#Thread : पी.एफ.आय वर बंदी का ? (भाग १)
सध्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. काल, गृह मंत्रालयाने या संघटनेवर आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या जवळपास सगळ्याच संघटनांवर बंदी आणली. यावरून नेहमी प्रमाणे 'Usual Suspects रडू लागले. 1/17
पण, या गोष्टीकडे लक्ष न देता, पी.एफ.आय हि संघटना किती धोकायदायक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
केरळ हि काही वर्षांपासून 'जिहाद' चे संगोपनक्षेत्र झाल्यासारखे झाले आहे. याचे कारण तिथले सरकार आणि तिथले लोकसंख्याशास्त्र अर्थात 'डेमोग्राफी'. 2/17
२००६ मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या नावाने एक इस्लामिक संघटनेची स्थापना करण्यात आली. अनेक इस्लामिक संघटनांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली. 3/17
कर्नाटकातील नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट, कर्नाटकातील फोरम फॉर डिग्निटी किंवा वेस्ट बंगाल मधील नागरिक अधिकार सुरक्षा समिती अश्या संघटना पी.एफ.आय स्थापन करताना एकत्र आल्या. हि नावं पाहून कोणालाही याच्या मागे इस्लामिक कट्टरवाद असू शकेल याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. 4/17
२००६ मध्ये स्थापन झालेली हि संस्था अश्याच पद्धतीची नावं असलेल्या विविध संस्थांशी हात मिळवणी करत आज भारताच्या २४ राज्यांपर्यंत पोहोचली होती. केवळ एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या संस्थेचे काम सुरु होते.
एखादी संस्था 'सामाजिक' काम करत असेल तर त्यात हरकत काय ? 5/17
असा प्रश्न काही तथाकथित पुरोगामी लोकांना पडू शकतो, पण पी.एफ.आय च्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या नावाखाली, 'धर्मांतरण, जातीयवादी दंगे, इस्लामिक कट्टरवादातून प्रेरित झालेले तरुण तयार करणे किंवा इस्लाम च्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या विरोधात आकस निर्माण करणे आणि कालांतराने… 6/17
…त्यांना संपवून टाकणे' असे सगळे सुरु आहे, हि गोष्ट २०१२ साली केरळ मध्ये असलेल्या काँग्रेस सरकार ने हायकोर्ट ला सांगितली होती.
या संघटनेचे खरे उद्देश तिथून दिसायला सुरु झाले जेव्हा यांचे काही डॉक्युमेंट्स काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. 7/17
त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचे २०४७ च्या बद्दलचे व्हिजन त्यांनी मांडले होते. डॉक्युमेंट च्या एका पेज स्पष्टपणे नमूद केले आहे, 'भित्र्या हिंदू समाजाला पुन्हा पराजित करून, इस्लामिक शासनाचे पर्व पुन्हा एकदा भारतात आणायचे आहे. 8/17
२०४७ साली, आपल्याकडे राजकीय ताकद आली कि आपण पुन्हा एकदा आपण या भारतावर आपल्या इस्लामिक वंशजांप्रमाणे राज्य करू'' 9/17
दुसऱ्या एका पानात नमूद केले आहे कि, 'आंबेडकर आणि संविधान यांच्या नावाचा वापर करून, एस.सी, एस.टी,ओ.बी.सी समाजातील लोकांना हिंदूंमधील 'तथाकथित उचभ्रु लोकांच्या विरोधात उभे करणे, त्यांच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि त्यांना आपल्या बाजूने… 10/17
…लढायला प्रवृत्त करणे. जेणेकरून, येत्याकाळात भारतात इस्लामिक राजवट निर्माण करण्याचा आपला मार्ग सुसज्ज होईल' 11/17
'बहुतांश मुस्लिम समाजाला, बाबरी मशीद आणि लिंचिंग ची आठवण करून देणे गरजेचे आहे, असे केल्याने त्यांच्या मनात कायम हिंदूंच्या विरोधात एक राग राहील व याचाच वापर आपल्या सरकारच्या व हिंदूंच्या विरोधात करता येईल. 12/17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्र करायची सगळी तयारी केली आहे अशी धारणा मुसलमान समाजाच्या मनात निर्माण झाली पाहिजे' असे अजून एका पानात नमूद केले आहे. 13/17
'योग आणि इतर अश्या अभियाने घेऊन, लोकांना एकत्र आणून पी.एफ.आय. च्या अंतर्गत त्यांना वेपन्स ट्रेनिंग देणे हा एक उद्देश आहे. असे करण्यासाठी मुस्लिम बहुल भागांमध्ये प्लॉट विकत घेऊन त्या जागांवर अश्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यात यावी. 14/17
या जागांची माहिती केवळ ठराविक लोकांनाच असेल याची काळजी घ्यावी. मदत लागल्यास आपल्याला बाहेरील इस्लामिक देशांकडून मदत घ्यावी लागेल. सध्या तुर्की सोबत पी.एफ.आय चे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले आहेत, अजून काही इस्लामिक देशांसोबत सुद्धा नक्की होतील' 15/17
असे काही मुद्दे या डॉक्युमेंट मध्ये आढळून आले. पी.एफ.आय या संघटनेची मूळ उद्दिष्टे या देशामध्ये इस्लामिक राजवट निर्माण करणे आहे हे या आधी वेळोवेळी दिसलेलेच आहे. या लेखात मी केवळ त्यांच्या उद्दिष्ठानची माहिती सांगितली. 16/17
पुढच्या थ्रेड मध्ये या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कोणकोणती पाऊले उचलली व देशविरोधी कारवाया कश्या घडवून आणल्या या विषयी लिहणार आहे... 17/17
#Thread : UNGA Speech @DrSJaishankar
२५ सप्टेंबर २०२२, ७७ वी यु.एन. जनरल असेम्ब्ली,
'भारत, स्वतःचा कोलोनियल इतिहास मागे टाकून, पुढच्या २५ वर्षात विकसनशील देशापासून संपूर्ण विकसित देश झाला असेल" हे वाक्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या... 1/16
...भाषणातून येताच माझे कान हे भाषण नीट ऐकण्यासाठी टवकारले गेले. कालचं, परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण हे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 2/16
१९७७ साली, अटल बिहारी वाजपेयी जनता पार्टीच्या सरकार मध्ये परराष्ट्र मंत्री होते, तेव्हा त्यांनी ३२ व्या यु.एन.जनरल असेम्ब्ली ला संबोधित करताना भारताबद्दलचे व्हिजन मांडले होते. त्याची पूर्तता एस.जयशंकर यांच्या भाषणात होताना दिसली. 3/16
#POST : राजपथ ते 'कर्तव्यपथ' !🇮🇳
इंद्रप्रस्थ असल्यापासून ते न्यू दिल्ली पर्यंतचा या शहराचा आणि शहरामुळे संपूर्ण भारताचा प्रवास हा मोठा रोमांचक आहे हे वेगळे सांगणे गरजेचे नाही. दिल्लीने अनेक राजवटी पहिल्या.
(1/16)
स्वकीय, परकीय अश्या सगळ्या राजवटींना स्वतःमध्ये सामावून घेत असताना या शहराचे स्वतःचे अस्तित्व काही प्रमाणात धूसर झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मुघल आले त्यांनी इथली नवे बदलली, शहरांची नावे स्वतःच्या राजवटीला साजेशी आणि केवळ साजेशीच आहेत म्हणून नाही तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्यासाठी म्हणून बदलली.
आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात पाहून त्यावर टिपण्या द्यायची एक वाईट सवय लागली आहे ! नुकताच सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त साजरा होणार शिक्षक दिवस साजरा झाला आणि लगेचच जातीयवाद्यांनी...
(1/12)
...जातीयवादाच्या काड्या पेटवायला सुरुवात केली.
ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस हाच शिक्षक दिवस म्हणून का साजरा करावा यावर अनेक कारणे देत सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या कर्तृत्वावर चिकलफेक करण्याचे कार्य, कोणी पाटील नावाचे डॉक्टर करताना दिसले.
खरंतर हे डॉक्टर, कायमच त्यांच्या जातीयवादी विधानांमुळे कुख्यात आहेतच ! पण या गोष्टीवर एक सविस्तर उत्तर देणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख लिहण्याचा घाट.
डॉ. पाटलांना सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर चिखल फेक करण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे त्यांची जात.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या अनेक वर्षांसाठी गुलाम होतो हे काही वेगळं सांगणं आवश्यक वाटत नाही.आपल्या शालेय जीवनातील पुस्तकांमध्ये आपण नाझी होलोकास्ट बद्दल नक्की वाचलं असेलच... 1/11
...पण कधी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची काय अवस्था झाली होती आणि त्यांना काय सहन करावं लागलं होतं या बद्दल कधी वाचलं आहे का ? नक्कीच नाही ! 2/11
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस पार्टीशन रिमेम्बरंस होरर्स डे म्हणून ओळखला जाईल असे सांगितल्यावर आपल्या देशातील तथाकथित पुरोगाम्यांनी, व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांनीच याचा कडाडून विरोध केला, हे तेच आहेत जे स्टीवन… 3/11
#Thread : म.वि.आ सरकार चे पतन, शरद पवार आणि इतिहासाची पुनरावृत्ती !
भारताच्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली झालेल्या आपण पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत. आघाड्या येतात, आघाड्या तुटतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.... 1/20
...यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हि एका दृष्टीने इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. 2/20
१९७८ साली, जून-जुलै महिन्यातच अधिवेशन सुरु असताना, रेड्डी काँग्रेस (यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंत दादा पाटील, सुशील कुमार शिंदे) मधील नेत्यांनी शरद पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं पाहिलं आघाडी सरकार पडलं आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 3/20
#Thread : नॉर्थ काश्मीर - बॉम्बिंग आणि शेलिंग पासून मुक्त !
अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काय फरक पडला ? दहशतवादी कारवाया कमी झाल्या का ? असा प्रश्न जसा अनेक वेळेला विरोधकांना पडतो तसाच सरकारच्या समर्थकांना देखील पडतो. याचेच उत्तर या वृत्तात आहे. 1/9
उत्तर काश्मीर मधील माचील सेक्टर मधील दुधी या गावातल्या लोकांनी २०१९ च्या आधी सीझफायर वायोलेशन मुळे
अनेक वर्ष अशांततेचा सामना केलेला आहे. 2/9
पाकिस्तान्यांनी अनेक वेळेला बॉम्बिंग आणि शेलिंग केल्यामुळे इथल्या रहिवास्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर काही कुटुंबियांना जवळच्या लोकांना मृत्युमुखी पडताना देखील पाहायला लागले आहे आणि हे असेच गेली अनेक दशके सुरु आहे. 3/9