आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८ #AdhaarCard#Update
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बायजूच्या CEO ने X वर एक भावनिक पोस्ट शेअर केली, आणि लोकांनी लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी समर्थन केलं, काहींनी दोष दिला. पण नक्की असं काय झालं ज्यामुळे बायजू कंपनी बुडाली आणि रविंद्रन वादाच्या भोवऱ्यात अडकले?
🧵
बायजू एकेकाळी भारतातील सर्वात मोठं एडटेक स्टार्टअप होतं, ज्याची किंमत $22 अब्ज होती. पण आक्रमक आणि फसव्या विक्री तंत्रांमुळे ते ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही धोक्याचं उदाहरण बनलं. 2011 मध्ये बायजू रविंद्रन यांनी ही कंपनी सुरू केली, आणि सुरुवातीला त्यांनी
नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं. पण त्यांचा झपाट्याने झालेला विकास खोट्या आश्वासनांवर उभा होता. याचा मोठा फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसला आणि शेवटी कंपनीच्या अपयशाला कारणीभूत ठरला. अशी कोणती खोटी विक्री आश्वासने या कंपनीने दिली?
बिल गेट्स म्हणाले की, माणसाला आराम मिळावा म्हणून AI त्याची कामं करेल आणि आपल्याला जास्त मोकळा वेळ मिळेल. पण या मोकळ्या वेळाचं करायचं काय? आजही आपल्याकडे बराच मोकळा वेळ आहे, जो आपण सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत, टिव्ही बघत किंवा🧵
काहीच न करता वाया घालवतोय. मग प्रश्न पडतो, आळसावलेली माणसं काय कामाची? नवीन तंत्रज्ञान, खासकरून AI, आपल्याला आळशी बनवतंय का? की हे आपल्या हातात आहे की आपण हा वेळ कसा वापरतो?
संशोधनातून असं दिसतं की, जास्त AI वर अवलंबून राहिल्याने आपल्या मेंदूच्या विचार
करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या २०२० च्या एका अभ्यासात असं आढळलं की, जे लोक जास्त GPS वापरतात, त्यांच्या मेंदूच्या ‘हिप्पोकॅम्पस’ भागात, लक्षणीय घट होते आणि ते रस्ते लक्ष्यात ठेऊ शकत नाहीत.
कालच्या खराब पनीरच्या पोस्टनंतर मॅकडोनाल्ड्सकडून DM आला. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केलं की, त्यांच्या उत्पादनांमध्ये अनलॉग पनीर वापरले जात नाही. पण फक्त एका ब्रँडने हे सांगितल्याने बाकीच्यांचं काय? आणि या पनीरचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचं काय?
🧵
अनलॉग पनीर म्हणजे काय?
अनलॉग पनीर हे दिसायला आणि चविला पारंपरिक पनीरसारखं असतं, पण ते खऱ्या दूधापासून बनलेलं नसतं. यामध्ये वनस्पती तेल (पाम तेल), स्टार्च आणि इतर कृत्रिम पदार्थांचा समावेश असतो.
हे स्वस्त असल्यामुळे अनेक रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड चेन याचा वापर करतात. उदा. खऱ्या पनीरची किंमत सुमारे ₹450 प्रति किलो असते, तर अनलॉग पनीर फक्त ₹210 प्रति किलोमध्ये मिळतं. त्यामुळे व्यवसायिक दृष्टिकोनातून तो फायदेशीर ठरतो, पण ग्राहकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो.
आजही उत्तर भारताकडून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे प्रयत्न सुरूच आहेत का? हिंदी आणि इतर भाषांमध्ये जो वाद आहे तो का आणि कसा सुरू झाला? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 मध्ये पुन्हा हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे आणण्यात आला.
हिंदी शक्ती का? फायदा कोणाला?🧵
26 जानेवारी 1965 – भारताचा 16 वा प्रजासत्ताक दिन! साऱ्या देशात उत्साहाचं वातावरण होतं. पण तामिळनाडूमध्ये तो दिवस रक्तरंजित ठरला. कारण होतं – भाषा!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी हिंदीला राष्ट्रीय भाषा बनवण्याची मागणी केली. 1946 मध्ये
यावर प्रचंड वाद झाला. त्यावेळी मद्रास काँग्रेसचे नेते टी. टी. कृष्णमाचारी यांनी स्पष्ट इशारा दिला.
"दक्षिण भारतात असे लोक आहेत, जे दुसऱ्या फाळणीची मागणी करत आहेत. हिंदीचे जबरदस्तीने लादले जाणे याला आणखी चालना देईल. नेत्यांनी ठरवावं की त्यांना एकसंघ भारत हवा आहे की हिंदी भारत!"
अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल तर आता 10,000 फाइन भरायला तयार रहा. 🧵
महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ने वाहन क्रमांक प्लेट बदलण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वाहन सुरक्षेत वाढ, फसवणुकीला आळा घालणे आणि राज्यभर क्रमांक प्लेट्सचे मानकीकरण करणे.
HSRP अनिवार्य का आहे?
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहने यांना जुन्या क्रमांक प्लेट्सच्या जागी HSRP बसवणे बंधनकारक आहे.
1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांमध्ये आधीपासूनच HSRP बसवलेले असते.
शेवटची मुदत: 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जुन्या वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे.
उन्हाच्या झळा वाढायला लागल्या आहेत, पण ही गरमी अजून किती वाढेल?
यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण असेल का? डेटा आणि हवामान खाते काय सांगते?
समजून घ्या. 🧵
महाराष्ट्रात उन्हाळ्यातील तापमान साधारणतः २२°C ते ४३°C दरम्यान असते.
विदर्भातील (नागपूर, अकोला) तापमान ४७°C पर्यंत जाते, तर कोकण (मुंबई, रत्नागिरी) सागरी प्रभावामुळे तुलनेने सौम्य म्हणजे ३३-३८°C राहते.
पण यावर्षीचा उन्हाळा असाच राहील का?
मागील वर्षी (२०२४) तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
नागपूरमध्ये ४५°C+, मुंबईत ३९°C आणि कोकणात उष्णता व दमट हवामान जाणवले.
२०२४ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस (२१% ते ८१% जास्त) झाला होता, ज्याचा परिणाम २०२५ च्या उन्हाळ्यावर होऊ शकतो.