आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८ #AdhaarCard#Update
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली, जी प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे. एका मोठ्या आणि उच्च सिक्युरिटी असलेल्या सोसायटीत अशी घटना घडणं खरोखरच चिंताजनक आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे🧵
रोजच्या सवयीप्रमाणे, सकाळी मुलांना शाळेत जायची वेळ झाली होती. या कुटुंबाने, शाळेचा बसचा पर्याय उपलब्ध असतानाही, आपल्या 7-8 वर्षांच्या मुलासाठी खासगी रिक्षाची व्यवस्था केली होती. या रिक्षाचालकाचं काम होतं, हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत मुलाला नेणं आणि दुपारी परत घरी आणणं.
रिक्षाचालक हा कुटुंबाचा विश्वासू व्यक्ती मानला जात होता, कारण तो गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा देत होता.
मात्र, एका दिवशी रिक्षाचालकाचा फोन आला, “दादा, आज माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे माझा भाऊ मुलाला घ्यायला येईल.” सकाळी रिक्षा नेहमीप्रमाणे आली आणि मुलाला घेऊन गेली.
तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही की तुमचा प्रत्येक श्वास तुमचे आयुष्य घडवत आहे आणि बिघडवतही आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस श्वास घेण्याची योग्य पद्धत जाणत होता. पण आज आपण श्वास तर घेतो, पण चुकीच्या पद्धतीने. मग श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती? समजून घेऊया🧵
आपण थकतो, आजारी पडतो आणि आतून तुटतो फक्त श्वासामुळे.
ही आहे त्या हरवलेल्या कलेची गोष्ट, जी माणसाला सामर्थ्यवान बनवत होती. आणि आता तीच कला तुम्हाला पुन्हा जिवंत करू शकते. फक्त पुढच्या काही मिनिटांसाठी श्वास घ्या लक्ष द्या, कारण तुम्ही जे शिकणार आहात, ते तुमचे आयुष्य बदलू शकते.
जरा मागे जाऊया, खूप मागे. जेव्हा माणूस जंगलात धावत होता, डोंगर चढत होता, नद्यांमध्ये पोहत होता. तेव्हा त्याचे शरीर मजबूत, चेहरा संतुलित आणि श्वास खोल होता. पण मग बदल आला. आपण आराम निवडला, फास्ट फूड, एसी आणि स्क्रीनचे आयुष्य. आणि सर्वात आधी जी गोष्ट हरवली, ती श्वास घेण्याची कला
सध्या इस्राएल आणि इराण यांच्यामध्ये जोरदार युद्ध चालू आहे हा संघर्ष केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे परिणाम भारतावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर होतील. ते कसं काय समजून घ्या 🧵
ही परिस्थिती 1973 मधील तेल संकट परत आणेल? तेव्हाही मध्य पूर्वेतील तणावामुळे संपूर्ण जगाचा आर्थिक तोल ढासळला होता, आणि आताही तसाच धोका निर्माण झाला आहे. तेल, व्यापार, सायबर हल्ले, अण्वस्त्र प्रसार आणि दहशतवाद या सगळ्या गोष्टींवर याचे दूरगामी परिणाम होतील.
इराण - एक इस्लामिक रिपब्लिक आणि इस्राएल - एक ज्यू देश. दोघांमध्ये अनेक दशकांपासून शत्रुत्व आहे. 1979 च्या क्रांतीपूर्वी इराण-इस्राएल संबंध चांगले होते. पण क्रांतीनंतर, इराणने इस्राएलला मान्यता नाकारली आणि इस्लामी कट्टरपंथी धोरण राबवायला सुरुवात केली. यानंतर इराण सातत्याने
सोशल मीडियावर BoycottTurkey ट्रेंड जोरात सुरु आहे. पण हा विरोध नेमका का होतोय, आणि खरंच जर भारतीयांनी टर्कीच्या वस्तू खरेदी करणं व तिकडं फिरायला जाणं बंद केलं तर टर्कीला आर्थिक फटका बसेल का?
हे समजून घेऊया. 🧵
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर टर्कीचे परराष्ट्रमंत्री हाकन फिदान यांनी भारताची ही कारवाई निषेध करून, परिस्थिती बिघडू शकते असा इशारा दिला. या वक्तव्यामुळे भारतीय लोकांमध्ये संताप पसरला.
भारताच्या सीमेजवळ पाडण्यात आलेले काही ड्रोन टर्की बनावटीचे होते, जे पाकिस्तानने भारतावर हल्ल्यासाठी वापरल्याचं उघड झालं. यामुळे टर्की पाकिस्तानला लष्करी मदत करत असल्याचा संशय बळावला.
2023 मध्ये टर्कीमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी भारताने 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत
कोणताही न्यूज चॅनेल न बघता फक्त MEA ची प्रेस ब्रीफिंग सीमेवर आणि दोन्ही देशांमध्ये काय चालू आहे यावर सविस्तर माहिती देते, आजच्या प्रेस ब्रीफिंग चे महत्वाचे मुद्दे 🧵
ही पत्रकार परिषद सकाळी १० वाजता होणार होती, पण ती सायंकाळी ५:३० वाजेपासून सुरू झाली. मुख्य सहभागी होते – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, इंडियन आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी, आणि इंडियन एअर फोर्सच्या विंग कमांडर व्योमिका सिंग.
मुख्य मुद्दे:
1. ऑपरेशन सिंदूर चालूच आहे:
या कारवाईचा उद्देश केवळ दहशतवादी तळांवर हल्ला करणे असून, पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, हे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
सध्या भारतात सोन्याच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की सामान्य माणूस अवाक झालाय. गेले काही महिने सोनं सतत नवे उच्चांक गाठत आहे. नुकताच २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह ₹१ लाखाच्या पुढे गेला आणि यामुळे भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा खळबळ माजली आहे.
सोमवारी सायंकाळी पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१ लाखाच्या वर गेली. खरंतर सोनं ₹97,200 प्रति 10 ग्रॅमच्या दराने विकलं जात होतं, पण त्यावर 3% GST धरला तर किंमत ₹1 लाखच्या पुढे जाते. ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण याआधी कधीच एवढी किंमत झाली नव्हती.
हे फक्त एका वस्तूच्या दरवाढीचं उदाहरण नाही, तर यामध्ये संपूर्ण जागतिक आर्थिक उलथापालथीचं प्रतिबिंब दिसतं. गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, चलन बाजारातील हालचाली आणि जागतिक अस्थिरता यामुळे सोन्याच्या मागणीला उधाण आलं आहे.