Sharad Pawar Profile picture
Jun 30 28 tweets 4 min read
आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्या अनुषंगाने घडत असलेल्या विविध राजकीय घडामोडींविषयी आपले विचार व्यक्त केले.

bit.ly/3uh3kvM

#Pressconference
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे, कदाचित त्यांनाही याची कल्पना नसावी. भाजप कार्यपद्धतीमध्ये आदेश दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. मागच्या काळात जे मुख्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता.
पण एकदा आदेश आला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी आज घालून दिले. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणालाच माहीत नव्हत्या.
एकदा मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्याच यंत्रणेत अन्य पदे स्वीकारण्याची उदाहरणे महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रिमंडळामध्ये स्व. शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते, चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा ते माझ्या मंत्रिमंडळात सहभागी झाले.
शंकरराव चव्हाण यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री झाले, त्यांच्या मंत्रिमंडळात चव्हाण सहभागी झाले. अलीकडे अशोकराव चव्हाण हे देखील मुख्यमंत्री होते, त्यांनीही त्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडलेली आहेत.
आता मुख्यमंत्री झाले ते एकनाथ शिंदे ठाण्याचे लोकप्रतिनिधी आहेत. अनेक वर्षे ठाण्यात त्यांचे काम आहे. पण ते मूळ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आहे. योगायोग असा की, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे साताऱ्याचे होते.
त्यानंतरच्या काळात मी मुख्यमंत्री झालो, माझेही मूळगाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. तिथूनच आम्ही बारामतीला गेलो. बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हे देखील सातारा जिल्ह्यातीलच होते. त्यामुळे सातारा जिल्ह्याला सुद्धा लॉटरी लागली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
आज एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझी अपेक्षा अशी आहे की, राज्याचा प्रमुख झाल्यानंतर तो व्यक्ती राज्याचा प्रमुख होतो. तो कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी असेल पण शपथ घेतल्यानंतर तो राज्याचा प्रतिनिधी असतो.
राज्याच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी, अशी साधारण अपेक्षा माझ्यासारख्याची आहे. मी त्यांना हे बोलून दाखविले, तसेच अंतःकरणापासून त्यांना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील लोकांना बाहेर नेण्यास प्रभावी ठरले. ३८ आमदार बाहेर जातात, ही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासंबंधीची कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे. हे नियोजित होते का, याबद्दल मला कल्पना नाही.
पण जे ऐकायला मिळते आहे त्यानुसार इथून सूरतला जाणे, तिथून गुवाहटीला व्यवस्था होणे, त्यानंतर पुन्हा गोव्याला येणे, या सर्व गोष्टी काही एकाएकी घडत नाहीत.
माझ्या मते, उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीनुसार एखाद्यावर विश्वास टाकल्यानंतर त्यावर पूर्ण जबाबदारी ते देत असत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची आणि विधिमंडळाची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्याचा कदाचित हा परिणाम आहे की काय, याबद्दल मला माहिती नाही.
पण ज्यावेळी ३९ लोक राज्याच्या बाहेर जातात, त्यांची मते काही वेगळी असतात तेव्हा त्याच्यात दुरुस्ती करण्यास काही वाव राहत नाही.
माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी क्रमांक दोनची जागा आनंदाने स्वीकारली असेल असे दिसत नाही. त्यांचा चेहराही हे सांगत होता. ते नाखूष आहेत.
त्यांनी नागपूरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. तिथे एकदा आदेश आल्यानंतर तो पाळायचा असतो. कदाचित त्यांच्यावर असे संस्कार असावेत, त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी हे पद स्वीकारले.
शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार वारंवार जे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलत आहेत, त्यात काही अर्थ नसून ते खोटं आहे. यात राष्ट्रवादी व काँग्रेसचा काही संबंध नाही. पण लोकांना काहीतरी सांगायला हवं म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसचे नाव घेतले जात आहे.
यामध्ये अन्य कारणे असू शकतात. त्याच्या खोलात जावे लागेल. खोलात गेल्यानंतर नाही त्या गोष्टी पुढे येतील. त्यामुळे कुणी खोलात जाऊ इच्छित नाही.
शिंदे सरकारकडे आज बहुमत असल्याचे दिसते त्यामुळे इतर विचार करण्यात काही अर्थ नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेव्हा कळले की त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यावेळी त्यांनी ग्रेसफुली आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना संपुष्टात आलेली नाही आणि संपणार देखील नाही. यापूर्वी भुजबळ यांनी बंड केले होते, तेव्हाही काही झाले नाही. भुजबळांसोबत जे लोक आमच्याकडे आले, त्यातला एक सोडून सर्व पराभूत झाले. भुजबळ स्वतः पराभूत झाले. नारायण राणे यांनी बंड केले. त्यांचाही पराभव झाला.
शिवसेनेत हे काही आज झालेले नाही. संघटना अशी संपत नसते. माझे उदाहरण सांगतो. १९८० साली माझ्या नेतृत्वाखाली ६७ आमदार निवडून आले. सहा महिन्यांनी मी भारताबाहेर सुट्टीसाठी गेलो होतो. दहा दिवसांनी परत आल्यानंतर ६७ मधील फक्त ६ सहा लोक शिल्लक राहिले होते.
मी अचानक पाचच लोकांचा नेता झालो. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मला सोडून गेलेल्या सर्व लोकांचा पराभव झाला.
ईडी आणि केंद्रीय यंत्रणांची मदत हल्ली घेतली जाते त्याचे परिणाम दिसतात. अनेक विधानसभेचे सदस्य चौकशीच्या नोटीसा आल्याचे सांगतात. ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. पाच वर्षापूर्वी ईडी हे नाव देखील आम्हाला माहीत नव्हते. आज तर गावखेड्यात देखील लोक गमतीने तुझ्या मागे ईडी लागेल असं म्हणतात.
या यंत्रणेचा उपयोग राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांच्या लोकांसाठी केला जातो. माझ्याकडे इन्कम टॅक्सच्या वतीने असेच एक प्रेमपत्र आले आहे. २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती त्याची चौकशी आता करत आहेत.
.२००९ साली देखील मी लोकसभेला उभा होतो, २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो, तसेच २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे. सुदैवाने त्याची सर्व माहिती माझ्याकडे व्यवस्थित ठेवलेली आहे.
त्यामुळे माहिती देण्याची मला चिंता नाही. या विभागाच्या कार्यक्षमतेमध्ये गुणात्मक वाढ झाली आहे. इतक्या वर्षांची माहिती गोळा करण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे आणि तेही ठराविक लोकांची माहिती गोळा करणे, म्हणजे धोरणात्मक बदल झालेला दिसतो.
मी १९६७ पासूनचे सर्व राज्यपाल पाहिले. प्रत्येक राज्यपालांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसंबंधी हल्लीच्या राज्यपालांकडून काय झालं हा चर्चेचा विषय आहे. या पदाची प्रतिष्ठा राखण्यासंबंधी त्यांनी अधिक प्रयत्न करायला हवे, असा आमचा ते आल्यापासूनचा अनुभव आहे.
पक्ष संघटना ही वेगळी असते आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असतो. पक्ष हा तिकीट देतो, पक्ष निर्णय घेतो आणि तुम्हाला लोकांसमोर नेतो. लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हातभार लावतो. निवडून आलेले लोक पाच वर्षांसाठी असतात. पक्ष हा कायमचा असतो.
आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जरी संकट आले आहे तरी उद्या ठाकरे जेव्हा लोकांमध्ये जातील आणि लोकांना मत देण्याची संधी मिळेल, तेव्हा उलटं चित्र दिसेल, असे मला वाटते.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sharad Pawar

Sharad Pawar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PawarSpeaks

Jun 23
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्यातील वर्तमान परिस्थितीवर भूमिका मांडली.

#Pressconference Image
महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे. Image
प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण विधानसभेचे जे सभासद महाराष्ट्राबाहेर गेले, ते पुन्हा राज्यात आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तुस्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल. Image
Read 14 tweets
Jun 21
In the meeting of representatives of various opposition parties held in New Delhi today to deliberate on the candidate for the Presidential Election. We have unanimously chosen Shri Yashwant Sinha as the common candidate of the opposition parties for the Presidential Election. Image
In his long and distinguished career in public life, Shri Sinha has served the nation in various capacities and he is eminently qualified to uphold the secular and democratic character of the Indian Republic and its constitutional values. Image
We have given a candidate who can truly serve as the custodian of the constitution & stop the current government from doing further damage to Indian Democracy & India’s social fabric. A committee has been formed to steer Shri Sinha’s campaign which will start working from today. Image
Read 4 tweets
Jun 21
पिछले दो-ढ़ाई साल में यह तिसरी बार हुआ है। पिछली दो बार विधायक उठाने का काम हुआ। पिछली बार हमारे विधायकों को हरियाणा, गुड़गांव मे रखा गया था। वहाँ से वो निकलकर आये, उसके बाद उद्धव ठाकरे जी का सरकार बना।

#NewDelhi #PressConference
पिछले ढ़ाई साल से महाराष्ट्र की सरकार ठिक तरह से चल रही है। कल महाराष्ट्र विधान परिषद का इलेक्शन हुआ। एनसीपी के दो उम्मीदवारों के लिए वोटों का जो कोटा तय किया गया था, वो उन्हें मिला। हमारी पार्टी के विधायकों ने डिसिप्लिन से वोटिंग किया।
हमारी फ्रंट का एक उम्मीदवार जीत नही सका, ये बात सच है। मुंबई वापस जाने के बाद इस पर चर्चा करेंगे। इस में कुछ ना कुछ रास्ता निकलेगा ऐसा मुझे भरोसा है। महाराष्ट्र सरकार की तीन सहयोगी पार्टीयों मे सही तालमेल है।
Read 6 tweets
May 23
वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद वाटला.
दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे.
व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली.
पुण्याचा शिक्षण क्षेत्रात लौकिक आहेच. व्यापाराचे विद्यापीठ या ग्रंथाच्या प्रकाशनाने व्यापारी क्षेत्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे म्हणून देखील पुणे शहराचा नावलौकिक होईल. या पुस्तकातील प्रत्येकाची जीवनगाथा जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट, सकारात्मकता, शिस्त, चिकाटी हे गुण दर्शवते.
Read 4 tweets
May 22
काही दिवसांपूर्वी माझी भेट घेण्यासाठी काही लोकांना विनंती केली होती. श्री. दवे यांनी यासंदर्भात वेळ मागितला होता. त्यानंतर आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याची कल्पना देऊन त्यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले.
#pressconference #Pune Image
जिल्हाध्यक्षांकडून समजले की, दवेच नाही तर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहूनही अनेक लोक भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नऊ ते दहा संघटनांचे साधारण ४० लोक आले होते. ज्यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले.
त्यापैकी त्यांच्यात माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी विधाने केली त्यासंबंधीची अस्वस्थता होती.याबद्दल त्यांना सांगितले की, पक्षांतर्गत त्या विधानांविषयी चर्चा झाली असून अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही जाति-धर्मावर न बोलता धोरणात्मक कार्यक्रमावर बोलण्याचा अधिकार आहे असा निर्णय झाला.
Read 20 tweets
May 18
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.

#MumbaiUniversity #exhibition
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(