#थ्रेड
मुलगी चीडचीड करते, तिचे मूडस्विंग होतात तर पाळीची तारिख जवळ येणार असेल किंवा पाळी आली असेल असं समजून तिला जपलं जातं.
पुढे चाळीशी नंतर Menopause जवळ आला किंवा आहे म्हणून पाळी जाताना किंवा गेली असताना तिची काळजी घेतली जाते आणि घ्यायलाच हवी त्यात दुमत नाही.
👇
मला नाही माहित मुलं चीडचीड, मूड स्विंग कसे सांभाळतात ? त्यांना पाळी येत नाही म्हणून त्यांचा राग-रुसवा, चीडचीड समजून घेतलीही जात नाही व त्यांना जपलंही जात नाही.
पण जपायला हवं समजून घ्यायला हवी त्यांची चीडचीड आणि मूडस्विंग.
👇
आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो तर ती मुलांची चीडचीड, राग-रुसवे, मूड स्विंग समजून घेण्यात ही हवी.निसर्गाने आपल्याला स्त्री पुरुष म्हणून विभागलं असलं तरी भावना ह्या दोघांच्या सारख्या असतात शिवाय बरेच hormone ही सारखे आहेत ज्या मुळे राग येतो मूड स्विंग होतात.
👇
आदर देणं, आदराने वागवणं ह्यात त्यांना समजून घेणं ही यायला हवं.
तेही आयुष्यात बर्याच गोष्टीतून जात असतात पण दुर्लक्षित होतात.
स्त्री ला पुरूषासोबत बरोबरी करायची असते
पण ह्या बाबतीत किती स्त्रिया समजून घेतात माहित नाही.
आपल्या मुलाची, भावाची, वडिलांची, नवर्याची चिडचीड होतेय
👇
ते राग रुसवा करताहेत तर खरंच आपण त्यांना तेव्हा समजून घेतो का ? किंवा त्या मागचं कारण समजून घेतो का ? "तो तसाच आहे, जाऊ दे रोजचंच आहे, बोलेल बसेल गप" ह्या दृष्टीकोनाने पाहतो ?
खरंच विचार करण्याची गरज आहे.
स्त्री रडते मोकळी होते पुरुष सहसा नाही रडत नाही आताल्या आत साठवतो
👇
त्याला समजण्याची आणि समजून घ्यायची गरज आहे.
मी खूप मुलींना गर्लफ्रेंड बायकोला पाहिलंय जरा काय झालं की भडकायचं त्या मुलावर, बॉयफ्रेंडवर, नवर्यावर
तुम्ही तुमच्या choice ने राहता ना त्याच्यासोबत नातं दोघांचं आहे मग त्याला dominate करायची गरज नाही तो राग काढण्याचं साधन नाही.
👇
त्याचा आनंद priority असली पाहिजे
खरंच त्याला समजून घेऊन जपलं पाहिजे
पण ह्या सगळ्यात कोणी कोणाला गृहीत धरू नये एवढंच!!
नाहीतर नवरा मारतोय, शिव्या देतोय, राग काढतोय आणि ही त्याचं मन, राग, मूड स्विंग सांभाळायला मार खातीये असं नको व्हायला...
-मध #Honey__ #म
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#थ्रेड
प्रत्येक गावात जवळचं, आवडीचं, आदराचं, एक वयस्कर माणूस असतंच अगदी तसेच मास्तर होते.
वय झालं होतं, जातील असं कोणाला वाटलं नव्हतं.
दसरा झाला व काही दिवसातंच ते देवाघरी गेले.
ते गेले तेव्हा सारं गाव निराश झालं, लोकं रडत होती,
बायका हुंदक्या देत देत रडत होत्या.
१
त्यांना पाहून त्यांची बारकी लेकरं पण रडायला लागली.
१५ दिवस दुखवटा होता सगळं बंद फक्त शेतातली कामं चालू.
भीती वाटत होती तेव्हा गाव ह्या सगळ्यातून सावरेल का?
खरंच ह्यांना किती दुःख झालंय, किती काय बोलतायेत, आठवणी सांगतायेत,
१३ दिवस त्यांच्या घरी लोकं बसायला जायची तेव्हाही
२
अश्रू आवरत नव्हते.
मास्तरांच्या घरच्यांना धीर द्यायला गेलेली माणसं स्वतःच खचल्यासारखी झाली. १५ दिवस शांत वातावरण होतं,
गावानीच धसका घेतला होता.
"शेवटी माणूस हाय कधीतरी जाणारंच माणसानी practical रहावं किती दिवस दुःख करणार" असे विचार असलेली लोकं अशी का वागतात?
३