#TheKashmirFiles

इतक्या यातना सोसल्या आहेत या काश्मिरी अल्पसंख्याक वर्गाने. पण फक्त पंडित म्हणून बघू नका,काही लोकांकडे.नाव असून जातीचे नाव लावणारा पहिला जगातील पंतप्रधान असेल.लेहेरू.
दोन विचारांच्या धारेतून लिहण्याचा प्रयत्न आहे.एक तटस्थ आणि प्रखर हिंदुत्ववादी.सर्व धर्म 1/25
समभाव या विचारधारेतून हे लिहण्याजोगे तर सोडा आपण विचार पण करू शकत नाही.
काश्मीर फाईल्स हा प्रॉपगेंडा मुव्ही की सत्य घटनांवर आधारित हे ज्याचं त्याने पाहून ठरवावं आणि त्याची त्यांना 'आजादी' आहे. काश्मीर मुद्दा, भारतीय सैन्य, काश्मिरी पंडित, काश्मिरी मिलिटंट आणि काश्मिरी मुस्लिम
2/
युवा वर्ग या सर्वांवर मी केलेल्या अभ्यासानुसारच माझं मत मांडलय ! मी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची 'शिंडलर्स लिस्ट'सोबत तुलना करणार नाही. पण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा भारताचा शिंडलर्स लिस्ट आहे, असच मला वाटतं. शिंडलर्स लिस्टमध्ये दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांना ज्यू
3/
समुदायाबाबत कसलीही सहानुभूती नव्हती आणि नाझींबाबतही त्यांना कसली चीड नव्हती. त्या चित्रपटात आपल्याला एकच गोष्ट दिसून येते की जिथे एक माणूस माणसांचच रक्त गाळण्यासाठी हपापलेला असतो तिथेच दुसरा माणूस तेच रक्त गळू नये, यासाठी धडपडत असतो. मानवी नरसंहार आणि ऑस्कर शिंडलरची माणुसकी
4/
दाखवण्याच्या दृष्टिकोनातून तो चित्रपट बनवला गेला होता. त्यात कोणत्याही देश, धर्म, समाज, समुदायाच्या भावना दुखावण्यासारखे काहीच नव्हते. मात्र भारताच्या भूमीवर भारतीय लोकांसोबतच घडलेला हा नरसंहार भयाण होता आणि आजही त्याच्या वेदना तितक्याच दुखावतात.

आपल्या देशात लेफ्ट विंग आणि
5/
राईट विंग नेहमीच एकमेकांवर चिखलफेक करत असतात. उदा. चित्रपटात जेएनयु दाखवणं, आजादी घोषणा, कम्युनिजम, माओ झेडॉंग, कार्ल मार्क्सचे पोस्टर, अभी के वजीर-ए-आलम (नरेंद्र मोदी) आणि त्यांचं 'सब चंगा सी' हे सर्व राजकीय मुद्दे घेऊन त्यानुसार मांडणी करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून हा
6/
चित्रपट एकीकडे झुकलेला आहे, असं मी मान्य करतो, पण ही कहाणी अशा स्वरूपात बाहेर येणं फार महत्त्वाचं होतं. दोन्ही बाजू माहिती पडणं गरजेचं आहे. कारण १९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. काश्मिरी हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार आणि
7/
काश्मिरी मिलिटंट्सचं खरं रूप जगासमोर आणण्याचाच प्रयत्न विवेक अग्निहोत्रीने केला आहे. आपण कोणाच्याही भावना दुखावल्या जातील यासाठी कित्येक गोष्टी टाळतो, पण प्रत्येकाला याची जाणीव झाली पाहिजे की एकेकाळी आपल्या धर्मावर असलेल्या भावनेच्या भरात वाहूनच दुसऱ्या धर्मीयांचा गळा घोटणारी
8/
टोळकी गेल्या हजारो वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी डोळे फाडून हा चित्रपट बघावा, सत्य पचलं नाही तर अ‍ॅसिडीटीच्या गोळ्या खाव्यात, पण बघावा.

त्याकाळी काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी एकही माणूस पुढे धजावला नाही, अपवाद बाळासाहेब ठाकरे ! मागे एका काश्मिरी पंडित पत्रकाराचीच मुलाखत
9/
पाहिली होती,त्यात त्यानेही हेच म्हटलं होतं की,'उस वक्त पुरे भारत में सिर्फ बालासाहब ही ऐसे राजनेता थे जो हमारी मदत के लिए आये'.याच कारणाने एका दृश्यात बाळासाहेबांचं नाव घेण्यात आलं आहे.त्यावेळी काश्मिरी हिंदूच पीडित नव्हते,तर काश्मीरमध्ये वास्तव्य करणारे इतर धर्मीयदेखील होते.
10
त्यांची कहाणी कोणीही जाणून घेतली नाही, कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याबाबत जास्त बोललं गेलं नाही. तत्कालीन पंतप्रधानांनीसुद्धा हात झटकले आणि न्यायव्यवस्थेनेही डोळ्यावर खरी पट्टी बांधली. आपल्याच देशात निर्वासित बनून राहणं त्यांच्या नशिबी आलं होतं. एका वैयक्तिक
11
धर्माची मक्तेदारीच येथे चालणार,हीच धारणा ठेऊन या धर्माधांनी काश्मीर पेटवलं होतं,ते आजही पेटतय!

चित्रपटाच्या अखेरीस एका स्त्रीला म्हणजे मुख्य नायकाच्या आईला लाकूड कापण्याच्या करवतीने कापल्याचं एक दृश्य आहे आणि ते खरं आहे. गिरीजाकुमारी टिक्कु नावाच्या काश्मिरी पंडित स्त्रीला
12
अशाच प्रकारे करवतीने कापण्यात आलं होतं. त्याआधी तिचं अपहरण करण्यात आलं, कित्येक दिवस तिचा बलात्कार करण्यात आला आणि अखेरीस तिचं शरीर त्या मशीनने कापून ते दोन तुकडे रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. हे केवळ गिरीजाकुमारीसोबतच घडलं नव्हतं, अनेक स्त्री-पुरुषांना असच मारण्यात आलं.
13
काश्मिरी युवा वर्ग हा आपल्या शेजारी राष्ट्राकडून आणि त्या राष्ट्रातील शांततेचे पुरस्कर्ते असलेल्या दहशतवाद्यांकडून जाणीवपूर्वक भडकावला जातो. त्यांना त्याचे पैसेही मिळतात. त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना भारताच्या आणि भारतीय सैन्याच्या विरोधात सोडलं जातं.

३७० असताना आणि इतक्या
14
विशेष सोयीसुविधा असतानाही काश्मीरमधला मोठा मुस्लिम युवा वर्ग का भरकटला गेला, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 'रलीव, सलीव, गलीव' हेसुद्धा त्यांना शिकवलं गेलं होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रपटात असलेला एक डायलॉग आहे 'इनके तो सरनेम भी हमारे है'! याचं कारण भारतातला मोठा मुस्लिम
15
वर्ग धर्मांतर केलेला आहे. काश्मीरमध्येच नाही तर आपल्या महाराष्ट्रात अनेक मुस्लिमांचे आडनाव मराठी आहेत. शांतीचा प्रतीक असलेला दाऊद इब्राहिम याचही आडनाव कासकर आहे. याच कारणाने सौदीचा मुस्लिम वर्ग भारतीय मुस्लिमांनाच काफिर समजतो, त्यांचा आदर करत नाही.

चित्रपटात फैज अहमद फैज
16
यांच्या दोन नज्म वापरल्या गेल्या आहेत. एक 'बोल की लब आजाद है तेरे' आणि दुसरी 'हम देखेंगे'. या दोन्ही जगप्रसिद्ध कविता भारतातील काही ठराविक समूहांकडून आणि संघटनांकडून काही वर्षांपूर्वी सरकारचा प्रतिकार करण्यासाठी वापरल्या गेल्या होत्या. पण त्या समूहांचा आणि त्या कवितांचा
17
काडीमात्र संबंध नाही. ८०च्या दशकात जिया उल हक यांच्या हुकूमशाहीमुळे पाकिस्तान पेटून उठला होता. त्याच हुकूमशाहीच्या विरोधात फैज अहमद फैज यांनी 'हम देखेंगे' हे क्रांतिगीत रचलं. याच काळात पाकिस्तानात साडी नेसण्यावर बंदी आणण्यात आली होती, तेव्हा प्रसिद्ध गायिका इकबाल बानो यांनी
18
काळी साडी नेसून जिया उल हक यांचा विरोध दर्शवण्यासाठी हे गाणं गायलं होतं. त्यावेळी पाकिस्तानात या गाण्यावर बंदी लादण्यात आली होती. हे गाणं केवळ त्यावेळेसाठीच मर्यादित असावं असं वाटतं, इतर ठिकाणी नाही. हे गाणं या चित्रपटात वापरलं गेलं हे उत्तम कारण त्या कवितेच्या मागे असलेलं
19
वास्तव आणि त्याची प्रत्येक ओळ सर्व लोकांना कळावी.

चित्रपटाच्या अखेरीस काश्मीरचं ज्याप्रकारे वर्णन केलं गेलं आहे, ते वाखाणण्याजोगं आहे. आजच्या केवळ दुधावरची साय चाखणाऱ्या युवा वर्गाला दुधाची खरी चवदेखील कळली पाहिजे. आपण नेहमी दंतकथा म्हणून वगळलेल्या साहित्यात ज्ञानाचा इतका
20
मोठा भांडार आहे, हे आपल्या कधीही लक्षात राहिलं नाही. दाढी वाढलेले ऋषी मुनी आपण धार्मिक दिसत असण्याचं कारण देऊन वगळले, मात्र त्याच ज्ञानी पुरुषांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक शोध लावले होते, त्याचे पुरावे आजही आपल्याकडे आहेत. काश्मीर हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रतीक होता आणि आजही
आहे. इसा मसिह म्हणजेच जीजस यांचा वयाच्या १३ ते २९ वर्षांचा काळ अज्ञात आहे, या काळात ते कुठे होते याची कोणालाही माहिती नाही आणि बायबलमध्येही त्याचा उल्लेख नाही. पण असं म्हटलं जातं की याच काळात ते भारतातल्या काश्मीरमध्ये आले होते आणि इथेच त्यांनी काही काळ वास्तव्य केलं. पायथागोर
22
ससुद्धा भारतात आला होता. मुहम्मद पैगंबर यांचा एक केसदेखील काश्मीरच्या हजरतबल या दर्ग्यात ठेवला आहे. अनेक बुद्धपुरुष काश्मीरमध्ये येऊन गेले आहेत.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दहशतवाद्यांनी अनेकदा सैन्याचा गणवेश घालून लूटमार, बलात्कार, हत्या असे कांड रचले आहेत आणि हे सत्य आहे.
23
पण याच सत्याचा चुकीचा वापरदेखील झाला.आपला भारत देश जगभरात जरी ऐकतेचा प्रतीक असला, तरी त्याने प्रांताच्या, धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या नावाने एकमेकांचे गळे कापणे जवळून पाहिले आहे. मध्ययुगीन आणि स्वात्र्यंत्योत्तर काळात दिन-दलितांवर झालेले अन्याय सर्वश्रुत आहेत.पण नाण्याच्या
24
दोन बाजू असतात, ती दुसरी बाजूही पुढे यायला हवी, ती कशा स्वरूपात येते ते महत्त्वाचं नाही, पण ती यायलाच हवी. द काश्मीर फाईल्स आपल्याला प्रत्येक बाजू दाखवतो. धर्मांचीसुद्धा आणि विचारसरणींचीसुद्धा !

- मोटाभाई गुजरातवाले😎🇮🇳🚩🤟🏻

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Mar 14
कश्‍मीर में अगर रहना है,अल्‍लाहू अकबर कहना है'।

प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड #Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3
Read 11 tweets
Mar 12
मातृत्वाचे समर्थपणे रक्षण !

आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देवच!तिच्या शिवाय हे जगचं कोणी पाहू शकत नाही.पण मनाला चटका लागणे म्हणजे काय? ते हे वाचल्यावर मन अगदी सुन्न होईल.बेळगांव (गंगावळी)येथील एक २८वर्षाची अश्विनी नावाची महिला तिच्याबाबतीत खूप हृदयद्रावक घटना घडली.हि महिला तिच्या
१/५ Image
तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती.बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो.आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते.अशी तिची पण होती पण डॉक्टरांनी
२/५
नॉर्मल प्रस्तुती होऊ शकणार नाही असं सांगितलं.सिझेरियन करावे लागेल.डॉक्टरांनी पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा(जुळं) जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पतीअरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.पण काळाच्या मनात वेगळचं होतं.पण ऑपरेशन
३/५
Read 5 tweets
Mar 9
@Dev_Fadnavis यांचे रोखठोक मुद्दे..

🔥या कटा मागे मोठे साहेब.
🔥 कटात महविकास आघाडीचे अनेक नेते, पोलीस अधिकारी,सरकारी वकिलांचा सहभाग.
🔥सरकारी वकील यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा.
🔥 सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग पुरावे सभापतींना सादर.
🔥 सीबीआय चौकशीची मागणी.
🔥अनिल देशमुख
१/४ Image
यांनी केवळ बदली नाही.इतर स्तोत्रं मधून पण पैसे कमिविले.
🔥देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल. रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपनियन द्यायचे? राजकीय नेत्यांनी आपल्याला त्यासाठी कशी मोकळीक दिली आहे.ही सर्व माहिती वकील प्रवीण चव्हाण यांना दिली आहे.
🔥जयंत पाटील यांचाही या क्लिपमध्ये
संवाद आहे.
🔥प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे positive केले याची संपूर्ण कथा प्रवीण चव्हाण सांगत आहेत.
🔥अजित पवार हे ऐकत नाहीत, दिलीप वळसे पाटील कसे कामाचे नाहीत.हे सांगताना मोठ्या साहेबांच्या कश्या सूचना आहेत.मोठे साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत.
🔥पोलिस ठाण्याच्या डायरीत
Read 4 tweets
Mar 9
#महिला_दिवस

काल महिला दिवस उत्साहात साजरा झाला.नकारात्मक गोष्टींचे लिखाण नको म्हणून टाळलं.
देशामध्ये लिंग गुणोत्तर २००१ साली ० ते ७ वयोगटातील १००मुलांमागे ९२७ मुली होत्या.जेव्हा २०११ साली शेवटची जनगणना झाली तेंव्हा हे प्रमाण इतक्या खाली सरकले होते की १९६१ नंतर देशातील हे १/१०
सर्वात कमी नोंदविलेले लिंग गुणोत्तर होते.१००० पुरुषांमागे ९४० स्त्रियां आहेत.आणि ० ते ७ वयोगटातील १०००मुलांमागे ९१८मुलींवर आले.याची कारणे शोधून हे प्रमाण वाढते किंवा सम प्रमाणात आणता किंवा ज्या दिवशी हे होईल तो खरा महिला दिवस मानला गेला पाहिजे.
दुसरा प्रमुख मुद्दा ज्यावर काल
२/१०
किती ठिकाणी चर्चा झाली.? तो म्हणजे बालविवाह.
अजून हि देशातील किती तरी राज्यात सर्रास राजरोज बालविवाह होताना दिसतात.हे प्रमाण एवढे आहे की जगातील ३बालवधू पैकी १भारतीय आहे.अजून पुढे गेलो तर २२.३०कोटींपैकी १०.२०कोटी बालवधू आहेत.त्यांचे वय १५पेक्षा कमी होते.आणखी थोडे पुढे जाऊयात
३/१०
Read 10 tweets
Mar 5
वैद्यकीय शिक्षण युक्रेन मध्येच का?

युक्रेन मध्ये सुमारे २००००हजार भारतीय शिक्षण घेत आहेत.हि माहिती भारतीय राजदूताने गेल्यावर्षी UN मध्ये दिली होती.या मध्ये MBBS,डेंटल आणि नर्सिंग यासाठीचे विदयार्थी जास्त आहेत.
मला त्या UPAच्या अज्ञान समर्थकांना सांगायचं आहे कि,भारतमध्ये२०२१
१/५
साली वैद्यकीय महाविद्यालयासाठी ८८००० जागा होत्या.वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी ८लाख विद्यार्थी बसले होते.म्हणजे ७लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे वैद्य होण्याचे स्वप्न अधुरे राहते.यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये डॉक्टर होयचं म्हणजे त्यासाठीचा लागणारा खर्च अफाट आहे.
२/५
एका विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च १ कोटी च्या घरात आहे.त्या तुलनेत युक्रेन मध्ये २५ लाखात डॉक्टर होते आणि तिथली प्रवेश परीक्षा आपल्या इतकी कठीण नाही व तिकडे लाचखोरी हि चालत नाही.युक्रेन मध्ये MBBS होण्यासाठी दरवर्षी ३-४लाख रुपये येतो.त्या तुलनेत आपल्या इथले उदाहरण घेतले तर तो
३/५
Read 5 tweets
Mar 4
#shanewarne

ऑस्ट्रेलियाच्या डॅनिस लिली नंतर जर कोणाची बॉलिंग अँक्शन आवडली असेल तर #shanewarne चीच! भारतातील क्रिकेटचे चाहते तर रस्त्याने चालताना देखील बॉलिंग अँक्शन्स करताना दिसतात. #shanewarne ची बॉलिंग ऍक्शन कोणी केली नसेल असा क्वचितच दिसेल. #Mike_Gatting ची विकेट म्हणजे १/३
क्रिकेट प्रेमींना दिलेली मेजवानी जणू. #BallofCentury म्हणून या बॉलची घोषणा झाली.गोलंदाज तज्ज्ञांनी सांगितले की, वॉर्नने ९० च्या कोनापेक्षाही अधिक कोनात चेंडू फिरवला होता. शारज्याच्या मॅचेस सरकारी टीव्ही पहायचो त्यावेळच्या क्रिकेट प्रेमींना सचिन Vs वॉर्न च्या आमना- सामन्याची २/३
चर्चा असायची.शेन वॉर्न हे जगातील एकमेव असा गोलंदाज आहेत ज्यांनी ३देशांविरुद्ध १०० हून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. शेन वॉर्न यांनी इंग्लंडविरुद्ध १९५, न्यूझीलंडविरुद्ध १०३ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३०बळी घेतले.
रिस्ट विझार्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या #shanewarne ला
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(