हणजेच अनेक देशांत याला कायदेशीर परवानगी मिळालेली आहे.अनेक देशांत यावर बंदी घालण्यात आली आहे.
पांडव लेणी :
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २०००
वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या,
पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा,कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
रामकुंड :
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
एसटीची लालपरी हे पहिलं क्लास कास्ट तोडणारं मेटाफर आहे. माझ्यासाठी जास्त रोमॅंटिक. पहिलं खेडं- तालुका- ते- जिल्हा असं स्थलातंर आणि त्याला लागून आलेल्या सगळ्या व्यक्तीगत बदलाच्या व विकासाच्या शक्यता एसटी भोवती फिरत राहतात. एसटी म्हणजे आपल्यासाठीचं पहिला टेलिफोन, पहिला कॅाईन बॅाक्स,
पहिला मोबाईल, पहिली वरात, पहिला जिओ, पहिलं फोर जी, पहिली तालुक्याची मैत्रिण आहे. एसटी महामंडळाची इमेज काढून टाकली तर पन्नास टक्के आठवणी कमी होतील. फुटाणे ते संत्रा गोळी ते उसाचा रस,कुमार सानु ते गोडी शेव, उसनी गायछाप ते पुण्यनगरी पेपरातलं कोडं.. एसटी महामंडळं एक परिसंस्था एक इको
सिस्टम आहे. आपण त्याचा भाग होतो हे रोमॅंटिक आहे. चालक-कन्डक्टर त्यांचा खाकी ड्रेस रूबाबात टिकला पाहिजे.....दोरीला लटकवलेली घंटी वाजली पाहिजे... मुलगा लहान आहे त्याचे तिकीट काढणार नाही या साठी कंडक्टर दादाशी दोन ते तीन किलोमीटर तंडणारी आई किंवा आज्जी पण त्यांनी लाख युक्तिवाद केला
📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सार वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक
पद्मभूषण पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! 💐💐🙏🏻
सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपले आजही मनोरंजन करतात. पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी
माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.