#सत्तासंघर्ष -3
एकनाथ शिंदे व त्यांचे वकील सांगत आहेत की आम्हाला MVA नको होती. त्यांच्यासाठी काही प्रश्न

१) MVA नको होती तर अडीच वर्षे मंत्रीपद कस काय घेतलं ?
२) सत्तास्थापनेच्या बैठकीत (नेहरू सेंटर) नार्वेकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत कशाला गेला होता ? ( ५/१) Image
३) विधिमंडळ नेत्याच्या जबाबदारीने सत्तास्थापने साठी अदित्य ठाकरे यांच्या सोबत सकाळीच 7-30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट का घेतली ?

४) राज्यपालांना का कळवले सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे परंतु एकूण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत द्यावी ( ५/२)
५) राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून आपणांस निमंत्रित केले आणि सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ते आवाहन का स्वीकारले !

तेव्हा MVA नको होती का ? तेव्हा कळलं कस नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, आपण युतीमधून लढलो आहोत, आघाडी नको. ( ५/३)
६) सगळ्यात महत्वाची अन मजेशीर गोष्ट, या 2019 च्या सत्तास्थापने वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पळून चाललेल्या एका आमदाराला विमानतळाजवळच्या हॉटेलवर पकडून SUV गाडीत घालून तुम्ही आणि मिलिंद नार्वेकरांनी वाय बी चव्हाण सेंटरला आणून शरद पवारांसमोर हजर करणारे आपणच होता ना ? (५/४)
७) आपण एवढे जुने जाणकार नेते, आपले वकील कौल साहेब सांगतात, आम्हाला आघाडी मान्य नाही. लोकांनी आम्हाला युतीसाठी मतदान केलंय. म्हणून आम्ही परत युती सरकार आणलं; पण 2019 ला MVA सरकार आणण्यासाठी विधिमंडळ नेते म्हणून आपण फार धडपड करत होता ते पण सांगा कोर्टात.! (५/५)
#महाराष्ट्र

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vijay Gite- Patil

Vijay Gite- Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kingsmanT11

Mar 4
#Thread
छ. शिवाजी महाराजांचां वस्तुनिष्ठ व खरा इतिहास वाचण्यासाठी काही शिवचरीत्र व पुस्तके.

१) छत्रपती शिवाजी - सेतुमाधव पगडी
२) कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे - शिवचरित्र
३) छत्रपती शिवाजी महाराज - पुर्वाध आणि उत्तरार्ध- वा.सी बेंद्रे
४) श्री शिवछत्रपती - त्र्यं. श. शेजवलकर.👇
५) छ. शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ- जयसिंगराव पवार
६) शिवाजी अँड हिज टाईम्स - जदूनाथ सरकार
६) Rise of Maratha power- न्या रानडे
७) शिवाजी द ग्रेट - डॉ बाळकृष्ण
८) छ. शिवाजी नी त्यांची प्रभावळ- सेतुमाधव पगडी
९) मराठ्यांचे आरमार - भा.कृ. आपटे
१०) शककर्ते छ. शिवाजी महाराज- रियासतकार
११) शिवकाल - डॉ वि.ग खोबरेकर
१२) छ. शिवाजी महाराजांचीं पत्रे- प्र.न.देशपांडे
१३) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे
१४) दगलबाज शिवाजी- के.सी ठाकरे
१५) शिवछत्रपती एक मागोवा-जयसिंगराव पवार
१६) छ. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक- डॉ आह साळुंखे
१७) मोघल मराठा संघर्ष - सेतुमाधव पगडी
Read 4 tweets
Feb 18
शिवसैनिक मित्र मैत्रिणीनो हे वाचा 👇

अनेक जण भाजपच्या सत्तेच्या उधळत्या वारू समोर पाठीचा कणा मोडेपर्यत वाकत आहेत ! उद्धव ठाकरेनाही इतरांप्रमाणे भाजपसमोर झुकून सत्तेचा मलिदा खाण्याची नामी संधी होती; तरी त्यानी परिणामाची पर्वा न भाजपला थेट उलट सलामी दिली ! हीच खरी मर्दांगी आहे
आणि बाळासाहेबानी हेच तर शिकवलय आम्हाला; अन्यायाविरुद्ध पेटुन उठायच, अन्यायाच्या बुडावर लाथ घालायची, भलेही सत्ता गेली तरी चालेल. आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे सत्तेला लाथ मारणारा माणूस आहे मी. आज त्यांचा मुलगाही तेच करतोय ! आणि हे शिवसैनिकांसाठी हे अभिमानास्पद आहे
यांची चोरी आणि गद्दारी लपवण्यासाठी कमळीचे बोंबलभिके ऊठसूट सेनेनं हिंदूत्व सोडल्याच वायफळ शिमगा करतात ! काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं अस असेल तर, त्याच सेक्युलर काँग्रेस राष्ट्रवादीमधून उपरे आणून मूळ भाजपच्या बोकांडी बसवले हे कोणत्या हिंदुत्वात बसत ?
Read 16 tweets
Feb 18
"आज आमचा साधा सरळ संयमी नेता
या छिनाल राजकरणाला फसला,
ह्या भिकार भाजन्यानां सार देऊनही यांनी
आमच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला !

सत्ता बसली गांडीखाली घेऊन सगळ्या संस्था सत्यवचनी धर्मराजा, ह्या कपटी कौरवांच्या म्होर कसा टिकेल तुझा पत्ता 👇
पुन्हा जल्माला आलाय शकुनी हरामजादा ! टाकतोय पापाचे फासे, अन फसतोय धर्मराजा,
म्हणून महाभारत व्ह्यायच थांबणार आहे का

पुन्हा एकदा दूशासन भडवा माजला म्हणून त्याला असाच सोडणार का ? त्याची छाती फाडून त्याच घटाघटा रघत प्यायला भीम थांबणार आहे का ? आता महाभारत व्ह्यायच थांबणार आहे का 👇
पुन्हा एकदा न्यायाचा राजदंड घेऊन आंधळ्या लवड्याची पैदास धृतराष्ट्र बसलाय गादीवर !

धर्माची अन सत्याची गंगा ज्याच्या वाणीतून वाहते, त्या भीष्माच्या तोंडात पडलीय माती !

द्रूपदामाई न्यायाला झाली पोरकी, तिची हाक ऐकेना कुणी, रडून भाकून बडवून घेते छाती 👇
Read 4 tweets
Feb 3
#Thread
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी अनेक इतिहासकारांनी जो त्याग केला त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत ! या सर्व थोर इतिहासाकारांनी, श्री.छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार या थ्रेड मधून आपण पाहू
१) राजेंनी निर्माण केलेल्या राज्याचे नाव ‘हिंदवी स्वराज्य’ असे होते. ते ‘हिंदू स्वराज्य’ नव्हते. हिंदवी याचा अर्थ हिंदुस्थानी. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंद भूमीवरील लोकांचे राज्य. भूमिपुत्रांचे राज्य. असा व्यापक अर्थ या राज्याच्या स्थापनेमागे दडलेला आहे.

- डॉ जयसिंगराव पवार
२) मोगलांच्या अफाट सामर्थ्यापुढे महाराजांचे सामर्थ्य ते काय! पण आपल्या असामान्य बुद्धिचातुर्याने‚ मुत्सद्देगिरीने व रणनीतीने महाराजांनी मोगलांच्या फौजांना अनेकदा खडे चारले. ‘माझ्या देशाचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे’‚ अशी घोषणा दिली

- पद्मभूषण इतिहासपंडित- सेतुमाधव पगडी !
Read 16 tweets
Feb 2
संत श्री तुकोबा १६५० च्या सुमारास देवाघरी गेल्यावर त्यांच्या कुटूंबाची छत्रपती शिवाजी महाराजांनी काळजी घेतली असावी; पण तसे उल्लेख उपलब्ध नाहीत; मात्र छत्रपती शंभुराजेंनी तुकोबांचे पुत्र माहादोबा गोसावी यांचे आदर-काळजी व सोय केल्याचे पत्र उपलब्ध आहे ! खाली देतोय आपल्यासाठी 👇
१९ ऑगस्ट‚ १६८०
‘ माहादोबा गोसावीस वर्शासनाची मोईन’

तुकाराम महाराजांचे पुत्र महादोबा गोसावी यांसी संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिल्याचे पुणे प्रांताच्या सुभेदारास आज्ञापत्र−
श्री प्रति स्वस्तिश्री राज्याभिशेक शके ७ रौद्र संवछर भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति याणी राजश्री विनायेक उमाजी देशाधिकारी प्रांत पुणे यांसी आज्ञा केली यैसीजे-
Read 5 tweets
Feb 1
#शिवकाळ 🚩
१) औरंगजेबाच्या पदरी असलेला भीमसेन सक्सेना हा औरंगजेबबरोबर दक्षिणच्या स्वारीत होता. त्याने शिवाजी महाराजांनी मोगलांबरोबर दिलेल्या लढाया पाहिल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची नोंद आपल्या लिखाणात (दिलकुशात) केल्यावर महाराजांचे गुणवर्णन तो खालीलप्रमाणे करतो.
२) शिवाजी हा एक सत्पुरुष होता. शिपाईगडी म्हणून तो अद्वितीय होता. तो राजनीतीनिपुण होता. एकनिष्ठ सैनिकांना तो जीव की प्राण करी. प्रत्येक मोहिमेत तो आपल्या एकनिष्ठ सेवकांचा सल्‍ला घेई. पण त्याला जी मसलत योग्य वाटे आणि जी योजना पटे ती तो अमलात आणी.
३) तो ती प्रत्यक्ष अमलात येईपर्यंत कुणालाही तिची वार्तासुद्धा लागत नसे. शिवाजी हा अतिशय धूर्त आणि चतुर होता. त्या कला त्याला पूर्णपणे अवगत होत्या. शिवाजी आपले सैन्य चहूकडे पसरवून धामधूम उडवीत असे. शिवाजीपाशी चाळीस हजार घोडे होते. मोहिमेतून मालमत्ता हाती येई ती सरकारांत दाखल करावी
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(