😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture
The_Young_Guns_Of_INDIA🇮🇳

May 19, 2022, 9 tweets

मधुबाला चट्टोपाध्याय✨

मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९
#anthropology

काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९

स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या

असे करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.त्यावेळी anthropology serve of India शी reaserch associate म्हणून निगडित होत्या.M.V.Tarmugli या स्थानिक प्रशासनाच्या जहाजांतून १३जणांचे पथक अखेर रवाना झाले.जहाजातून ते एका छोट्याश्या बोटीतून किनाऱ्याजवळ गेले असता.भेटीसाठी त्यांनी
४/९

समुद्राच्या पाण्यावर नारळ फेकून आदिवासींशी संपर्क करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला.त्यावेळी त्या बेटावरुन आलेल्या लोकांनी ते नारळ गोळा करून नेले आणि ह्यांना संदेश मिळाला असे वाटले.जेंव्हा दुसऱ्यावेळी पथक त्याठिकाणी गेले तेंव्हा एका आदिवास्याने मधुमाला यांच्यावर धनुष्यबाण रोखला

तेंव्हा तिथल्या आदिवासी महिलेनं तो बाण खाली करायला सांगितल्यामुळे त्या बचावल्या.ही पण भेट अर्धवट झाली,पुन्हा तिसरी भेटीची तयारी सुरू झाली. तेंव्हा त्यांच्या विषयी थोडा आत्मविश्वास आलेला होता.वरील सगळ्या प्रसंगावरून न डगमगता सगळे पाण्यात उतरले व त्यांनीं स्वतःच्या हातांनी यांना

नारळ भेट दिले.अश्या४मोहिमे नंतर आणखी मोहिमा करण्यास भारत सरकारनं नंतर बंदी घातली. बाहेरील लोकांच्या मुळे त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून बंदी घातली हा त्यापाठीमागे उद्देश होता. मधूमाला यांनी सांगितले की "त्यांना बाहेरच्या जगाच्या कोणत्याही मदतीची गरज नाहीये."ते त्यांच्या

जगात खूष आणि सुरक्षित आहेत.त्यांना केवळ एकटे सोडणे हेच गरजेचे आहे. मधुमाला यांनी ओंग किंवा आपण त्यांना जरावा म्हणू शकतो.या आदिवासींची भेट घेऊन त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले.१९९१ ते ९९ याकाळात त्यांनी अनेकवेळा याआदिवासींची भेट घेतली.त्यांना घरी नेऊन
८/९

खाऊ पिऊ घालून,तेथील महिलांना बहिणी सारखी वागणूक दिली.

महत्वाकांक्षेने जगणारी लोकं ही अशीच असतात.त्यांच्या विचारात फक्त त्यांचे धेय्य असते.वयाच्या १२व्या पाहिलेलं स्वप्न अखेर त्या दिशेनेच वाटचाल करून पूर्ण ही केलं.

अश्या या महत्वकांक्षी महिलेला हृदयपुर्वक नमन:

#मोटाभाई 😎🇮🇳🚩🤟🏻

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling