थ्रेड
आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाईल, ज्या ज्यावेळी या हिंदुस्थानात हिंदू राजा झाला आहे त्यांनी हिंदूंच्या आस्था, अध्यात्म आणि सनातन संस्कृती रक्षणाचे काम केलंय, मग ते हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय असतील नाहीतर हिंदूंच्या आस्था आणि कित्येक मंदिरांचा+
जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी!
आज बनारसमध्ये काशी विश्वनाथ धाम लोकार्पणाचा डोळे दिपवणारा देखणा सोहळा पाहिल्यानंतर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा नरेंद्र मोदीजींबद्दलचा आदर लाखो पटीने वाढला आहे. हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेला खुल्या मनाने व्यापक पातळीवर+
मांडणारा एकमेव लोकशाहीचा राजा हे नरेंद्र मोदीजी आहेत. 303 खासदार हा फक्त आकडा आहे, पण त्यांच्या राजकीय भूमिकेला विरोध करणारी काँग्रेस असेल नाहीतर मूठभर पक्ष एकत्र येऊन तयार झालेली UPA असेल. असे कितीही बाटगे एकत्र आले तरीही मोदीजींना पर्याय होऊ शकत नाही. कारण काम बोलता हैं...+
आज ज्यावेळी काशी विश्वनाथ मंदिराच्या सोहळ्यात पंतप्रधान दाखल झाले ते केवळ औपचारिक म्हणून नाही, आजपर्यंत देशाने हिंदूंच्या अस्मिता समजणारा अन धाडसाने सनातन धर्माची मांडणी करणारा प्रधानसेवक पाहिला नव्हता. पण आज त्यांचं विशाल अनइ उदार रूप आपण पाहतोय, मान्य आहे त्याला 75 वर्ष लागली+
पण प्रत्येक हिंदू आज आनंदोत्सव साजरा करतोय कारण हा हिंदुस्थान आहे हे ठासून सांगणारा सेवक आम्हाला लोकशाहीतून मिळाला आहे. आज गंगेच्या पात्रात मंत्रोच्चार करत सूर्याला अर्ध्य देत स्नान करणारा सेवक पाहिला, गंगेच्या पात्रातून अभिषेक करायला पाणी घेऊन जाणारा सेवक पाहिला. ज्या हातानी+
प्रतिष्ठितांचे सत्काराचे करोडो सोहळे केले त्या मोदीजींच्या हातांनी मंदिरांच्या परिसरात ज्यांनी कष्टाने आपला घाम गाळला त्या मजुरांच्या शाब्बासकीचा सोहळा पाहिला. त्यांच्या पंगतीला बसून जेवण केलं, एवढंच नाही यांच्यासह पायरीवर बसून फोटो काढला. ज्यांना राजकारण वाटतंय त्यांनी खुशाल+
वाटू द्यावं असंही आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्हाला राजकारणच वाटत आलंय मात्र हे संन्यस्त आणि निस्वार्थी जमिनीवरचं जीवन आभाळाच्या उंचीला घेऊन जात असतं!

ज्यावेळी काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळा झाला त्यानंतर देशाला संबोधित करताना एका एका शब्दातून त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती+
येत होती, अभ्यासपुर्णता डोकावत होती, ते ऐकत असताना अक्षरशः मी भावुक झालो होतो कारण आजच्या दिवशी पुन्हा मोदीजींनी हिंदुस्थानातल्या करोडो नागरिकांच्या मनावर विजय मिळवला आहे.

केवळ हिंदू असल्याच्या वलग्ना काही कामाच्या नाहीत तुमच्याकडे हिंदुत्वाचे काम करण्याची दानत आणि हिंदूच्या+
अस्मिता जपण्याची, वाढवण्याची धमक पाहिजे, आणि ती मोदीजींमध्ये आहे. होय आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदुत्ववादीही आहोत हे सांगणारा आणि प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवून देणारा एकमेव नेता जर कोणी असले तर "हिंदुहृदयसम्राट प्रधानसेवक नरेंद्र दामोदरदास मोदी" आहेत! म्हणून अभिमान आणि गर्व+
आहे आम्ही या माणसाचे भक्त आहोत..🚩🚩🚩

- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ, सोलापूर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

12 Dec
नेत्याच्या वाट्याला देवपण येणं सोप्पं नसतं,आजही मराठवाड्याच्या कोणत्याही भागातली माणसं गाठ पडली अन राजकीय गप्पा निघाल्या तर मुंडे साहेबांची आठवण निघतेच! पण जी माणसं राजकीय चाकोरीच्या बाहेर आहेत, ज्यांना आपल्या कच्च्याबच्च्यासाठी कष्ट करावे लागतात ती माणसं डोळ्यात पाणी आणून मुंडे+ Image
साहेबांच्या आठवणी सांगतात, अनेकांच्या देव्हाऱ्यात मी मुंडे साहेब पाहिले आहेत. हे कमावणारा नेता विरळा आहे.

भाजपाचं राजकीय आणि पक्षीय अस्तित्व तसं नगण्य होतं तो संघर्षाचा काळ पायपीट करून, सायकलवर आणि सामान्य माणसांच्या गराड्यात झोकून देत धनदांडग्या प्रस्थापितांसोबत दोन हात करत+
सत्ताकाळापर्यंत केलेला प्रवास अद्वितीय आहेच, पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. गावगाड्यातल्या दुर्बल माणसाच्या खांद्यावर हात टाकत, त्याच्या डोळ्याचं पाणी पुसत आधार दिला, न्याय दिला, सत्ता त्यांच्यासाठी राबविली. बीड- अंबेजोगाईच्या मातीतून महाराष्ट्र+
Read 4 tweets
8 Oct
महत्वाचा थ्रेड👇
शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद असल्याचं आज राज्यसभा खासदार @PawarSpeaks यांनी बोलताना सांगितले.
आता त्याच राष्ट्रवादीच्या शरद पवारांना शेतकऱ्यांची हत्या आणि त्यांची कारकीर्द याचीही आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे.

पवार साहेब,+
तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना 23 नोव्हेंबर 1994 या दिवशी आदिवासी गोवारी हत्याकांड घडले होते. गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपुरात आला होता. त्या दिवशी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्या मोर्च्यावर सरकारने लाठीमार केला अन त्यात एकूण 114 गोवारी बांधव मृत्यूमुखी पडले. हजारो+
जखमी झाले. ते तुम्ही सत्तेत असताना सरकार पुरस्कृत झालेले सर्वात मोठे हत्याकांड होते. तेव्हा महाराष्ट्र बंद केला होता का! त्या रक्तरंजित आरोळ्या अन जखमा महाराष्ट्र अजून विसरला नाही.

पवार साहेब, 9 ऑगस्ट 2011 ला पवनेच्या पाण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मावळमध्ये मोर्चा काढला होता.+
Read 14 tweets
6 Oct
राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, पालघर, वाशीम व नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भारतीय जनता पार्टी मुसंडी मारत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. प्रामुख्याने तीन पक्षांशी लढत असून आणि ते तिन्ही पक्ष सत्तेत असूनही भाजपा+
जिल्हा परिषदेत पुढेच आहे. मात्र भाजपाला राज्यात धोका देऊन सत्तेत असणारी शिवसेना मात्र या निकालात थेट तिसऱ्या/चौथ्या क्रमांकाचा फेकली गेलीय.यात पालघरला सेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव करत जागा भाजपाने जिंकली आहे.ज्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे त्यांचे पतन होणे हे
+
त्यांच्या अपयशी कर्तृत्वाचे यशच म्हणावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला पाठीमागे टाकण्यात यश मिळवलं आहे.
नागपूरच्या बाबतीत भाजपाने राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात 2 जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्या आहेत, नागपुरात पंचायत समितीच्या जागाही भाजपाच्या वाढल्या+
Read 5 tweets
7 Sep
थ्रेड 👇
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात प्रयाग चिखलीपासून ते नृसिंहवाडीपर्यंत पायी साधारण 97 किलोमीटरची पदयात्रा काढली, पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ती स्थगित केली हा विषय निराळा...+
खरंतर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला आहे, ते योगदान कोणी नाकारणार नाही, पण काही राजकीय गणितं बिघडली, विशेषत्वाने बारामतीशी जवळीक अंगलट आली हे खरंय. आणि त्यांच्या वाट्याला राजकीय पराभव आला. कदाचित ते पुन्हा योग्य मार्गावर येत आहेत.

पण+
त्यांनी मागच्या 5 दिवसात जी यात्रा काढली त्यात एक आग्रही मागणी होती की, "2019 च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत द्या."
मी अनेकदा 2019 च्या पूरग्रस्त मदतीसंदर्भात देवेंद्रजींवर टीका झालेली ऐकली, मात्र आज खुद्द राजू शेट्टींसारखा जाणता शेतकरी नेता देवेंद्रजींच्या GR चा+
Read 9 tweets
6 Sep
थ्रेड
विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळ्या सुरू झाल्या की राष्ट्रवादी नेटाने महिला धोरणांवर बोलायला उभी राहते, "साहेबांचे महिला धोरण" या टॅगखाली मोठीमोठी भाषणं होतात. मात्र एकीकडे काही घटना अशा पुढं आल्या की नेमकं राष्ट्रवादीच्या नेत्यांना साहेबांचं महिला धोरण समजलं का? की+ Image
साहेबांचं महिला धोरण त्यांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी सोयीस्कर आहे हे कळायलाच मार्ग नाही. सर्रास बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना रोज घडताहेत त्यावर मात्र साहेबांचे धोरण सांगणाऱ्या रुपालीताई चाकणकर शांत असतात.

राज्यात ठाकरे सरकार हे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आणि+
पवार साहेबांच्या आशीर्वादानेच आहे, या सरकारने अत्याचाराच्या घटना रोखल्या पाहिजेत, मात्र अशा घटना घडवण्यात खुद्द राष्ट्रवादीच काही मागे नाही. पुण्याच्या कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली. एका महिला सरपंचावर हात उगारने, थेट+
Read 7 tweets
21 Aug
महत्वाचा थ्रेड👇
हा एक असा चेहरा आहे की यांनीच अख्ख्या मावा आघाडीच्या भ्रष्टाचारी नेत्यांची झोप उडवली आहे. काल वाशीम दौऱ्यावर असताना शेणक्यांनी भाजपा नेते किरीटजी सोमय्या यांच्यावर शाईफेक आणि दगडफेक केली. मुळात लोकशाहीच्या गोष्टी करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ले करणं हे+
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत बसते का हेच पहावं लागेल. केकजिवी गुलामांनी केलेला पडळकरांच्या गाडीवरचा हल्ला आणि वडापावजिवी शेणक्यांनी केलेला सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला या मागची भीती स्पष्ट आहे. सोमय्यांनी चूक काय केली? यांचे खंडणीखोर बेधडक उघडे पाडले, चौकशा लावल्या, काहींना+
सत्तेतून पायउतार व्हावं लागलं अन त्याचा राग आता सोमय्यांवर हल्ला करून व्यक्त करत असतील तर सोमय्या योग्य मार्गावर आहेत.

सोमय्या सभागृहात नको हा शिवसेनेचा पहिला मुद्दा जर युतीसाठी असेल तर ती चूक होती, झाली. पण सोमय्या सभागृहात असते तर कदाचित दैनंदिन कामकाजात व्यस्त राहिले असते,+
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(