आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८ #AdhaarCard#Update
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सोशल मिडियाने एक पूर्ण जनरेशन घडवली आणि बिघडवली देखील, तसेच जी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे ती भविष्यातील पिढ्यांवर काय परिणाम करू शकते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यावर झालेले रिसर्च आणि अहवाल याच भविष्याबद्दल बोलतात, जाणून घेऊया.
World Economic Forum च्या 2020 च्या "Future of Jobs Report" नुसार, 85 दशलक्ष नोकऱ्या AI आणि ऑटोमेशनमुळे नष्ट होतील, तर 97 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील. मात्र, हा बदल सहज होणार नाही आणि अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होऊ शकते.
AI उच्च-कौशल्य असलेल्या नोकऱ्याही स्वयंचलित करू शकतो. PwC च्या 2017 च्या अहवालानुसार, वित्त, कायदा आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही उच्च-भुगतानाच्या नोकऱ्यांवर AI चा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गरीब आणि श्रीमंत यातील दरी वाढू शकते.
काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत किमान १५ जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये अनेक स्त्रिया आणि लहान मुले होती. महाकुंभ साठी निघालेल्या या भाविकांच्या मृत्यूचा जबाबदार कोण? का चेंगचेगारी हा पुन्हा पुन्हा कित्येक लोकांच्या मृत्यूचे कारण बनतं?
दुर्घटना कशी घडली?
महाकुंभसाठी जाणाऱ्या भाविकांमुळे प्लॅटफॉर्मवर क्षमतेपेक्षा अधिक लोक एकत्र झाले. दोन विशेष गाड्या उशिरा धावत असल्याने लोकांना प्लॅटफॉर्मवर तासन्तास थांबावे लागले, ज्यामुळे तणाव वाढला.
इतक्या मोठ्या गर्दीचे नियोजन नव्हतेच.
काही लोक बेशुद्ध पडल्यामुळे घबराट पसरली, आणि त्यामुळे अचानक धावाधाव सुरू झाली.
आणि हा गोंधळ चेंगचेंगरीत बदलला.
या दुर्घटनेनंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. दिल्ली पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (RPF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
एकेकाळी स्वतंत्र, शांत, आणि आध्यात्मिकतेने नटलेले तिबेट आता एका संघर्षाचे प्रतीक बनले आहे. या भूमीच्या मोकळ्या रस्त्यांवर, लामा भिक्षूंनी चालवलेल्या मठांमध्ये, आणि थंड वाऱ्याच्या झुळुकांमध्ये इतिहासाच्या खोल जखमा दडलेल्या आहेत.
हे का झालं? चीनने कश्याप्रकारे तिबेट काबीज केलं?
१९४९ साली चीनमध्ये माओ झेडॉन्ग यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी क्रांती झाली आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झाले.
तिबेट १९१२ ते १९५० या काळात स्वतंत्र होता स्वतःची सरकारव्यवस्था, चलन, सैन्य, आणि आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या या भूमीवर नव्याने जन्मलेल्या या चीनने नजर टाकली.
७ ऑक्टोबर १९५० रोजी चीनने तिबेटमध्ये प्रवेश केला. अत्यंत कमी शस्त्रास्त्रे आणि सैनिक असलेल्या तिबेटी सैन्याला झुंज देता आली नाही. फक्त १८ दिवसांत चामडो येथे झालेल्या युद्धात तिबेटचा पराभव झाला. चीनने सतरा कलमी करार (Seventeen-Point Agreement) तिबेटी नेत्यांवर लादला.
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सतत घसरत आहे आणि सध्या तो ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रुपयाने 86.65 चा स्तर गाठला, आणि आशियातील सर्वात खराब प्रदर्शन करणारा चलन ठरला आहे.
पण असं का होतंय? यामागची कारण समजून घ्या.
रुपयाचे मूल्य आर्थिक घटकांवर अवलंबून असते.
आयात-निर्यात असंतुलन
भारताचा व्यापार तुटीचा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये $26.83 अब्जांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलासह अन्य महत्त्वाच्या वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी वाढते, परिणामी रुपयाचे मूल्य कमी होते.
कच्च्या तेलाचा खर्च: भारत 80% कच्चे तेल आयात करतो, आणि ब्रेंट क्रूडची किंमत $75.22 प्रति बॅरलपर्यंत गेल्याने आयातीचा खर्च वाढला आहे.
इतर वस्तूंच्या किंमती: इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि रसायने यांसारख्या वस्तू महाग झाल्याने डॉलरच्या मागणीत वाढ होत आहे.
बऱ्याच वर्षांनी छत्रपती महाराजांचा इतिहास, साहस आणि रहस्य यांवर भाष्य करणारी काल्पनिक पण इतिहासाची जोड असलेली एक सुंदर वेबसीरिज काल बघितली, ती म्हणजे 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्स'
ही वेबसिरिज सर्वांनी बघितली पाहिजे का? काय आहे या वेबसिरीज मध्ये? जाणून घ्या या थ्रेड मधून
Hotstar वर प्रदर्शित झालेली ही वेबसीरिज इतिहास, साहस आणि रहस्य यांचा उत्तम संगम साधते, 31 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून, ती डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या ‘प्रतिपश्चंद्र’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे
राजीव खांडेलवाल, सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसीरिजचे कथानक सुमारे 3 तास 40 मिनिटे (6 एपिसोड्स, प्रत्येकी 30-40 मिनिटे) चालते.